Skip to main content

१४ ऑगस्ट २०१६

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 14/08/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं.... सुचलं तेव्हडं लिहावं दिसलं त्तेव्हडं वाचावं रुचलं तेव्हडं ऐकावं आवडलं तेव्हडं बोलावं विचारलं तेव्हडं सांगावं दिलं तेव्हडं घ्यावं पचलं तेव्हडं खावं जमलं तेव्हडं चालावं जीवन तृप्त असावं आणि कुणी म्हटलं तसं "ह्या जन्मावरं ह्या जगण्यावरं शतदा प्रेम करावं" शुभेच्छा देण्यार्‍यांचे आणि न देण्यार्‍यांचेही आभार. श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

आयुष्य

लेखक अभिषेक पांचाळ यांनी रविवार, 14/08/2016 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात सुख दुःख , जणू किनाऱ्याची लाट गुलाबाच्या छोट्या छोट्या , झाडांची ती वाट कधी दुःखाची ती ओहोटी , कधी सुखाची भरती कधी वास त्या फुलाचा , कधी पाय काट्यावरती आता दुःख म्हणून रडायचं , कि सुखी होऊन हसायचं फुल ठेवून बाजूला , नुसतं काट्यातच पडायचं निर्णय आपलाच , कसं आयुष्याकडे बघायचं सारं आपल्या हाती , कसं आयुष्य जगायचं - अभिषेक पांचाळ

मी आयफोन-कर

लेखक विश्वेश यांनी रविवार, 14/08/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला कोण व्हायचे आहे आयफोन-कर, एनड्रोइड-कर कि विंडोज-कर ... आता तुम्हाला आयफोन-कर व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही. पण मुख्य सल्ला असा, की पुन्हा विचार करा अगदी आग्रहच असेल, तर मात्र कंबर कसून तयारी केली पाहिजे, आणि एकदा तयारी झाली, की त्या सारखी मजा नाही ,तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक फोन च्या फिचर वरून मतभेद करायला शिका. म्हणजे आपल्या फोन मध्ये आहे का, आपल्या फोनमधील फिचरचा दर्जा काय, एकूण उपयोग काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.

कॅनव्हास

लेखक विश्वेश यांनी रविवार, 14/08/2016 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
गेले अनेक दिवस तुझे नि माझे रंग एकमेकात मिसळतो आहे मी … मला माहिती नव्हते कि सगळे रंग एकत्र आले कि बनतो तो काळा रंग … आता चाचपडतो आहे त्या अंधारात शोधत तुझ्या त्या वेगवेगळ्या छटा … तुझ्या डोळ्यांचा निळा त्या अधरांचा गुलाबी अन तुझ्या हातातल्या गुलमोहराचा लाल … खूप वेळा पुसायचा प्रयत्न केला स्वताला, स्वताच्या रंगांना पण, सगळे इतके गडद झाले आहे कि … पुसताना भीती वाटते आता, कॅनव्हास फाटण्याची … किंवा पुन्हा पांढरा पडण्याची … नकोच ते .... - विश्वेश
काव्यरस

आशय - भाग ४

लेखक किंबहुना यांनी शनिवार, 13/08/2016 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आणि भाग १ आशय - भाग २ आशय - भाग ३ दहावीच्या क्लासच्या काळात आम्ही सगळे जिथे रहायचो तिथे एक भयानक किस्सा घडला. व्हेकेशन क्लास संपत आलेला असताना म्हणजे साधारण २०-२१ मेच्या दरम्यान पाउस पडला. अम्ही जिथे रहायचो तिथे नारळाच्या बागेला पाणी पुरवण्यासाठी एक विहीर होती, त्या विहीरीवर एक पंप होता. त्या पंपाला नेमके शॉर्टसर्किट झाले, आणि करंट पंपाच्या लोखंडी पाईपातून आजूबाजूच्या जमिनीत पसरला होता.

कठोपनिषद (२)

लेखक शरद यांनी शनिवार, 13/08/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

सेकंड लाईफ - भाग ४

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 13/08/2016 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ -------------------------------------------------------------------- देहाने मुंबईला आलो होतो मात्र मन वडगावमधेच होतं. पुढच्या शनिवार चे वेध लागले होते. माझं असचं आहे. अगदी त्या 'हा छंद जीवाला लावी पिसे' गाण्यासारखे. एख्याद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर मला रात्रंदिन तेच आठवत राहते. अगदी स्वप्नदेखील त्याच गोष्टीची पडतात. पण मला जपायला हवे होते. ऑफीसमधे तर कोणाच्या लक्षात येणार नव्हते.

हरवलेलं विश्व (भाग ५)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 13/08/2016 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836 हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891 हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920 हरवलेलं विश्व (भाग ४): http://www.misalpav.com/node/36944 भाग ५ "मॅडम आपण पोहोचलो आहोत." अचानक करकचुन ब्रेक मारत राजेश म्हणाला. जयु योगानच्या त्या गोष्टीत; किंबहुना रियोच्या दुःखात इतकी गुंतली होती की लागलेल्या ब्रेकमुळे ती एकद

रूस्तम

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 13/08/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा. युद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो.

हॉस्टेलः एक लढा! भाग २

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 13/08/2016 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
इतकं सोप्पं होतं??? नक्कीच नाही... ------------------------------------------------------- लढा छोटा असो वा मोठा, काही गणितं, प्रमेये निर्विवाद अबाधित असतात. मसलपावर, ब्रेनपावर, योग्य वेळी योग्य चाली खेळण्याची समज आणि अचूक निर्णयक्षमता लागतेच लागते! पण बंधो एवढ्याने भागत नाय. समोरचाही ही सगळी जंत्री घेउनच मैदानात उतरलेला असतो. तेव्हा काय? पिरातै म्हणाल्या, 'फिल्मी वाटतंय'. खरंच आहे. आहेच हे फिल्मी. पण फिल्म आणि प्रत्यक्ष जीवनात एक म्होट्टा फरक आहे. कथाकार एक ध्येय ठरवून लिहितो, एक तत्त्वज्ञान जिंकावं अशा हेतूने मांडणी करतो. प्रत्यक्ष जीवनात असे एकांगी बुद्धीबळ नसते.