मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युध्द : जागतिक अर्थव्यवस्थे ची गरज ?

वडिल ·

या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण चर्चा (विशेषतः अर्थशास्त्राच्या अंगाने जाणारी) झाली तर वाचायला आवडेल. युद्धं ही बरेचवेळा अर्थकारणाधारित असतात असे नेहमीच म्हणले जाते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रदीप 23/12/2010 - 18:28
म्हणतो. युद्धे अर्थव्यवस्थेस चालना देतात असे समजले जाते. तेव्हा धाग्याच्या गाभ्याशी सहमत आहे. भारत युद्धसामग्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे, म्हणून अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आपल्याला ती विकण्याची बरीच खटपट करीत आहेत हेही खरेच (पण १. भारताच्या ह्या बाजारातील मोठेपणाविषयी आणि २. हे देश हे मोठे गिर्हाईक टॅप करण्यासाठी येत आहेत ह्या दोन्हीत गैर काय आहे हे नेमके समजले नाही). तसेच चीन माझ्या माहितीप्रमाणे भारतास कुठलीही युद्दसामग्री विकण्याचे प्रपोजल घेऊन आला नाही. माझी माहिती चुकीची असेलही, कदाचित!! वडील ह्यांनी एका प्रतिसादात लिहीले आहे की "कोरीयात युध्द झाले तर ते अमेरीकेच्या खुप फायद्याचे आहे". खरे आहे, कारण द. कोरीया अमेरिकेन युद्धसामग्रीचे मोठेठे गिर्हाईक आहे. पण सध्या कोरियन पेनिन्सुलात नेमके कोण युद्धखोरी करते आहे? उ. कोरिया की द. कोरीया? माझ्या माहीहीनुसार अलिकडे उ. कोरीयाने दोन मोठ्या आगळिकी केल्या --पहिली मार्चच्या महिन्यात द. कोरीयाच्या आरमारचे एक जहाज त्याने टॉर्पेडो करून बुडवले, त्यात द. कोरीयाच्या ४६ नौसैनिकांना जलसमाधि मिळाली. तरीही द. कोरीया शांत राहिले. मग अलिकडे नोव्हेंबरात उ. कोरीयाने द. कोरीयाच्या एका बेटावर विनाकारण तोफांचा मारा केला. द. कोरीयाने मग अमेरिकेसमवेत स्वतःच्या हद्दीतच काही युद्धसराव केला. उ. कोरीयाची ही खेळी अत्यंत घातक होती-- १९५३ नंतर इतकी युद्धसदृष्य परिस्थिती मधे कधीही निर्माण झाली नव्हती असे निरीक्षक म्हणतात. आता वडिल ह्यांच्या अनेक कॉन्स्पिरसी थेयरींनुसार इथेही अमेरिकेची उ. कोरीयास युद्धाचे आवाहन करण्यासाठी फूस होती असले काही असेल, तर गोष्ट वेगळी !!

In reply to by प्रदीप

वाहीदा 24/12/2010 - 23:45
कधी ना कधी अमेरिका अन उ. कोरियाचे युध्द होणार हे नक्की वडिल यांच्या धाग्यातिल बर्‍याचश्या विचांराशी सहमत

In reply to by वाहीदा

प्रदीप 25/12/2010 - 08:56
तसे कधाचित होईलही, कोण जाणे! वडिल ह्यांच्या लेखात ते म्हणतात की 'अर्थव्यवस्थे ला चालना मिळावी म्हणुन हे [मोठे] देश युध्द शस्त्रांचा खप वाढवण्या साठि काय काय करतील हे सांगता येत नाहि. कोरीया, भारत - पाकिस्तान , अफ्रिकेतील अनेक देश हे असल्या राजकारणाला बळि पडतील. जगात कुठे हि युध्द झामेरीकेला त्याचा आर्थिक लाभ होतो. वर वर जरी अमेरीका स्वत: ला शांतिदुत भासवत असला तरी स्वत: च्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थे ला वाचवण्या साठि युध्द घडवुन आणणे हे अमेरीकेच्या फायद्याचे आहे असे वाटते'. थोडक्यात मला ह्यावरून जे उमगले ते असे की मोठे देश छोट्या देशांना युद्धसामग्री विकून व नंतर इतर राजकीय खेळी करून युद्धे करण्यास प्रवृत्त करतात ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळते. ह्या सर्वसकट विधानाबदल मीही सहमती दर्शवली आहेच. पण कोरीया ह्या गेमप्लॅनमधे किती बसते असे मी विचारले आहे. कारण कोरीयातील सध्याच्या परिस्थितीनुसार आगळीक उ. कोरीयाकडूनच होतांना दिसते. तिच्या अधूनमधून आगळीकी फक्त द. कोरीयासच नव्हे तर जपानलाही बर्‍याच त्रास देणार्‍या असतात. तेव्हा मोठ्या (पक्षी: अमेरिका, ब्रिटन, फ्रांस इ. नेहमीचे कल्प्रिट्स) देशांनी इथे युद्ध व्हावे म्हणून नक्की आत काय केले आहे ते सांगावे हा माझा प्रश्न आहे. का इतरस्त्र वडिल ह्यानी लिहीलेल्या कॉन्स्पिरसी थेयरीप्रमाणेच इथेही अमेरिकाच उ. कोरीयास फूस लावत आहे?

वडिल 22/12/2010 - 16:20
कोरीयात युध्द झाले तर ते अमेरीकेच्या खुप फायद्याचे आहे. त्यामुळे अमेरीकेचा कोरीया भागात दबदबा वाढेल. चीन सहजा सहजी अशा युध्दात भाग घेणार नाहि. पुढिल युध्दांच्या तयारी साठि आणि युध्द सामग्री साठि हे युध्द टेस्टिंग ग्राउन्ड ठरु शकते.

महमन्दि नन्तर महयुध्ह झाले म्हनुन असे म्हनले जाते परन्तु हे एक मिथक आहे आसेहि म्हनतत.हे मिथक 'broken window fallacy'ह्या नावाने ओलखतत आसे कुथेतरि वचल्यचे आथवते

महमन्दि नन्तर महयुध्ह झाले म्हनुन असे म्हनले जाते परन्तु हे एक मिथक आहे आसेहि म्हनतत.हे मिथक 'broken window fallacy'ह्या नावाने ओलखतत आसे कुथेतरि वचल्यचे आथवते

In reply to by नितिन थत्ते

वडिल 22/12/2010 - 22:40
नितिन जी, ओरवील नी जे लिहिलं आहे ते आपण आपल्या जगात आत्ता बघतो आहोत. मिडिया द्वारे एखादा विचार ५०% लोकान मधे जरी पसरवला तरी ते सत्य म्हणुन खपुन जातो. ह्यालाच प्रॉपोगन्डा असे म्हणतात. अमेरीका असल्या प्रकारात माहिर आहे. अल कायदा... अल कायदा करत जगभर सैन्य पाठवणे, कृत्रीम टंचाई निर्माण करणे ( सोने, तेल, कमोडिटिज इ), जगभरातील रीसोर्सेस( ह्युमन,कमोडिटिज) स्वतःकडे एकत्र करणे, युध्द घडवुन आणणे इ... हे सगळे प्रॉपोगन्डा तंत्र आहे.

In reply to by डीलर

वडिल 24/12/2010 - 16:04
डिलर जी, मतितार्थ असा आहे कि अमेरीका आणि युरोप या मधील अर्थ युध्दात भारत हा एक प्यादे म्हणुन खेळवला जाणार. आपल्याकडे मान्युफाकच्यरींग नाहि इन्फ्रास्ट्रकचर नाहि, सर्व गोष्टि आयात कराव्या लागत असल्या मुळे रुपया ला बाइंग पावर मिळणार नाहि असे वाटते. इन्फ्लेशन वाढत आहे... ( कांदा !) कमोडिटिज चा तुडवडा त्यामुळे आणि निर्याती मुळे अजुन इन्फ्लेशन. भारत स्वत: ला विकुन काय खरेदि करतो आहे ... तर युध्द सामग्री !

In reply to by वडिल

प्रदीप 24/12/2010 - 17:13
अमेरिका आणि युरोप ह्यांच्यात सध्या कसले अर्थयुद्ध चालले आहे? आणि त्यात भारत प्यादे खेळवले जाणार म्हणजे नेमके काय व कसे?

In reply to by प्रदीप

वडिल 24/12/2010 - 22:24
प्रदिप, अमेरीके च्या डॉलर मधे जागतिक व्यापार चालतो. युरोपीय देशांनी मिळुन युरो हि करन्सी गेल्या दशकात सुरु केली. इग्लंड अजुन पाउन्ड मधेच व्यवहार करतो. युरोपात अनेक देश कफल्लक आहेत ( ग्रीस ,पोर्तुगाल....) जर युरो मधे जगानी व्यवहार केले नाहित तर युरो ला काहिहि मागणी रहाणार नाहि आणि भाव घसरुन अर्थव्यवस्था अजुन कोलमडेल. त्यामुळे युरोप ( युरो) आणि अमेरीका ( डॉलर) आप आपल्या करन्सी मधे जास्तित जास्त व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्या त्या करन्सी ची मागणी जग भर वाढेल. चीन , रशिया आणि युरोपिय देश जास्तित जास्त व्यवहार युरो मधे करुन अमेरीके ला (डॉलरला) शह देत आहेत.

In reply to by वडिल

क्लिंटन 25/12/2010 - 00:54
युरोपात अनेक देश कफल्लक आहेत ( ग्रीस ,पोर्तुगाल....) जर युरो मधे जगानी व्यवहार केले नाहित तर युरो ला काहिहि मागणी रहाणार नाहि आणि भाव घसरुन अर्थव्यवस्था अजुन कोलमडेल.
नाही हो ते कारण नाही.खरे कारण आहे ग्रीस आणि इतर देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेत घातलेला सावळागोंधळ.ग्रीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बेसुमार सवलती दिल्या गेल्या आणि अनेक पांढरे हत्ती पोसले.त्यातून सरकारचे उत्पन्न आणि खर्च यातील फरक असलेले फिस्कल डेफिसिट वाढले.युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी ३% डेफिसिट असा नॉर्म असताना ग्रीसचे डेफिसिट १०% पेक्षा जास्त झाले.यातूनच ग्रीस सरकार त्यांच्या बॉंडवरील व्याज आणि मुद्दल यावर डिफॉल्ट करेल अशा अवस्थेला पोहोचले.युरोपातील इतर देशांतील बॅंकांनी ग्रीस सरकारचे बॉंड मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते.तेव्हा ग्रीस सरकारने डिफॉल्ट केल्यास या सगळ्या बॅंका अडचणीत येणाऱ्यातल्या होत्या.यावर उपाय म्हणजे जर्मनी आणि युरोपीयन युनियनला ग्रीससाठी तातडीचे पॅकेज जाहिर करावे लागले.देशातील सरकार बॉंडवर डिफॉल्टपर्यंत पोहोचणे याची निशाणी असते त्या बॉंडवरील यिल्ड (व्याज) वाढणे.एकदा सरकारी बॉंडवरील व्याज वाढले की अर्थव्यवस्थेतील व्याजाचे इतर दरही वाढतात.व्याजाचे दर वाढले की त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट पर्णाम होतो.तसेच इंटरेस्ट रेट पॅरिटीप्रमाणे व्याजाचे दर वाढले की त्या चलनाचे अवमूल्यन होते. युरोपातील देशांचे चलन एकच असल्यामुळे आणि मुख्यत: त्यांच्या अर्थव्यवस्था इंटिग्रेटेड असल्यामुळे व्याजाचे दर हे पूर्णपणे त्या देशातील सरकारच्या हातात राहत नाहीत. एका युरोपीयन देशातील व्याजाच्या दरांवर इतर देशांतील परिस्थितीचाही परिणाम होतो.आणि हा प्रश्न केवळ ग्रीसपुरता मर्यादित नाही.तर पोर्तुगाल,इटली,आयर्लंड आणि स्पेन या इतर देशांमध्येही हाच प्रश्न आहे.मध्यंतरी आयर्लंडमध्येही ग्रीससारखे पॅकेज द्यावे लागले.तीच वेळ पुढील २-३ वर्षात पोर्तुगाल,इटली आणि स्पेनवर येणार हे नक्कीच. तेव्हा अशा परिस्थितीत पूर्ण युरोझोनमध्ये हा प्रश्न पसरला आणि म्हणून युरोची पडझड झाली.मूळ कारण सगळ्या जगाने युरोत व्यवहार न करणे हे नाही तर त्या देशांमधील अर्थव्यवस्था वाईट पध्दतीने हाताळली हे आहे. भारतीय रुपयात पूर्ण जगातील १% व्यवहारही होत नसतील.मग तुम्ही म्हणता त्या न्यायाने भारतीय रूपया किती गडगडायला हवा.
चीन , रशिया आणि युरोपिय देश जास्तित जास्त व्यवहार युरो मधे करुन अमेरीके ला (डॉलरला) शह देत आहेत
चीनने प्रचंड प्रमाणावर अमेरिकन डॉलर आपल्याकडे ठेवले आहेत आणि चीनची परकीय चलन गंगाजळी प्रचंड प्रमाणावर आहे.साधारण ३-४ वर्षांपूर्वी चीनने स्वत:चा "सार्वभौम फंड" (Sovereign Wealth Fund) स्थापन केला.२००७ मध्ये चीनच्या फंडने काही अमेरिकन बॅंका आणि मुख्य म्हणजे मॉर्गन स्टॅनले सारखी इन्व्हेस्टमेन्ट बॅंक यांच्यात गुंतवणूक केली आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला काही प्रमाणावर तरी स्थैर्य दिले.याचे कारण अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळणे सध्या तरी कोणालाच परवडणार नाही.तेव्हा जास्तीत जास्त व्यवहार युरोत करून डॉलरला शह देणे म्हणजे तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? आज जगाचे जीडीपी सुमारे ५८ ट्रिलियन डॉलर्स आहे त्यापैकी अमेरिकेचा वाटा आहे सुमारे १६ ट्रिलियन डॉलर्स आणि चीनचा सुमारे ५.५ ट्रिलियन डॉलर्स.तेव्हा आजही इतक्या अडचणी येऊनही अमेरिकेची अर्थव्यवस्था चीनपेक्षा तीनपट मोठी आहे.आणि चीनच्या जीडीपीच्या सुमारे २३-२४% भाग हा निर्यातीवर अवलंबून आहे.जर अमेरिकेसारखी मोठी अर्थव्यवस्था कोसळली तर त्याचा फटका चीनलाही बसणारच आहे.तेव्हा चीनने कितीही वेगाने प्रगती केली आणि अमेरिकेत कितीही अडचणी आल्या तरी आणखी १० वर्षे तरी चीन डॉलरला शह वगैरे द्यायच्या भानगडीत पडणार नाही असे मला वाटते.नंतरचे सांगता येत नाही. असो.

In reply to by क्लिंटन

वडिल 25/12/2010 - 02:25
क्लिंटन साहेब, माझा वरचा प्रतिसाद हा फक्त ढोबळ अर्थाने डॉलर /युरो च युध्द समजावुन सांगण्या पुरता होता. ह्या धाग्याचा मुख्य विषय युध्द हे अर्थकारणा ची आवश्यकता आहे का नाहि असे आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे ( पण लांबलचक अ‍ॅनालिसिस आहे). नेल फर्गुसन चे पुस्तक तुम्हि वाचलेले दिसते. दोन देशांमधे व्यवहार हा कुठल्याहि चलनात होउ शकतो ( अगदि मीठ, फुलं इ मधे सुध्दा). गेल्या आठवड्यात तर चीन आणि रशिया नी रुबल आणि युआन मधे संरक्षण विषयक करार केला. त्या मुळे युरो आणि डॉलर वरुन डिलिवरेजींग / हेजींग करण्याचे अजुन एक टुल मिळाले. डॉलर आणि युरो ची मागणी हळु हळु कमी झाली म्हणजे हेजींग /डि रिस्किंग ला मोठा स्प्रेड मिळेल आणि इकॉनॉमी सेग्रिगेट होइल ( बहुदा) चीन अमेरीकेला शह देणार नाहि हा मुद्दा अगदि बरोबर आहे. अमेरीका हि चीन ची सर्वात मोठि बाजारपेठ आहे. अमेरीका आणि चीन चे लग्न हे ह्या जन्माचे आहे. चीन ची सर्व असेटस अमेरीकेत आहेत ( बॉन्डस). १९ जानेवारी ला हु आणि ओबामा ची महत्वाची राजकिय भेट आहे. बघु तेव्हा काय होते ! ह्या सर्व खेळात आत्ता तरी रशिया आणि रुबल ला महत्व आले आहे. (RIC) + B पण चीन हा लंबी रेस का घोडा आहे. क्लिंटन साहेब तुमच्या अमेरीकेला इतक्यात मरण नाहि. काळजी करु नका चीन तुमचे सर्व लाड पुरवेल. व्य नी नी अधिक बोलु.

In reply to by वडिल

प्रदीप 25/12/2010 - 08:36
सध्या युरोची जी धडपड चालली आहे, त्याचे कारण युरोतील किनारी (पेरिफरी)तील [ग्रीस, पोर्तुगाल, हंगेरी] देशांच्या तसेच थोड्याबहुत मुख्य काही [स्पेन, फ्रान्स, इटली] देशांची आर्थिक मिसमॅनेजमेंट हे आहे, आणि 'डॉलर युद्धा'शी त्याचा काहीही संबंध नाही. क्लिंटन ह्यांनी हेच इथे सविस्तर विशद केले आहे, तेव्हा उगाच 'माझे विधान ढोबळ स्वरूपाचे होते' अशा प्रकारची सारवासारव करू नये. तसे विधान आपण का केले होतेत हे आपल्याकडून समजावे ह्यासाठीच मी तुम्हाला प्रस्न विचारले होते. तसेच 'चीन , रशिया आणि युरोपिय देश जास्तित जास्त व्यवहार युरो मधे करुन अमेरीके ला (डॉलरला) शह देत आहेत' अशी (ज्याला तुम्ही ढोबळ म्हणाल बहुधा) सुरूवात करून आता तुम्ही 'चीन अमेरीकेला शह देणार नाहि हा मुद्दा अगदि बरोबर आहे' इथवर आला आहात! युरोमधील देशांशी व्यवहार करतांना चीन युरोमधे करत आलेला आहे, त्यात नवे काही नाही. तेव्हा जे 'जास्तीत जास्त' वगैरे कोठून आले? वास्तविक आर. एम. बी. हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीचे चलन व्हावे ह्यासाठी चीन तयारी करीत आहे. त्यादृष्टिने त्याने काही पाउले उचलली आहेत. पण ह्याला बराच अवधि लागेल असे तज्ञ्यांचे म्हणणे आहे. नियाल फर्गुसनच्या पुस्तकाची अगदी अलिकडील आवृत्ति मजजवळ आहे. त्यात २००८ च्या फायनॅन्शियल त्सुनामीपर्यंतचा आढावा आहे. युरोची धडपड गेल्या वर्षांत ग्रीसपासून सुरू झाली आहे. चर्चा सुरू करतांना व नंतरही भोंगळ , ऊडती विधाने नसावीत, माहितीपूर्ण व चोख असावीत अशी किमान अपेक्षा मी तरी करतो.

In reply to by प्रदीप

वडिल 25/12/2010 - 11:43
प्रदिप, एका ओळीचा प्रश्न विचारला म्हणुन ढोबळ उत्तर दिले. ह्या धाग्या चा रोख युरोपातील समस्या हे नाहि. युरोपात जे होते आहे त्याला डेट क्रायसीस असे म्हणतात हे तुम्हि फर्गुसन च्या पुस्तकात वाचले असेल. पण... ते सोडवण्या साठि युरोप युरो मधे कर्ज न घेता अमेरीकेच्या फेडरल रिजर्व कडुन (डॉलर) कर्ज घेत आहेत हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे इलेक्श न च्या दुसर्या दिवशीच क्वान्टिटेटिव इजींग ... म्हणजे थोडक्यात डिवाल्युएशन ( नोटा छापणे). आजची समस्या उद्दावर ढकलण्या सारखे. त्या मुळे बॉन्ड नोटस कोसळल्या आहेत. नाहितर युरो आणि युरोपिय अर्थव्यवस्था आत्ताच गडगड्ली असती आणि ब्लॅक क्रिसमस दिसला असता. असो. युद्ध करुन अर्थकारण सुधारता येउ शकेल का नाहि आणि तो पर्याय कोण , कधि आणि कुठे वापरेल हे ह्या धाग्याचा विषय आहे. तुम्हि नाय्ल फर्गुसन चे पुस्तक वाचुन आहात हि आनंदा ची गोष्ट आहे. तुम्हि आता ब्लॅक स्वान (निस्सम तालेब) आणि माइक तायब्बी च जे काहि मिळेल ते सर्व वाचा. तुमच्या उत्तर कोरीया बद्दल च्या प्रश्वाचे उत्तर हे तुम्हाला बिल रिचर्डसन ( माजी कॉमर्स सेक) नक्कि देइल.. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे.. जी २० च्या वेळी व्यापारीक करार न करण्याचे धाडस जेव्हा द कोरीया नी दाखवले तेव्हा युध्दा ची भिती दाखवली गेली.. आणि नंतर काहि दिवसात हवा तसा करार अमेरीकेला मिळाला. अमेरीकेच्या सेवन्थ फ्लिट बद्द्ल तुम्हि नक्की वाचा. संडे मॉर्निंग शोज हि अमेरीकेची सर्वात प्रभावी प्रोपगन्डा मशीनरी आहे. तिकडे जास्त लक्ष देउ नका हिच विनंती ! तुमचा लिहिण्याचा रोख हा माझ्यावर हल्ला करण्याचा दिसतो. तुम्हि प्रश्व विचारणयात विद्वान आहात त्या मुळे मी उत्तरे नक्कि देइन . टाइप करायला वेळ मात्र लागेल. तो पर्यंत अशिच चांगली पुस्तके घ्या आणि वाचाहि

In reply to by वडिल

प्रदीप 25/12/2010 - 12:43
पण... ते सोडवण्या साठि युरोप युरो मधे कर्ज न घेता अमेरीकेच्या फेडरल रिजर्व कडुन (डॉलर) कर्ज घेत आहेत हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे इलेक्श न च्या दुसर्या दिवशीच क्वान्टिटेटिव इजींग ... म्हणजे थोडक्यात डिवाल्युएशन ( नोटा छापणे). आजची समस्या उद्दावर ढकलण्या सारखे. त्या मुळे बॉन्ड नोटस कोसळल्या आहेत. नाहितर युरो आणि युरोपिय अर्थव्यवस्था आत्ताच गडगड्ली असती आणि ब्लॅक क्रिसमस दिसला असता. असो.
हे समजले नाही. युरोतील ज्या देशांच्या अर्थव्यवस्था धडपडत आहेत त्यांना युरोची सेंट्रल बँक मदत करीत आहे (तेथील रोखे विकत घेऊन). त्यासाठी युरोची सामायिक गंगाजळी मुख्य्तवे वापरण्यात येत आहे. ह्या गंगाजळीचे प्रमुख काँट्रिब्युटर्स त्यांच्यातील सधन देश-- प्रामुख्याने जर्मनी व मग फ्रान्स. अशा प्रकरे मदत करीत रहाण्यास जर्मनीचा अर्थातच विरोध आहे. त्यामुळे अलिकडे त्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या (म्हणजे ग्रीस व आयर्लंड) ह्या पुढील मदतींसाठी निम सरकारी -- खाजगी-- गुंतवणूकदारही जबाबदार रहातील अशी तरतूद केली आहे. ह्याचा अर्थ ह्यापुढील युरोतील आर्थिक दृष्ट्या धडपडणार्‍या देशांचे डेट रिस्ट्रक्चरींग करतांना इतर सरकारीच नव्हे तर प्रायव्हेट गुंतवणूकदारांनाही झळ सोसावी लागेल!! ह्य बातमीमुळे अर्थात खाजगी गुंतवणूकदार अधिकच धास्तावले आहेत, व ग्रीस, पोर्तुगाल व स्पेन ह्या देशांच्या रोख्यांचे यिल्ड अजून वाढले आहे. ह्या देशांच्या सी. डी. एस.च्य किंमती अजून चढत आहेत. ही सगळी लक्षणे युरोसाठी फारशी चांगली नाहीत. तेव्हा लवकरच युरो विसर्जित करावा लागेल की काय अशी चिन्हे सध्यातरी दिसत आहेत. ग्रीस व आयर्लंड येथे यूरोपीय सेंट्रल बँकेच्या व्यतिरीक्त आय. एम. एफ. नेही पैसे टाकलेले आहेत. पण तसे त्यांनी इतरत्र्सही टाकलेले होते (उदा. ९७ सालच्या आशियाई देशांच्या धडपडीत). ह्या सर्वाचा व QE2 चा संबंध काय? (परत प्रश्न-- कारण असले अजून एक भोंगळ विधान तुम्ही करीत आहात). अमेरीकेने QE2 त्यांच्या स्वतःच्या मोडकळीला अलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केले आहे. गंमत पहा-- डॉलर व युरो ह्यांच्यात कसलेतरी युद्ध सुरू आहे, अशा विधानापासून तुमची सुरूवात झाली. आता अमेरीकेच्या फेडच्या QE2 चा उद्देश युरोचा पडता डोलारा सावरणे असा होता अशा अर्थाचे काही तुम्ही ह्या प्रतिसादात लिहीले आहे! तुमच्या ज्या विधानांविषयी तुम्हाला नेमके काय अभिप्रेत आहे हे समजत नाही (कारण तुमच्या मते ते ढोबळ लिहीलेले असते) त्यांविषयी नेमके तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारतो. त्याविषयी मला कसलीही लाज अथवा खंत वाटत नाही. आपण जे लिहीतो त्याविषयी तुम्ही नीट, सविस्तर व कोहीरंट उत्तरे द्याल अशी किमान आशा आहे. आता येथेकी तुम्ही जे उत्तर दिले आहे, त्याविषयी परत विचारावे लागते आहेच! 'नियाल फर्ग्युसन्चे पुस्तक तुम्ही वाचले आहेत (व म्हणून तुम्ही युरोच्या आर्थिक धडपडीविषयी सविस्तर लिहीत आहात)' अशी शाबासकी तुम्ही क्लिंटन ह्यांना दिली होती. तेव्हढ्यापुरता मी तो उल्लेख केला आहे, कारण ह्या घडामोडी अगदी अलिकडच्या आहेत, फर्गुसनच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख नाही. माझ्या लिहीण्याचा रोख तुमच्यावर हल्ला करण्याचा दिसत असेल तर तो तुमचा प्रश्न झाला. चर्चा सुरू करतांना व त्यापुढे प्रतिसादातूनही कोहीरंट, नेमकी माहीती देता यावी. उगाच चार टर्म्स उडवल्या तर कुणी ना कुणी तरी त्याविषयी पृच्छा करणार, हे मी तुम्हाला सांगायला नको.

In reply to by प्रदीप

वडिल 25/12/2010 - 12:58
प्रदिप, तुम्हाला काहिहि सांगितलं तरी तुम्हि फाटे फोडत आहात. "ह्या सर्वाचा व QE2 चा संबंध काय? (परत प्रश्न-- कारण असले अजून एक भोंगळ विधान तुम्ही करीत आहात). अमेरीकेने QE2 त्यांच्या स्वतःच्या मोडकळीला अलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केले आहे. " (हा तुमचा समज आहे) मी सुचवले.. युरोपात ला डेट क्रायसीस आणि युध्द अर्थकारण याचा संबध नाहि. मी तुमच्या खोडसाळ प्रश्वा ची उत्तरे देउ शकणार नाहि. तुम्हाला पटत नसेल तर ठिक. तुम्हि युध्द आणि अर्थ कारण यांचा संबध नाहि हे तरी लिहा.

In reply to by वडिल

प्रदीप 25/12/2010 - 18:17
तुम्हि युध्द आणि अर्थ कारण यांचा संबध नाहि हे तरी लिहा.
युद्ध आणि अर्थकारण ह्यांचा पूर्वापार संबंध आहे, हे वर मी माझ्या ह्या धाग्यावरच्या पहिल्या प्रतिसादातच मान्य केले आहे. तुम्ही ते वाचले नसेल तर पुन्हा वाचा.
मी सुचवले.. युरोपात ला डेट क्रायसीस आणि युध्द अर्थकारण याचा संबध नाहि.
अगदी बरोबर. पण डॉलर-युरो युद्ध सुरू आहे आणि त्यावर खुलासा विचारल्यावर QE2 वगैरे कुणी लिहीले? धागा तुमचा, त्याचे लेखक तुम्ही आणि डाफरताय दुसर्‍यांवर? आता मला खरोखरीच हसू येते आहे :) मेरी ख्रिस्मस!!

In reply to by वडिल

क्लिंटन 25/12/2010 - 11:12
गेल्या आठवड्यात तर चीन आणि रशिया नी रुबल आणि युआन मधे संरक्षण विषयक करार केला.
तुम्ही नक्की कोणत्या संरक्षण विषयक कराराबद्दल बोलत आहात?मी ती बातमी फॉलो केली नव्हती आणि गुगलूनही गेल्या आठवड्यात रेलेव्हन्ट काही मिळाले नाही.गेल्या महिन्यातील ही बातमी तुम्हाला अभिप्रेत आहे का?त्या बातमीत म्हटले आहे की पूर्वी चीन आणि रशिया अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार करत पण आता ते हळूहळू त्यांच्या चलनांमध्ये व्यापार करणार आहेत. या दुव्यावर चीन आणि रशियातील करारावर म्हटले आहे की दोन देशांमधील व्यापार वर्षाला ५० बिलियन डॉलर आहे आणि तो आकडा जागतिक व्यापारात मोठ्या उलथापालथी घडवू शकणार नाही.पण या करारातून प्रेरणा घेऊन पुढे पेट्रोलियमचा वार्षिक २.३ ट्रिलियन डॉलरचा व्यापार (सध्या जो डॉलरमध्ये चालतो) तो लोकल चलनात चालायला लागल तर डॉलरवर त्याचा परिणाम होईल आणि असा परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सौदी अरेबिया सारख्या देशांवर अवलंबून आहे. यातही पुढील मुद्दे आहेत. १. सौदी अरेबियानेही अमेरिकेत अनेक शे बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे हे Fahrenhite 911 सारख्या चित्रपटात म्हटले आहेच.तेव्हा डॉलर कोसळणे म्हणजे सौदी अरेबियाचेही नुकसान आहेच. २. चीनकडे सुमारे २.६ ट्रिलियन डॉलर इतके परकीय चलन आहे.चीनचे जीडीपी दरवर्षी ५.५ ट्रिलियन डॉलर आहे हे लक्षात घेतले तर त्यांच्याकडील परकीय चलनाचा साठा किती मोठा आहे हे कळते.डॉलर कोसळणे आणि त्या प्रक्रियेला स्वत: चीनने मदत करणे म्हणजे आपल्या पायावरच धोंडा पाडल्यासारखे होणार नाही का? ३. आज अमेरिका हीच पेट्रोलियम पदार्थांसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.तेव्हा या बाजारपेठेच्या नुसत्या आकारामुळे अमेरिका ही competitive market मधील price taker नाही तर price maker सुध्दा आहे. अशा मोठ्या ग्राहकाकडे बार्गेनिंग पॉवर जास्त असते. तेव्हा चीन-रशिया करारामुळे डॉलर कोसळेल असे म्हणणे मला तरी far-fetched वाटते.
त्या मुळे युरो आणि डॉलर वरुन डिलिवरेजींग / हेजींग करण्याचे अजुन एक टुल मिळाले. डॉलर आणि युरो ची मागणी हळु हळु कमी झाली म्हणजे हेजींग /डि रिस्किंग ला मोठा स्प्रेड मिळेल
याचे अधिक स्पष्टीकरण देऊ शकाल का?जागतिक व्यापारातील काही मुख्य रिस्क असतात. त्या म्हणजे परकीय चलनाच्या विनिमय दरांमधील होणारे चढउतार (करन्सी रिस्क), व्याजाच्या दरांमध्ये होणारे चढउतार (इंटरेस्ट रेट रिस्क) आणि मूळ गोष्टीतील (उदाहरणार्थ पेट्रोलियम) दरांमध्ये होणारे चढउतार. यासाठी हेजिंग करायला करन्सी फॉरवर्ड्स/फ्युचर्स, कमोडिटी फॉरवर्ड्स/फ्युचर्स, Forward Rate Agreement, Eurodollar Futures असे विविध टूल असतात.तेव्हा हेजिंगसाठी आणखी टूल मिळेल म्हणजे नक्की कोणते?ते कशा स्वरूपाचे असेल?
व्य नी नी अधिक बोलु.
आपल्या चर्चेत इतर कोणाला रस असेल तर त्यांनाही हे वाचता यावे म्हणून व्य.नि न करता इथेच लिहित आहे.

In reply to by क्लिंटन

प्रदीप 25/12/2010 - 12:59
सुंदर विश्लेषण व माहिती. हेजिंग खरे तर अनेक क्षेत्रात केले जाते. उदा. विमान कंपन्या इंधनाची फ्यूचर काँट्रॅक्ट्स करतात व पैशाची बचत करतात. कधीकधी हे अंगाशी येते, जसे २००८ -९ च्या धडपडीत कॅथे पॅसिफिकचे झाले. हेजिंग चुकिच्या दिशेने केल्याने त्यांना तेव्हा खूप मार खावा लागला. तसेच ड्राय बल्क कार्गो शिपींगमधेही केलेली फॉरवर्ड काँट्रॅक्ट्स ह्या त्सुनामिच्या काळात अनेक शिपींग कंपन्यांना त्रासदायक ठरली.

In reply to by प्रदीप

क्लिंटन 25/12/2010 - 15:52
विमान कंपन्या इंधनाची फ्यूचर काँट्रॅक्ट्स करतात व पैशाची बचत करतात.
हो बरोबर.पण विमानाच्या इंधनाची फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स सर्वत्र एक्स्चेंजवर उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ अमेरिकेत अशी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स एक्स्चेंजमध्ये नाहीत पण गेल्या २-३ वर्षांपासून अशी कॉन्ट्रॅक्ट्स भारतात एक्स्चेंजमध्ये उपलब्ध आहेत. जिथे अशी कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध नसतात तिथे विमानवाहतूक कंपन्या विमानाच्या इंधनाला सर्वसाधारण मिळत्याजुळत्या कमोडिटीवर (उदाहरणार्थ क्रूड पेट्रोलियम तेल) फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स घेतात.
कधीकधी हे अंगाशी येते
हे सगळ्यात महत्वाचे.असे अंगाशी आल्यामुळे बिलियन डॉलर्सचे नुकसान होण्यापासून दिवाळखोरी जाहिर करावी लागण्यापर्यंत वेळ विविध कंपन्यांवर आली आहे.यापैकी Metallgeschaft या कंपनीची केस रिस्क मॅनेजमेन्ट कम्युनिटीमध्ये खूपच लोकप्रिय आहे.जमल्यास यावर स्वतंत्र लेख कधीतरी. अर्थात या सगळ्याचा मूळ चर्चा विषयाशी संबंध नाही.पण एकातून एक विषय निघत गेले आणि त्यात हा विषयही आला.तेव्हा भविष्यातही कोणी ही चर्चा वाचल्यास पूर्ण माहिती मिळावी म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by वडिल

विजुभाऊ 24/12/2010 - 23:00
आपल्याकडे मान्युफाकच्यरींग नाहि इन्फ्रास्ट्रकचर नाहि, सर्व गोष्टि आयात कराव्या लागत असल्या मुळे रुपया ला बाइंग पावर मिळणार नाहि असे वाटते भारताबद्दल हे नवीनच काहितरी ऐकतोय? तुम्ही नक्की हे भारताबद्दलच बोलताय ना? की पाकिस्तानबद्दल? दोन्ही देशातले चलनाचे नाव रुपया हेच आहे म्हणून विचारतोय? भारताकडे शस्त्रास्त्रे उत्पादन क्षमता नाही हे अर्धसत्य आहे. डी आर डी ओ सारखी संस्था संरक्षणसामग्री साठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर काही प्रमाणात उपलब्ध करून देते. तसे ते सौदी कुवेतकडे सुद्धा नव्हते. युद्धातील सामुग्री विकत घेण्यासाठी पैसे घेऊन जायचे आणि क्विन्टल दोन क्विन्टल शस्त्रे घेऊन यायची असा हा शस्त्र व्यापार चालत नाही. अमेरीका सध्या अफगाणीस्थानात आहे. अफगाणीस्थानकडे तर मान्युफाकच्यरींग /इन्फ्रास्ट्रकचर सोडाच तर डॉलर्/तेल देखील नाहिय्ये. ते कशाप्रकारे अमेरीकेचे पैसे भागवत असतील याची कल्पना करुन पहा? आंतरराष्त्रीय व्यापार केवळ पैसे या एकाच गोष्तीवर चालतात असे नव्हे. अमेरीका हा श्रीमन्त देश आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो सर्वात मोठा कर्जबाजारी देश सुद्धा आहे. अमेरीकेतले मान्युफाकच्यरींग नाहि इन्फ्रास्ट्रकचर सध्या इतरत्र जायला लागले आहे. तरीसुद्धा डॉलर हे जागतीक चलन आहे. ते कशामुळे ? वडीलजी आपण हा धागा काढलाय त्यामुळे जागतीक अर्थव्यस्थे बद्दल बोलताना नक्की नीट माहीत नसेल उगाच चुकीचे निष्कर्ष मांडू नका. अवांतरः पाकिस्तानसारखा देश अजूनही टिकून आहे..... कर्जबाजारी तर आहेच तरीदेखील शस्त्रास्त्रे खरेदी करतोय. पंधरा वर्षापूर्वी पाकिस्तानने पैसे देवुनदेखील अमेरीकेने पाकिस्तानला एफ १६ विमाने अजून दिलेली नाहीत.

In reply to by विजुभाऊ

वडिल 25/12/2010 - 00:32
विजुभाउ, धन्यवाद .तुमचे प्रश्व वाचले. तुम्हि बरेच प्रश्न एकत्र विचारले आहेत त्यात काहि बेसिक इकॉनॉमिक्स्स चे आहेत आणि काहि या विषयाला अनुसरुन नाहित. तुम्हि तुमची प्रतिक्रिया सकाळ झाली कि परत एकदा वाचा आणि जे संबधित महत्वाचे वाटतील ते ठेवुन बाकिचे उडवुन टाका. सविस्तर उत्तरे नक्कि देइन . तुम्हाला काहि पुस्तके हि वाचायला सुचवीन. तुम्हाला अधिक कन्फुज करण्याचा हेतु नाहि ... पण "युध्द -अर्थकारणाची एक गरज आहे" हा लेखनाचा विषय आहे. तुमचे विचार नक्कि काय आहेत ते तुमच्या लांब लचक प्रतिसादाने समजत नाहित. "आंतरराष्त्रीय व्यापार केवळ पैसे या एकाच गोष्तीवर चालतात असे नव्हे." हे वाक्य काहि समजले नाहि. मी काहि फार मोठा आहे असे माझे अजिबात मत नाहि. तुमची टिका जर जेनुइन उत्सुकते पोटि असेल तर मी माझ्या परीने तुम्हाला नक्कि खरडवहित समजावुन सांगीन. पण हे प्रश्व फक्त टिंगली टवाळी साठि असतील तर मी वेळ घालवणार नाहि.

In reply to by वडिल

विजुभाऊ 25/12/2010 - 10:34
आंतरराष्त्रीय व्यापार केवळ पैसे या एकाच गोष्तीवर चालतात असे नव्हे." हे वाक्य काहि समजले नाहि. तो व्यापार हा वस्तुविनीमय ( बार्टर) या स्वरूपात देखील असू शकतो. त्यासाठी वस्तूच हव्यात असेही नाही. तो व्यापार भविष्यातील होणार्‍या नफ्याला भागिदारीत ठेवून सुद्ध होउ शकतो. मी शक्यतो वैयक्तीक टिंगल्/शेरेबाजी करीत नाही. तुम्ही मांडलेले मुद्दे विषेशतः रुपया गडगडेल किंवा भारताकडे म्यान्युफेक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाही. हे मला पटले नाही. युद्ध किंवा आपत्ती ही अर्थकारणाला चलना देणारी घटना असते हे खरे. अमेरीकेने त्याचा वापर नेहमीच केलेला आहे. उ कोरीय/ द कोरीया यांच्यात यूद्धा होइलही कदाचित पण त्याची व्याप्ती ही सर्वंकष नसेल. दक्षीण अशियात यूद्ध ( भारत-पाक) झाले तर ते आजच्या घडीला कोणालाच परवडणारे नसेल. कारण अमेरीकेला किंवा चीनला त्या युद्धात नुसती शस्त्रे विकून बघ्याची भूमीका घेता येणार नाही. तशा युद्धात अमेरीकेची पत पणाला लागेल. ते त्याना परवडणारे नाही. अफगाण युद्धात अमेरीका पोळली गेलीय. त्याना ते अवघड जागेचे दुखणे झालेय.त्यांच्या देशात झाले नाही तरी त्यांचे सैनीक तिथे मरत आहेत. आता परिस्थिती अशी आहे की तेथून माघार घेतली की अफगणीस्थानचे तुकडे होतील. पाकचाही उत्तर पश्चीम भाग कदाचित जाईल की काय अशी शम्का आहे. त्यामुळे पाकला अमेरीका तेथे हवी आहे. अफगाणीस्थात पुन्हा तालीबान्यांची सत्ता आली तर ते अमेरीकेला अवघड जाईल

In reply to by विजुभाऊ

क्लिंटन 25/12/2010 - 11:29
अमेरिकेने दुसऱ्या महायुध्दानंतर दर ८-१० वर्षांनी कुठेना कुठे युध्द काढले.त्यातूनच त्यांच्या देशातील संरक्षण उद्योगाला चालना मिळाली.पण १९५०-६० च्या दशकातील (किंवा अगदी १९८० च्या दशकातील) परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यात मूलभूत फरक आहेत. वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दक्षिण आशियात अणुयुध्द होणे आणि त्यात भारताचे नुकसान होणे अमेरिकेला नक्कीच परवडणारे नाही. जागतिक अर्थकारणात ५० वर्षांपूर्वीचे अमेरिकेचे स्थान आणि आताचे स्थान यात खूप मोठा फरक आहे.आज अमेरिकेला भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेची गरज आहे.कोरिया प्रकरण मी फारसे वाचलेले नाही त्यामुळे त्याविषयी मला बोलता येणार नाही.पण माझा मुद्दा जास्त दक्षिण आशियातील परिस्थितीबद्दल आहे. १९८० च्या दशकात पाकिस्तानने पैसे देऊनही एफ-१६ विमाने अमेरिकेने २००५ पर्यंत दिली नव्हती.२००५ मध्ये बुश-मुश भेटीत बुशने ती द्यायचे मान्य केले.ती अजून दिली आहेत की नाही याची कल्पना नाही.त्याचवेळी भारताला एफ-१८ विमाने द्यायची तयारी अमेरिकेने दाखवली.तेव्हा युध्द झाले तर त्यात अमेरिकेची फूस अशा स्वरूपाची असेल आणि युध्द झाले नाही तरी अमेरिकेची विमाने विकली गेली तरी त्यांना चालण्यासारखे आहे.पण भारत-पाकिस्तान दरम्यान अणुयुध्द व्हायची वेळ आली तर अमेरिका नक्कीच हस्तक्षेप करून युध्द होऊ नये याची काळजी घेईल (कदाचित पाकिस्तानातील अण्वस्त्रांचा ताबा आपल्याकडे घेऊन) असे मला वाटते.जाणकारांनी यावर अधिक भाष्य करावे ही विनंती. तेव्हा युध्द हा अर्थव्यवस्थेला चालना द्यायचा मार्ग हा मार्ग जुना झाला आणि सध्याच्या काळाला तो १००% लागू नाही असे मला म्हणायचे आहे.

In reply to by क्लिंटन

वडिल 25/12/2010 - 12:11
जर एकच कंपनी दोन देशांना शस्त्र सामग्री पुरवत असेल तर ते काय म्हणायचे ? अशी कंपनी जास्तीत जास्त माल विकायला काय करेल ? तुमचं सर्व लेखन हेच दर्शवते आहे कि अमेरीकेचा मुख्य धंदा हा सर्व देशांना शस्त्र पुरवणे हा आहे. कोणाला किती हाच फक्त वादाचा विषय आहे. समजा आज किंवा उद्या युध्द झाले नाहि तरी ... युध्द करवुन व्यापार वाढवता येइल का नाहि ? जर गरीब देशांच्या जि डि पी तील अधिक अधिक भाग हा युध्द सामग्री मधे गुंतला तर प्रगति होईल का ? सदैव युध्द सदृश भितीदायक वातावरण ठेवलं तर व्यापारावर / इन्वेस्ट्मेन्टस वर त्याचा काय परीणाम होईल ? भारतीय उप खंड.

In reply to by वडिल

क्लिंटन 25/12/2010 - 14:00
तुमचं सर्व लेखन हेच दर्शवते आहे कि अमेरीकेचा मुख्य धंदा हा सर्व देशांना शस्त्र पुरवणे हा आहे. कोणाला किती हाच फक्त वादाचा विषय आहे.
कसे काय?माझ्या मते तरी अमेरिकेचा मुख्य धंदा स्वत:चा स्वार्थ साधणे हाच आहे.आणि तो तसा असेल तर त्यात काही गैर मला वाटत नाही.घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी भाजत नसतो.जर स्वत:चा स्वार्थ इतर देशांना शस्त्रे विकून साधता येत असेल तर अमेरिका तसे करेल आणि जर इतर देशांमधील युध्द थांबवून स्वत:चा स्वार्थ साधता येत असेल तर अमेरिका ते ही करेल.
समजा आज किंवा उद्या युध्द झाले नाहि तरी ... युध्द करवुन व्यापार वाढवता येइल का नाहि ?
दक्षिण आशियाच्या संदर्भात सुमारे २० वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत नि:संदिग्ध हो.मधल्या काळात उत्तर तितके निंसंदिग्ध नव्हते.पण आताच्या काळात युध्द करवून शस्त्रांचा व्यापार जितका वाढेल त्याच्या अनेक पटींनी युध्दात भारताच्या होणाऱ्या नुकसानामुळे तो कमी होईल.भारत-पाकिस्तान दरम्यान युध्द झाले तर (अमेरिकेने पाकिस्तानची अण्वस्त्रे ताब्यात घेतली नाहीत तर) ते अणुयुध्दच होईल हे वेगळे सांगायला नको. इथे Fortune 500 कंपन्यांची यादी दिली आहे.त्यात लॉकहिड मार्टीन ही एफ-१६ विमाने उत्पादन करणारी कंपनी ४४व्या क्रमांकावर आहे.पण त्यापेक्षाही वॉलमार्ट, बॅंक ऑफ अमेरिका, जनरल इलेक्ट्रीक,जे.पी.मॉर्गन चेस,एच.पी,सिटीग्रुप,प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बल,जनरल मोटर्स या कंपन्या मोठ्या आहेत आणि त्यांचे हितसंबंध दक्षिण आशियात अणुयुध्द होऊ नये यातच गुंतलेले आहेत हे नक्की. भारतात वेगाने वाढणारे एअरलाईन्स क्षेत्र ही पैशाच्या दृष्टीने विचार केला तर भारत ही बोईंगसाठी लॉकहिड मार्टीनपेक्षा मोठी बाजारपेठ आहे. प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बलची उत्पादने जगभरात जवळपास सर्वत्र विकली जातात पण भारतीय मध्यमवर्गीयांची संख्या लक्षात घेता भारत ही त्या कंपनीची मोठी बाजारपेठ आहे.अणुयुध्द झाले तर भारतात लोकांना विमान प्रवास परवडेल का?म्हणजे त्यात बोईंगसारख्या कंपनीचे नुकसान नाही का? भारताचे अणुयुध्दात मोठे नुकसान झाले तर एरियल, मॅक ३, टाईड हे सध्या अगदी गल्लोगल्ली विकले जाणारे ब्रॅन्ड लोकांना परवडतील का?म्हणजेच त्याचा प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बलला मोठा फटका बसणार हे नक्कीच. असेच Fortune 500 कंपन्यांपैकी अनेकांविषयी लिहिता येईल.तेव्हा निदान दक्षिण आशियात युध्द करवून अमेरिका स्वत:चा स्वार्थ साधेल असे वाटावे अशी परिस्थिती आहे का? अर्थात उद्या पाकिस्तान तालिबान्यांच्या हातात गेला तरी अणुयुध्द होणार नाही अशा भ्रमात मी नक्कीच नाही.माझा म्हणायचा उद्देश आहे की तुम्ही म्हणता तसे युध्द अमेरिका करवणार नाही असे मला वाटते.
सदैव युध्द सदृश भितीदायक वातावरण ठेवलं तर व्यापारावर / इन्वेस्ट्मेन्टस वर त्याचा काय परीणाम होईल ? भारतीय उप खंड
याचे उत्तर वर लिहिले तसेच आहे.त्याचा व्यापारावर आणि इन्व्हेस्टमेन्टवर वाईट परिणाम होईल आणि सध्याच्या काळात ते अमेरिकेला परवडण्यासारखे नाही.

In reply to by वडिल

डीलर 27/12/2010 - 16:27
वडील जी , युध्द जागतिक अर्थ्व्यवस्थेची गरज की अमेरिकन अर्थ व्यवस्थेची? भारतात कांद्याचे भाव वाढण्यामागे अमेरिकेची युध्द्खोरी कशी जबाबदार आहे ते जरा समजावून सांगा. US and EUROPE both are busy licking their wounds and seeminterested in seeing how their own currencies are devalued more to reap benefits.More and more countries are losing faith in any single currency as reserve currency be it DOLLAR or EURO. भारत सर्वात जास्त आयात (किंमती ने) कच्चा तेलाची होते. भारताची निर्यात ही आयाती पे़क्षा कमी आहे पण भारतात उत्पान आणि पायाभूत सुविधा नाहीत हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. त्यांचा वेग कमी आहे रुपयाची बाइंग पावर (?) वढवून आयात वाढवण्यात काय फायदा? चीन आणि जपान सारखे देश तर त्यांच्या चलनाची किंमत (बाइंग पावर) वाढू नये म्हणून जास्त काळजी घेतात.

या धाग्यावर खरंच माहितीपूर्ण चर्चा (विशेषतः अर्थशास्त्राच्या अंगाने जाणारी) झाली तर वाचायला आवडेल. युद्धं ही बरेचवेळा अर्थकारणाधारित असतात असे नेहमीच म्हणले जाते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रदीप 23/12/2010 - 18:28
म्हणतो. युद्धे अर्थव्यवस्थेस चालना देतात असे समजले जाते. तेव्हा धाग्याच्या गाभ्याशी सहमत आहे. भारत युद्धसामग्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे, म्हणून अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आपल्याला ती विकण्याची बरीच खटपट करीत आहेत हेही खरेच (पण १. भारताच्या ह्या बाजारातील मोठेपणाविषयी आणि २. हे देश हे मोठे गिर्हाईक टॅप करण्यासाठी येत आहेत ह्या दोन्हीत गैर काय आहे हे नेमके समजले नाही). तसेच चीन माझ्या माहितीप्रमाणे भारतास कुठलीही युद्दसामग्री विकण्याचे प्रपोजल घेऊन आला नाही. माझी माहिती चुकीची असेलही, कदाचित!! वडील ह्यांनी एका प्रतिसादात लिहीले आहे की "कोरीयात युध्द झाले तर ते अमेरीकेच्या खुप फायद्याचे आहे". खरे आहे, कारण द. कोरीया अमेरिकेन युद्धसामग्रीचे मोठेठे गिर्हाईक आहे. पण सध्या कोरियन पेनिन्सुलात नेमके कोण युद्धखोरी करते आहे? उ. कोरिया की द. कोरीया? माझ्या माहीहीनुसार अलिकडे उ. कोरीयाने दोन मोठ्या आगळिकी केल्या --पहिली मार्चच्या महिन्यात द. कोरीयाच्या आरमारचे एक जहाज त्याने टॉर्पेडो करून बुडवले, त्यात द. कोरीयाच्या ४६ नौसैनिकांना जलसमाधि मिळाली. तरीही द. कोरीया शांत राहिले. मग अलिकडे नोव्हेंबरात उ. कोरीयाने द. कोरीयाच्या एका बेटावर विनाकारण तोफांचा मारा केला. द. कोरीयाने मग अमेरिकेसमवेत स्वतःच्या हद्दीतच काही युद्धसराव केला. उ. कोरीयाची ही खेळी अत्यंत घातक होती-- १९५३ नंतर इतकी युद्धसदृष्य परिस्थिती मधे कधीही निर्माण झाली नव्हती असे निरीक्षक म्हणतात. आता वडिल ह्यांच्या अनेक कॉन्स्पिरसी थेयरींनुसार इथेही अमेरिकेची उ. कोरीयास युद्धाचे आवाहन करण्यासाठी फूस होती असले काही असेल, तर गोष्ट वेगळी !!

In reply to by प्रदीप

वाहीदा 24/12/2010 - 23:45
कधी ना कधी अमेरिका अन उ. कोरियाचे युध्द होणार हे नक्की वडिल यांच्या धाग्यातिल बर्‍याचश्या विचांराशी सहमत

In reply to by वाहीदा

प्रदीप 25/12/2010 - 08:56
तसे कधाचित होईलही, कोण जाणे! वडिल ह्यांच्या लेखात ते म्हणतात की 'अर्थव्यवस्थे ला चालना मिळावी म्हणुन हे [मोठे] देश युध्द शस्त्रांचा खप वाढवण्या साठि काय काय करतील हे सांगता येत नाहि. कोरीया, भारत - पाकिस्तान , अफ्रिकेतील अनेक देश हे असल्या राजकारणाला बळि पडतील. जगात कुठे हि युध्द झामेरीकेला त्याचा आर्थिक लाभ होतो. वर वर जरी अमेरीका स्वत: ला शांतिदुत भासवत असला तरी स्वत: च्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थे ला वाचवण्या साठि युध्द घडवुन आणणे हे अमेरीकेच्या फायद्याचे आहे असे वाटते'. थोडक्यात मला ह्यावरून जे उमगले ते असे की मोठे देश छोट्या देशांना युद्धसामग्री विकून व नंतर इतर राजकीय खेळी करून युद्धे करण्यास प्रवृत्त करतात ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळते. ह्या सर्वसकट विधानाबदल मीही सहमती दर्शवली आहेच. पण कोरीया ह्या गेमप्लॅनमधे किती बसते असे मी विचारले आहे. कारण कोरीयातील सध्याच्या परिस्थितीनुसार आगळीक उ. कोरीयाकडूनच होतांना दिसते. तिच्या अधूनमधून आगळीकी फक्त द. कोरीयासच नव्हे तर जपानलाही बर्‍याच त्रास देणार्‍या असतात. तेव्हा मोठ्या (पक्षी: अमेरिका, ब्रिटन, फ्रांस इ. नेहमीचे कल्प्रिट्स) देशांनी इथे युद्ध व्हावे म्हणून नक्की आत काय केले आहे ते सांगावे हा माझा प्रश्न आहे. का इतरस्त्र वडिल ह्यानी लिहीलेल्या कॉन्स्पिरसी थेयरीप्रमाणेच इथेही अमेरिकाच उ. कोरीयास फूस लावत आहे?

वडिल 22/12/2010 - 16:20
कोरीयात युध्द झाले तर ते अमेरीकेच्या खुप फायद्याचे आहे. त्यामुळे अमेरीकेचा कोरीया भागात दबदबा वाढेल. चीन सहजा सहजी अशा युध्दात भाग घेणार नाहि. पुढिल युध्दांच्या तयारी साठि आणि युध्द सामग्री साठि हे युध्द टेस्टिंग ग्राउन्ड ठरु शकते.

महमन्दि नन्तर महयुध्ह झाले म्हनुन असे म्हनले जाते परन्तु हे एक मिथक आहे आसेहि म्हनतत.हे मिथक 'broken window fallacy'ह्या नावाने ओलखतत आसे कुथेतरि वचल्यचे आथवते

महमन्दि नन्तर महयुध्ह झाले म्हनुन असे म्हनले जाते परन्तु हे एक मिथक आहे आसेहि म्हनतत.हे मिथक 'broken window fallacy'ह्या नावाने ओलखतत आसे कुथेतरि वचल्यचे आथवते

In reply to by नितिन थत्ते

वडिल 22/12/2010 - 22:40
नितिन जी, ओरवील नी जे लिहिलं आहे ते आपण आपल्या जगात आत्ता बघतो आहोत. मिडिया द्वारे एखादा विचार ५०% लोकान मधे जरी पसरवला तरी ते सत्य म्हणुन खपुन जातो. ह्यालाच प्रॉपोगन्डा असे म्हणतात. अमेरीका असल्या प्रकारात माहिर आहे. अल कायदा... अल कायदा करत जगभर सैन्य पाठवणे, कृत्रीम टंचाई निर्माण करणे ( सोने, तेल, कमोडिटिज इ), जगभरातील रीसोर्सेस( ह्युमन,कमोडिटिज) स्वतःकडे एकत्र करणे, युध्द घडवुन आणणे इ... हे सगळे प्रॉपोगन्डा तंत्र आहे.

In reply to by डीलर

वडिल 24/12/2010 - 16:04
डिलर जी, मतितार्थ असा आहे कि अमेरीका आणि युरोप या मधील अर्थ युध्दात भारत हा एक प्यादे म्हणुन खेळवला जाणार. आपल्याकडे मान्युफाकच्यरींग नाहि इन्फ्रास्ट्रकचर नाहि, सर्व गोष्टि आयात कराव्या लागत असल्या मुळे रुपया ला बाइंग पावर मिळणार नाहि असे वाटते. इन्फ्लेशन वाढत आहे... ( कांदा !) कमोडिटिज चा तुडवडा त्यामुळे आणि निर्याती मुळे अजुन इन्फ्लेशन. भारत स्वत: ला विकुन काय खरेदि करतो आहे ... तर युध्द सामग्री !

In reply to by वडिल

प्रदीप 24/12/2010 - 17:13
अमेरिका आणि युरोप ह्यांच्यात सध्या कसले अर्थयुद्ध चालले आहे? आणि त्यात भारत प्यादे खेळवले जाणार म्हणजे नेमके काय व कसे?

In reply to by प्रदीप

वडिल 24/12/2010 - 22:24
प्रदिप, अमेरीके च्या डॉलर मधे जागतिक व्यापार चालतो. युरोपीय देशांनी मिळुन युरो हि करन्सी गेल्या दशकात सुरु केली. इग्लंड अजुन पाउन्ड मधेच व्यवहार करतो. युरोपात अनेक देश कफल्लक आहेत ( ग्रीस ,पोर्तुगाल....) जर युरो मधे जगानी व्यवहार केले नाहित तर युरो ला काहिहि मागणी रहाणार नाहि आणि भाव घसरुन अर्थव्यवस्था अजुन कोलमडेल. त्यामुळे युरोप ( युरो) आणि अमेरीका ( डॉलर) आप आपल्या करन्सी मधे जास्तित जास्त व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्या त्या करन्सी ची मागणी जग भर वाढेल. चीन , रशिया आणि युरोपिय देश जास्तित जास्त व्यवहार युरो मधे करुन अमेरीके ला (डॉलरला) शह देत आहेत.

In reply to by वडिल

क्लिंटन 25/12/2010 - 00:54
युरोपात अनेक देश कफल्लक आहेत ( ग्रीस ,पोर्तुगाल....) जर युरो मधे जगानी व्यवहार केले नाहित तर युरो ला काहिहि मागणी रहाणार नाहि आणि भाव घसरुन अर्थव्यवस्था अजुन कोलमडेल.
नाही हो ते कारण नाही.खरे कारण आहे ग्रीस आणि इतर देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेत घातलेला सावळागोंधळ.ग्रीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बेसुमार सवलती दिल्या गेल्या आणि अनेक पांढरे हत्ती पोसले.त्यातून सरकारचे उत्पन्न आणि खर्च यातील फरक असलेले फिस्कल डेफिसिट वाढले.युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी ३% डेफिसिट असा नॉर्म असताना ग्रीसचे डेफिसिट १०% पेक्षा जास्त झाले.यातूनच ग्रीस सरकार त्यांच्या बॉंडवरील व्याज आणि मुद्दल यावर डिफॉल्ट करेल अशा अवस्थेला पोहोचले.युरोपातील इतर देशांतील बॅंकांनी ग्रीस सरकारचे बॉंड मोठ्या प्रमाणावर खरेदी केले होते.तेव्हा ग्रीस सरकारने डिफॉल्ट केल्यास या सगळ्या बॅंका अडचणीत येणाऱ्यातल्या होत्या.यावर उपाय म्हणजे जर्मनी आणि युरोपीयन युनियनला ग्रीससाठी तातडीचे पॅकेज जाहिर करावे लागले.देशातील सरकार बॉंडवर डिफॉल्टपर्यंत पोहोचणे याची निशाणी असते त्या बॉंडवरील यिल्ड (व्याज) वाढणे.एकदा सरकारी बॉंडवरील व्याज वाढले की अर्थव्यवस्थेतील व्याजाचे इतर दरही वाढतात.व्याजाचे दर वाढले की त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट पर्णाम होतो.तसेच इंटरेस्ट रेट पॅरिटीप्रमाणे व्याजाचे दर वाढले की त्या चलनाचे अवमूल्यन होते. युरोपातील देशांचे चलन एकच असल्यामुळे आणि मुख्यत: त्यांच्या अर्थव्यवस्था इंटिग्रेटेड असल्यामुळे व्याजाचे दर हे पूर्णपणे त्या देशातील सरकारच्या हातात राहत नाहीत. एका युरोपीयन देशातील व्याजाच्या दरांवर इतर देशांतील परिस्थितीचाही परिणाम होतो.आणि हा प्रश्न केवळ ग्रीसपुरता मर्यादित नाही.तर पोर्तुगाल,इटली,आयर्लंड आणि स्पेन या इतर देशांमध्येही हाच प्रश्न आहे.मध्यंतरी आयर्लंडमध्येही ग्रीससारखे पॅकेज द्यावे लागले.तीच वेळ पुढील २-३ वर्षात पोर्तुगाल,इटली आणि स्पेनवर येणार हे नक्कीच. तेव्हा अशा परिस्थितीत पूर्ण युरोझोनमध्ये हा प्रश्न पसरला आणि म्हणून युरोची पडझड झाली.मूळ कारण सगळ्या जगाने युरोत व्यवहार न करणे हे नाही तर त्या देशांमधील अर्थव्यवस्था वाईट पध्दतीने हाताळली हे आहे. भारतीय रुपयात पूर्ण जगातील १% व्यवहारही होत नसतील.मग तुम्ही म्हणता त्या न्यायाने भारतीय रूपया किती गडगडायला हवा.
चीन , रशिया आणि युरोपिय देश जास्तित जास्त व्यवहार युरो मधे करुन अमेरीके ला (डॉलरला) शह देत आहेत
चीनने प्रचंड प्रमाणावर अमेरिकन डॉलर आपल्याकडे ठेवले आहेत आणि चीनची परकीय चलन गंगाजळी प्रचंड प्रमाणावर आहे.साधारण ३-४ वर्षांपूर्वी चीनने स्वत:चा "सार्वभौम फंड" (Sovereign Wealth Fund) स्थापन केला.२००७ मध्ये चीनच्या फंडने काही अमेरिकन बॅंका आणि मुख्य म्हणजे मॉर्गन स्टॅनले सारखी इन्व्हेस्टमेन्ट बॅंक यांच्यात गुंतवणूक केली आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला काही प्रमाणावर तरी स्थैर्य दिले.याचे कारण अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळणे सध्या तरी कोणालाच परवडणार नाही.तेव्हा जास्तीत जास्त व्यवहार युरोत करून डॉलरला शह देणे म्हणजे तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे? आज जगाचे जीडीपी सुमारे ५८ ट्रिलियन डॉलर्स आहे त्यापैकी अमेरिकेचा वाटा आहे सुमारे १६ ट्रिलियन डॉलर्स आणि चीनचा सुमारे ५.५ ट्रिलियन डॉलर्स.तेव्हा आजही इतक्या अडचणी येऊनही अमेरिकेची अर्थव्यवस्था चीनपेक्षा तीनपट मोठी आहे.आणि चीनच्या जीडीपीच्या सुमारे २३-२४% भाग हा निर्यातीवर अवलंबून आहे.जर अमेरिकेसारखी मोठी अर्थव्यवस्था कोसळली तर त्याचा फटका चीनलाही बसणारच आहे.तेव्हा चीनने कितीही वेगाने प्रगती केली आणि अमेरिकेत कितीही अडचणी आल्या तरी आणखी १० वर्षे तरी चीन डॉलरला शह वगैरे द्यायच्या भानगडीत पडणार नाही असे मला वाटते.नंतरचे सांगता येत नाही. असो.

In reply to by क्लिंटन

वडिल 25/12/2010 - 02:25
क्लिंटन साहेब, माझा वरचा प्रतिसाद हा फक्त ढोबळ अर्थाने डॉलर /युरो च युध्द समजावुन सांगण्या पुरता होता. ह्या धाग्याचा मुख्य विषय युध्द हे अर्थकारणा ची आवश्यकता आहे का नाहि असे आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे ( पण लांबलचक अ‍ॅनालिसिस आहे). नेल फर्गुसन चे पुस्तक तुम्हि वाचलेले दिसते. दोन देशांमधे व्यवहार हा कुठल्याहि चलनात होउ शकतो ( अगदि मीठ, फुलं इ मधे सुध्दा). गेल्या आठवड्यात तर चीन आणि रशिया नी रुबल आणि युआन मधे संरक्षण विषयक करार केला. त्या मुळे युरो आणि डॉलर वरुन डिलिवरेजींग / हेजींग करण्याचे अजुन एक टुल मिळाले. डॉलर आणि युरो ची मागणी हळु हळु कमी झाली म्हणजे हेजींग /डि रिस्किंग ला मोठा स्प्रेड मिळेल आणि इकॉनॉमी सेग्रिगेट होइल ( बहुदा) चीन अमेरीकेला शह देणार नाहि हा मुद्दा अगदि बरोबर आहे. अमेरीका हि चीन ची सर्वात मोठि बाजारपेठ आहे. अमेरीका आणि चीन चे लग्न हे ह्या जन्माचे आहे. चीन ची सर्व असेटस अमेरीकेत आहेत ( बॉन्डस). १९ जानेवारी ला हु आणि ओबामा ची महत्वाची राजकिय भेट आहे. बघु तेव्हा काय होते ! ह्या सर्व खेळात आत्ता तरी रशिया आणि रुबल ला महत्व आले आहे. (RIC) + B पण चीन हा लंबी रेस का घोडा आहे. क्लिंटन साहेब तुमच्या अमेरीकेला इतक्यात मरण नाहि. काळजी करु नका चीन तुमचे सर्व लाड पुरवेल. व्य नी नी अधिक बोलु.

In reply to by वडिल

प्रदीप 25/12/2010 - 08:36
सध्या युरोची जी धडपड चालली आहे, त्याचे कारण युरोतील किनारी (पेरिफरी)तील [ग्रीस, पोर्तुगाल, हंगेरी] देशांच्या तसेच थोड्याबहुत मुख्य काही [स्पेन, फ्रान्स, इटली] देशांची आर्थिक मिसमॅनेजमेंट हे आहे, आणि 'डॉलर युद्धा'शी त्याचा काहीही संबंध नाही. क्लिंटन ह्यांनी हेच इथे सविस्तर विशद केले आहे, तेव्हा उगाच 'माझे विधान ढोबळ स्वरूपाचे होते' अशा प्रकारची सारवासारव करू नये. तसे विधान आपण का केले होतेत हे आपल्याकडून समजावे ह्यासाठीच मी तुम्हाला प्रस्न विचारले होते. तसेच 'चीन , रशिया आणि युरोपिय देश जास्तित जास्त व्यवहार युरो मधे करुन अमेरीके ला (डॉलरला) शह देत आहेत' अशी (ज्याला तुम्ही ढोबळ म्हणाल बहुधा) सुरूवात करून आता तुम्ही 'चीन अमेरीकेला शह देणार नाहि हा मुद्दा अगदि बरोबर आहे' इथवर आला आहात! युरोमधील देशांशी व्यवहार करतांना चीन युरोमधे करत आलेला आहे, त्यात नवे काही नाही. तेव्हा जे 'जास्तीत जास्त' वगैरे कोठून आले? वास्तविक आर. एम. बी. हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीचे चलन व्हावे ह्यासाठी चीन तयारी करीत आहे. त्यादृष्टिने त्याने काही पाउले उचलली आहेत. पण ह्याला बराच अवधि लागेल असे तज्ञ्यांचे म्हणणे आहे. नियाल फर्गुसनच्या पुस्तकाची अगदी अलिकडील आवृत्ति मजजवळ आहे. त्यात २००८ च्या फायनॅन्शियल त्सुनामीपर्यंतचा आढावा आहे. युरोची धडपड गेल्या वर्षांत ग्रीसपासून सुरू झाली आहे. चर्चा सुरू करतांना व नंतरही भोंगळ , ऊडती विधाने नसावीत, माहितीपूर्ण व चोख असावीत अशी किमान अपेक्षा मी तरी करतो.

In reply to by प्रदीप

वडिल 25/12/2010 - 11:43
प्रदिप, एका ओळीचा प्रश्न विचारला म्हणुन ढोबळ उत्तर दिले. ह्या धाग्या चा रोख युरोपातील समस्या हे नाहि. युरोपात जे होते आहे त्याला डेट क्रायसीस असे म्हणतात हे तुम्हि फर्गुसन च्या पुस्तकात वाचले असेल. पण... ते सोडवण्या साठि युरोप युरो मधे कर्ज न घेता अमेरीकेच्या फेडरल रिजर्व कडुन (डॉलर) कर्ज घेत आहेत हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे इलेक्श न च्या दुसर्या दिवशीच क्वान्टिटेटिव इजींग ... म्हणजे थोडक्यात डिवाल्युएशन ( नोटा छापणे). आजची समस्या उद्दावर ढकलण्या सारखे. त्या मुळे बॉन्ड नोटस कोसळल्या आहेत. नाहितर युरो आणि युरोपिय अर्थव्यवस्था आत्ताच गडगड्ली असती आणि ब्लॅक क्रिसमस दिसला असता. असो. युद्ध करुन अर्थकारण सुधारता येउ शकेल का नाहि आणि तो पर्याय कोण , कधि आणि कुठे वापरेल हे ह्या धाग्याचा विषय आहे. तुम्हि नाय्ल फर्गुसन चे पुस्तक वाचुन आहात हि आनंदा ची गोष्ट आहे. तुम्हि आता ब्लॅक स्वान (निस्सम तालेब) आणि माइक तायब्बी च जे काहि मिळेल ते सर्व वाचा. तुमच्या उत्तर कोरीया बद्दल च्या प्रश्वाचे उत्तर हे तुम्हाला बिल रिचर्डसन ( माजी कॉमर्स सेक) नक्कि देइल.. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे.. जी २० च्या वेळी व्यापारीक करार न करण्याचे धाडस जेव्हा द कोरीया नी दाखवले तेव्हा युध्दा ची भिती दाखवली गेली.. आणि नंतर काहि दिवसात हवा तसा करार अमेरीकेला मिळाला. अमेरीकेच्या सेवन्थ फ्लिट बद्द्ल तुम्हि नक्की वाचा. संडे मॉर्निंग शोज हि अमेरीकेची सर्वात प्रभावी प्रोपगन्डा मशीनरी आहे. तिकडे जास्त लक्ष देउ नका हिच विनंती ! तुमचा लिहिण्याचा रोख हा माझ्यावर हल्ला करण्याचा दिसतो. तुम्हि प्रश्व विचारणयात विद्वान आहात त्या मुळे मी उत्तरे नक्कि देइन . टाइप करायला वेळ मात्र लागेल. तो पर्यंत अशिच चांगली पुस्तके घ्या आणि वाचाहि

In reply to by वडिल

प्रदीप 25/12/2010 - 12:43
पण... ते सोडवण्या साठि युरोप युरो मधे कर्ज न घेता अमेरीकेच्या फेडरल रिजर्व कडुन (डॉलर) कर्ज घेत आहेत हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे इलेक्श न च्या दुसर्या दिवशीच क्वान्टिटेटिव इजींग ... म्हणजे थोडक्यात डिवाल्युएशन ( नोटा छापणे). आजची समस्या उद्दावर ढकलण्या सारखे. त्या मुळे बॉन्ड नोटस कोसळल्या आहेत. नाहितर युरो आणि युरोपिय अर्थव्यवस्था आत्ताच गडगड्ली असती आणि ब्लॅक क्रिसमस दिसला असता. असो.
हे समजले नाही. युरोतील ज्या देशांच्या अर्थव्यवस्था धडपडत आहेत त्यांना युरोची सेंट्रल बँक मदत करीत आहे (तेथील रोखे विकत घेऊन). त्यासाठी युरोची सामायिक गंगाजळी मुख्य्तवे वापरण्यात येत आहे. ह्या गंगाजळीचे प्रमुख काँट्रिब्युटर्स त्यांच्यातील सधन देश-- प्रामुख्याने जर्मनी व मग फ्रान्स. अशा प्रकरे मदत करीत रहाण्यास जर्मनीचा अर्थातच विरोध आहे. त्यामुळे अलिकडे त्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या (म्हणजे ग्रीस व आयर्लंड) ह्या पुढील मदतींसाठी निम सरकारी -- खाजगी-- गुंतवणूकदारही जबाबदार रहातील अशी तरतूद केली आहे. ह्याचा अर्थ ह्यापुढील युरोतील आर्थिक दृष्ट्या धडपडणार्‍या देशांचे डेट रिस्ट्रक्चरींग करतांना इतर सरकारीच नव्हे तर प्रायव्हेट गुंतवणूकदारांनाही झळ सोसावी लागेल!! ह्य बातमीमुळे अर्थात खाजगी गुंतवणूकदार अधिकच धास्तावले आहेत, व ग्रीस, पोर्तुगाल व स्पेन ह्या देशांच्या रोख्यांचे यिल्ड अजून वाढले आहे. ह्या देशांच्या सी. डी. एस.च्य किंमती अजून चढत आहेत. ही सगळी लक्षणे युरोसाठी फारशी चांगली नाहीत. तेव्हा लवकरच युरो विसर्जित करावा लागेल की काय अशी चिन्हे सध्यातरी दिसत आहेत. ग्रीस व आयर्लंड येथे यूरोपीय सेंट्रल बँकेच्या व्यतिरीक्त आय. एम. एफ. नेही पैसे टाकलेले आहेत. पण तसे त्यांनी इतरत्र्सही टाकलेले होते (उदा. ९७ सालच्या आशियाई देशांच्या धडपडीत). ह्या सर्वाचा व QE2 चा संबंध काय? (परत प्रश्न-- कारण असले अजून एक भोंगळ विधान तुम्ही करीत आहात). अमेरीकेने QE2 त्यांच्या स्वतःच्या मोडकळीला अलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केले आहे. गंमत पहा-- डॉलर व युरो ह्यांच्यात कसलेतरी युद्ध सुरू आहे, अशा विधानापासून तुमची सुरूवात झाली. आता अमेरीकेच्या फेडच्या QE2 चा उद्देश युरोचा पडता डोलारा सावरणे असा होता अशा अर्थाचे काही तुम्ही ह्या प्रतिसादात लिहीले आहे! तुमच्या ज्या विधानांविषयी तुम्हाला नेमके काय अभिप्रेत आहे हे समजत नाही (कारण तुमच्या मते ते ढोबळ लिहीलेले असते) त्यांविषयी नेमके तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारतो. त्याविषयी मला कसलीही लाज अथवा खंत वाटत नाही. आपण जे लिहीतो त्याविषयी तुम्ही नीट, सविस्तर व कोहीरंट उत्तरे द्याल अशी किमान आशा आहे. आता येथेकी तुम्ही जे उत्तर दिले आहे, त्याविषयी परत विचारावे लागते आहेच! 'नियाल फर्ग्युसन्चे पुस्तक तुम्ही वाचले आहेत (व म्हणून तुम्ही युरोच्या आर्थिक धडपडीविषयी सविस्तर लिहीत आहात)' अशी शाबासकी तुम्ही क्लिंटन ह्यांना दिली होती. तेव्हढ्यापुरता मी तो उल्लेख केला आहे, कारण ह्या घडामोडी अगदी अलिकडच्या आहेत, फर्गुसनच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख नाही. माझ्या लिहीण्याचा रोख तुमच्यावर हल्ला करण्याचा दिसत असेल तर तो तुमचा प्रश्न झाला. चर्चा सुरू करतांना व त्यापुढे प्रतिसादातूनही कोहीरंट, नेमकी माहीती देता यावी. उगाच चार टर्म्स उडवल्या तर कुणी ना कुणी तरी त्याविषयी पृच्छा करणार, हे मी तुम्हाला सांगायला नको.

In reply to by प्रदीप

वडिल 25/12/2010 - 12:58
प्रदिप, तुम्हाला काहिहि सांगितलं तरी तुम्हि फाटे फोडत आहात. "ह्या सर्वाचा व QE2 चा संबंध काय? (परत प्रश्न-- कारण असले अजून एक भोंगळ विधान तुम्ही करीत आहात). अमेरीकेने QE2 त्यांच्या स्वतःच्या मोडकळीला अलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केले आहे. " (हा तुमचा समज आहे) मी सुचवले.. युरोपात ला डेट क्रायसीस आणि युध्द अर्थकारण याचा संबध नाहि. मी तुमच्या खोडसाळ प्रश्वा ची उत्तरे देउ शकणार नाहि. तुम्हाला पटत नसेल तर ठिक. तुम्हि युध्द आणि अर्थ कारण यांचा संबध नाहि हे तरी लिहा.

In reply to by वडिल

प्रदीप 25/12/2010 - 18:17
तुम्हि युध्द आणि अर्थ कारण यांचा संबध नाहि हे तरी लिहा.
युद्ध आणि अर्थकारण ह्यांचा पूर्वापार संबंध आहे, हे वर मी माझ्या ह्या धाग्यावरच्या पहिल्या प्रतिसादातच मान्य केले आहे. तुम्ही ते वाचले नसेल तर पुन्हा वाचा.
मी सुचवले.. युरोपात ला डेट क्रायसीस आणि युध्द अर्थकारण याचा संबध नाहि.
अगदी बरोबर. पण डॉलर-युरो युद्ध सुरू आहे आणि त्यावर खुलासा विचारल्यावर QE2 वगैरे कुणी लिहीले? धागा तुमचा, त्याचे लेखक तुम्ही आणि डाफरताय दुसर्‍यांवर? आता मला खरोखरीच हसू येते आहे :) मेरी ख्रिस्मस!!

In reply to by वडिल

क्लिंटन 25/12/2010 - 11:12
गेल्या आठवड्यात तर चीन आणि रशिया नी रुबल आणि युआन मधे संरक्षण विषयक करार केला.
तुम्ही नक्की कोणत्या संरक्षण विषयक कराराबद्दल बोलत आहात?मी ती बातमी फॉलो केली नव्हती आणि गुगलूनही गेल्या आठवड्यात रेलेव्हन्ट काही मिळाले नाही.गेल्या महिन्यातील ही बातमी तुम्हाला अभिप्रेत आहे का?त्या बातमीत म्हटले आहे की पूर्वी चीन आणि रशिया अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार करत पण आता ते हळूहळू त्यांच्या चलनांमध्ये व्यापार करणार आहेत. या दुव्यावर चीन आणि रशियातील करारावर म्हटले आहे की दोन देशांमधील व्यापार वर्षाला ५० बिलियन डॉलर आहे आणि तो आकडा जागतिक व्यापारात मोठ्या उलथापालथी घडवू शकणार नाही.पण या करारातून प्रेरणा घेऊन पुढे पेट्रोलियमचा वार्षिक २.३ ट्रिलियन डॉलरचा व्यापार (सध्या जो डॉलरमध्ये चालतो) तो लोकल चलनात चालायला लागल तर डॉलरवर त्याचा परिणाम होईल आणि असा परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सौदी अरेबिया सारख्या देशांवर अवलंबून आहे. यातही पुढील मुद्दे आहेत. १. सौदी अरेबियानेही अमेरिकेत अनेक शे बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे हे Fahrenhite 911 सारख्या चित्रपटात म्हटले आहेच.तेव्हा डॉलर कोसळणे म्हणजे सौदी अरेबियाचेही नुकसान आहेच. २. चीनकडे सुमारे २.६ ट्रिलियन डॉलर इतके परकीय चलन आहे.चीनचे जीडीपी दरवर्षी ५.५ ट्रिलियन डॉलर आहे हे लक्षात घेतले तर त्यांच्याकडील परकीय चलनाचा साठा किती मोठा आहे हे कळते.डॉलर कोसळणे आणि त्या प्रक्रियेला स्वत: चीनने मदत करणे म्हणजे आपल्या पायावरच धोंडा पाडल्यासारखे होणार नाही का? ३. आज अमेरिका हीच पेट्रोलियम पदार्थांसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.तेव्हा या बाजारपेठेच्या नुसत्या आकारामुळे अमेरिका ही competitive market मधील price taker नाही तर price maker सुध्दा आहे. अशा मोठ्या ग्राहकाकडे बार्गेनिंग पॉवर जास्त असते. तेव्हा चीन-रशिया करारामुळे डॉलर कोसळेल असे म्हणणे मला तरी far-fetched वाटते.
त्या मुळे युरो आणि डॉलर वरुन डिलिवरेजींग / हेजींग करण्याचे अजुन एक टुल मिळाले. डॉलर आणि युरो ची मागणी हळु हळु कमी झाली म्हणजे हेजींग /डि रिस्किंग ला मोठा स्प्रेड मिळेल
याचे अधिक स्पष्टीकरण देऊ शकाल का?जागतिक व्यापारातील काही मुख्य रिस्क असतात. त्या म्हणजे परकीय चलनाच्या विनिमय दरांमधील होणारे चढउतार (करन्सी रिस्क), व्याजाच्या दरांमध्ये होणारे चढउतार (इंटरेस्ट रेट रिस्क) आणि मूळ गोष्टीतील (उदाहरणार्थ पेट्रोलियम) दरांमध्ये होणारे चढउतार. यासाठी हेजिंग करायला करन्सी फॉरवर्ड्स/फ्युचर्स, कमोडिटी फॉरवर्ड्स/फ्युचर्स, Forward Rate Agreement, Eurodollar Futures असे विविध टूल असतात.तेव्हा हेजिंगसाठी आणखी टूल मिळेल म्हणजे नक्की कोणते?ते कशा स्वरूपाचे असेल?
व्य नी नी अधिक बोलु.
आपल्या चर्चेत इतर कोणाला रस असेल तर त्यांनाही हे वाचता यावे म्हणून व्य.नि न करता इथेच लिहित आहे.

In reply to by क्लिंटन

प्रदीप 25/12/2010 - 12:59
सुंदर विश्लेषण व माहिती. हेजिंग खरे तर अनेक क्षेत्रात केले जाते. उदा. विमान कंपन्या इंधनाची फ्यूचर काँट्रॅक्ट्स करतात व पैशाची बचत करतात. कधीकधी हे अंगाशी येते, जसे २००८ -९ च्या धडपडीत कॅथे पॅसिफिकचे झाले. हेजिंग चुकिच्या दिशेने केल्याने त्यांना तेव्हा खूप मार खावा लागला. तसेच ड्राय बल्क कार्गो शिपींगमधेही केलेली फॉरवर्ड काँट्रॅक्ट्स ह्या त्सुनामिच्या काळात अनेक शिपींग कंपन्यांना त्रासदायक ठरली.

In reply to by प्रदीप

क्लिंटन 25/12/2010 - 15:52
विमान कंपन्या इंधनाची फ्यूचर काँट्रॅक्ट्स करतात व पैशाची बचत करतात.
हो बरोबर.पण विमानाच्या इंधनाची फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स सर्वत्र एक्स्चेंजवर उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ अमेरिकेत अशी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स एक्स्चेंजमध्ये नाहीत पण गेल्या २-३ वर्षांपासून अशी कॉन्ट्रॅक्ट्स भारतात एक्स्चेंजमध्ये उपलब्ध आहेत. जिथे अशी कॉन्ट्रॅक्ट्स उपलब्ध नसतात तिथे विमानवाहतूक कंपन्या विमानाच्या इंधनाला सर्वसाधारण मिळत्याजुळत्या कमोडिटीवर (उदाहरणार्थ क्रूड पेट्रोलियम तेल) फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स घेतात.
कधीकधी हे अंगाशी येते
हे सगळ्यात महत्वाचे.असे अंगाशी आल्यामुळे बिलियन डॉलर्सचे नुकसान होण्यापासून दिवाळखोरी जाहिर करावी लागण्यापर्यंत वेळ विविध कंपन्यांवर आली आहे.यापैकी Metallgeschaft या कंपनीची केस रिस्क मॅनेजमेन्ट कम्युनिटीमध्ये खूपच लोकप्रिय आहे.जमल्यास यावर स्वतंत्र लेख कधीतरी. अर्थात या सगळ्याचा मूळ चर्चा विषयाशी संबंध नाही.पण एकातून एक विषय निघत गेले आणि त्यात हा विषयही आला.तेव्हा भविष्यातही कोणी ही चर्चा वाचल्यास पूर्ण माहिती मिळावी म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by वडिल

विजुभाऊ 24/12/2010 - 23:00
आपल्याकडे मान्युफाकच्यरींग नाहि इन्फ्रास्ट्रकचर नाहि, सर्व गोष्टि आयात कराव्या लागत असल्या मुळे रुपया ला बाइंग पावर मिळणार नाहि असे वाटते भारताबद्दल हे नवीनच काहितरी ऐकतोय? तुम्ही नक्की हे भारताबद्दलच बोलताय ना? की पाकिस्तानबद्दल? दोन्ही देशातले चलनाचे नाव रुपया हेच आहे म्हणून विचारतोय? भारताकडे शस्त्रास्त्रे उत्पादन क्षमता नाही हे अर्धसत्य आहे. डी आर डी ओ सारखी संस्था संरक्षणसामग्री साठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर काही प्रमाणात उपलब्ध करून देते. तसे ते सौदी कुवेतकडे सुद्धा नव्हते. युद्धातील सामुग्री विकत घेण्यासाठी पैसे घेऊन जायचे आणि क्विन्टल दोन क्विन्टल शस्त्रे घेऊन यायची असा हा शस्त्र व्यापार चालत नाही. अमेरीका सध्या अफगाणीस्थानात आहे. अफगाणीस्थानकडे तर मान्युफाकच्यरींग /इन्फ्रास्ट्रकचर सोडाच तर डॉलर्/तेल देखील नाहिय्ये. ते कशाप्रकारे अमेरीकेचे पैसे भागवत असतील याची कल्पना करुन पहा? आंतरराष्त्रीय व्यापार केवळ पैसे या एकाच गोष्तीवर चालतात असे नव्हे. अमेरीका हा श्रीमन्त देश आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तो सर्वात मोठा कर्जबाजारी देश सुद्धा आहे. अमेरीकेतले मान्युफाकच्यरींग नाहि इन्फ्रास्ट्रकचर सध्या इतरत्र जायला लागले आहे. तरीसुद्धा डॉलर हे जागतीक चलन आहे. ते कशामुळे ? वडीलजी आपण हा धागा काढलाय त्यामुळे जागतीक अर्थव्यस्थे बद्दल बोलताना नक्की नीट माहीत नसेल उगाच चुकीचे निष्कर्ष मांडू नका. अवांतरः पाकिस्तानसारखा देश अजूनही टिकून आहे..... कर्जबाजारी तर आहेच तरीदेखील शस्त्रास्त्रे खरेदी करतोय. पंधरा वर्षापूर्वी पाकिस्तानने पैसे देवुनदेखील अमेरीकेने पाकिस्तानला एफ १६ विमाने अजून दिलेली नाहीत.

In reply to by विजुभाऊ

वडिल 25/12/2010 - 00:32
विजुभाउ, धन्यवाद .तुमचे प्रश्व वाचले. तुम्हि बरेच प्रश्न एकत्र विचारले आहेत त्यात काहि बेसिक इकॉनॉमिक्स्स चे आहेत आणि काहि या विषयाला अनुसरुन नाहित. तुम्हि तुमची प्रतिक्रिया सकाळ झाली कि परत एकदा वाचा आणि जे संबधित महत्वाचे वाटतील ते ठेवुन बाकिचे उडवुन टाका. सविस्तर उत्तरे नक्कि देइन . तुम्हाला काहि पुस्तके हि वाचायला सुचवीन. तुम्हाला अधिक कन्फुज करण्याचा हेतु नाहि ... पण "युध्द -अर्थकारणाची एक गरज आहे" हा लेखनाचा विषय आहे. तुमचे विचार नक्कि काय आहेत ते तुमच्या लांब लचक प्रतिसादाने समजत नाहित. "आंतरराष्त्रीय व्यापार केवळ पैसे या एकाच गोष्तीवर चालतात असे नव्हे." हे वाक्य काहि समजले नाहि. मी काहि फार मोठा आहे असे माझे अजिबात मत नाहि. तुमची टिका जर जेनुइन उत्सुकते पोटि असेल तर मी माझ्या परीने तुम्हाला नक्कि खरडवहित समजावुन सांगीन. पण हे प्रश्व फक्त टिंगली टवाळी साठि असतील तर मी वेळ घालवणार नाहि.

In reply to by वडिल

विजुभाऊ 25/12/2010 - 10:34
आंतरराष्त्रीय व्यापार केवळ पैसे या एकाच गोष्तीवर चालतात असे नव्हे." हे वाक्य काहि समजले नाहि. तो व्यापार हा वस्तुविनीमय ( बार्टर) या स्वरूपात देखील असू शकतो. त्यासाठी वस्तूच हव्यात असेही नाही. तो व्यापार भविष्यातील होणार्‍या नफ्याला भागिदारीत ठेवून सुद्ध होउ शकतो. मी शक्यतो वैयक्तीक टिंगल्/शेरेबाजी करीत नाही. तुम्ही मांडलेले मुद्दे विषेशतः रुपया गडगडेल किंवा भारताकडे म्यान्युफेक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाही. हे मला पटले नाही. युद्ध किंवा आपत्ती ही अर्थकारणाला चलना देणारी घटना असते हे खरे. अमेरीकेने त्याचा वापर नेहमीच केलेला आहे. उ कोरीय/ द कोरीया यांच्यात यूद्धा होइलही कदाचित पण त्याची व्याप्ती ही सर्वंकष नसेल. दक्षीण अशियात यूद्ध ( भारत-पाक) झाले तर ते आजच्या घडीला कोणालाच परवडणारे नसेल. कारण अमेरीकेला किंवा चीनला त्या युद्धात नुसती शस्त्रे विकून बघ्याची भूमीका घेता येणार नाही. तशा युद्धात अमेरीकेची पत पणाला लागेल. ते त्याना परवडणारे नाही. अफगाण युद्धात अमेरीका पोळली गेलीय. त्याना ते अवघड जागेचे दुखणे झालेय.त्यांच्या देशात झाले नाही तरी त्यांचे सैनीक तिथे मरत आहेत. आता परिस्थिती अशी आहे की तेथून माघार घेतली की अफगणीस्थानचे तुकडे होतील. पाकचाही उत्तर पश्चीम भाग कदाचित जाईल की काय अशी शम्का आहे. त्यामुळे पाकला अमेरीका तेथे हवी आहे. अफगाणीस्थात पुन्हा तालीबान्यांची सत्ता आली तर ते अमेरीकेला अवघड जाईल

In reply to by विजुभाऊ

क्लिंटन 25/12/2010 - 11:29
अमेरिकेने दुसऱ्या महायुध्दानंतर दर ८-१० वर्षांनी कुठेना कुठे युध्द काढले.त्यातूनच त्यांच्या देशातील संरक्षण उद्योगाला चालना मिळाली.पण १९५०-६० च्या दशकातील (किंवा अगदी १९८० च्या दशकातील) परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यात मूलभूत फरक आहेत. वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दक्षिण आशियात अणुयुध्द होणे आणि त्यात भारताचे नुकसान होणे अमेरिकेला नक्कीच परवडणारे नाही. जागतिक अर्थकारणात ५० वर्षांपूर्वीचे अमेरिकेचे स्थान आणि आताचे स्थान यात खूप मोठा फरक आहे.आज अमेरिकेला भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेची गरज आहे.कोरिया प्रकरण मी फारसे वाचलेले नाही त्यामुळे त्याविषयी मला बोलता येणार नाही.पण माझा मुद्दा जास्त दक्षिण आशियातील परिस्थितीबद्दल आहे. १९८० च्या दशकात पाकिस्तानने पैसे देऊनही एफ-१६ विमाने अमेरिकेने २००५ पर्यंत दिली नव्हती.२००५ मध्ये बुश-मुश भेटीत बुशने ती द्यायचे मान्य केले.ती अजून दिली आहेत की नाही याची कल्पना नाही.त्याचवेळी भारताला एफ-१८ विमाने द्यायची तयारी अमेरिकेने दाखवली.तेव्हा युध्द झाले तर त्यात अमेरिकेची फूस अशा स्वरूपाची असेल आणि युध्द झाले नाही तरी अमेरिकेची विमाने विकली गेली तरी त्यांना चालण्यासारखे आहे.पण भारत-पाकिस्तान दरम्यान अणुयुध्द व्हायची वेळ आली तर अमेरिका नक्कीच हस्तक्षेप करून युध्द होऊ नये याची काळजी घेईल (कदाचित पाकिस्तानातील अण्वस्त्रांचा ताबा आपल्याकडे घेऊन) असे मला वाटते.जाणकारांनी यावर अधिक भाष्य करावे ही विनंती. तेव्हा युध्द हा अर्थव्यवस्थेला चालना द्यायचा मार्ग हा मार्ग जुना झाला आणि सध्याच्या काळाला तो १००% लागू नाही असे मला म्हणायचे आहे.

In reply to by क्लिंटन

वडिल 25/12/2010 - 12:11
जर एकच कंपनी दोन देशांना शस्त्र सामग्री पुरवत असेल तर ते काय म्हणायचे ? अशी कंपनी जास्तीत जास्त माल विकायला काय करेल ? तुमचं सर्व लेखन हेच दर्शवते आहे कि अमेरीकेचा मुख्य धंदा हा सर्व देशांना शस्त्र पुरवणे हा आहे. कोणाला किती हाच फक्त वादाचा विषय आहे. समजा आज किंवा उद्या युध्द झाले नाहि तरी ... युध्द करवुन व्यापार वाढवता येइल का नाहि ? जर गरीब देशांच्या जि डि पी तील अधिक अधिक भाग हा युध्द सामग्री मधे गुंतला तर प्रगति होईल का ? सदैव युध्द सदृश भितीदायक वातावरण ठेवलं तर व्यापारावर / इन्वेस्ट्मेन्टस वर त्याचा काय परीणाम होईल ? भारतीय उप खंड.

In reply to by वडिल

क्लिंटन 25/12/2010 - 14:00
तुमचं सर्व लेखन हेच दर्शवते आहे कि अमेरीकेचा मुख्य धंदा हा सर्व देशांना शस्त्र पुरवणे हा आहे. कोणाला किती हाच फक्त वादाचा विषय आहे.
कसे काय?माझ्या मते तरी अमेरिकेचा मुख्य धंदा स्वत:चा स्वार्थ साधणे हाच आहे.आणि तो तसा असेल तर त्यात काही गैर मला वाटत नाही.घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी भाजत नसतो.जर स्वत:चा स्वार्थ इतर देशांना शस्त्रे विकून साधता येत असेल तर अमेरिका तसे करेल आणि जर इतर देशांमधील युध्द थांबवून स्वत:चा स्वार्थ साधता येत असेल तर अमेरिका ते ही करेल.
समजा आज किंवा उद्या युध्द झाले नाहि तरी ... युध्द करवुन व्यापार वाढवता येइल का नाहि ?
दक्षिण आशियाच्या संदर्भात सुमारे २० वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत नि:संदिग्ध हो.मधल्या काळात उत्तर तितके निंसंदिग्ध नव्हते.पण आताच्या काळात युध्द करवून शस्त्रांचा व्यापार जितका वाढेल त्याच्या अनेक पटींनी युध्दात भारताच्या होणाऱ्या नुकसानामुळे तो कमी होईल.भारत-पाकिस्तान दरम्यान युध्द झाले तर (अमेरिकेने पाकिस्तानची अण्वस्त्रे ताब्यात घेतली नाहीत तर) ते अणुयुध्दच होईल हे वेगळे सांगायला नको. इथे Fortune 500 कंपन्यांची यादी दिली आहे.त्यात लॉकहिड मार्टीन ही एफ-१६ विमाने उत्पादन करणारी कंपनी ४४व्या क्रमांकावर आहे.पण त्यापेक्षाही वॉलमार्ट, बॅंक ऑफ अमेरिका, जनरल इलेक्ट्रीक,जे.पी.मॉर्गन चेस,एच.पी,सिटीग्रुप,प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बल,जनरल मोटर्स या कंपन्या मोठ्या आहेत आणि त्यांचे हितसंबंध दक्षिण आशियात अणुयुध्द होऊ नये यातच गुंतलेले आहेत हे नक्की. भारतात वेगाने वाढणारे एअरलाईन्स क्षेत्र ही पैशाच्या दृष्टीने विचार केला तर भारत ही बोईंगसाठी लॉकहिड मार्टीनपेक्षा मोठी बाजारपेठ आहे. प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बलची उत्पादने जगभरात जवळपास सर्वत्र विकली जातात पण भारतीय मध्यमवर्गीयांची संख्या लक्षात घेता भारत ही त्या कंपनीची मोठी बाजारपेठ आहे.अणुयुध्द झाले तर भारतात लोकांना विमान प्रवास परवडेल का?म्हणजे त्यात बोईंगसारख्या कंपनीचे नुकसान नाही का? भारताचे अणुयुध्दात मोठे नुकसान झाले तर एरियल, मॅक ३, टाईड हे सध्या अगदी गल्लोगल्ली विकले जाणारे ब्रॅन्ड लोकांना परवडतील का?म्हणजेच त्याचा प्रॉक्टर ऍन्ड गॅम्बलला मोठा फटका बसणार हे नक्कीच. असेच Fortune 500 कंपन्यांपैकी अनेकांविषयी लिहिता येईल.तेव्हा निदान दक्षिण आशियात युध्द करवून अमेरिका स्वत:चा स्वार्थ साधेल असे वाटावे अशी परिस्थिती आहे का? अर्थात उद्या पाकिस्तान तालिबान्यांच्या हातात गेला तरी अणुयुध्द होणार नाही अशा भ्रमात मी नक्कीच नाही.माझा म्हणायचा उद्देश आहे की तुम्ही म्हणता तसे युध्द अमेरिका करवणार नाही असे मला वाटते.
सदैव युध्द सदृश भितीदायक वातावरण ठेवलं तर व्यापारावर / इन्वेस्ट्मेन्टस वर त्याचा काय परीणाम होईल ? भारतीय उप खंड
याचे उत्तर वर लिहिले तसेच आहे.त्याचा व्यापारावर आणि इन्व्हेस्टमेन्टवर वाईट परिणाम होईल आणि सध्याच्या काळात ते अमेरिकेला परवडण्यासारखे नाही.

In reply to by वडिल

डीलर 27/12/2010 - 16:27
वडील जी , युध्द जागतिक अर्थ्व्यवस्थेची गरज की अमेरिकन अर्थ व्यवस्थेची? भारतात कांद्याचे भाव वाढण्यामागे अमेरिकेची युध्द्खोरी कशी जबाबदार आहे ते जरा समजावून सांगा. US and EUROPE both are busy licking their wounds and seeminterested in seeing how their own currencies are devalued more to reap benefits.More and more countries are losing faith in any single currency as reserve currency be it DOLLAR or EURO. भारत सर्वात जास्त आयात (किंमती ने) कच्चा तेलाची होते. भारताची निर्यात ही आयाती पे़क्षा कमी आहे पण भारतात उत्पान आणि पायाभूत सुविधा नाहीत हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. त्यांचा वेग कमी आहे रुपयाची बाइंग पावर (?) वढवून आयात वाढवण्यात काय फायदा? चीन आणि जपान सारखे देश तर त्यांच्या चलनाची किंमत (बाइंग पावर) वाढू नये म्हणून जास्त काळजी घेतात.
जागतिक अर्थव्यवस्था कोलमडत आहे. अमेरीके सारखा श्रीमंत देश जवळ जवळ कंगाल झाला आहे. युरोप त्याच स्थितित आहे. भारत , चीन, ब्राजिल, रशिया सारखे देश जागतिक अर्थव्यवस्था पुन: जिवित करतील अशी आशा जगभर आहे. ओबामा नंतर रशिया, चीन , फ्रान्स आदि देशांचे प्रमुख भारताचे कौतुक करुन (हरभर् या च्या) झाडावर चढवत आहेत. स्वत: च्या फायद्या साठि भारतीय बाजारपेठ आणि कन्जुमर कडे सगळ्यांचे लक्ष आहे. युध्द शस्त्राचा भारत हा मोठा आयात कर्ता आहे.

गनप्या (भाग-४)

पियुशा ·

गणेशा 22/12/2010 - 16:25
खुप जबरी ... काही ठिकाणी तर हसुन हसुन पुरे वआट . ऑफिस मधले बाजुचे पण पाहिला लागले काय वाचतोय हा ... खुप सुंदर लिहिले आहे सगळे .. सगळे भागच जबरी ..

In reply to by नगरीनिरंजन

गणेशा 22/12/2010 - 19:27
तुज्या आयला ........................................(नक्को) येथे आहे ना ते .. अजुन ही एका शिवी नंतर आहे असे वाटते ... --- ही शिवी माझ्या तर लय आवडिची झाली आहे .. ही शिवी नाही तर ओवी असावी असे माझे मन उगीच म्हणते

स्वैर परी 22/12/2010 - 18:09
एकदम सुंदर जमलाय हा भाग! ह. ह. पु. वा! ऑफिस मधे लोक पहायला लागले, इतकं खिदीखिदी कोण हसतय म्हणुन! असेच भाग येउदे आणखी

प्रकाश१११ 23/12/2010 - 15:01
"म्या पाहील का आपल्या दोघांच एक मोट्ट शेत हूत , सकलिकड़ हिरव मावळ डुलत हूत धारदार काट्याची गावरान वांगी ,मेथी आन शेपूच वाफे , मळा कसा फुलला हुताहिरवागार म्या काम करीत हुतो आन तू मला भाकरी घेउन आल्ली हुती ,म्या जेवत हुतो आन तू वांगी खुडत हुती ,काय दिसत हुती बकुळे तू ! पियुषा ..!! मस्त निव्वळ. हिरव्या मिरच्यांचा ठेचा .ज्वारीची भाकरी नि ठेचा.दुसरे काय हवे ? माझ्या खूप शुभेच्छा.!!

गणेशा 22/12/2010 - 16:25
खुप जबरी ... काही ठिकाणी तर हसुन हसुन पुरे वआट . ऑफिस मधले बाजुचे पण पाहिला लागले काय वाचतोय हा ... खुप सुंदर लिहिले आहे सगळे .. सगळे भागच जबरी ..

In reply to by नगरीनिरंजन

गणेशा 22/12/2010 - 19:27
तुज्या आयला ........................................(नक्को) येथे आहे ना ते .. अजुन ही एका शिवी नंतर आहे असे वाटते ... --- ही शिवी माझ्या तर लय आवडिची झाली आहे .. ही शिवी नाही तर ओवी असावी असे माझे मन उगीच म्हणते

स्वैर परी 22/12/2010 - 18:09
एकदम सुंदर जमलाय हा भाग! ह. ह. पु. वा! ऑफिस मधे लोक पहायला लागले, इतकं खिदीखिदी कोण हसतय म्हणुन! असेच भाग येउदे आणखी

प्रकाश१११ 23/12/2010 - 15:01
"म्या पाहील का आपल्या दोघांच एक मोट्ट शेत हूत , सकलिकड़ हिरव मावळ डुलत हूत धारदार काट्याची गावरान वांगी ,मेथी आन शेपूच वाफे , मळा कसा फुलला हुताहिरवागार म्या काम करीत हुतो आन तू मला भाकरी घेउन आल्ली हुती ,म्या जेवत हुतो आन तू वांगी खुडत हुती ,काय दिसत हुती बकुळे तू ! पियुषा ..!! मस्त निव्वळ. हिरव्या मिरच्यांचा ठेचा .ज्वारीची भाकरी नि ठेचा.दुसरे काय हवे ? माझ्या खूप शुभेच्छा.!!
3

चिलीया बाळाची कथा

विजुभाऊ ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अडगळ 22/12/2010 - 22:43
खरंच की ~ जाईल_औंदा इजिप्त कधी ती ~

In reply to by कवितानागेश

चिंतामणी 22/12/2010 - 23:28
चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का? सगळेच T.P. करत आहेत. प्रश्ण निट वाचा आणि पुढे जा. :|

In reply to by वेताळ

अवलिया 22/12/2010 - 13:53
एकदा आम्ही रुपककथेचा अर्थ कसा लावायचा हे नीट समजवुन दिले. आता विजुभाउंना १००+ चा धागा आपला पण असावा असे डोहाळे लागले त्याला आपण काय करणार? तेव्हा चालु द्या!!

In reply to by अवलिया

नरेशकुमार 24/12/2010 - 15:11
विजुभाउंना डोहाळे कसे शक्य वाटते ? उगा बोटं उचलायचि आनि टायपायचे काय पन तरी पन शक्यता नाकारता येत नाय बुवा.

गवि 22/12/2010 - 13:45
अरे देवा.. बरं.. त्या मूळ चर्चेच्या धाग्यातच धागालेखिकेने एक लिंक दिली आहे, चिलियाबाळाच्या कथेसाठी. पहिल्या दहा बारा कॉमेंटस मधेच दिसेल. असेच एक अतिथी सत्कारापोटी "शिजवलेले मूल" पैकी आहे. (वैधानिक इशारा: प्रतीकात्मक अर्थही असू शकतो. तात्पर्यः अतिथी देवो भवः) गहन आहे विषय पण उगीचच सूचना: फक्त तात्पर्य समजून घेतले तर गोळीबार टळेल.

योगप्रभू 22/12/2010 - 14:22
'प्रसाद' या मासिकाने (प्रसाद प्रकाशन, पुणे) फार पूर्वी 'दत्त संप्रदाय विशेषांक' नावाचा व्यापक, सुंदर आणि अभ्यासकांसाठी संग्राह्य विशेषांक काढला होता. हा अंक सध्या बाजारात दुर्मीळ आहे, परंतु प्रकाशनाच्या कार्यालयात संपर्क साधून बघावा. दत्त अवधूत संप्रदायाची परंपरा-इतिहास-शिस्त-महत्त्वाची स्थळे असे खूप लेख आहेत. मी तो अंक वाचून परत केला त्याचवेळी त्याची झेरॉक्स करायला हवी होती. आता हळहळ वाटते.

सुप्परमॅन 22/12/2010 - 15:49
धागा कशाला काढला? शुचिंना खरड टाकायची. त्यांचा अशा विषयात हातखंडा आहे. त्यांनी तुम्हाला सांगितली असती गोष्ट.

In reply to by आमोद शिंदे

यशोधरा 23/12/2010 - 13:25
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत? जा, सांगितलेली कामं करा! फुकट (धागे) खाऊ!

In reply to by यशोधरा

टारझन 23/12/2010 - 13:30
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत?
'अरे' ह्या एकेरी उल्लेखा नंतर "तुमी" ( पक्षी : तुम्ही) हा दुहेरी उल्लेख मराठी व्याकरणात चालतो काय ? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. वडिलांना "अरे तुम्ही माझी गाडी घेऊन गेला होतात काय ? " असे वाक्य कर्णमधुर वाटत नाही.
फुकट (धागे) खाऊ!
मराठीच्या व्याकरणात "भाड" ला समानार्थी शब्द म्हणुन "फुकट" चालुन जाते काय ? इथेही जाणकारांच्या प्रकाशात बघायला उत्सुक आहे. - शब्दधारा

In reply to by आमोद शिंदे

यशोधरा 23/12/2010 - 19:25
चिडून नाय काय! :) चिल्लर पिल्लर लोकांवर काय चिडायचे? तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म. आता जा, कामाला लागा.

In reply to by यशोधरा

पंगा 24/12/2010 - 10:42
तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म.
मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?

In reply to by पंगा

यशोधरा 24/12/2010 - 12:44
>>मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?>> पंगा, त्याची उठाठेव तुम्हांला कशाला? भलेपणाशी तुमचा दुरुनही संबंध असावा असे वाटत नाही. उगाच चांचौ. आणि तुम्ही भले आहात असे गृहीत धरुन जरी तुम्हांला काही दिले तरी मुळातच तुमच्यापाशी सभ्यता वा लाज नाहीच ती झाकायचाही प्रश्न उद्भवत नाही, नाही का? असो. शहाणे असाल तर एवढे पुरेसे होईल असे वाटते.

In reply to by यशोधरा

विजुभाऊ 24/12/2010 - 15:50
माझेही हेच मत आहे. पंगा थट्टा मस्करी करावी पण त्याला काळवेळ व्यक्ती वगैरे बघून थोडी मुरड सुधा घालावी. मर्यादा राखावी

Pain 23/12/2010 - 06:53
चिलीया नाही, चिलया बाळ. नाथपरंपरा म्हणजे बहुदा श्रीदत्तात्रेयांची शिष्यपरंपरा. ती आदिगुरु गहिनीनाथांपासून सुरु होऊन मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे करत करत अलीकडे निवृत्तीनाथांपर्यंत आली आहे. (जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा)

In reply to by टारझन

त्या जाणकारच आहेत. पण सध्या त्यांच्याकडचा प्रकाश संपला असेल. डे लाईट पुरेसा सेव्ह केलेला दिसत नाही.

विजुभाऊ 23/12/2010 - 14:26
दत्त संप्रदाय आणि आयसेनहॉवर अर्थात कोणाचा कोण : सौतन्त्र सामाजीक पौराणीक ऐत्याशीक वगणाट्य. असा एखादा धागा सुरु व्हावा अशी इच्छा व्यक्त करूया म्हणतोय. अरे....काय राव काय चाल्लय काय ( बनवाबनवी : सुधीर जोशी) धागा कुठला, विषय कुठे ,तुम्ही कुठे, मी कुठे , शक्यता कुठे ...............हर हर मुळे मुठे मुळे मुठे

विजुभाऊ 23/12/2010 - 17:35
आयसेनहॉवरची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी लौकरच टाक्तोय. तो अमेरीका या जगाचा १९व्या शतकात जन्मलेला शेवट्चा अध्यक्ष होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अडगळ 22/12/2010 - 22:43
खरंच की ~ जाईल_औंदा इजिप्त कधी ती ~

In reply to by कवितानागेश

चिंतामणी 22/12/2010 - 23:28
चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का? सगळेच T.P. करत आहेत. प्रश्ण निट वाचा आणि पुढे जा. :|

In reply to by वेताळ

अवलिया 22/12/2010 - 13:53
एकदा आम्ही रुपककथेचा अर्थ कसा लावायचा हे नीट समजवुन दिले. आता विजुभाउंना १००+ चा धागा आपला पण असावा असे डोहाळे लागले त्याला आपण काय करणार? तेव्हा चालु द्या!!

In reply to by अवलिया

नरेशकुमार 24/12/2010 - 15:11
विजुभाउंना डोहाळे कसे शक्य वाटते ? उगा बोटं उचलायचि आनि टायपायचे काय पन तरी पन शक्यता नाकारता येत नाय बुवा.

गवि 22/12/2010 - 13:45
अरे देवा.. बरं.. त्या मूळ चर्चेच्या धाग्यातच धागालेखिकेने एक लिंक दिली आहे, चिलियाबाळाच्या कथेसाठी. पहिल्या दहा बारा कॉमेंटस मधेच दिसेल. असेच एक अतिथी सत्कारापोटी "शिजवलेले मूल" पैकी आहे. (वैधानिक इशारा: प्रतीकात्मक अर्थही असू शकतो. तात्पर्यः अतिथी देवो भवः) गहन आहे विषय पण उगीचच सूचना: फक्त तात्पर्य समजून घेतले तर गोळीबार टळेल.

योगप्रभू 22/12/2010 - 14:22
'प्रसाद' या मासिकाने (प्रसाद प्रकाशन, पुणे) फार पूर्वी 'दत्त संप्रदाय विशेषांक' नावाचा व्यापक, सुंदर आणि अभ्यासकांसाठी संग्राह्य विशेषांक काढला होता. हा अंक सध्या बाजारात दुर्मीळ आहे, परंतु प्रकाशनाच्या कार्यालयात संपर्क साधून बघावा. दत्त अवधूत संप्रदायाची परंपरा-इतिहास-शिस्त-महत्त्वाची स्थळे असे खूप लेख आहेत. मी तो अंक वाचून परत केला त्याचवेळी त्याची झेरॉक्स करायला हवी होती. आता हळहळ वाटते.

सुप्परमॅन 22/12/2010 - 15:49
धागा कशाला काढला? शुचिंना खरड टाकायची. त्यांचा अशा विषयात हातखंडा आहे. त्यांनी तुम्हाला सांगितली असती गोष्ट.

In reply to by आमोद शिंदे

यशोधरा 23/12/2010 - 13:25
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत? जा, सांगितलेली कामं करा! फुकट (धागे) खाऊ!

In reply to by यशोधरा

टारझन 23/12/2010 - 13:30
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत?
'अरे' ह्या एकेरी उल्लेखा नंतर "तुमी" ( पक्षी : तुम्ही) हा दुहेरी उल्लेख मराठी व्याकरणात चालतो काय ? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. वडिलांना "अरे तुम्ही माझी गाडी घेऊन गेला होतात काय ? " असे वाक्य कर्णमधुर वाटत नाही.
फुकट (धागे) खाऊ!
मराठीच्या व्याकरणात "भाड" ला समानार्थी शब्द म्हणुन "फुकट" चालुन जाते काय ? इथेही जाणकारांच्या प्रकाशात बघायला उत्सुक आहे. - शब्दधारा

In reply to by आमोद शिंदे

यशोधरा 23/12/2010 - 19:25
चिडून नाय काय! :) चिल्लर पिल्लर लोकांवर काय चिडायचे? तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म. आता जा, कामाला लागा.

In reply to by यशोधरा

पंगा 24/12/2010 - 10:42
तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म.
मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?

In reply to by पंगा

यशोधरा 24/12/2010 - 12:44
>>मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?>> पंगा, त्याची उठाठेव तुम्हांला कशाला? भलेपणाशी तुमचा दुरुनही संबंध असावा असे वाटत नाही. उगाच चांचौ. आणि तुम्ही भले आहात असे गृहीत धरुन जरी तुम्हांला काही दिले तरी मुळातच तुमच्यापाशी सभ्यता वा लाज नाहीच ती झाकायचाही प्रश्न उद्भवत नाही, नाही का? असो. शहाणे असाल तर एवढे पुरेसे होईल असे वाटते.

In reply to by यशोधरा

विजुभाऊ 24/12/2010 - 15:50
माझेही हेच मत आहे. पंगा थट्टा मस्करी करावी पण त्याला काळवेळ व्यक्ती वगैरे बघून थोडी मुरड सुधा घालावी. मर्यादा राखावी

Pain 23/12/2010 - 06:53
चिलीया नाही, चिलया बाळ. नाथपरंपरा म्हणजे बहुदा श्रीदत्तात्रेयांची शिष्यपरंपरा. ती आदिगुरु गहिनीनाथांपासून सुरु होऊन मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे करत करत अलीकडे निवृत्तीनाथांपर्यंत आली आहे. (जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा)

In reply to by टारझन

त्या जाणकारच आहेत. पण सध्या त्यांच्याकडचा प्रकाश संपला असेल. डे लाईट पुरेसा सेव्ह केलेला दिसत नाही.

विजुभाऊ 23/12/2010 - 14:26
दत्त संप्रदाय आणि आयसेनहॉवर अर्थात कोणाचा कोण : सौतन्त्र सामाजीक पौराणीक ऐत्याशीक वगणाट्य. असा एखादा धागा सुरु व्हावा अशी इच्छा व्यक्त करूया म्हणतोय. अरे....काय राव काय चाल्लय काय ( बनवाबनवी : सुधीर जोशी) धागा कुठला, विषय कुठे ,तुम्ही कुठे, मी कुठे , शक्यता कुठे ...............हर हर मुळे मुठे मुळे मुठे

विजुभाऊ 23/12/2010 - 17:35
आयसेनहॉवरची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी लौकरच टाक्तोय. तो अमेरीका या जगाचा १९व्या शतकात जन्मलेला शेवट्चा अध्यक्ष होता.
दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय. त्याच संदर्भातील एक गाणे आठवले . त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का? असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे. चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे? हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?

श्रीनिवास रामानुजन

ramjya ·

टारझन 22/12/2010 - 12:53
आज २२ डिसेम्बर्
ब्रेकिंग ण्युज .. ब्रेकिंग ण्युज .. ब्रेकिंग ण्युज ... आज बाविस डिसेंबर आहे ?
गणिती 'श्रीनिवास रामानुज'' जन्मदिन
ते रामानुज होते की रामानुजण ?
http://en.wikipedia.org/wiki/Srinivasa_Ramanujan
फार कष्ट घेऊन सर्च केलेला दिसतोय उपयुक्त लिंक साठी ... बाकी शिला आली होती का ? एवढ्या पटकन लेख टाकुन पळालात ते ? अवांतर : रामानुज ला हॅप्पी बड्डे बिल्कुल देणार नाही. मॅथ्स चा मला फार तिटकारा आहे. इंजिनियरिंग ला सगळे मॅथ्स एकेकदा लटकले होते. त्यामुळे सगल्या गणितींबद्दल मला मनस्वी तिरस्कार वाटतो. - गमज्या

चिरोटा 22/12/2010 - 13:48
रामानुजन ह्यांच्यावर लिहिलेले "The man who knew infinity"(http://en.wikipedia.org/wiki/The_Man_Who_Knew_Infinity ) हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भाषणात रामानुजन ह्यांच्या शय रोगाने तरुणपणी मृत्यू झाला .त्याबद्दल त्यांची इंग्लड मधील सोवळी आणि कर्मठ राहणीमान कारणीभूत ठरले असे म्हटले होते .नव्या देशात त्यांच्या संस्कृतीची समरस न होता हा गृहस्थ भर थंडीत थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ ( गरम पाणी न मिळाल्याने ) स्नान व शाकाहाराचा अट्टाहास त्यामुळे खुपदा उपासमार सहन करून शेवटी शय रोगी झाले .त्यमुळे जग व भारत एका फार मोठ्या गणित तज्ञाला मुकले . परदेशात स्थयिक होतांना मी हि गोष्ट ध्यानी ठेवली. व जमेल तेवढ व सापेक्षवादास पटेल इतक्या परंपरा मी येथे पाळतो .कारण माणसाने परंपरा रूढी बनविल्या आहेत .त्यांनी माणसाला बनविले नाही .हे रामानुजन ह्यांच्या पुण्यतिथी च्या निम्मिताने लक्षात ठेवले तर त्याच्या मृत्यूचे चीज झाले असे आपण समजू . कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला

टारझन 22/12/2010 - 12:53
आज २२ डिसेम्बर्
ब्रेकिंग ण्युज .. ब्रेकिंग ण्युज .. ब्रेकिंग ण्युज ... आज बाविस डिसेंबर आहे ?
गणिती 'श्रीनिवास रामानुज'' जन्मदिन
ते रामानुज होते की रामानुजण ?
http://en.wikipedia.org/wiki/Srinivasa_Ramanujan
फार कष्ट घेऊन सर्च केलेला दिसतोय उपयुक्त लिंक साठी ... बाकी शिला आली होती का ? एवढ्या पटकन लेख टाकुन पळालात ते ? अवांतर : रामानुज ला हॅप्पी बड्डे बिल्कुल देणार नाही. मॅथ्स चा मला फार तिटकारा आहे. इंजिनियरिंग ला सगळे मॅथ्स एकेकदा लटकले होते. त्यामुळे सगल्या गणितींबद्दल मला मनस्वी तिरस्कार वाटतो. - गमज्या

चिरोटा 22/12/2010 - 13:48
रामानुजन ह्यांच्यावर लिहिलेले "The man who knew infinity"(http://en.wikipedia.org/wiki/The_Man_Who_Knew_Infinity ) हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका भाषणात रामानुजन ह्यांच्या शय रोगाने तरुणपणी मृत्यू झाला .त्याबद्दल त्यांची इंग्लड मधील सोवळी आणि कर्मठ राहणीमान कारणीभूत ठरले असे म्हटले होते .नव्या देशात त्यांच्या संस्कृतीची समरस न होता हा गृहस्थ भर थंडीत थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ ( गरम पाणी न मिळाल्याने ) स्नान व शाकाहाराचा अट्टाहास त्यामुळे खुपदा उपासमार सहन करून शेवटी शय रोगी झाले .त्यमुळे जग व भारत एका फार मोठ्या गणित तज्ञाला मुकले . परदेशात स्थयिक होतांना मी हि गोष्ट ध्यानी ठेवली. व जमेल तेवढ व सापेक्षवादास पटेल इतक्या परंपरा मी येथे पाळतो .कारण माणसाने परंपरा रूढी बनविल्या आहेत .त्यांनी माणसाला बनविले नाही .हे रामानुजन ह्यांच्या पुण्यतिथी च्या निम्मिताने लक्षात ठेवले तर त्याच्या मृत्यूचे चीज झाले असे आपण समजू . कायदा पाळा गतीचा थांबला तो संपला
आज २२ डिसेम्बर् गणिती 'श्रीनिवास रामानुज'' जन्मदिन....http://en.wikipedia.org/wiki/Srinivasa_Ramanujan

चीनचे मनसे.

विजुभाऊ ·

अवलिया 22/12/2010 - 11:07
चीन सरकारचे मनापासुन अभिनंदन.. मध्यंतरी चीनी लोकांनी इंग्लिश शिकावे म्हणुन सरकारी प्रयत्न पण चालू होते असे समजले. पण त्यांनी दोन्ही गोष्टित गल्लत केलेली नाही हे स्पृहणीय.

विजुभौंच्या ह्या लेखनात कधी न्हवे ते कुठेही संघ अथवा भाजपावर टिका केलेली नसल्याने हा त्यांचा लेख फाऊल धरुन उडवण्यात यावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 22/12/2010 - 11:10
आणि राम, हिंदू, धर्म, संस्कृती यावर हिंदूद्वेषप्रणित कागदपत्रे वाचून गरळ पण ओकलेली नाही... जियो ! विजुभाउ जियो !

आजानुकर्ण 22/12/2010 - 11:16
मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी. चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे. http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते. मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे. गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे. अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे. कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे. सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते. हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो? बाय द वे मातृभाषेला योग्य सन्मान देणार्‍या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्‍या चीन सरकारचे अभिनन्दन.

In reply to by आजानुकर्ण

अवलिया 22/12/2010 - 11:19
मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी. मी इथे आलो मी इथं आलो म्या इडं आलु म्या इत्तं आलु हे मराठीतील वाक्य नाहीत का? केवळ प्रमाणलेखनानुसारच बोलणे आणि लिहिणे म्हणजेच मातृभाषेबद्दल प्रेम का? (अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे)

In reply to by अवलिया

आजानुकर्ण 22/12/2010 - 11:21
मी इथे आलो मी इथं आलो म्या इडं आलु म्या इत्तं आलु हे मराठीतील वाक्य नाहीत का?
एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा.

In reply to by आजानुकर्ण

विजुभाऊ 22/12/2010 - 11:39
एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा. साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो. त्यात गर्व असणे / गर्विष्ठ असणे हा वाईट गुण आहे मानसाने गर्व करू नये. नम्र असावे अशी शिकवण दिली होती. हिन्दी भाषेने मात्र गर्वाला फार आदराचे स्थान दिले. त्यामुळे आपण गर्वाने म्हणतो मी मराठी आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. भाषा जपली संस्कृती जपली. भाषा संपली संस्कृती संपली

In reply to by विजुभाऊ

पंगा 24/12/2010 - 10:59
साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो.
मग पुढे काय घडले त्या धड्यात? मोठेपणी गर्वाला भाडेकरू मिळाला का?

In reply to by अवलिया

टारझन 22/12/2010 - 11:30
तु "ब्रिटिश टिंगी" शी सहमत आहेस की "ब्रिटिश टिंग्या" शी ? हे असं बोलतोय कारण की ह्यात जी गल्लत होते आहे ती भाषेचा अभ्यास वाढवुन कमी करता येणार नाहीये. - भेंडीश वांग्या

In reply to by अवलिया

छोटी टिंगीशी सहमत व्हावे. अवांतरः हा टारझन माझ्याशी फार वाईट वागतो. मला सारखे खाली दाखवतो (हे हिंदीतील "निचा दिखाना" चे मराठीकर्ण आहे). असो. हिंदी शब्द आले म्हणून कुठे बिघडले आहे ?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 22/12/2010 - 12:09
मला सारखे खाली दाखवतो
अश्लील अश्लील. अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की.

In reply to by आजानुकर्ण

अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की. ऑल हिंदी वर्डस् कमिंग टू मराठी आर ईक्वल बट सम आर मोअर इक्वल. (वाह इतके सगळे इंग्रजी शब्द पण मराठीत आले तर मराठी कशी जागतिक भाषा होईल नै!) गर्व से कहो हम हिंदी हई.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 24/12/2010 - 11:10
गर्व से कहो हम हिंदी हई.
सांभाळून हो! नाही म्हणजे, इथे 'हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा' याचा अर्थसुद्धा कोणी 'हिंदुस्थान हिंदीभाषकांचा, तस्मात् हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? (*बाकी या असल्या भाषांतरास प्रॉपगांडा व्हॅल्यू मजबूत आहे, नाही? ;-))

In reply to by पंगा

हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विजुभाऊ 24/12/2010 - 16:17
हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात. पंगा /पुपे हा अनुभव मलादेखील आला आहे. एकाला मी हिन्दी ही राष्ट्रभाषा नाहिय्ये असे सांगितले तेंव्हा तो म्हणाला की मग या देशाचे नाव हिंदुस्थान कशाला आहे. त्या बेण्याला तिथेच एक खॅळ्ळ खॅटॅक करून त्याच्या तोंडातले फर्निचर बाहेर काढावेसे वाटले.

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 24/12/2010 - 16:32
देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा. अनेक हिंदू हिंदी न वापरताही हिंदू आहेत. देशाचे नाव हिंदुस्थान/हिंदीस्तान नाही. हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.

In reply to by आजानुकर्ण

देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे. वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 16:45
सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते.
हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे.
वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.
देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे. समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही.

In reply to by आजानुकर्ण

हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे. काहो दुसर्‍याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का? देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे. स्तान आणि स्थान यात अर्थाच्या दृष्टीने फारसा फरक नसल्याने आमच्या वाक्यातही फारसा फरक पडत नाही. समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही. अर्थ लक्षात घेऊन वाचल्यास फारसा फरक नाही. तरीही सूचनेचा विचार करू.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:03
काहो दुसर्‍याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का?
नाही.
तरीही सूचनेचा विचार करू.
धन्यवाद.

In reply to by आजानुकर्ण

पंगा 24/12/2010 - 18:52
हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.
याबद्दल साशंक आहे. म्हणजे 'हिंदोस्ताँ'करिता मराठीत 'हिंदुस्थान' हा शब्द नेमका कधी वापरला जाऊ लागला, कोणी बनवला याबद्दल कल्पना नाही, परंतु जुन्या (म्ह. आमच्या आजोबांच्या वगैरे) पिढीपासूनच्या लोकांच्या तोंडून (आणि लेखी वापरातसुद्धा) हा शब्द सरसकट असाच ऐकलेला (आणि वाचलेला) आहे. असा वापर करणारांपैकी अनेकांचा 'हिंदुत्ववादा'शी दूरान्वयानेही संबंध नसावा (किंवा असलाच तर विरोधापुरता असावा). किंवा कदाचित याचे मूळ 'हिंदुत्ववाद्यां'त (म्ह. कोण? सावरकर वगैरे?) असेलही, परंतु हा शब्द मराठीतील सामान्य वापरात ('हिंदुत्ववाद्यां'मध्ये आणि इतरांमध्येसुद्धा) अशाच स्वरूपात गेल्या किमान तीनचार पिढ्यांत तरी रुळलेला आहे, आणि तो मराठीत 'हिंदुस्तान' असा कधीही म्हटलेला किंवा लिहिलेला निदान माझ्या तरी ऐकण्यापाहण्यात आलेला नाही. मग म्हणणारा/लिहिणारा 'हिंदुत्ववादी' असो वा नसो. उलटपक्षी, मराठीखेरीज इतर भाषांत हा शब्द 'हिंदुस्थान' असा लिहिलेला किंवा म्हटलेला (अगदी 'हिंदुत्ववाद्यां'कडूनसुद्धा) वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही. त्यामुळे हा शब्द मराठीत 'हिंदुस्थान' तर इतर भाषांत 'हिंदुस्तान/हिंदोस्ताँ' असा असावा, आणि वापरणार्‍याच्या 'हिंदुत्वा'शी (किंवा 'हिंदुत्व'वादाशी) संबंध नसावा, अशी निदान माझी तरी धारणा आहे. (कदाचित मराठीतील 'हिंदुस्थान' हे 'हिंदोस्ताँ'चे अपभ्रष्ट रूप असू शकेल. मुंबईत एकदा 'रिचर्डसन अँड क्रूडास' या कंपनीचे नाव 'रिचर्डसन अँड गुरदास' असे सामान्यजनांकडून ऐकलेले आहे, तद्वत.) (बाय द वे, माझ्याच घरातील उदाहरण घ्यायचे झाल्यास, हा शब्द माझ्या घरात नेहमी 'हिंदुस्थान' असाच वापरण्यात आलेला आहे. माझ्या आजोबांबद्दल कल्पना नाही, परंतु माझे वडील 'हिंदुत्ववादा'चे कट्टर विरोधक होते आणि मीही 'हिंदुत्ववादी' नाही.)

In reply to by पंगा

आजानुकर्ण 24/12/2010 - 20:00
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण हिंदुस्तान/हिंदुस्थान आणि हिंदीस्तान याचा संबंध नसावा हा मुख्य मुद्दा आहे. (पूर्वपदस्थ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

पंगा 24/12/2010 - 22:13
बाय द वे, हिंदुस्थानाकरिता तुर्की भाषेत 'हिन्दिस्तान' असा शब्द असावा असे वाटते. हवे तर तुर्कस्थानातील* भारतीय वकिलातीच्या वेबसाइटीस भेट देऊन खात्री करून घ्यावी. *पुन्हा स्थान! तसेही 'हिंदी' या शब्दाचा अर्थ 'हिंदचा (म्ह. हिंदुस्थानचा) रहिवासी' असा आहे, आणि योगायोगाने हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागात बोलल्या जाणार्‍या भाषेचेही ते नाव आहे, असे वाटते. तसेही भौगोलिकदृष्ट्या 'हिंदुस्थान' हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी, कधी 'आसिंधुसिंधुपर्यंत' अर्थाने, कधी 'ब्रिटिश इंडिया' अशा अर्थी, कधी 'भारतीय गणराज्य' अशा अर्थी तर कधी केवळ उत्तरेकडील मैदानी प्रदेशासाठी (पहा: 'हिंदुस्थानचे मैदान') वापरला जातो, असे वाटते. तसेही 'हिंद' किंवा 'हिंदोस्ताँ'चा मूळ अर्थ 'उत्तरेकडील गंगायमुनांच्या खोर्‍यांतील मैदानी प्रदेश'** असा काहीसा लक्षात घेता, ऐतिहासिकदृष्ट्या 'हिंदची (किंवा हिंदोस्ताँची) भाषा ती हिंदी (किंवा हिंदोस्तानी)', यात काहीही गैर नाही. 'हिंदोस्ताँ'(या संज्ञे)ची व्याप्ती नंतर वाढली, त्याला कोण काय करणार? ** दख्खनचे पठार हे 'हिंदोस्ताँ' संज्ञेच्या मूळ व्याप्तीच्या बाहेर होते असे विकीवरून कळते. चूभूद्याघ्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 24/12/2010 - 22:47
असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.
माझा रोख 'हिंदी इतर भाषांना गिळंकृत करून राहिली आहे'-छाप अपप्रचार करणारांकडे होता. अशा अपप्रचारकांकरिता अशा (मुद्दाम लावलेल्या) अर्थास बरीच प्रॉपगांडा-व्हॅल्यू आहे, असे म्हणायचे होते. बाकी उत्तर भारतवासी हिंदीभाषक बांधवांच्या याबद्दलच्या (आपण म्हणता तशा) विचारांबद्दल बोलायचे झाल्यास, होय, याचाही थोडाफार अनुभव आहे. (म्हणजे अगदी बिगर-हिंदीभाषकांनी हिंदुस्थानात राहू नये वगैरे इतकी नव्हे, पण बिगरहिंदीभाषकांबद्दल - विशेष करून हिंदी पट्ट्याच्या दक्षिणेकडील रहिवाशांबद्दल - एकंदर तुच्छतेची भावना वगैरे पाहिलेली नाही असे नाही. दिल्लीच्या बसेसमध्ये 'भारत की सभी भाषाएं हमारी अपनी भाषाएं हैं' अशी 'सरकारी' घोषणा मुद्दाम लावावी लागते हे चित्र पुरेसे बोलके आहे. अर्थात ही परिस्थिती सार्वत्रिक नाही, पण नाही असेही नाही.) पण त्याची दखल घेण्याची गरज आहे असे वाटत नाही. भारताच्या एका छोट्या भागातील मर्यादित लोकांना उर्वरित भारतीयांबद्दल काय वाटते यावरून त्या उर्वरित भारतीयांचे भारतीयत्व ठरू नये, आणि त्या उर्वरित भारतीयांनी तर ते तसे मुळीच ठरवून घेऊ नये. गेले उडत! आणि तशीही इतरप्रांतीयांबद्दल तुच्छता ही एकंदर भारताचीच (किंवा कदाचित मानवजातीची) खासियत असावी. खुद्द महाराष्ट्रात, दक्षिणेकडील हेल काढून बोलणार्‍या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषांबद्दल विनाकारण तुच्छतेची - किमानपक्षी टिंगलटवाळीची - भावना परवापरवापर्यंत - अगदी आमच्या आईवडिलांच्या पिढीपर्यंत किंवा कदाचित आमच्याही पिढीपर्यंत - होती, आणि कदाचित अजूनही असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना, (केवळ भाषेच्याच नव्हे, तर इतरही बाबतींत) भक्कम परस्परतिरस्काराच्या मजबूत बांधणीवर भारत टिकून आहे, असे म्हटल्यास बहुधा वावगे ठरू नये.

In reply to by अवलिया

अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे
+१ सहमत आहे बॉस. विजुभौंच्या मराठी प्रेमाबद्दल पुर्ण खात्री आहे. मात्र आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले.

In reply to by अवलिया

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:29
मी या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेले परखड उत्तर संपादित झाले. मात्र हा एकांगी आरोप संपादित झाला नाही याचे आश्चर्य वाटते. वर मी हिंदी शब्द आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला आहे. तो सल्ला आणि वरील प्रतिसाद संपादित व्हावा ही संपादन मंडळाला विनंती.

In reply to by आजानुकर्ण

आमोद शिंदे 24/12/2010 - 11:09
सहमत आहे. सदर सदस्याची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा संपादक मंडळ करेल काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले. + १ मला तर गदगदुन आले आणि माझे डोळे पाणावले तात्पर्य काय : मिपा उपक्रमी आनि मनोगती होणार

विजुभाऊ 22/12/2010 - 11:33
शुद्धलेखन आनि मातृभाषेला योग्य सन्मान देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक सांगा व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा? अवांतर" आणि हा शब्द टंकताना तो आनि असा टंकला गेला यात शुद्धातेपेक्षा कळफलक आणि घाई गडबड जबाबदार आहे. टिळकानी संत हा शब्द सन्त सनत असा तिन्ही प्रकारे लिहीला होता. सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो. त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो. त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले जातात. मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते" फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते. ही तर्‍हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्‍या पुणेकरांची

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 11:40
व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा?
हा फुलराणीतला डायलॉग आहे वाटतं. बरं हे देशद्रोही नक्की कोण ठरवते? महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे.

In reply to by आजानुकर्ण

>>महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम असा आहे की पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे. मुंबईत येऊन बघा. आणि पुण्याची आजची स्थिती पाहता आपण काही नाही केले तर आज जे मुंबईत होते आहे ते १०-१५ वर्षात पुण्यात होणार(If not earlier)

In reply to by विजुभाऊ

रमताराम 22/12/2010 - 11:44
इतके सगळे प्रकार पुण्यात दिसत असताना मग तुम्ही नेहमी घाऊक द्वेष करता तो नक्की 'कुठल्या' पुण्याचा?

In reply to by विजुभाऊ

सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो. त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो. त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले जातात. मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते" फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते. ही तर्‍हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्‍या पुणेकरांची
हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिंतामणी 24/12/2010 - 23:49
हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !! अजून वरिजनल विजुभौ हायेत. त्यांनी नवीन वर्षापासुन (म्हणजेच २०११ आहे हे गृहीत धरले आहे) पुणे आणि पुणेकरांना नाव ठेवणार नाही असा "पण" केला आहे. जाउ देत परा. शेवटचे ४-५ दिवस राहीलेत. त्यामुळे दुर्लक्ष कर आत्ता.

In reply to by विजुभाऊ

चिंतामणी 24/12/2010 - 23:50
" कुठे " चे "कुढं" किंवा "फुडं" झाले तरी किंवा येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले तरी पुण्यात मराठीचाच वापर होतो हे तुम्ही सिध्द केल्याबद्दल मंडळ आभारी आहे. (बंबईया भाषेबद्दल न बोलणे चांगले) बाकी लो.टिळकांबरोबर स्वत:ची तुलना करण्याचा प्रयत्न करून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रकार भारी होता.

विजुभाऊ 22/12/2010 - 11:48
पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे. महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला. नक्की कुठल्या भूभागावर राहता ?

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 11:56
महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला. नक्की कुठल्या भूभागावर राहता ?
मी पुण्यात राहतो. :-) गेले अनेक दिवस याबाबतीत काही बातम्या वाचनात आल्या नाहीत त्यामुळे हा वाद मिटला असावा असे वाटले. मला वाटते पाट्या-फलक मराठीत - पक्षी देवनागरीत - आल्याने हिंदी भाषकांचा फायदाच होणार आहे. पुरेसे शिक्षण न मिळाल्याने अनेक युपी बिहारी लोकांना इंग्रजी वाचता येत नाही मात्र देवनागरीतल्या पाट्या मात्र त्यांना चोख वाचता येतील. किंबहुना मराठी देवनागरीतल्या पाट्या या त्यांच्या हिताच्याच आहेत हे लाई चना वगैरे कार्यक्रमात श्री. ठाकरे (ठाकरे कुटुंबियांपैकी सध्या जे कोणी पदावर असतील त्यांनी) हिंदी भाषकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. मला तर वाटते हा मराठी पाट्यांच्या विरोधातला कट हा हिंदी भाषकांचा नसून गुजराती भाषकांचा आहे. विरेन शाह वगैरे शाह मंडळी या कटाच्या अग्रभागी आहेत. (फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन व रूपम ग्रुप) (तुम्ही मुंबई असा मराठमोळा शब्द असताना बम्बईपासून प्रेरणा घेऊन मुम्बई असा शब्द का बनवला? मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.)

In reply to by आजानुकर्ण

विजुभाऊ 22/12/2010 - 12:16
मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.) तुमचे व्याकरण कच्चे असावे असा संशय होता. आतातर इतिहास देखील कच्चा आहे असे वाटायला लागलेय. लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता. व्याकरणदृष्ट्या तीनही शब्द बरोबर आहेत. मुंबई हा शब्द मुम्बई किंवा मुम्बै असा लिहीला तरी बरोबर आहे. देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 12:24
माझे व्याकरण कच्चेच आहे त्यामुळे मराठी संकेतस्थळांवर येऊन मी व्याकरण शिकायचा प्रयत्न करतो. असो. संत, सन्त किंवा सन्‌त असे शब्द पुलंनी 'आम्ही सूक्ष्मात जातो' मध्ये वापरल्याचे आठवते. (त्यात या शब्दांच्या जोडीला नम्र, नम्‍र, नम्‌र हेही होते) मी माझ्या वाक्यात 'शक्यतो' हा शब्द वापरला होता. मुंबई हा शब्द मुम्बअ‍ि असाही लिहिता येतोच की.)
देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.
हा हा म्हणजे प्रत्येक शब्द हे 'अक्शर्चिन्ह' असते असे सतीश रावले म्हणतात तसे का?

In reply to by आजानुकर्ण

विजुभाऊ 22/12/2010 - 12:31
मुंबई हा शब्द मुम्बअ‍ि असाही लिहिता येतोच की "मुम्बअ‍ि" शब्दात " अ" अक्षरावर्ची वरची वेलान्टी दीर्घ हवी

In reply to by विजुभाऊ

पंगा 24/12/2010 - 22:48
लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता.
अहो पण टिळकांनी तो शब्द तसा केवळ दिपोटींशी पंगा घेण्यासाठी लिहिला होता. (शेवटी मूळचे पुण्याचे नसले तरी रेट्रोअ‍ॅक्टिव इफेक्टने वाण नाही पण गुण लागायचाच. असो.) त्यानंतरच्या महाराष्ट्राच्या उभ्या इतिहासात (म्हणजे, महाराष्ट्राचा बसलेला इतिहास पाहिलेला नाही. तसेही आपण इतिहासतज्ज्ञ नाही. असो.) तो तसा तीन वेगवेगळ्या प्रकारे (एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी सुटा) लिहिला गेल्याची उदाहरणे (वर आजानुकर्ण यांनी म्हटल्याप्रमाणे पु.लं.चा अपवाद वगैरे वगळता) फारशी नसावीत. (नाही म्हणायला हा शब्द 'सन्त' असा लिहिणारे तुरळक खाजाळू असतीलसुद्धा, परंतु 'सन् त' - मधली रिकामी जागा वगळून - असा लिहिणारे महाभाग टिळकांअगोदर किंवा नंतर झाल्याचे ऐकिवात नाही.) असो. (अवांतर: बाकी, टिळकांची संतत्रयीची किंवा 'मी शेंगदाणे खाल्लेच नाहीत'वाली गोष्ट काय किंवा गांधींची 'केट्ल'च्या स्पेलिंगची गोष्ट काय, या गोष्टी या कोणीतरी उठवून दिलेल्या वावड्या असाव्यात, अशी मला दाट शंका आहे.)

गवि 22/12/2010 - 12:28
भाषा आपोआप जपली गेली तर जगते. नियम, सक्ती, कायदे असे काही करुन सोवळ्याचे फडके बांधून लोणच्यागत टिकवली तरी फार काळ तग धरेल असे नाही. लवचिक भाषा जगतात. बाहेरच्यांना अजिबात प्रवेश न देणार्‍या. शब्दांची जराही मोडतोड न होऊ देणार्‍या कडक नियमवाल्या भाषा काळाच्या धुरळ्यात गडप होतात. किंवा फक्त म्यूझियम / ऐतिहासिक व्हॅल्यूच्या (ममिफाईड) बनतात. उदा संस्कृत. जे शब्द सहज रुढ होताहेत ते गुलामगिरी, परभाषा वगैरे असे जुने संदर्भ न आणता सामील करुन घ्यावेत हे हिताचे. टिकण्यायोग्य असते ती भाषा टिकतेच. मराठीचे तरी काय?: अगदी पहिले सापडलेले मराठी वाक्यः "चामुंडरायै सुत्ताले करवियले. श्री गंगरायै सुत्ताले करवियले" नंतर बखरींमधे.. "जैसे भडबुन्जे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहला.." या भाषेपेक्षा तुम्ही आम्ही बोलतोय ती (या लेखाची आणि प्रतिक्रियांची धरुन) मराठी भाषा यांत लिपी सोडून काय साम्य आहे? त्यावेळची मराठी संपली. पण आता वेगळे रुप जिवंत आहे.

तिमा 22/12/2010 - 12:51
चीनचे एवढे कौतुक नको. काही वर्षांनी आपल्या इथे पण सगळ्या पाट्या चायनीज भाषेतच लागणार आहेत. आणि त्या सक्तीने वाचाव्या पण लागतील.

धाग्याचे जे मूळ कारण आहे "चिनी भाषेची प्युरिटी राखण्यासाठी त्या सरकारने उचललेले पाऊल...", त्याविषयी मत व्यक्त करीत आहे. त्या बातमीवरून (तसेच या धाग्यावरून) असे वाटण्याची शक्यता आहे की चीनची इंग्लिश भाषेशी दुश्मनी आहे. पण प्रत्यक्षात तसे नसून तो आदेश काढण्याचे कारण "लिपी" आहे. म्हणजे असे की, चिनी वर्तमानपत्राला आता बातमीत वा लेखात English Word वा Phrase द्यायची असेल तर ती 'चिनी लिपीत' देता येणार नाही. उदा. आपण महाराष्ट्र टाईम्स वा सकाळ या वर्तमानपत्रात असे वाचू शकतो की "वर्ल्ड कप फूटबॉल" साठी आयोजनासाठी भारत उत्सुक. चीनचे वर्तमानपत्रही ही बातमी देणार असेल तर या शीर्षकातील "वर्ल्ड कप फूटबॉल" त्याला 'चिनी लिपी' त देता येणार नाही. हा एवढाच शब्द World Cup Football असा देऊन त्याचा चिनी भाषेत कंसात अनुवाद द्यावा लागेल. चिनी लिपी ही खरे तर चित्रलिपी असल्याने वर्तमानपत्रांना बातमीमध्ये एखादेवेळी इंग्लिश संक्षिप्त रूपे UNO, GDP, WTC, NBA द्यायची असल्यास ते चिनी लिपी वापरत (जसे आपण मराठीत 'युनो, जीडीपी, एनबीए' वापरली असती), त्यामुळे त्या लिपीतील इंग्लिश शॉर्टफॉर्म्सचे अनेकविध अर्थ निघू शकतात (इथे भाषेच्या Purity चा प्रश्न आला होता).....हे त्या सरकारच्या The General Administration of Press and Publication या विभागाच्या लक्षात आल्याने त्यानी "इंग्रजी शब्दांची संक्षिप्त रूपे देऊ नयेत" असा जरी आदेश जरी जारी केला असला तरी त्यात 'If necessary' ची एक पळवाट ठेवली आहेच अन् ती म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे शब्दाचे पूर्ण रूप देऊन त्याचा चिनी भाषेतील अनुवाद कंसात देणे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आजानुकर्ण 22/12/2010 - 14:06
दुर्दैवाने मराठी आणि हिंदीची लिपी एकच असल्याने विजुभौंना भीती वाटणारे हिंदी शब्द ओळखण्यास अंमळ अडचण येणार आहे.

In reply to by आजानुकर्ण

अडचण येणार नाही असे वाटते. सम मोअर इक्वल शब्द लगेच ओळखता येतील की? जसे की एखाद्याला तू किती बिझी आहेस हे विचारताना मी त्याला "तेरा व्यस्त प्रमाण काय आहे?" असे विचारीन. हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते. "गर्वाने सांगा हम मराठी आहे"

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:24
हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते.
चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो.

In reply to by आजानुकर्ण

चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो. यू सेड इट. वर कोणीतरी हिंदी शब्द मराठीत आल्यामुळे काय बिघडतं असे विचारले होते. तिथे हा चोप्य पस्ते करावा असा विचार करतो आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:55
अहो महाशय, स्वतःला पटणारे सोयीस्कर उदाहरण घेऊन सिद्धता होत नसते. तुम्ही चुकीच्या ठिकाणी हिंदी काय अगदी संस्कृत शब्द घातला तरी तिथे बिघडणारच. याउलट योग्य ठिकाणी हिंदी शब्द चालूनही जाईल. थोडा विचार करा.

In reply to by आजानुकर्ण

नगरीनिरंजन 23/12/2010 - 07:14
तुम्हाला काय म्हणायचंय ते कळतंय. जसे फारसी, अरबी आणि संस्कृत शब्द मराठीत आले तसे काही हिंदी शब्द आले तर काहीच हरकत नाही हे तत्वतः मान्य आहे. परंतु तुम्ही जर आजकाल वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर दिसणारी आणि बर्‍याच लोकांच्या तोंडी असणारी भाषा पाहिलीत तर योग्य तेच हिंदी शब्द मराठीत येत आहेत असे म्हणाल? शिवाय मराठीत आधीच त्या अर्थाचे अनेक शब्द असताना (भले ते पुर्वी इतर भाषेतून आलेले असो) विनाकारण नवीन प्रतिशब्द आयात करून जुने शब्द विस्मरणात घालवायची किंवा त्यांचे अर्थ बदलायची गरज काय? वरती पुपे म्हणाले तसं, "मी व्यस्त आहे", "मला गर्व आहे", "माझी मदत कर"इत्यादी चुकीचे वाक्यप्रयोग आणि प्रेक्षकांसाठी दर्शक असे चुकीचे शब्द आजकाल सर्रास वापरले जातात. इतकाच जर हिंदीचा सोस आहे तर हिंदीच बोलूया ना. कशाला पाहिजे मराठीतरी? ज्याला शब्दांचा पोत, छटा आणि रुप पाहता येते त्याला थोड्या छटेच्या फरकानेही खडा लागल्यासारखे होते. इथे तर ढळढळीत काहीही शब्द वापरले जातात आणि वर भावना पोचल्या म्हणजे झाले ना अशी रंगसफेती केली जाते. जर भावना पोचणेच फक्त महत्त्वाचे असेल तर माकडेही एकमेकात संवाद साधतात त्या आणि इतर भाषांमध्ये फरक काय?

In reply to by इन्द्र्राज पवार

सुनील 22/12/2010 - 20:17
हे जपानी भाषेने ह्यापूर्वीच अंगिकारले आहे. जपानीत मूळ जपानी शब्द हे कांजी ह्या चीनकडून आयात केलेल्या लिपीत लिहिले जातात तर, जपानीबाह्य शब्दांसाठी काताकाना ही लिपी वापरली जाते. सुनील-सान

In reply to by सुनील

पंगा 24/12/2010 - 22:24
सुनील-सान
स्वतःस उल्लेखताना 'सान'प्रत्यय लावण्याची जपानीत प्रथा नसावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

सहज 22/12/2010 - 14:21
चीन ने देश में अख़बारों, पत्र-पत्रिकाओं और वेबसाइटों पर विदेशी शब्दों और विशेष रूप से अंग्रेज़ी के शब्दों का प्रयोग करने पर पाबंदी लगा दी है. मुळ लेखात 'अन्य भाषीक' ऐवजी विदेशी शब्दों और विशेष रूप से अंग्रेज़ी असा स्पष्ट उल्लेख असताना इथे विशेष टिप्पणी करताना, मराठीत हिंदी मग हळुच कन्नड, गुजराथी भाषा व त्या प्रातांचे नियम इ. काढून देशांतगर्त भाषिकांमधेच दुरावा निर्माण करायचा प्रयत्न तर नव्हे? मराठीत इंग्रजी अथवा अन्य विदेशी भाषांबद्दल बोलत असाल तर एकवेळ तो समान धागा असेल. बाकी सध्या महाराष्ट्रात रुळलेल्या मराठीत अन्य भाषेतले (देशी, परदेशी) शब्द बिल्कुल नाहीत असे आपले म्हणणे आहे का? चीन मधे देखील वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी भाषा बोलणारे लोक आहेत. 'कोणतीही भाषा बोला पण जितक्या चांगल्याप्रकारे बोलता / वापरता येईल तितकी बोला / वापरा' हे जगातल्या कोणत्याही भाषा बोलणार्‍याला तत्वता पटेल असेच आहे. चीन मधील दोन प्रांतांच्या सीमावर्ती भागात, तसेच मोठ्या शहरात रहाणारे लोक चीन मधे बोलल्या जाणार्‍या अन्य भाषेतले शब्द वापरत नाहीत असे आपले ठाम म्हणणे व वस्तुस्थिती आहे काय? खरे तर मराठी भाषा बोलणार्‍यांनी हिंदीच्या वाटेला जाउ नये असे कोणत्याही हिंदीभाषकाला मनापासून वाटेल :-) तुमने कभी अस्सल मराठी मानुस हिंदी बोल्तेहूए ऐक्या है क्या? वो एक कणेकर लेखक करके है एकजन, उनकी लिही हुवी वाक्ये वाचो कभी| तरी मराठीला धोका हिंदीपासुन वगैरे वक्तव्ये खोडसाळ वाटतात. भारतात ज्या प्रांतात आपण रहातो तेथील भाषा, हिंदी व इंग्रजी भाषा (अगदी क्वचित प्रसंगी सरमिसळ, संभाषण कळावे म्हणुन ) वापरुन संभाषण करण्यात, सरकारी काम करण्यात कोणाला कसली अडचण नसावी.

In reply to by सहज

विजुभाऊ 22/12/2010 - 14:43
भारतात ज्या प्रांतात आपण रहातो तेथील भाषा, हिंदी व इंग्रजी भाषा (अगदी क्वचित प्रसंगी सरमिसळ, संभाषण कळावे म्हणुन ) वापरुन संभाषण करण्यात, सरकारी काम करण्यात कोणाला कसली अडचण नसावी. राज ठाकरे देखील हेच म्हणतात. पण आपले थोर सबसे तेज चॅनेलचे रीपोर्टर्स महाराष्ट्राच्या मुख्यमन्त्र्यानासुद्धा हिन्दीत बोला असे सांगतात तेंव्हा त्या माजुर्डेपणाला काय म्हणायचे? पुण्यात राहूनही मराठी न येता माझे काही अडत नाही असे अभिमानाने म्हणणारे हिन्दीभाषीक मराठी भाषेला कमी लेखतात . त्याना तुम्ही ही वाक्ये का नाही समजून सांगत? वर पुन्हा हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे . ती सर्वानी बोलायलाच हवी असा वृथा तोरा मिरवतात. मी मराठी बोलणारच नाही . मला कळावे म्हणून तुम्हीच हिन्दीत बोला हा अट्टाहास कशाला? आमच्या देशात्/प्रान्तात यायचे इथेच जगायचे पैसे मिळवायचे आणि वर आम्हालाच शहाणपण शिकवायचे हा माजुर्डेपणा मराठी माणसाने कशासाठी सहन करायचा. मराठी माणसाने या बाबतीत तमीळ लोकांचा आदर्श समोर ठेवावा.

In reply to by विजुभाऊ

सहज 22/12/2010 - 15:03
माजुर्डेपणाला सडेतोड उत्तर द्यायला मराठी माणसाचे हात कोणी बांधले नाहीत. की अश्या माजुर्डेपणाचे समर्थन कोणीच करणार नाही. बाकी चीनने इंग्रजी भाषा की अन्य चीनी बोली भाषेबाबत फतवा काढला आहे ते लिहले नाहीत. 'मराठीवर अन्य भाषांचे आक्रमण' हा एक न संपणारा विषय वाटतो आहे.

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:21
महाराष्ट्रातील मराठी लोक मराठी बोलत नाहीत, मराठी चित्रपट पाहत नाहीत, मराठी लिहीत नाहीत याला उत्तरेकडच्या वाहिन्या किंवा उत्तरेतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले हिंदीभाषक जबाबदार कसे काय असतील. मराठी लोकांनी मराठीत बोलू नये म्हणून त्यांनी तोंडे धरून ठेवली आहेत का? हिंदी वाहिनीने हिंदीत बोला असे मुख्यमंत्र्यांना सांगणे हे त्या वाहिनीचे काम असावे. (हिंदी वाहिनीचा प्रेक्षकवर्ग हिंदी जाणणारा असतो) पण मुख्यमंत्र्यांनी मराठीतच उत्तर द्यायला काय हरकत आहे. मराठीत न बोलण्याचा दोष मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाच आहे.

विजुभाऊ 22/12/2010 - 14:34
तरी मराठीला धोका हिंदीपासुन वगैरे वक्तव्ये खोडसाळ वाटतात. हिन्दी भाषेने बर्‍याच भाषा गिळंकृत केल्या आहेत. राजस्थानी ही भाषा पूर्वी हिन्दीची पोटभाषा मानली गेली. पण आता तर त्या भाषेचा अस्त होऊ लागलाय. तीच गत हरयाणवी ची , मैथीली अंगीका या भाषांची. मराठीवर हिंदीचे हळूहळू आक्रमण होतच आहे. वर्तमानपत्रातल्या /टीव्हीवरील जहीरातीतील भाषा पहा// तुम्हाला जाणवेल मराठी सीरीयल्स मधील पात्रे चुकीचे ( हिन्दी धाटणीचे ) शब्द प्रयोग करू लागलीत. उदा :मला मदत करशील हे वाक्य ( मेरी मदद करोगे?) या प्रमणे माझी मदत करशील असे बोलतात. "गर्व " या शब्दाबद्दल अगोदरच लिहीले आहे. " सकाल प्रहर पासून एकसारख्या ताजगी साठी " अशी जहीरात करणार्‍याला मराठीत सकाळ हा शब्द आहे आणि त्यासाठी प्रहर हा शब्द वापरावा लागत नाही. " ताजगी " या ऐवजी "उत्साह , ताजेपणा" हे शब्द आहेत हे माहीत नाही. लोक तेच चालवून घेतात आणि हळूहळू चुकीचे शब्द बरोबर आहेत असे लोकाना वाटू लागते. ही वस्तुस्थिती आहे त्यात खोडसाळ पणा काय झाला. मराठीला मराठीचे हिन्दीकरण होण्याचा धोका आहेच. भाषा जगली संस्कृती जगली. भाषा संपली संस्कृती संपली

In reply to by विजुभाऊ

सुहास.. 22/12/2010 - 17:47
राजस्थानी ही भाषा पूर्वी हिन्दीची पोटभाषा मानली गेली. पण आता तर त्या भाषेचा अस्त होऊ लागलाय. तीच गत हरयाणवी ची मैथीली अंगीका या भाषांची. हम्म ! आता कस ? विजुभाऊंशी १००% सहमत !

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:53
" सकाल प्रहर पासून एकसारख्या ताजगी साठी " अशी जहीरात करणार्‍याला मराठीत सकाळ हा शब्द आहे आणि त्यासाठी प्रहर हा शब्द वापरावा लागत नाही. " ताजगी " या ऐवजी "उत्साह , ताजेपणा" हे शब्द आहेत हे माहीत नाही. लोक तेच चालवून घेतात आणि हळूहळू चुकीचे शब्द बरोबर आहेत असे लोकाना वाटू लागते.
श्री. विजुभाऊ तुमची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. पण हा मुद्दा शेवटी प्रमाणलेखनाशीच निगडित आहे ना. हळूहळू चुकीचे शब्द बरोबर वाटण्याचा प्रकार अशुद्ध शब्दांनीही होणारच ना. तुम्ही 'सकाळ' या शब्दाचा 'सकाल' असा उच्चार चुकीचा असल्याचे लिहिले आहे. पण 'नलाच्या बाजूच्या तलातल्या खोलीतल्यांचे' उच्चार असेच असणार ना. मग मी शुद्धलेखनाचा मुद्दा काढला तो चुकीचा कसा काय?

In reply to by आजानुकर्ण

सुहास.. 22/12/2010 - 18:06
आजानुकर्णजी बोलीभाषेत आणि लेखी भाषेत बरीचशी गल्लत होते आहे आपली असे वाटते आहे बाकी चालु द्या

In reply to by सुहास..

आजानुकर्ण 22/12/2010 - 18:08
हो पण विजुभाऊंचा हा चर्चाप्रस्ताव हा 'लेख'च आहे ना. मी चर्चाप्रस्तावाच्या लेखी भाषेबाबतच माझा मुद्दा मांडला होता. विजुभाऊंनी पॉडकास्टवर ही चर्चा उपलब्ध करून दिली असेल तर सपशेल माफी मागतो.

In reply to by आजानुकर्ण

सुहास.. 22/12/2010 - 18:18
आपण त्याच्यां भावनांना समजायचे होते, आपण तर त्यांच्या भावनेला आपले समजायला लागलो आहे . ;) असो

In reply to by सुहास..

पंगा 24/12/2010 - 12:42
आपण त्याच्यां भावनांना समजायचे होते
साफ चूक! 'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'!

In reply to by पंगा

सुहास.. 24/12/2010 - 20:49
साफ चूक! 'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'! >>> पंगोपंत !! त्याच करिता मुद्दामुन टाकले होते. पण चिकित्सकांनी भ्रमनिरास केले मला. ;)

"....भाषा जगली संस्कृती जगली. भाषा संपली संस्कृती संपली...." वरील वाक्यातील भावार्थ जसाचा तसा घेऊनही मी असे म्हणतो की, इतकी शेणगोळ्यासम लेचीपेची मराठी संस्कृती आहे का, की भाषेत (देशातीलच) दुसरी भाषा, व्यवहाराकरीता, आली म्हणून तिला उर्ध्व लागावा? भाषा हे सुशिक्षित तसेच अशिक्षित माणसांमधील संवादाचे माध्यम आहे (लिपीचा इथे विचार करीत नाही) तर विविध ढंगी भाषांचे महत्त्व भारतासारख्या बहुभाषी देशात विशेषच आहे. घटनेने देशात कुणालाही कुठेही प्रवासासाठी, रोजीरोटीसाठी मुभा दिली असल्याने त्या त्या प्रांतातील भाषेचे अनेकविध कंगोरे आपल्या भाषेत अवतरणारच, पण त्यामुळे आपली भाषा "भ्रष्ट" झाली असे मानण्याचे काही कारण नसते. मराठी भाषेचा अभिमान बाळगणार्‍या व्यक्तीच्या मुलीला "डॉक्टर" जावई सांगून आला तर तो आपल्या पाहुणे-परिवारात "माधवीच्या लग्नासाठी वैद्य मुलगा आलाय" असे सांगेल का? तिथे मात्र अभिमानाने "डॉक्टर" असे इंग्रजी नामच वापरण्याची ती व्यक्ती काळजी घेईल. असे शब्द आणि ते ज्यातून येतात त्या भाषा म्हणजे संस्कृतीचाच एक पूल असतो. इंग्रजीचे स्थान जसं भारत भ्रमणात महत्वाचे ठरते तद्वतच माझ्यासारख्या पक्क्या मराठी नागरिकाला पोटासाठी पंजाब वा हरियाणा इथे जावे लागते त्यावेळी 'हिंदी' चा (भले कितीही मोडकातोडका का असेना) आधार घ्यावाच लागतो. या दोन्ही प्रांतातील (शीख आणि जाट) व्यावसायिक बंधू माझे कोल्हापुरी हिंदी ऐकून ("मेरे पीठको घाम आयाला है"...पद्धतीचे) बेशुद्ध पडलेले नाहीत किंवा "ओये पुत्तर पंजाबी सिख लेना जल्दी जल्दी....!" अशी प्रेमळ धमकीदेखील देत नाहीत. अमृतसर, गुरुदासपूर, लुधियाना, फिरोझपूर, बर्नाला आदी मेट्रो शहरे तर सोडाच पण अगदी आतील ग्रामीण भागातदेखील हिंदी भाषा बोलून कुणी व्यवहार करीत आहे हे पाहून गावकर्‍याची भुवई वक्र होत नाही...किंबहुना रोहटक आणि अंबाला या दोन हरियाणवी जिल्ह्यात तर परक्या व्यक्तीने (इथे मी...) बोललेले हिंदी कळत नसले तरी तो दुकानदार्/कंडक्टर्/बॅन्क कर्मचारी थोडावेळ थांबून समजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करतोच करतो....अशावेळी त्यांच्या मूळच्या भाषेचा तिथे काही अवमान होत आहे असे त्याला वाटत नाही. "महाराष्ट्रातून चार लोक येऊन पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर घाला घालत आहेत..." अशी समजूत तिथे कुठे रुजल्याचे मला आजअखेर आढळलेले नाही. 'भाषेच्या अस्मितेचा प्रश्न' हे मनसेच्या राजकारणातील अस्तित्वासाठी एक प्रभावी शस्त्र आहे....त्याचा संबंध आपण भाषावृद्धी आणि संस्कृती यांच्याशी जोडू नये. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

गांधीवादी 22/12/2010 - 15:56
अति अति अवांतर : आताच एक मित्राबोबर ह्या विषयी चर्चा करीत होतो, त्या पट्ठ्याने एक नवीनच माहिती दिली. Sentence of the year : बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिहारी जनतेने विकासाला जो अभूतपूर्व कौल दिला, त्याला खरे कारणीभूत कोण ? त्यांची निद्रावस्थेत गेलेली अस्मिता जागृत करण्याचे कार्य केले ते 'राज ठाकरे' यांनी.

In reply to by इन्द्र्राज पवार

धमाल मुलगा 22/12/2010 - 16:01
"महाराष्ट्रातून चार लोक येऊन पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर घाला घालत आहेत..." अशी समजूत तिथे कुठे रुजल्याचे मला आजअखेर आढळलेले नाही.
बिहारींबद्दल काय समजूत आहे तिथे?

In reply to by धमाल मुलगा

श्री.धमु.... पंजाब असो वा हरियाणा, या दोन्ही प्रांतांची देशभर ओळख आहे ती मुख्यत्वे करून शेतीउद्योगाशी आणि काही प्रमाणात कारखानदारीच्या क्षेत्रातील त्यांची भरारी. इथे २४ तास राबणारा शेतकरी जसा दिसतो (जो गव्हाच्या रूपाने सोन्याची पैदास करतो असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही) तसाच लुधियानाच्या घराघरातून चाललेले कारखानदारीशी संबंधित कुटिरोद्योग पाहिले तर अन्य प्रांतियांनासुध्दा तिथे "नोकरी" निमित्ताने येण्याची गरज वाटावी. पण आलेच (आणि तसे बिहारी आले असले तरी का कोण जाणे पंजाबी लोक त्याना 'परके' मानत नाहीत....किंबहुना त्याला काही ऐतिहासिक कारणदेखील असू शकेल) तर ते इथल्या मातीत असे मिसळून गेलेले आहेत की, आपल्यासारख्या महाराष्ट्रीयानास असेच वाटेल की ते मुळचेच इथले आहेत. भाषा-वेषभूषा-खाण्याच्या पद्धती-राहणीमान, सणवार अगदी त्या मातीतीलच. (हे महाराष्ट्रात आलेले बिहारीदेखील करीत असतील तर वादाचा मुद्दाच राहणार नाही). पण असे आहे म्हणून त्यांच्यापेक्षाही घाम गाळून काम करतात ते स्थानिक लोक. बाहेरच्यांची गरज भासणार नाही अशी जबरदस्त वातावरण निर्मिती शीख आणि हरियाणवी युवक-युवतीच काय पण प्रौढानीसुद्धा (स्त्री-पुरुष) निर्माण केली आहे; पण म्हणून जे आले आहेत त्याबद्दल (मला तरी) कुठे असंतोष खदखदत आहे असे दिसलेले नाही (अर्थात माझी झाडाझडती फक्त दोन-तीन जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे, हेही इथे नमूद करणे आवश्यक आहे). सतत कामात असतात हे लोक, शिवाय अमुक एक काम 'हलके' वा 'माझे नव्हे' अशीही भावना कुठे दिसत नाही. माझ्यासमोर ट्रॅक्टर चालविणारा कदाचित त्या गावातील लखपती आणि मुखियादेखील असू शकतो, पण पेहेरावावरून तो आपल्याकडील रामा-शिवा-तुक्या सारखाच दिसतो.....खाण्यातही बिलकुल नखरे नसतात. दालरोटी तसेच चनाभटोरा, लस्सीचा ग्लास समोर आले की गडी खुश ! त्यामुळे परिस्थिती अशी आहे की; अशा मेहनतीच्या/कारागिरीच्या कामासाठी बाहेरचे हवेतच असे चित्र जरी नसले तरी जे बिहारी आता गेली २०-२५ वर्षे झाली त्या दोन राज्यात आहेत त्याना हुसकाविण्यासाठी काही चळवळी दिसत नाहीत (असल्या तर त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे असे म्हणतो). काही बॅन्किंग आणि सरकारी नोकरीनिमित्य येणे झाले म्हणून आले आणि कायमच्या वास्तव्यासाठीदेखील राहिलेले आहेत. माझ्यासारखे काही तुरळक महाराष्ट्रीयन दिसत असले तरी ते कायमच्या वास्तव्यासाठी नसून तेथील काही संस्थांशी भागिदारीचे छोटेमोठे व्यवहार झालेले असतात या कारणासाठीच. या किंवा अशाच कारणामुळे या दोन राज्यातील जनतेला अन्य राज्यातून आलेल्या भय्यांमुळे कसलीही चिंता वाटत नाही असेच चित्र आहे. त्यातही मुंबईसारखेच बिहारी बाबूंना "नवी दिल्ली" चे आकर्षण आहे पण 'अमृतसर' वा 'चंदिगड' चे तितके नाही असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

तर ते इथल्या मातीत असे मिसळून गेलेले आहेत की, आपल्यासारख्या महाराष्ट्रीयानास असेच वाटेल की ते मुळचेच इथले आहेत. भाषा-वेषभूषा-खाण्याच्या पद्धती-राहणीमान, सणवार अगदी त्या मातीतीलच. (हे महाराष्ट्रात आलेले बिहारीदेखील करीत असतील तर वादाचा मुद्दाच राहणार नाही). इंद्रा तुम्हीच कारणही लिहीले आहे. विचार करून बघा. आपल्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातील महानगरांमधे ही परिस्थिती आहे का? ४ मराठी माणसांमधे १ बाहेरचा माणूस असेल तर त्याच्यासाठी सर्वांनी का म्हणून हिंदी बोलावे. आणि हा एकटा असलेला माणूस तुम्ही हिंदीत बोला असे म्हणायला धजावतो हा त्याचा माजुरडे पणा आहे ज्याला आजकाल काही लोक शूरपणा संबोधत असले तरीही. मी अशाप्रकारे समजा ४ इतरभाषिकांच्यात असलो असतो तर त्यांना माझ्यासाठी हिंदीत बोला हे कधीच सांगितले नसते. याचे कारण शारीरीक वा मानसिक दौर्बल्य हे नसून मला त्या लोकांच्या भाषाप्रेमाचीही कदर आहे . आणि असा मोठ्यामनाने वागण्याचा संस्कार माझ्यावर आहे. पण माझ्या शहराची, गावाची व्यवहार भाषा जर बदलत असेल तर तो बदल थांबवणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो . आणि ते सर्वांच्या प्रयत्नातूनच शक्य आहे. त्यासाठी मित्रांचे प्रबोधन करतो. आणि त्यासाठी योग्य तिथे बोलतो, इतर मराठी मित्रांना मराठी बोलताना मदत करतो. ते वापरत असलेल्या हिंदी शब्दाला योग्य तो मराठी शब्द सांगतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

"....पण माझ्या शहराची, गावाची व्यवहार भाषा जर बदलत असेल तर तो बदल थांबवणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो...." श्री.पु.पे. तुमच्या या मताचा मी नि:संशय आदर करतो इतके ते निखळ आहे. मी पाहिलेल्या (तसेच काम करीत असलेल्या काही) राज्यातील परिस्थिती मात्र अशी आहे की, त्या राज्याचे कायमचे रहिवासी झालेल्या बिहारी लोकांनी जशी स्थानिक बोलीभाषा आत्मसात केली आहे तद्वतच जर ते एखाद्या वेळी एखाद्या 'सिंग' बरोबर संवाद साधताना हिंदीचा आसरा घेत असतील तर ते सिंग याना खटकत नाही (नसावे....तसे पाहिल्यास शीख समाजालाही पंजाबीइतकीच उर्दु आणि हिंदी प्रिय आहे, हेदेखील कारण असू शकेल.). आत्ता लुधियाना (पॉवरफुल इंडस्ट्रियल बेल्ट) शहरात आणि तालुका पातळीवर मात्र अलिकडे निर्माण झालेल्या अशांततेच्या वातावरणामुळे छोट्यामोठ्या संघटना बांधून राहण्याची हे बिहारी बाबू दक्षता घेत आहेत आणि हिंदीशिवाय संवाद करीत नाहीत. (त्यासाठी नकळत वा छुप्या मार्गाने का होईना बिहार सरकारचादेखील पाठिंबा आहे). याला प्रत्युत्तर म्हणून लुधियानामधे शिखांच्या संघटनांनी आता हात सरसावले आहेत. (अर्थात ही परिस्थिती फक्त लुधियानामध्ये असल्याने पंजाबच्या अन्य जिल्ह्यात अजून परराज्यातील मायग्रंट्समध्ये भीतीसम वातावरण नाही.) मात्र महाराष्ट्रातच हे बिहारी (संघटनेच्या जोरावर) उर्मटपणे 'हिंदी' भाषेतूनच आपले व्यवहार करीत असल्याचे दिसत असल्याने त्यावर 'मनसे' चे जे काही उपाय असतीत ते असो, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निदान पहिली पायरी म्हणून का होईना मराठी लोकानीच रोजच्या व्यवहारात त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आलाच तर जाणीवपूर्वक मराठीचाच पाठपुरावा करणे हा एक सरळमार्गी आणि प्रभावी उपाय होऊ शकेल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सुहास.. 22/12/2010 - 19:20
महाराष्ट्रातच हे बिहारी (संघटनेच्या जोरावर) उर्मटपणे 'हिंदी' भाषेतूनच आपले व्यवहार करीत असल्याचे दिसत असल्याने त्यावर 'मनसे' चे जे काही उपाय असतीत ते असो, >>> धन्यवाद ! विषय संपला ! कुत्सीत हास्य >> मागची पिढी संपले.

In reply to by इन्द्र्राज पवार

पैसा 22/12/2010 - 20:34
८/१० दिवसांपूर्वीची गोष्ट. मी चष्मा घ्यायला बँकेच्या खालीच भर पणजी बाजारात एका दुकानात गेले, आणि "मातसो चष्मो दाखय मरे" म्हणून दुकानदाराला सांगितले. पठ्ठ्या मला म्हणतो," वो सब मुझे आता नहीं"म्हणजे 'कोकणी' हा शब्द सुद्धा तोंडातून काढायची तयारी नाही. तुम्ही कुठले म्हणून विचारताच "बिहार से" म्हणून उत्तर आलं. गोव्यातले लोक मराठी लोकांपेक्षा गरीब स्वभावाचे. त्यानी रस्त्यात दिसलेल्या कोणाही नवीन लोकांबरोबर निमूट राष्ट्रभाषेत बोलायला सुरुवात केलीय हल्ली!

In reply to by पैसा

चिंतामणी 25/12/2010 - 00:04
शक्यता नाकारता येत नाही. (मी एव्हढेच लिहून थांबणार नाही.) हा कोकण रेल्वेचा एक तोटा आहे असे म्हणावेसे वाटते. या कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशनवर केटरींग कॉन्ट्राक्टर बिहारीच असतो आणि काम करणारे सुद्धा. कोकण रेल्वेमुळे कोकण आणि गोवावासियांना प्रवास सोपा झाला एव्हढाच फायदा झाला असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

In reply to by इन्द्र्राज पवार

तुमचे सद्यपरिस्थितीचे वर्णन कदाचित बरोबर असेल. परंतु खलिस्तान चळवळ नक्की काय होती? तेव्हा पंजाब व्यतिरिक्त अन्य भारताबाबत शत्रुत्व नव्हते काय? नक्कीच होते. पंजाबमधील शीखांना हरयाणा, राजस्थान आणि त्याहीपेक्षा जास्त युपी, बिहार, बंगाल हे आपली लुबाडणुक करतात असेच वाटत होते. पंजाब चळवळीच्या सुरुवातीच्या काळात तरी शीखांवर भावनिक्-सांस्कृतीक-धार्मिक अतिक्रमण होते आहे, लुबाडणुक होते आहे ही भावना नक्कीच होती. जसजसा त्या चळवळीचा जोर ओसरला तसतशी ती भावना कमी होत गेली असेलही कदाचित. दुसरे म्हणजे पंजाबमधे मराठी माणसांकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाबाबतचा मुद्दा. मराठी माणसांकडे पंजाबी, काश्मिरी किंवा आसामी जनता शत्रुत्वाने पहात नाही हे खरेच आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या राज्यांमधे फुटिरतावादी वृत्ती जोर धरत होती तेव्हा महाराष्ट्रातील (आणि केवळ महाराष्ट्रातील) लोकांनी त्यांच्याबरोबर समान पातळीवर भावनिक नाते स्थापन करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केले. तुम्ही आणि आम्ही एकाच देशाचे भाग आहोत, आपले प्रश्न समान आहेत. बिहार, बंगाल सारख्या राज्यांची परिस्थिती वेगळी असली तरीही ती या देशाचेच भाग आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना समजावुन घेणे भाग आहे असा विचार या राज्यांत जाऊन तेव्हा केवळ मराठी माणसांनी दाखवला. याच संबंधांमुळे या राज्यांमधील माणसांचे महाराष्ट्राशी वेगळे भावनिक नाते आहे. दुर्दैवाने गेल्या दोन दशकात महाराष्ट्रातीलच परिस्थिती बदलत गेली आणि तेव्हा पंजाब, आसाममधील अनेक लोक करत तसा विचार मराठी माणसेही करु लागली. तरीही महाराष्ट्रात पंजाब, हरयाणाबद्दल संताप नाही. पंजाबी, हरयाणवीबद्दल राग देखील नाही. इथे लोकांमधे संताप आहे तो केवळ युपी, बिहार आणि हिंदीबाबतच.

In reply to by प्रसन्न केसकर

सुहास.. 23/12/2010 - 15:56
महाराष्ट्रात पंजाब, हरयाणाबद्दल संताप नाही. पंजाबी, हरयाणवीबद्दल राग देखील नाही. इथे लोकांमधे संताप आहे तो केवळ युपी, बिहार आणि हिंदीबाबतच. >>> एकदम सहमत. उगाच नाशकात एकदम चार सिटं लागली ..पब्लीक कुठल्या बाजुला वळतय हे देखील समजत नाही काही लोकांना... म्हणतात ना डोळे मिटुन...

In reply to by प्रसन्न केसकर

श्री.प्रसन्न जी... थोडा सविस्तर खुलासा करणे क्रमप्राप्त आहे. 'खलिस्तान' चळवळीच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास एक गोष्ट प्रखरपणे समोर येते की, देशाच्या स्वातंत्र्याची पहाट अगदी दोन-तीन आठवड्यावर आली होती आणि ज्यावेळी सिरिल रॅडक्लिफ ब्रिटिश-इंडियातील अवाढव्य अशा पंजाबच्या फाळणीचा नकाशा तयार करण्यात मग्न होते; त्यावेळीही जवळपास सर्वच शीख आणि त्याप्रांतात बहुसंख्येने असणार्‍या हिंदुना (अखंड पंजाबात हिंदू टक्केवारीने जास्त होते) असे वाटत होते की 'लाहोर' सह एकच पंजाब तयार होईल....लाहोर हे त्या काळातही पूर्णपणे 'मुस्लिम डॉमिनेटिंग सिटी' नव्हते आणि आजही तिथे उर्दु आणि पंजाबी भाषा गुण्यागोविंदाने नांदतात. पण फाळणी झाली आणि पुढे हिंसेचे जे काही रामायण घडले तीत फटका बसला होता तो प्रामुख्याने शिखांना (या विषयात जास्त खोल जात नाही). त्यामुळे झाले असे की, अगदी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी असो वा अकाल तख्त, यांच्यात 'आता जो काही पंजाब राहिला आहे तो हिंदू आणि मुस्लिम यांच्याशिवाय टिकविला पाहिजे' हा विचार बळावला आणि अगदी 'भारतीय प्रजासत्ताक घटना समितीने' तयार केलेल्या पहिल्या खर्ड्यात शीख प्रतिनिधीने त्यावेळी (सन १९४९) लेखी स्वरूपात त्यातील तरतुदीविषयी समस्त शीख समुदायाच्यावतीने विरोध दाखल केला होता. घटनेच्या त्या खर्ड्यानुसार घटक राज्यातील शीख, जैन आणि बुद्ध धर्मीयांना 'हिंदू' असेच ओळखले जाईल अशी तरतुद होती. म्हणजे अल्पसंख्य जैन आणि बुद्धांना त्याबद्दल तक्रार नसली तरी शीख 'ते' लेबल मान्य करतील अशी परिस्थिती नव्हती आणि पुढे तर ज्यावेळी फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पंजाबमधुन हिंदूंचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांना वेगळे करून अनुक्रमे हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाची निर्मिती झाली त्यावेळी तर राहिलेल्या 'पंजाब' चे स्वतंत्रच अस्तित्व का असू नये असे शिखांतील जहाल गटाला वाटू लागले आणि तिथून सुरू झाली ती 'खलिस्तान' चळवळ; जिला अकाली तख्ताचे आशीर्वाद होतेच पण अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या धनवान शीखांचे आर्थिक पाठबळ लाभले; त्यासाठी वा त्या दरम्यान तिथे जाऊन जगजितसिंग चौहानाने केलेल्या प्रभावी भाषणबाजीचाही हातभार लाभला. अगदी 'खलिस्तान'चे स्वतंत्र चलन आणि झेंडादेखील तयार करण्यापर्यंत त्या चळवळीने मजल मारली होती....पुढे भिन्द्रनवाले यांचा उदय आणि अंत, रक्तरंजीत इतिहास, ऑपरेशन ब्ल्यू स्टार...इंदिराजींची हत्या....या ठळक घडामोडी तर सर्वांनाच माहिती आहेत. सांगायचा मुद्दा असा की, पंजाबचे 'त्या' अर्थाने भारतातील अन्य राज्यांशी शत्रुत्व नव्हते...(म्हणजे युपी, बिहार, बंगाल आदी राजे हे आपली लुबाडणूक करतात असे वाटणे). त्यांची - खलिस्तानची - चळवळ ही 'स्वतंत्र अस्तित्व' यासाठीच होती आणि या घडीला ती अत्यंत क्षीण जरी झाली असली तरी ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे असे नवी दिल्लीदेखील मानत नाही. पण एक आहे की कोणत्याही अनुकुल्/प्रतिकुल परिस्थितीत पंजाबने आपली 'कष्टकरी' ही प्रतिमा डागाळून घेतलेली नाही. अगदी भिन्द्रनवाले यांच्या 'टेरर' काळातदेखील पंजाबात उत्पादन झालेला गहू सार्‍या देशाला पुरत होता. तीच गोष्ट लुधियाना बेल्टची, जिथे तंत्रज्ञानाशी निगडीत व्यापारउदीम फोफावला आहे....आणि इथे मात्र बिहारी अन्य राज्यांतील नागरिकांपेक्षा मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. (त्यामुळे त्या जिल्ह्यात दोन गटात होऊ घातलेल्या झगड्याविषयी चर्चा झालेलीच आहे, त्याची द्विरूक्ती इथे करत नाही). तुम्ही प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे 'मराठी' माणसाबद्दल तेथील हवेत भावनिक नाते आहेच आहे. महाराष्ट्रातून आलेली व्यक्ती ही त्याना 'आपली' का वाटते याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी गेल्या दोन वर्षातील तिथल्या भेटीदरम्यान घेतला असता असे आढळते की, एकतर 'शिवाजी' हे नाव पंजाबला अगदी देवासम वाटते (एक गंमतीची गोष्ट सांगतो : गुरुदासपूरमध्ये तर महाराजांची दाढी आणि जिरेटोप यांचे पंजाब्यांना आदरमिश्रीत कौतुक वाटते, इतके की त्या पेहरावामुळे ते त्याना आपल्यातीलच एक वाटतात, इतकेच नव्हे तर महाराजांप्रमाणे आताचा मराठा समाज दाढी का राखत नाही याचेही कुतहूल वाटतेच)....कारण अर्थातच शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला दिलेली यशस्वी टक्कर, शिवाय मुघलांचा खर्‍या अर्थाने अखेरचा सम्राट 'औरंगजेबा' चा मृत्यु झाला तो त्याच्या दख्खन स्वारीत, महाराष्ट्रातच. सैन्यातही शीख आणि मराठा रेजिमेंटस यांनी लढवय्ये म्हणूनच ओळखले जात असल्याने आर्मीत दोन्ही जमाती अगदी बंधूसम वागताना दिसतात. या बाबी पंजाबच्या इतिहासाला आवर्जुन नोंदाव्याशा वाटल्या आहेत. शिवाय फाळणीनंतर "मुंबई" ने शीखांना जी जवळीक दिली (जो आजही आहे) त्याचाही कुठे ना कुठे तरी संबंध आहे. त्यामुळेच असेल कदाचित मला (एक मराठा या नात्याने) त्या भागात कधीही परके वाटलेले नाही, किंबहुना तेथील स्थानिकांनी तसे कधीही जाणवूनही दिलेले नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मी जे लिहिले होते ते ८०च्या दशकात मी जे अनुभवले, पाहिले आणि त्यानंतरही माझे शीख समाजाशी जे संबंध राहिले त्यावर आधारित होते. पाकिस्तान निर्मिती, पंजाबची फाळणी आणि भारतातील खलिस्तान चळवळीचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. (कॅनडामधे तसा तो लावला गेला पण तो फक्त अनेक युद्धे केलेल्या पाकिस्तानशी हातमिळवणी करण्याचे समर्थन होते.) हा इतिहास भिंद्रावाले यांनी कधीही सांगीतलेला नाही किंवा त्यांच्या आधिच्या निहंग नेत्यांनीही सांगीतलेला नाही. हरयाणाचा संदर्भ होता तो अबोहर-फाजिल्का, चंदीगढ पुरताच. तेथेही स्वातंत्योत्तर भारतातील आर्थिक विषमता हाच भाग मोठ्या प्रमाणात होता. सैन्याबाबत व अन्य दलांबाबत बोलायचे तर तेथे असंतोष होताच आणि ऑपरेशन ब्ल्यु स्टार नंतर तो अधिकच वाढला. याचे अनेक दाखले आहेत. ते देण्यासाठी ही योग्य जागा आहे असे मला वाटत नाही. सिव्हिलियन्समधे सध्या जी शीख-मराठी जवळिक दिसते ती ८० च्या दशकात महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकारामुळेच. आणि या जवळिकीबाबत सर्वाधिक समानत्व दिसते ते संत नामदेवांमुळे आणि गुरु गोविंदसिंहांमुळे.

In reply to by प्रसन्न केसकर

".....ते देण्यासाठी ही योग्य जागा आहे असे मला वाटत नाही....." ~ त्या दाखल्यांच्या निमित्ताने खूप चांगली चर्चा करता आली असती त्या विषयावर....पण तुम्ही म्हणता तसे "ही योग्य जागा आहे..." असे मलाही वाटत नाही. [सध्याच्या मिपावरील हवेत तर ते शक्यच नाही.] थॅन्क्स इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

धमाल मुलगा 22/12/2010 - 18:19
:) पंजाबात असाल तर ऊसतोडणी कामगार आणि अचानक वाढलेले गुन्हे ह्या दोन गोष्टींबद्दल अंमळ चौकशी करा. :) असो. आणि भौ, ते 'श्री.धमु' वगैरे नेऊन घाल तिच्यायला बारा गडगड्याच्या विहिरीत्त! च्यायला, झिरमिळ्यांची पगडी घालुन करवतकाठी उपरण्याच्या घड्यांशी खेळत उगाच शब्द चावत वाद घालायला उपक्रमावर जाऊन बसल्यागत वाटतं राव. :)

In reply to by धमाल मुलगा

क्रमांक १ ~ नक्कीच शोध घेतो....पण तरीही मी तिथे व्यवसायासाठी ये-जा करतो म्हणजे पूर्ण पंजाब प्रांतात माझी भटकंती असते असा अर्थ होत नाही. दोन जिल्ह्यात असतो, त्याशिवाय रोहटक या हरियाणाच्या आणखीन एका शहरात. तरीही विदा मिळविण्यास काही अडचण येईल असे वाटत नाही....मित्रपरिवार भरपूर आहे त्या भागात. क्रमांक २ ~ च्यामारी....ही बारा गडगड्याची विहीर (आणि हाळभावी) आमचे प्रिय लेखक जी.ए.कुलकर्णी यांची कॉपीराईट मालमत्ता असताना तुम्ही कशी काय वापरू शकता???? बाकी "झिरमिळ्यांची पगडी घालुन करवतकाठी उपरण्याच्या घड्यांशी"....वाचून अंमळ मोहन आगाशे आठवले...!! इन्द्रा

विजुभाऊ 22/12/2010 - 17:37
बीहारींबद्दल तिकडे ही अवस्था आहे http://www.bihartodayonline.com/2007/11/punjab-now-land-of-bihari-sardars.html आणि ही देखील आहे http://www.ambedkar.org/News/hl/Biharigirls.htm सर्वात महत्वाचे म्हणजे बीहारी लोकांच्या पंजाबमध्ये येण्याबद्दल पंजाबमध्ये असंतोषच आहे http://www.sikhsiyasat.net/2009/12/06/bihar-asked-punjab-to-explain-the-sitation-over-security-of-bihari-labour-in-punjab/ त्या बातमीतला हा मजकूर काय सांगतो It is notable that the Bihari migrating labour created much disturbance in Ludhiana and burned several vehicles and robbed the general public. आणि हा The intentions of the Indian state are clear now. They want to uproot Sikhs from Punjab and in-root Biharis here.” said Bhai Harpal Singh Cheema, a Sikh leader. “It is strange that Bihar Government is demanding security for those who created panic in the city without any reason” said a local resident. “The situation was such that locals felt insecure” he added while explaining the situation created by Biharis in the industrial city of the state. एकूण काय एक बिहारी सौ बीमारी आम्ही फक्त हरी हरी हरी हरी

In reply to by विनायक प्रभू

मेघवेडा 22/12/2010 - 18:02
आपल्या सिद्धांताचा व्यत्यास खरा असू शकतो असं वाटतं गुर्जी!

आजानुकर्ण 22/12/2010 - 18:03
विजुभौ एकंदर चर्चा वाचून चतुःसूत्री खालीलप्रमाणे आहे असे मला वाटते. १. मराठी भाषेतील लेखनाबाबत शुद्धलेखन-प्रमाणलेखन यांचे नियम मानणे वेडगळपणाचे आहे. ती जशी लिहीता किंवा बोलता येईल तशी वाकवली पाहिजे व जगवली पाहिजे. २. मात्र त्याचबरोबर मराठी भाषेची शुचिता सांभाळली गेली पाहिजे (!) व परकीय ( विशेषतः हिंदी) शब्दांपासून तिला वाचवणे आवश्यक आहे. ३. मराठी भाषा व संस्कृतीला रसातळाला नेण्यात महाराष्ट्रातील व पंजाबातील बिहारी लोकांचा महत्त्वाचा हात आहे. ४. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीत बोलतात व महाराष्ट्रातील सामान्य जनता आपल्या मुलाबाळांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालते याला उत्तरभारतीय जबाबदार आहेत. मराठी भाषेत याआधीच असलेले पोर्तुगीज, फारसी व इतरभाषिक शब्दांबाबत आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by आजानुकर्ण

सन्जोप राव 22/12/2010 - 18:50
माझे कान अद्याप गुडघ्याइतके लांब झाले नाहीत, पक्षी माझा अद्याप आजानुकर्ण झालेला नाही, पक्षी माझी वाढ / उत्क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही. वस्तुस्थिती आहे आक, तुम्ही कशाला रागावता?

सुधीर काळे 22/12/2010 - 22:19
पूर्वी स्वत: लिहिलेल्या लेखांचे संपादन स्वतः करण्याची सोय होती. ती असती तर ही चर्चा अशी फरफटली न जाता मूळ विषयाशी प्रामाणिक राहिली असती. तरी नीलकांत वगैरे संचालकांना नम्र विनंती कीं ही सोय पुनश्च लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आज संपादकवर्गाला विनंती करावी लागते व त्यांच्या कामात उगीचच वाढ होते व त्यामुळे त्यांनी जे काम करायला हवे ते राहून जाते.

धनंजय 22/12/2010 - 22:41
चीनमध्ये अनेक भाषा आहेत. बातमीमधली भाषा कुठली? चीनची राष्ट्रभाषा "प्हूथोंगहुआ" (त्याला "मंत्री"/"मांदारीन" असे इंग्रजी नाव आहे) ती भाषा असावी. म्हणजे भारताने सर्वत्र हिंदी भाषेबद्दल कायदा केले तर जसे होईल तसे. राष्ट्रभाषेची सक्ती करणार्‍या चीनची अभिनंदने कशाला करता - त्यांच्यासारखे आपण व्हावे म्हणून? म्हणजे त्यांच्यासारखी एक राष्ट्रभाषा ठरवून तिची सक्ती सर्वत्र करावी म्हणून? सध्या जितकी मराठी चालते तेसुद्धा सलते की काय या "चीनसारखे-वागू"वाद्यांना? का असे म्हणायचे आहे, की महाराष्ट्र भारतातून फोडा, आणि त्या फुटीर "राष्ट्रा"ची मराठी भाषा आहे, तिने चीनचे अनुकरण करावे? असल्या फुटीरवादाला महाराष्ट्रात सध्या तरी खूप विरोध होईल, आणि माझ्याकडून तर विरोध होईलच. - - - मराठीच्या उत्कर्षासाठी खूप विधायक कार्यक्रम आपण हाती घेऊ शकतो. त्या सगळ्या कार्यक्रमांपैकी हा चीनचा कार्यक्रम मुळीच नको. (मात्र भारतातच जेथवर हिंदी बोलली जाते, त्या ठिकाणी हिंदीच्या उत्कर्षासाठी हा "चीनसारखा" कार्यक्रम राबवला तर काहीच हरकत नाही.) - - - (विजूभाऊंना मराठी सलते, असे मला मुळीच वाटत नाही. पण बातमीतली चिनी भाषा म्हणजे त्यांच्या देशातली हिंदीसदृश भाषा आहे, त्यांची मराठीसदृश भाषा नाही, याबद्दल त्यांचे क्षणिक दुर्लक्ष झाले असेल. या बातमीला त्यांनी कृती-मार्गदर्शक मानू नये. त्याआधी मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांचे जे काय प्रयत्न होते, ते पूर्ववत चालू ठेवावे. अशी विनंती.)

In reply to by धनंजय

आजानुकर्ण 23/12/2010 - 16:17
या बातमीला त्यांनी कृती-मार्गदर्शक मानू नये. त्याआधी मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांचे जे काय प्रयत्न होते, ते पूर्ववत चालू ठेवावे. अशी विनंती.
धनंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत असलो तरी वरील मुद्द्याशी असहमत आहे. विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.

In reply to by आजानुकर्ण

सुप्परमॅन 23/12/2010 - 16:44
विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.
सहमत. लेखातले पोटफोडे ष पाहता नरसिंहावतार धारण करून लेखकाला आडवा मांडीवर घेण्याचा मोह झाला.

विजुभाऊ 23/12/2010 - 10:30
मला एवढेच म्हणायचे आहे की चिनी लोक त्यांच्या भाषेबद्दल जागृत आहेत. त्यांचे कौतूक होते. आपण मराठी लोक मात्र आपल्या भाषेबद्दल एवढे जागृत नसतो. बिहारी हिन्दी वगैरे मुद्दे ...ते लोक त्यांची भाशा आपल्यावर लादतात आणि आपण ते सोशीकपणे स्वीकारतो. मी बंगळूरात अस्खलीत कन्नड बोलनारा बिहारी पानवाला पाहिला. तो केवळ दोन वर्षेच तिथे होता. महाराष्ट्रात राहून बिहारी लोक त्यांच्या भाषेचा आग्रह सोडत नाहीत. वर उर्मटपणे तुम्हीच हिन्दी बोला असा आग्रह धरतात. अशिक्षीत सोडा पण शिकलेले लोक सुद्धा तसाच आग्रह धरतात. पाच मराठी अस्तील आणि एक हिन्दी भाषीक असेल तर तो म्हणतो तुम्ही सारे माझ्याशी हिन्दीत बोला..... आपण त्याच्या सोयीसाठी समजा इंग्रजीत बोललो तर तो मात्र हिन्दी ची कास सोडत नाही. आपण मराठी लोक असा आपल्या भाशेचा आग्रह का चालवत नाही. असा माझा प्रश्न आहे. आहे. बाकी श्री श्री श्री अजानुकर्णजी यांच्या २. मात्र त्याचबरोबर मराठी भाषेची शुचिता सांभाळली गेली पाहिजे (!) व परकीय ( विशेषतः हिंदी) शब्दांपासून तिला वाचवणे आवश्यक आहे. ३. मराठी भाषा व संस्कृतीला रसातळाला नेण्यात महाराष्ट्रातील व पंजाबातील बिहारी लोकांचा महत्त्वाचा हात आहे. या शोधाबद्दल त्याना खास कोणतेतरी जागतीक पारितोषीक दिले पाहिजे. मी शक्यतो वैयक्तीक लिहीत नाही. पण ओढून ताणून त्यानी जे मुद्दे जुळवले आहेत त्याबद्दल त्यांच्या बुद्धीमत्तेची वाखणणी करावी तेवढी थोडीच आहे. पंजाबातील उदाहरण कोणीतरी पंजाबात बिहारींचा प्रॉब्लेम नाही का ? या साठी उत्तर म्हणून दिला. मराठीवर हिन्दी भाषा आक्रमण करीत आहे याला कारण हिन्दी भाषीकांचा हिन्दीच रेटून नेण्याचा अट्टाहास आणि मराठी भाषीकांची मातृभाषेबद्दलची अनासक्ती. या चीन सरकारने जे केले ते मराठी लोकानी का करू नये?

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 23/12/2010 - 10:52
मी शोध लावलेला नाही. चर्चेत जी विविध मते वारंवार आली त्यावरून चार निष्कर्ष मी काढले. ते निष्कर्ष तुम्ही खोडलेले नाहीत. मराठीतील फारसी, पोर्तुगीज वगैरे शब्दांबाबत तुम्ही मत सांगितले नाही. या कोणत्याही मुद्द्यांचे खंडन न करता 'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत हळूच वैयक्तिक बोललात :-)

विजुभाऊ 23/12/2010 - 12:20
'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत हळूच वैयक्तिक बोललात अजानुकर्णजी आपण पुन्हा एकदा माझ्य अवाक्यातील सोयीस्कर शब्द घेतलेत मी लिहीले होते. मी शक्यतो वैयक्तीक लिहीत नाही. शक्यतो हा शब्द तुम्ही सोयीस्करपणे गाळलात. मराठी भाषेत इतर भाषांमधून बरेच शब्द आले आहेत. तसे ते प्रत्येक भाषेत असतात. फारसी कन्नड गुजराती अशा बर्‍याच भाषांमधून मराठीत खूप शब्द आले आहेत.ते तसे आले तर भाषा समृद्ध होते. काही शब्दाना मराठीत शब्दच नाहीत. ते शब्द ज्या वातावरणातील आहेत त्या प्रदेशातील भाषेतून ते शब्द आपल्या भाषेत येतील माझा आक्षेप आहे तो हिन्दी लोकांच्या "माझी भाषा हिन्दी आहे...म्हणून तू देखील हिन्दीतच बोलले पाहिजे. तू या अरेरावीचा" तुम्ही मांडलेले मुद्दे हे शुद्धलेखन : मुद्दा या चर्चेत गैरलागू आहे मुद्दा क्र २ : वरती स्पष्टीकरण दिले आहे मुद्द क्र ३: पंजाबातील बिहारीलोकांचा या इथे काय संबन्ध मुद्दा क्र ४ : महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री हिन्दीत बोलतात याला माझा आक्षेप नाही. आक्षेप आहे तो हिन्दी चॅनेलवाले लोक माजुर्डेपणाने मुख्यमन्त्र्याना सुद्धा हिन्दीत बोला असे ऐकवू लागले आहेत. असो. मुद्दे भरकटवून टाकायची ही कला वाखाणण्याजोगीच.

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 23/12/2010 - 13:29
विजुभाऊ तुमचा मूळ चर्चाप्रस्ताव वाचून माझा समज असा झाला की मराठीत भेसळ करणारे हिंदी शब्द हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण आता तुम्ही म्हणता आहात की महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम आहे. नक्की प्रॉब्लेम काय आहे हे निश्चित झाले नाही तर सोल्युशन कसे सापडणार. बाय द वे, तुम्हाला हिंदीच्या भेसळीचा इतका तिटकारा असूनही 'जी' हे नखशिखान्त हिंदी संबोधन तुम्ही माझ्यासाठी का वापरत आहात. राव, पंत, साहेब वगैरे मराठी संबोधने आहेत ना. तसेही मराठीत काहीही संबोधन वापरले नाही तरी बिघडत नाही.

विजुभाऊ 23/12/2010 - 16:02
महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम आहे पुन्हा गल्लत करताय महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणारे आणि मराठी लोकांवर हिन्दी लादणारे लोक तसेच ही मुस्कटदाबी न जाणवून घेणारे मराठी लोक हा मुद्दा आहे. हिंदीच्या भेसळीचा इतका तिटकारा असूनही 'जी' हे नखशिखान्त हिंदी संबोधन तुम्ही माझ्यासाठी का वापरत आहात. मी हिन्दीचा /भेसळीचा तिटकारा आहे असे कधीच म्हंटले नाही. मराठीत अनेक भाषातील शब्द आहेत. तुमच्या नावापुढे "जी" लावले याचे कारण " जी" शब्दाव्वर हिन्दीची मक्तेदारे नाही. तानाजी .बाजी येसाजी असे अनेक "जी" इथे होऊन गेलेत. अर्थात तुमच्या एकुण्च प्रतिसादांवरून महान असलेल्या तुम्हाला " जी" असे संबोधावे असे वाटले. ( एखाद्याला " फार शहाणा आहेस" असे म्हंणतोना तसेच हे काहीसे )

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 23/12/2010 - 16:14
महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणारे आणि मराठी लोकांवर हिन्दी लादणारे लोक तसेच ही मुस्कटदाबी न जाणवून घेणारे मराठी लोक हा मुद्दा आहे.
मूळ मुद्दा मराठी भाषेतील भेसळीचा आहे की मराठी लोकांवर हिंदी लादण्याचा हे आधी फैनल करा बुवा. मुस्कटदाबी न जाणवून घेण्याचा प्रॉब्लेम मराठी लोकांचाच आहे त्यासाठी बिहारी लोक कसे काय जबाबदार धरले तुम्ही?
मी हिन्दीचा /भेसळीचा तिटकारा आहे असे कधीच म्हंटले नाही
मग चीन सरकारने त्यांच्या भाषेत भेसळ बंद करण्याचा आदेश दिला आहे हा मुद्दा चर्चेला घेण्याचे कारणच नव्हते ना.
तानाजी .बाजी येसाजी असे अनेक "जी" इथे होऊन गेलेत.
या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?)
अर्थात तुमच्या एकुण्च प्रतिसादांवरून महान असलेल्या तुम्हाला " जी" असे संबोधावे असे वाटले.
थ्यांक्यू. पण मला मराठी प्रत्यय लावलेले आवडतील.

In reply to by आजानुकर्ण

या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?) नाही पण तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असा शिवाजीमहाराजांनी केल्याचे अनेक शाहीरांच्या तोंडी ऐकले आहेत. बाळ किंवा बाळ नावाच्या व्यक्तिंचे पुढे बाळाजी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 15:52
नाही पण तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असा शिवाजीमहाराजांनी केल्याचे अनेक शाहीरांच्या तोंडी ऐकले आहेत. बाळ किंवा बाळ नावाच्या व्यक्तिंचे पुढे बाळाजी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही. (तसे पुरावे दिल्यास हे मान्य करता येईल) टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत. शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे?

In reply to by आजानुकर्ण

बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही. पडळकर कुलवृत्तांत मिळाला बाजारात तर त्यामधे आताच्या पडळकरांच्या १७पिढ्या आधीचा मनुष्य पडळकरांच्या वंशाचा मूळ पुरुष मानला जातो. त्यांचे नाव बाळा(प्रभू) अथवा बाळाजी असे लिहीलेले सापडेल. टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत. टिळकांच्या जमान्यात जी लावायची पद्धत कमी झाली होती असे दिसते. किंवा फार कमी प्रमाणात अस्तित्वात होती. तेव्हा आडनावांना महत्व प्राप्त झाले होते. आणि साहेब किंवा राव असे प्रत्यय (विभक्ती नव्हे आदरार्थी) जोडणे चालू झाले होते. शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे? जुने पोवाडे काढून वाचलेत तर त्यात सापडेल.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 20:43
जुने पोवाडे काढून वाचलेत तर त्यात सापडेल.
जुने पोवाडे कुठे वाचायला मिळतील? एखाद्या पुस्तकाचे नेमके नाव सांगितले तर ते पाहता येईल.

विजुभाऊ 24/12/2010 - 10:11
या निमित्ताने अनेकांशी चर्चा घडली. काही विचारवन्ताना मराठी भाषेचे काहीही झाले तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही हे जाणवले. अवांतरः विचारवन्त हा नक्की कोणाच्या डोक्याने विचार करतो? अती अवांतरः विचारवन्ताची लक्षणे ही स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणेच असतात का? तज्ञानी मार्गदर्शन करावे

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 24/12/2010 - 10:19
विजुभाऊ, अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे नुकसान होत नाही तर परभाषेतून मराठीत आयात होणाऱ्या शब्दांमुळे मराठीचे नुकसान होते या तुमच्या सिद्धांताला कोणताही भाषाशास्त्रीय आधार नाही. अवांतरः वीरेन शाह वगैरे शाह मंडळी मराठी पाट्यांच्या विरोधात आहेत याबाबत तुमचे मत तुम्ही सांगितले नाही. ;)

In reply to by आजानुकर्ण

अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे नुकसान होत नाही तर परभाषेतून मराठीत आयात होणाऱ्या शब्दांमुळे मराठीचे नुकसान होते या तुमच्या सिद्धांताला कोणताही भाषाशास्त्रीय आधार नाही. भाषा ही भाषाशास्त्राच्या नियमानुसार चालते, वाढते, बहरते का?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 11:54
भाषा ही भाषाशास्त्राच्या नियमानुसार चालत, वाढत किंवा बहरत नाही. भाषाशास्त्राचे नियम या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याचे वर्णन करतात. भाषाशास्त्राच्या सिद्धांतानुसार भाषेच्या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याला अशुद्धलेखनामुळे खीळ बसू शकते. त्याचबरोबर परभाषेतून मराठीत आयात होणारे शब्द बंद केल्यास भाषेचे डबके होऊन भाषेच्या चालण्या, वाढण्या व बहरण्यावर मर्यादा येऊ शकते.

In reply to by आजानुकर्ण

भाषाशास्त्राच्या सिद्धांतानुसार भाषेच्या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याला अशुद्धलेखनामुळे खीळ बसू शकते. त्याचबरोबर परभाषेतून मराठीत आयात होणारे शब्द बंद केल्यास भाषेचे डबके होऊन भाषेच्या चालण्या, वाढण्या व बहरण्यावर मर्यादा येऊ शकते. आमच्या अल्पबुद्धीनुसार शब्द हे न वापरल्यामुळे भाषाबाह्य होतात. मूळ मराठी भाषेतले शब्द अन्य भाषेतील आक्रमित शब्दांमुळे भाषाबाह्य होत असतील तर ते मूळ आग्रहाने वापरल्याने टिकून राहतात. राहीला शब्द परभाषेतून मराठीत शब्द घेण्याचा तर ज्या गोष्टींसाठी शब्द नाहीत त्यासाठी शब्द घेणे ठीक पण ज्यासाठी शब्द अस्तित्वात आहेत त्यासाठी परभाषेतला शब्द वापरणे ही लाचारी किंवा आळस कींवा दोन्हीही.

वेताळ 24/12/2010 - 12:00
तिथे भाषेचे डबके झाले. कालांतराने ते डबके आटले व त्याचा र्‍हास झाला.

विजुभाऊ 24/12/2010 - 16:31
मराठीत परभाषीक शब्द येण्यावर कुणाचेच आक्षेप नाहीत. इंग्रजी भाषेत इतर भाषेतले शब्द आले म्हणून तीचा इतका विस्तार झाला. आक्षेप आहेत ते इतरानी माजुर्डेपणाने इथल्या भाषेला नाकारून त्यांची भाषा इथल्या समाजावर लादण्याबद्दल. रेल्वे रूळा साठी तुमच्या भाषेत शब्द नसेल तर जो अन्य भाषेत आहे तो च शब्द वापरला जातोय ना.

नरेशकुमार 24/12/2010 - 20:40
मीपाल धोका, देशाला धोका, मरठिला धोका, शिवाजिला धोका, दादोजिला धोका, कळयान्ना धोका, फळान्ना धोका, लोकांना धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका,

अवलिया 22/12/2010 - 11:07
चीन सरकारचे मनापासुन अभिनंदन.. मध्यंतरी चीनी लोकांनी इंग्लिश शिकावे म्हणुन सरकारी प्रयत्न पण चालू होते असे समजले. पण त्यांनी दोन्ही गोष्टित गल्लत केलेली नाही हे स्पृहणीय.

विजुभौंच्या ह्या लेखनात कधी न्हवे ते कुठेही संघ अथवा भाजपावर टिका केलेली नसल्याने हा त्यांचा लेख फाऊल धरुन उडवण्यात यावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 22/12/2010 - 11:10
आणि राम, हिंदू, धर्म, संस्कृती यावर हिंदूद्वेषप्रणित कागदपत्रे वाचून गरळ पण ओकलेली नाही... जियो ! विजुभाउ जियो !

आजानुकर्ण 22/12/2010 - 11:16
मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी. चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे. http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते. मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे. गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे. अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे. कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे. सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते. हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो? बाय द वे मातृभाषेला योग्य सन्मान देणार्‍या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्‍या चीन सरकारचे अभिनन्दन.

In reply to by आजानुकर्ण

अवलिया 22/12/2010 - 11:19
मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी. मी इथे आलो मी इथं आलो म्या इडं आलु म्या इत्तं आलु हे मराठीतील वाक्य नाहीत का? केवळ प्रमाणलेखनानुसारच बोलणे आणि लिहिणे म्हणजेच मातृभाषेबद्दल प्रेम का? (अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे)

In reply to by अवलिया

आजानुकर्ण 22/12/2010 - 11:21
मी इथे आलो मी इथं आलो म्या इडं आलु म्या इत्तं आलु हे मराठीतील वाक्य नाहीत का?
एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा.

In reply to by आजानुकर्ण

विजुभाऊ 22/12/2010 - 11:39
एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा. साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो. त्यात गर्व असणे / गर्विष्ठ असणे हा वाईट गुण आहे मानसाने गर्व करू नये. नम्र असावे अशी शिकवण दिली होती. हिन्दी भाषेने मात्र गर्वाला फार आदराचे स्थान दिले. त्यामुळे आपण गर्वाने म्हणतो मी मराठी आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. भाषा जपली संस्कृती जपली. भाषा संपली संस्कृती संपली

In reply to by विजुभाऊ

पंगा 24/12/2010 - 10:59
साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो.
मग पुढे काय घडले त्या धड्यात? मोठेपणी गर्वाला भाडेकरू मिळाला का?

In reply to by अवलिया

टारझन 22/12/2010 - 11:30
तु "ब्रिटिश टिंगी" शी सहमत आहेस की "ब्रिटिश टिंग्या" शी ? हे असं बोलतोय कारण की ह्यात जी गल्लत होते आहे ती भाषेचा अभ्यास वाढवुन कमी करता येणार नाहीये. - भेंडीश वांग्या

In reply to by अवलिया

छोटी टिंगीशी सहमत व्हावे. अवांतरः हा टारझन माझ्याशी फार वाईट वागतो. मला सारखे खाली दाखवतो (हे हिंदीतील "निचा दिखाना" चे मराठीकर्ण आहे). असो. हिंदी शब्द आले म्हणून कुठे बिघडले आहे ?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 22/12/2010 - 12:09
मला सारखे खाली दाखवतो
अश्लील अश्लील. अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की.

In reply to by आजानुकर्ण

अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की. ऑल हिंदी वर्डस् कमिंग टू मराठी आर ईक्वल बट सम आर मोअर इक्वल. (वाह इतके सगळे इंग्रजी शब्द पण मराठीत आले तर मराठी कशी जागतिक भाषा होईल नै!) गर्व से कहो हम हिंदी हई.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 24/12/2010 - 11:10
गर्व से कहो हम हिंदी हई.
सांभाळून हो! नाही म्हणजे, इथे 'हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा' याचा अर्थसुद्धा कोणी 'हिंदुस्थान हिंदीभाषकांचा, तस्मात् हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? (*बाकी या असल्या भाषांतरास प्रॉपगांडा व्हॅल्यू मजबूत आहे, नाही? ;-))

In reply to by पंगा

हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विजुभाऊ 24/12/2010 - 16:17
हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा? सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात. पंगा /पुपे हा अनुभव मलादेखील आला आहे. एकाला मी हिन्दी ही राष्ट्रभाषा नाहिय्ये असे सांगितले तेंव्हा तो म्हणाला की मग या देशाचे नाव हिंदुस्थान कशाला आहे. त्या बेण्याला तिथेच एक खॅळ्ळ खॅटॅक करून त्याच्या तोंडातले फर्निचर बाहेर काढावेसे वाटले.

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 24/12/2010 - 16:32
देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा. अनेक हिंदू हिंदी न वापरताही हिंदू आहेत. देशाचे नाव हिंदुस्थान/हिंदीस्तान नाही. हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.

In reply to by आजानुकर्ण

देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे. वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 16:45
सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते.
हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे.
वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.
देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे. समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही.

In reply to by आजानुकर्ण

हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे. काहो दुसर्‍याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का? देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे. स्तान आणि स्थान यात अर्थाच्या दृष्टीने फारसा फरक नसल्याने आमच्या वाक्यातही फारसा फरक पडत नाही. समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही. अर्थ लक्षात घेऊन वाचल्यास फारसा फरक नाही. तरीही सूचनेचा विचार करू.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:03
काहो दुसर्‍याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का?
नाही.
तरीही सूचनेचा विचार करू.
धन्यवाद.

In reply to by आजानुकर्ण

पंगा 24/12/2010 - 18:52
हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.
याबद्दल साशंक आहे. म्हणजे 'हिंदोस्ताँ'करिता मराठीत 'हिंदुस्थान' हा शब्द नेमका कधी वापरला जाऊ लागला, कोणी बनवला याबद्दल कल्पना नाही, परंतु जुन्या (म्ह. आमच्या आजोबांच्या वगैरे) पिढीपासूनच्या लोकांच्या तोंडून (आणि लेखी वापरातसुद्धा) हा शब्द सरसकट असाच ऐकलेला (आणि वाचलेला) आहे. असा वापर करणारांपैकी अनेकांचा 'हिंदुत्ववादा'शी दूरान्वयानेही संबंध नसावा (किंवा असलाच तर विरोधापुरता असावा). किंवा कदाचित याचे मूळ 'हिंदुत्ववाद्यां'त (म्ह. कोण? सावरकर वगैरे?) असेलही, परंतु हा शब्द मराठीतील सामान्य वापरात ('हिंदुत्ववाद्यां'मध्ये आणि इतरांमध्येसुद्धा) अशाच स्वरूपात गेल्या किमान तीनचार पिढ्यांत तरी रुळलेला आहे, आणि तो मराठीत 'हिंदुस्तान' असा कधीही म्हटलेला किंवा लिहिलेला निदान माझ्या तरी ऐकण्यापाहण्यात आलेला नाही. मग म्हणणारा/लिहिणारा 'हिंदुत्ववादी' असो वा नसो. उलटपक्षी, मराठीखेरीज इतर भाषांत हा शब्द 'हिंदुस्थान' असा लिहिलेला किंवा म्हटलेला (अगदी 'हिंदुत्ववाद्यां'कडूनसुद्धा) वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही. त्यामुळे हा शब्द मराठीत 'हिंदुस्थान' तर इतर भाषांत 'हिंदुस्तान/हिंदोस्ताँ' असा असावा, आणि वापरणार्‍याच्या 'हिंदुत्वा'शी (किंवा 'हिंदुत्व'वादाशी) संबंध नसावा, अशी निदान माझी तरी धारणा आहे. (कदाचित मराठीतील 'हिंदुस्थान' हे 'हिंदोस्ताँ'चे अपभ्रष्ट रूप असू शकेल. मुंबईत एकदा 'रिचर्डसन अँड क्रूडास' या कंपनीचे नाव 'रिचर्डसन अँड गुरदास' असे सामान्यजनांकडून ऐकलेले आहे, तद्वत.) (बाय द वे, माझ्याच घरातील उदाहरण घ्यायचे झाल्यास, हा शब्द माझ्या घरात नेहमी 'हिंदुस्थान' असाच वापरण्यात आलेला आहे. माझ्या आजोबांबद्दल कल्पना नाही, परंतु माझे वडील 'हिंदुत्ववादा'चे कट्टर विरोधक होते आणि मीही 'हिंदुत्ववादी' नाही.)

In reply to by पंगा

आजानुकर्ण 24/12/2010 - 20:00
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण हिंदुस्तान/हिंदुस्थान आणि हिंदीस्तान याचा संबंध नसावा हा मुख्य मुद्दा आहे. (पूर्वपदस्थ) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

पंगा 24/12/2010 - 22:13
बाय द वे, हिंदुस्थानाकरिता तुर्की भाषेत 'हिन्दिस्तान' असा शब्द असावा असे वाटते. हवे तर तुर्कस्थानातील* भारतीय वकिलातीच्या वेबसाइटीस भेट देऊन खात्री करून घ्यावी. *पुन्हा स्थान! तसेही 'हिंदी' या शब्दाचा अर्थ 'हिंदचा (म्ह. हिंदुस्थानचा) रहिवासी' असा आहे, आणि योगायोगाने हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागात बोलल्या जाणार्‍या भाषेचेही ते नाव आहे, असे वाटते. तसेही भौगोलिकदृष्ट्या 'हिंदुस्थान' हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी, कधी 'आसिंधुसिंधुपर्यंत' अर्थाने, कधी 'ब्रिटिश इंडिया' अशा अर्थी, कधी 'भारतीय गणराज्य' अशा अर्थी तर कधी केवळ उत्तरेकडील मैदानी प्रदेशासाठी (पहा: 'हिंदुस्थानचे मैदान') वापरला जातो, असे वाटते. तसेही 'हिंद' किंवा 'हिंदोस्ताँ'चा मूळ अर्थ 'उत्तरेकडील गंगायमुनांच्या खोर्‍यांतील मैदानी प्रदेश'** असा काहीसा लक्षात घेता, ऐतिहासिकदृष्ट्या 'हिंदची (किंवा हिंदोस्ताँची) भाषा ती हिंदी (किंवा हिंदोस्तानी)', यात काहीही गैर नाही. 'हिंदोस्ताँ'(या संज्ञे)ची व्याप्ती नंतर वाढली, त्याला कोण काय करणार? ** दख्खनचे पठार हे 'हिंदोस्ताँ' संज्ञेच्या मूळ व्याप्तीच्या बाहेर होते असे विकीवरून कळते. चूभूद्याघ्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 24/12/2010 - 22:47
असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.
माझा रोख 'हिंदी इतर भाषांना गिळंकृत करून राहिली आहे'-छाप अपप्रचार करणारांकडे होता. अशा अपप्रचारकांकरिता अशा (मुद्दाम लावलेल्या) अर्थास बरीच प्रॉपगांडा-व्हॅल्यू आहे, असे म्हणायचे होते. बाकी उत्तर भारतवासी हिंदीभाषक बांधवांच्या याबद्दलच्या (आपण म्हणता तशा) विचारांबद्दल बोलायचे झाल्यास, होय, याचाही थोडाफार अनुभव आहे. (म्हणजे अगदी बिगर-हिंदीभाषकांनी हिंदुस्थानात राहू नये वगैरे इतकी नव्हे, पण बिगरहिंदीभाषकांबद्दल - विशेष करून हिंदी पट्ट्याच्या दक्षिणेकडील रहिवाशांबद्दल - एकंदर तुच्छतेची भावना वगैरे पाहिलेली नाही असे नाही. दिल्लीच्या बसेसमध्ये 'भारत की सभी भाषाएं हमारी अपनी भाषाएं हैं' अशी 'सरकारी' घोषणा मुद्दाम लावावी लागते हे चित्र पुरेसे बोलके आहे. अर्थात ही परिस्थिती सार्वत्रिक नाही, पण नाही असेही नाही.) पण त्याची दखल घेण्याची गरज आहे असे वाटत नाही. भारताच्या एका छोट्या भागातील मर्यादित लोकांना उर्वरित भारतीयांबद्दल काय वाटते यावरून त्या उर्वरित भारतीयांचे भारतीयत्व ठरू नये, आणि त्या उर्वरित भारतीयांनी तर ते तसे मुळीच ठरवून घेऊ नये. गेले उडत! आणि तशीही इतरप्रांतीयांबद्दल तुच्छता ही एकंदर भारताचीच (किंवा कदाचित मानवजातीची) खासियत असावी. खुद्द महाराष्ट्रात, दक्षिणेकडील हेल काढून बोलणार्‍या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषांबद्दल विनाकारण तुच्छतेची - किमानपक्षी टिंगलटवाळीची - भावना परवापरवापर्यंत - अगदी आमच्या आईवडिलांच्या पिढीपर्यंत किंवा कदाचित आमच्याही पिढीपर्यंत - होती, आणि कदाचित अजूनही असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना, (केवळ भाषेच्याच नव्हे, तर इतरही बाबतींत) भक्कम परस्परतिरस्काराच्या मजबूत बांधणीवर भारत टिकून आहे, असे म्हटल्यास बहुधा वावगे ठरू नये.

In reply to by अवलिया

अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे
+१ सहमत आहे बॉस. विजुभौंच्या मराठी प्रेमाबद्दल पुर्ण खात्री आहे. मात्र आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले.

In reply to by अवलिया

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:29
मी या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेले परखड उत्तर संपादित झाले. मात्र हा एकांगी आरोप संपादित झाला नाही याचे आश्चर्य वाटते. वर मी हिंदी शब्द आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला आहे. तो सल्ला आणि वरील प्रतिसाद संपादित व्हावा ही संपादन मंडळाला विनंती.

In reply to by आजानुकर्ण

आमोद शिंदे 24/12/2010 - 11:09
सहमत आहे. सदर सदस्याची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा संपादक मंडळ करेल काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले. + १ मला तर गदगदुन आले आणि माझे डोळे पाणावले तात्पर्य काय : मिपा उपक्रमी आनि मनोगती होणार

विजुभाऊ 22/12/2010 - 11:33
शुद्धलेखन आनि मातृभाषेला योग्य सन्मान देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक सांगा व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा? अवांतर" आणि हा शब्द टंकताना तो आनि असा टंकला गेला यात शुद्धातेपेक्षा कळफलक आणि घाई गडबड जबाबदार आहे. टिळकानी संत हा शब्द सन्त सनत असा तिन्ही प्रकारे लिहीला होता. सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो. त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो. त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले जातात. मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते" फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते. ही तर्‍हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्‍या पुणेकरांची

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 11:40
व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा?
हा फुलराणीतला डायलॉग आहे वाटतं. बरं हे देशद्रोही नक्की कोण ठरवते? महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे.

In reply to by आजानुकर्ण

>>महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम असा आहे की पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे. मुंबईत येऊन बघा. आणि पुण्याची आजची स्थिती पाहता आपण काही नाही केले तर आज जे मुंबईत होते आहे ते १०-१५ वर्षात पुण्यात होणार(If not earlier)

In reply to by विजुभाऊ

रमताराम 22/12/2010 - 11:44
इतके सगळे प्रकार पुण्यात दिसत असताना मग तुम्ही नेहमी घाऊक द्वेष करता तो नक्की 'कुठल्या' पुण्याचा?

In reply to by विजुभाऊ

सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो. त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो. त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले जातात. मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते" फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते. ही तर्‍हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्‍या पुणेकरांची
हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !!

In reply to by परिकथेतील राजकुमार

चिंतामणी 24/12/2010 - 23:49
हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !! अजून वरिजनल विजुभौ हायेत. त्यांनी नवीन वर्षापासुन (म्हणजेच २०११ आहे हे गृहीत धरले आहे) पुणे आणि पुणेकरांना नाव ठेवणार नाही असा "पण" केला आहे. जाउ देत परा. शेवटचे ४-५ दिवस राहीलेत. त्यामुळे दुर्लक्ष कर आत्ता.

In reply to by विजुभाऊ

चिंतामणी 24/12/2010 - 23:50
" कुठे " चे "कुढं" किंवा "फुडं" झाले तरी किंवा येवू र्‍हायला जावू र्‍हायला असे शब्द वापरले तरी पुण्यात मराठीचाच वापर होतो हे तुम्ही सिध्द केल्याबद्दल मंडळ आभारी आहे. (बंबईया भाषेबद्दल न बोलणे चांगले) बाकी लो.टिळकांबरोबर स्वत:ची तुलना करण्याचा प्रयत्न करून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रकार भारी होता.

विजुभाऊ 22/12/2010 - 11:48
पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे. महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला. नक्की कुठल्या भूभागावर राहता ?

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 11:56
महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला. नक्की कुठल्या भूभागावर राहता ?
मी पुण्यात राहतो. :-) गेले अनेक दिवस याबाबतीत काही बातम्या वाचनात आल्या नाहीत त्यामुळे हा वाद मिटला असावा असे वाटले. मला वाटते पाट्या-फलक मराठीत - पक्षी देवनागरीत - आल्याने हिंदी भाषकांचा फायदाच होणार आहे. पुरेसे शिक्षण न मिळाल्याने अनेक युपी बिहारी लोकांना इंग्रजी वाचता येत नाही मात्र देवनागरीतल्या पाट्या मात्र त्यांना चोख वाचता येतील. किंबहुना मराठी देवनागरीतल्या पाट्या या त्यांच्या हिताच्याच आहेत हे लाई चना वगैरे कार्यक्रमात श्री. ठाकरे (ठाकरे कुटुंबियांपैकी सध्या जे कोणी पदावर असतील त्यांनी) हिंदी भाषकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. मला तर वाटते हा मराठी पाट्यांच्या विरोधातला कट हा हिंदी भाषकांचा नसून गुजराती भाषकांचा आहे. विरेन शाह वगैरे शाह मंडळी या कटाच्या अग्रभागी आहेत. (फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन व रूपम ग्रुप) (तुम्ही मुंबई असा मराठमोळा शब्द असताना बम्बईपासून प्रेरणा घेऊन मुम्बई असा शब्द का बनवला? मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.)

In reply to by आजानुकर्ण

विजुभाऊ 22/12/2010 - 12:16
मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.) तुमचे व्याकरण कच्चे असावे असा संशय होता. आतातर इतिहास देखील कच्चा आहे असे वाटायला लागलेय. लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता. व्याकरणदृष्ट्या तीनही शब्द बरोबर आहेत. मुंबई हा शब्द मुम्बई किंवा मुम्बै असा लिहीला तरी बरोबर आहे. देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 12:24
माझे व्याकरण कच्चेच आहे त्यामुळे मराठी संकेतस्थळांवर येऊन मी व्याकरण शिकायचा प्रयत्न करतो. असो. संत, सन्त किंवा सन्‌त असे शब्द पुलंनी 'आम्ही सूक्ष्मात जातो' मध्ये वापरल्याचे आठवते. (त्यात या शब्दांच्या जोडीला नम्र, नम्‍र, नम्‌र हेही होते) मी माझ्या वाक्यात 'शक्यतो' हा शब्द वापरला होता. मुंबई हा शब्द मुम्बअ‍ि असाही लिहिता येतोच की.)
देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.
हा हा म्हणजे प्रत्येक शब्द हे 'अक्शर्चिन्ह' असते असे सतीश रावले म्हणतात तसे का?

In reply to by आजानुकर्ण

विजुभाऊ 22/12/2010 - 12:31
मुंबई हा शब्द मुम्बअ‍ि असाही लिहिता येतोच की "मुम्बअ‍ि" शब्दात " अ" अक्षरावर्ची वरची वेलान्टी दीर्घ हवी

In reply to by विजुभाऊ

पंगा 24/12/2010 - 22:48
लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता.
अहो पण टिळकांनी तो शब्द तसा केवळ दिपोटींशी पंगा घेण्यासाठी लिहिला होता. (शेवटी मूळचे पुण्याचे नसले तरी रेट्रोअ‍ॅक्टिव इफेक्टने वाण नाही पण गुण लागायचाच. असो.) त्यानंतरच्या महाराष्ट्राच्या उभ्या इतिहासात (म्हणजे, महाराष्ट्राचा बसलेला इतिहास पाहिलेला नाही. तसेही आपण इतिहासतज्ज्ञ नाही. असो.) तो तसा तीन वेगवेगळ्या प्रकारे (एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी सुटा) लिहिला गेल्याची उदाहरणे (वर आजानुकर्ण यांनी म्हटल्याप्रमाणे पु.लं.चा अपवाद वगैरे वगळता) फारशी नसावीत. (नाही म्हणायला हा शब्द 'सन्त' असा लिहिणारे तुरळक खाजाळू असतीलसुद्धा, परंतु 'सन् त' - मधली रिकामी जागा वगळून - असा लिहिणारे महाभाग टिळकांअगोदर किंवा नंतर झाल्याचे ऐकिवात नाही.) असो. (अवांतर: बाकी, टिळकांची संतत्रयीची किंवा 'मी शेंगदाणे खाल्लेच नाहीत'वाली गोष्ट काय किंवा गांधींची 'केट्ल'च्या स्पेलिंगची गोष्ट काय, या गोष्टी या कोणीतरी उठवून दिलेल्या वावड्या असाव्यात, अशी मला दाट शंका आहे.)

गवि 22/12/2010 - 12:28
भाषा आपोआप जपली गेली तर जगते. नियम, सक्ती, कायदे असे काही करुन सोवळ्याचे फडके बांधून लोणच्यागत टिकवली तरी फार काळ तग धरेल असे नाही. लवचिक भाषा जगतात. बाहेरच्यांना अजिबात प्रवेश न देणार्‍या. शब्दांची जराही मोडतोड न होऊ देणार्‍या कडक नियमवाल्या भाषा काळाच्या धुरळ्यात गडप होतात. किंवा फक्त म्यूझियम / ऐतिहासिक व्हॅल्यूच्या (ममिफाईड) बनतात. उदा संस्कृत. जे शब्द सहज रुढ होताहेत ते गुलामगिरी, परभाषा वगैरे असे जुने संदर्भ न आणता सामील करुन घ्यावेत हे हिताचे. टिकण्यायोग्य असते ती भाषा टिकतेच. मराठीचे तरी काय?: अगदी पहिले सापडलेले मराठी वाक्यः "चामुंडरायै सुत्ताले करवियले. श्री गंगरायै सुत्ताले करवियले" नंतर बखरींमधे.. "जैसे भडबुन्जे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहला.." या भाषेपेक्षा तुम्ही आम्ही बोलतोय ती (या लेखाची आणि प्रतिक्रियांची धरुन) मराठी भाषा यांत लिपी सोडून काय साम्य आहे? त्यावेळची मराठी संपली. पण आता वेगळे रुप जिवंत आहे.

तिमा 22/12/2010 - 12:51
चीनचे एवढे कौतुक नको. काही वर्षांनी आपल्या इथे पण सगळ्या पाट्या चायनीज भाषेतच लागणार आहेत. आणि त्या सक्तीने वाचाव्या पण लागतील.

धाग्याचे जे मूळ कारण आहे "चिनी भाषेची प्युरिटी राखण्यासाठी त्या सरकारने उचललेले पाऊल...", त्याविषयी मत व्यक्त करीत आहे. त्या बातमीवरून (तसेच या धाग्यावरून) असे वाटण्याची शक्यता आहे की चीनची इंग्लिश भाषेशी दुश्मनी आहे. पण प्रत्यक्षात तसे नसून तो आदेश काढण्याचे कारण "लिपी" आहे. म्हणजे असे की, चिनी वर्तमानपत्राला आता बातमीत वा लेखात English Word वा Phrase द्यायची असेल तर ती 'चिनी लिपीत' देता येणार नाही. उदा. आपण महाराष्ट्र टाईम्स वा सकाळ या वर्तमानपत्रात असे वाचू शकतो की "वर्ल्ड कप फूटबॉल" साठी आयोजनासाठी भारत उत्सुक. चीनचे वर्तमानपत्रही ही बातमी देणार असेल तर या शीर्षकातील "वर्ल्ड कप फूटबॉल" त्याला 'चिनी लिपी' त देता येणार नाही. हा एवढाच शब्द World Cup Football असा देऊन त्याचा चिनी भाषेत कंसात अनुवाद द्यावा लागेल. चिनी लिपी ही खरे तर चित्रलिपी असल्याने वर्तमानपत्रांना बातमीमध्ये एखादेवेळी इंग्लिश संक्षिप्त रूपे UNO, GDP, WTC, NBA द्यायची असल्यास ते चिनी लिपी वापरत (जसे आपण मराठीत 'युनो, जीडीपी, एनबीए' वापरली असती), त्यामुळे त्या लिपीतील इंग्लिश शॉर्टफॉर्म्सचे अनेकविध अर्थ निघू शकतात (इथे भाषेच्या Purity चा प्रश्न आला होता).....हे त्या सरकारच्या The General Administration of Press and Publication या विभागाच्या लक्षात आल्याने त्यानी "इंग्रजी शब्दांची संक्षिप्त रूपे देऊ नयेत" असा जरी आदेश जरी जारी केला असला तरी त्यात 'If necessary' ची एक पळवाट ठेवली आहेच अन् ती म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे शब्दाचे पूर्ण रूप देऊन त्याचा चिनी भाषेतील अनुवाद कंसात देणे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

आजानुकर्ण 22/12/2010 - 14:06
दुर्दैवाने मराठी आणि हिंदीची लिपी एकच असल्याने विजुभौंना भीती वाटणारे हिंदी शब्द ओळखण्यास अंमळ अडचण येणार आहे.

In reply to by आजानुकर्ण

अडचण येणार नाही असे वाटते. सम मोअर इक्वल शब्द लगेच ओळखता येतील की? जसे की एखाद्याला तू किती बिझी आहेस हे विचारताना मी त्याला "तेरा व्यस्त प्रमाण काय आहे?" असे विचारीन. हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते. "गर्वाने सांगा हम मराठी आहे"

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:24
हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते.
चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो.

In reply to by आजानुकर्ण

चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो. यू सेड इट. वर कोणीतरी हिंदी शब्द मराठीत आल्यामुळे काय बिघडतं असे विचारले होते. तिथे हा चोप्य पस्ते करावा असा विचार करतो आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:55
अहो महाशय, स्वतःला पटणारे सोयीस्कर उदाहरण घेऊन सिद्धता होत नसते. तुम्ही चुकीच्या ठिकाणी हिंदी काय अगदी संस्कृत शब्द घातला तरी तिथे बिघडणारच. याउलट योग्य ठिकाणी हिंदी शब्द चालूनही जाईल. थोडा विचार करा.

In reply to by आजानुकर्ण

नगरीनिरंजन 23/12/2010 - 07:14
तुम्हाला काय म्हणायचंय ते कळतंय. जसे फारसी, अरबी आणि संस्कृत शब्द मराठीत आले तसे काही हिंदी शब्द आले तर काहीच हरकत नाही हे तत्वतः मान्य आहे. परंतु तुम्ही जर आजकाल वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर दिसणारी आणि बर्‍याच लोकांच्या तोंडी असणारी भाषा पाहिलीत तर योग्य तेच हिंदी शब्द मराठीत येत आहेत असे म्हणाल? शिवाय मराठीत आधीच त्या अर्थाचे अनेक शब्द असताना (भले ते पुर्वी इतर भाषेतून आलेले असो) विनाकारण नवीन प्रतिशब्द आयात करून जुने शब्द विस्मरणात घालवायची किंवा त्यांचे अर्थ बदलायची गरज काय? वरती पुपे म्हणाले तसं, "मी व्यस्त आहे", "मला गर्व आहे", "माझी मदत कर"इत्यादी चुकीचे वाक्यप्रयोग आणि प्रेक्षकांसाठी दर्शक असे चुकीचे शब्द आजकाल सर्रास वापरले जातात. इतकाच जर हिंदीचा सोस आहे तर हिंदीच बोलूया ना. कशाला पाहिजे मराठीतरी? ज्याला शब्दांचा पोत, छटा आणि रुप पाहता येते त्याला थोड्या छटेच्या फरकानेही खडा लागल्यासारखे होते. इथे तर ढळढळीत काहीही शब्द वापरले जातात आणि वर भावना पोचल्या म्हणजे झाले ना अशी रंगसफेती केली जाते. जर भावना पोचणेच फक्त महत्त्वाचे असेल तर माकडेही एकमेकात संवाद साधतात त्या आणि इतर भाषांमध्ये फरक काय?

In reply to by इन्द्र्राज पवार

सुनील 22/12/2010 - 20:17
हे जपानी भाषेने ह्यापूर्वीच अंगिकारले आहे. जपानीत मूळ जपानी शब्द हे कांजी ह्या चीनकडून आयात केलेल्या लिपीत लिहिले जातात तर, जपानीबाह्य शब्दांसाठी काताकाना ही लिपी वापरली जाते. सुनील-सान

In reply to by सुनील

पंगा 24/12/2010 - 22:24
सुनील-सान
स्वतःस उल्लेखताना 'सान'प्रत्यय लावण्याची जपानीत प्रथा नसावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

सहज 22/12/2010 - 14:21
चीन ने देश में अख़बारों, पत्र-पत्रिकाओं और वेबसाइटों पर विदेशी शब्दों और विशेष रूप से अंग्रेज़ी के शब्दों का प्रयोग करने पर पाबंदी लगा दी है. मुळ लेखात 'अन्य भाषीक' ऐवजी विदेशी शब्दों और विशेष रूप से अंग्रेज़ी असा स्पष्ट उल्लेख असताना इथे विशेष टिप्पणी करताना, मराठीत हिंदी मग हळुच कन्नड, गुजराथी भाषा व त्या प्रातांचे नियम इ. काढून देशांतगर्त भाषिकांमधेच दुरावा निर्माण करायचा प्रयत्न तर नव्हे? मराठीत इंग्रजी अथवा अन्य विदेशी भाषांबद्दल बोलत असाल तर एकवेळ तो समान धागा असेल. बाकी सध्या महाराष्ट्रात रुळलेल्या मराठीत अन्य भाषेतले (देशी, परदेशी) शब्द बिल्कुल नाहीत असे आपले म्हणणे आहे का? चीन मधे देखील वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी भाषा बोलणारे लोक आहेत. 'कोणतीही भाषा बोला पण जितक्या चांगल्याप्रकारे बोलता / वापरता येईल तितकी बोला / वापरा' हे जगातल्या कोणत्याही भाषा बोलणार्‍याला तत्वता पटेल असेच आहे. चीन मधील दोन प्रांतांच्या सीमावर्ती भागात, तसेच मोठ्या शहरात रहाणारे लोक चीन मधे बोलल्या जाणार्‍या अन्य भाषेतले शब्द वापरत नाहीत असे आपले ठाम म्हणणे व वस्तुस्थिती आहे काय? खरे तर मराठी भाषा बोलणार्‍यांनी हिंदीच्या वाटेला जाउ नये असे कोणत्याही हिंदीभाषकाला मनापासून वाटेल :-) तुमने कभी अस्सल मराठी मानुस हिंदी बोल्तेहूए ऐक्या है क्या? वो एक कणेकर लेखक करके है एकजन, उनकी लिही हुवी वाक्ये वाचो कभी| तरी मराठीला धोका हिंदीपासुन वगैरे वक्तव्ये खोडसाळ वाटतात. भारतात ज्या प्रांतात आपण रहातो तेथील भाषा, हिंदी व इंग्रजी भाषा (अगदी क्वचित प्रसंगी सरमिसळ, संभाषण कळावे म्हणुन ) वापरुन संभाषण करण्यात, सरकारी काम करण्यात कोणाला कसली अडचण नसावी.

In reply to by सहज

विजुभाऊ 22/12/2010 - 14:43
भारतात ज्या प्रांतात आपण रहातो तेथील भाषा, हिंदी व इंग्रजी भाषा (अगदी क्वचित प्रसंगी सरमिसळ, संभाषण कळावे म्हणुन ) वापरुन संभाषण करण्यात, सरकारी काम करण्यात कोणाला कसली अडचण नसावी. राज ठाकरे देखील हेच म्हणतात. पण आपले थोर सबसे तेज चॅनेलचे रीपोर्टर्स महाराष्ट्राच्या मुख्यमन्त्र्यानासुद्धा हिन्दीत बोला असे सांगतात तेंव्हा त्या माजुर्डेपणाला काय म्हणायचे? पुण्यात राहूनही मराठी न येता माझे काही अडत नाही असे अभिमानाने म्हणणारे हिन्दीभाषीक मराठी भाषेला कमी लेखतात . त्याना तुम्ही ही वाक्ये का नाही समजून सांगत? वर पुन्हा हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे . ती सर्वानी बोलायलाच हवी असा वृथा तोरा मिरवतात. मी मराठी बोलणारच नाही . मला कळावे म्हणून तुम्हीच हिन्दीत बोला हा अट्टाहास कशाला? आमच्या देशात्/प्रान्तात यायचे इथेच जगायचे पैसे मिळवायचे आणि वर आम्हालाच शहाणपण शिकवायचे हा माजुर्डेपणा मराठी माणसाने कशासाठी सहन करायचा. मराठी माणसाने या बाबतीत तमीळ लोकांचा आदर्श समोर ठेवावा.

In reply to by विजुभाऊ

सहज 22/12/2010 - 15:03
माजुर्डेपणाला सडेतोड उत्तर द्यायला मराठी माणसाचे हात कोणी बांधले नाहीत. की अश्या माजुर्डेपणाचे समर्थन कोणीच करणार नाही. बाकी चीनने इंग्रजी भाषा की अन्य चीनी बोली भाषेबाबत फतवा काढला आहे ते लिहले नाहीत. 'मराठीवर अन्य भाषांचे आक्रमण' हा एक न संपणारा विषय वाटतो आहे.

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:21
महाराष्ट्रातील मराठी लोक मराठी बोलत नाहीत, मराठी चित्रपट पाहत नाहीत, मराठी लिहीत नाहीत याला उत्तरेकडच्या वाहिन्या किंवा उत्तरेतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले हिंदीभाषक जबाबदार कसे काय असतील. मराठी लोकांनी मराठीत बोलू नये म्हणून त्यांनी तोंडे धरून ठेवली आहेत का? हिंदी वाहिनीने हिंदीत बोला असे मुख्यमंत्र्यांना सांगणे हे त्या वाहिनीचे काम असावे. (हिंदी वाहिनीचा प्रेक्षकवर्ग हिंदी जाणणारा असतो) पण मुख्यमंत्र्यांनी मराठीतच उत्तर द्यायला काय हरकत आहे. मराठीत न बोलण्याचा दोष मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाच आहे.

विजुभाऊ 22/12/2010 - 14:34
तरी मराठीला धोका हिंदीपासुन वगैरे वक्तव्ये खोडसाळ वाटतात. हिन्दी भाषेने बर्‍याच भाषा गिळंकृत केल्या आहेत. राजस्थानी ही भाषा पूर्वी हिन्दीची पोटभाषा मानली गेली. पण आता तर त्या भाषेचा अस्त होऊ लागलाय. तीच गत हरयाणवी ची , मैथीली अंगीका या भाषांची. मराठीवर हिंदीचे हळूहळू आक्रमण होतच आहे. वर्तमानपत्रातल्या /टीव्हीवरील जहीरातीतील भाषा पहा// तुम्हाला जाणवेल मराठी सीरीयल्स मधील पात्रे चुकीचे ( हिन्दी धाटणीचे ) शब्द प्रयोग करू लागलीत. उदा :मला मदत करशील हे वाक्य ( मेरी मदद करोगे?) या प्रमणे माझी मदत करशील असे बोलतात. "गर्व " या शब्दाबद्दल अगोदरच लिहीले आहे. " सकाल प्रहर पासून एकसारख्या ताजगी साठी " अशी जहीरात करणार्‍याला मराठीत सकाळ हा शब्द आहे आणि त्यासाठी प्रहर हा शब्द वापरावा लागत नाही. " ताजगी " या ऐवजी "उत्साह , ताजेपणा" हे शब्द आहेत हे माहीत नाही. लोक तेच चालवून घेतात आणि हळूहळू चुकीचे शब्द बरोबर आहेत असे लोकाना वाटू लागते. ही वस्तुस्थिती आहे त्यात खोडसाळ पणा काय झाला. मराठीला मराठीचे हिन्दीकरण होण्याचा धोका आहेच. भाषा जगली संस्कृती जगली. भाषा संपली संस्कृती संपली

In reply to by विजुभाऊ

सुहास.. 22/12/2010 - 17:47
राजस्थानी ही भाषा पूर्वी हिन्दीची पोटभाषा मानली गेली. पण आता तर त्या भाषेचा अस्त होऊ लागलाय. तीच गत हरयाणवी ची मैथीली अंगीका या भाषांची. हम्म ! आता कस ? विजुभाऊंशी १००% सहमत !

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 22/12/2010 - 17:53
" सकाल प्रहर पासून एकसारख्या ताजगी साठी " अशी जहीरात करणार्‍याला मराठीत सकाळ हा शब्द आहे आणि त्यासाठी प्रहर हा शब्द वापरावा लागत नाही. " ताजगी " या ऐवजी "उत्साह , ताजेपणा" हे शब्द आहेत हे माहीत नाही. लोक तेच चालवून घेतात आणि हळूहळू चुकीचे शब्द बरोबर आहेत असे लोकाना वाटू लागते.
श्री. विजुभाऊ तुमची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. पण हा मुद्दा शेवटी प्रमाणलेखनाशीच निगडित आहे ना. हळूहळू चुकीचे शब्द बरोबर वाटण्याचा प्रकार अशुद्ध शब्दांनीही होणारच ना. तुम्ही 'सकाळ' या शब्दाचा 'सकाल' असा उच्चार चुकीचा असल्याचे लिहिले आहे. पण 'नलाच्या बाजूच्या तलातल्या खोलीतल्यांचे' उच्चार असेच असणार ना. मग मी शुद्धलेखनाचा मुद्दा काढला तो चुकीचा कसा काय?

In reply to by आजानुकर्ण

सुहास.. 22/12/2010 - 18:06
आजानुकर्णजी बोलीभाषेत आणि लेखी भाषेत बरीचशी गल्लत होते आहे आपली असे वाटते आहे बाकी चालु द्या

In reply to by सुहास..

आजानुकर्ण 22/12/2010 - 18:08
हो पण विजुभाऊंचा हा चर्चाप्रस्ताव हा 'लेख'च आहे ना. मी चर्चाप्रस्तावाच्या लेखी भाषेबाबतच माझा मुद्दा मांडला होता. विजुभाऊंनी पॉडकास्टवर ही चर्चा उपलब्ध करून दिली असेल तर सपशेल माफी मागतो.

In reply to by आजानुकर्ण

सुहास.. 22/12/2010 - 18:18
आपण त्याच्यां भावनांना समजायचे होते, आपण तर त्यांच्या भावनेला आपले समजायला लागलो आहे . ;) असो

In reply to by सुहास..

पंगा 24/12/2010 - 12:42
आपण त्याच्यां भावनांना समजायचे होते
साफ चूक! 'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'!

In reply to by पंगा

सुहास.. 24/12/2010 - 20:49
साफ चूक! 'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'! >>> पंगोपंत !! त्याच करिता मुद्दामुन टाकले होते. पण चिकित्सकांनी भ्रमनिरास केले मला. ;)

"....भाषा जगली संस्कृती जगली. भाषा संपली संस्कृती संपली...." वरील वाक्यातील भावार्थ जसाचा तसा घेऊनही मी असे म्हणतो की, इतकी शेणगोळ्यासम लेचीपेची मराठी संस्कृती आहे का, की भाषेत (देशातीलच) दुसरी भाषा, व्यवहाराकरीता, आली म्हणून तिला उर्ध्व लागावा? भाषा हे सुशिक्षित तसेच अशिक्षित माणसांमधील संवादाचे माध्यम आहे (लिपीचा इथे विचार करीत नाही) तर विविध ढंगी भाषांचे महत्त्व भारतासारख्या बहुभाषी देशात विशेषच आहे. घटनेने देशात कुणालाही कुठेही प्रवासासाठी, रोजीरोटीसाठी मुभा दिली असल्याने त्या त्या प्रांतातील भाषेचे अनेकविध कंगोरे आपल्या भाषेत अवतरणारच, पण त्यामुळे आपली भाषा "भ्रष्ट" झाली असे मानण्याचे काही कारण नसते. मराठी भाषेचा अभिमान बाळगणार्‍या व्यक्तीच्या मुलीला "डॉक्टर" जावई सांगून आला तर तो आपल्या पाहुणे-परिवारात "माधवीच्या लग्नासाठी वैद्य मुलगा आलाय" असे सांगेल का? तिथे मात्र अभिमानाने "डॉक्टर" असे इंग्रजी नामच वापरण्याची ती व्यक्ती काळजी घेईल. असे शब्द आणि ते ज्यातून येतात त्या भाषा म्हणजे संस्कृतीचाच एक पूल असतो. इंग्रजीचे स्थान जसं भारत भ्रमणात महत्वाचे ठरते तद्वतच माझ्यासारख्या पक्क्या मराठी नागरिकाला पोटासाठी पंजाब वा हरियाणा इथे जावे लागते त्यावेळी 'हिंदी' चा (भले कितीही मोडकातोडका का असेना) आधार घ्यावाच लागतो. या दोन्ही प्रांतातील (शीख आणि जाट) व्यावसायिक बंधू माझे कोल्हापुरी हिंदी ऐकून ("मेरे पीठको घाम आयाला है"...पद्धतीचे) बेशुद्ध पडलेले नाहीत किंवा "ओये पुत्तर पंजाबी सिख लेना जल्दी जल्दी....!" अशी प्रेमळ धमकीदेखील देत नाहीत. अमृतसर, गुरुदासपूर, लुधियाना, फिरोझपूर, बर्नाला आदी मेट्रो शहरे तर सोडाच पण अगदी आतील ग्रामीण भागातदेखील हिंदी भाषा बोलून कुणी व्यवहार करीत आहे हे पाहून गावकर्‍याची भुवई वक्र होत नाही...किंबहुना रोहटक आणि अंबाला या दोन हरियाणवी जिल्ह्यात तर परक्या व्यक्तीने (इथे मी...) बोललेले हिंदी कळत नसले तरी तो दुकानदार्/कंडक्टर्/बॅन्क कर्मचारी थोडावेळ थांबून समजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करतोच करतो....अशावेळी त्यांच्या मूळच्या भाषेचा तिथे काही अवमान होत आहे असे त्याला वाटत नाही. "महाराष्ट्रातून चार लोक येऊन पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर घाला घालत आहेत..." अशी समजूत तिथे कुठे रुजल्याचे मला आजअखेर आढळलेले नाही. 'भाषेच्या अस्मितेचा प्रश्न' हे मनसेच्या राजकारणातील अस्तित्वासाठी एक प्रभावी शस्त्र आहे....त्याचा संबंध आपण भाषावृद्धी आणि संस्कृती यांच्याशी जोडू नये. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

गांधीवादी 22/12/2010 - 15:56
अति अति अवांतर : आताच एक मित्राबोबर ह्या विषयी चर्चा करीत होतो, त्या पट्ठ्याने एक नवीनच माहिती दिली. Sentence of the year : बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिहारी जनतेने विकासाला जो अभूतपूर्व कौल दिला, त्याला खरे कारणीभूत कोण ? त्यांची निद्रावस्थेत गेलेली अस्मिता जागृत करण्याचे कार्य केले ते 'राज ठाकरे' यांनी.

In reply to by इन्द्र्राज पवार

धमाल मुलगा 22/12/2010 - 16:01
"महाराष्ट्रातून चार लोक येऊन पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर घाला घालत आहेत..." अशी समजूत तिथे कुठे रुजल्याचे मला आजअखेर आढळलेले नाही.
बिहारींबद्दल काय समजूत आहे तिथे?

In reply to by धमाल मुलगा

श्री.धमु.... पंजाब असो वा हरियाणा, या दोन्ही प्रांतांची देशभर ओळख आहे ती मुख्यत्वे करून शेतीउद्योगाशी आणि काही प्रमाणात कारखानदारीच्या क्षेत्रातील त्यांची भरारी. इथे २४ तास राबणारा शेतकरी जसा दिसतो (जो गव्हाच्या रूपाने सोन्याची पैदास करतो असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही) तसाच लुधियानाच्या घराघरातून चाललेले कारखानदारीशी संबंधित कुटिरोद्योग पाहिले तर अन्य प्रांतियांनासुध्दा तिथे "नोकरी" निमित्ताने येण्याची गरज वाटावी. पण आलेच (आणि तसे बिहारी आले असले तरी का कोण जाणे पंजाबी लोक त्याना 'परके' मानत नाहीत....किंबहुना त्याला काही ऐतिहासिक कारणदेखील असू शकेल) तर ते इथल्या मातीत असे मिसळून गेलेले आहेत की, आपल्यासारख्या महाराष्ट्रीयानास असेच वाटेल की ते मुळचेच इथले आहेत. भाषा-वेषभूषा-खाण्याच्या पद्धती-राहणीमान, सणवार अगदी त्या मातीतीलच. (हे महाराष्ट्रात आलेले बिहारीदेखील करीत असतील तर वादाचा मुद्दाच राहणार नाही). पण असे आहे म्हणून त्यांच्यापेक्षाही घाम गाळून काम करतात ते स्थानिक लोक. बाहेरच्यांची गरज भासणार नाही अशी जबरदस्त वातावरण निर्मिती शीख आणि हरियाणवी युवक-युवतीच काय पण प्रौढानीसुद्धा (स्त्री-पुरुष) निर्माण केली आहे; पण म्हणून जे आले आहेत त्याबद्दल (मला तरी) कुठे असंतोष खदखदत आहे असे दिसलेले नाही (अर्थात माझी झाडाझडती फक्त दोन-तीन जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे, हेही इथे नमूद करणे आवश्यक आहे). सतत कामात असतात हे लोक, शिवाय अमुक एक काम 'हलके' वा 'माझे नव्हे' अशीही भावना कुठे दिसत नाही. माझ्यासमोर ट्रॅक्टर चालविणारा कदाचित त्या गावातील लखपती आणि मुखियादेखील असू शकतो, पण पेहेरावावरून तो आपल्याकडील रामा-शिवा-तुक्या सारखाच दिसतो.....खाण्यातही बिलकुल नखरे नसतात. दालरोटी तसेच चनाभटोरा, लस्सीचा ग्लास समोर आले की गडी खुश ! त्यामुळे परिस्थिती अशी आहे की; अशा मेहनतीच्या/कारागिरीच्या कामासाठी बाहेरचे हवेतच असे चित्र जरी नसले तरी जे बिहारी आता गेली २०-२५ वर्षे झाली त्या दोन राज्यात आहेत त्याना हुसकाविण्यासाठी काही चळवळी दिसत नाहीत (असल्या तर त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे असे म्हणतो). काही बॅन्किंग आणि सरकारी नोकरीनिमित्य येणे झाले म्हणून आले आणि कायमच्या वास्तव्यासाठीदेखील राहिलेले आहेत. माझ्यासारखे काही तुरळक महाराष्ट्रीयन दिसत असले तरी ते कायमच्या वास्तव्यासाठी नसून तेथील काही संस्थांशी भागिदारीचे छोटेमोठे व्यवहार झालेले असतात या कारणासाठीच. या किंवा अशाच कारणामुळे या दोन राज्यातील जनतेला अन्य राज्यातून आलेल्या भय्यांमुळे कसलीही चिंता वाटत नाही असेच चित्र आहे. त्यातही मुंबईसारखेच बिहारी बाबूंना "नवी दिल्ली" चे आकर्षण आहे पण 'अमृतसर' वा 'चंदिगड' चे तितके नाही असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

तर ते इथल्या मातीत असे मिसळून गेलेले आहेत की, आपल्यासारख्या महाराष्ट्रीयानास असेच वाटेल की ते मुळचेच इथले आहेत. भाषा-वेषभूषा-खाण्याच्या पद्धती-राहणीमान, सणवार अगदी त्या मातीतीलच. (हे महाराष्ट्रात आलेले बिहारीदेखील करीत असतील तर वादाचा मुद्दाच राहणार नाही). इंद्रा तुम्हीच कारणही लिहीले आहे. विचार करून बघा. आपल्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातील महानगरांमधे ही परिस्थिती आहे का? ४ मराठी माणसांमधे १ बाहेरचा माणूस असेल तर त्याच्यासाठी सर्वांनी का म्हणून हिंदी बोलावे. आणि हा एकटा असलेला माणूस तुम्ही हिंदीत बोला असे म्हणायला धजावतो हा त्याचा माजुरडे पणा आहे ज्याला आजकाल काही लोक शूरपणा संबोधत असले तरीही. मी अशाप्रकारे समजा ४ इतरभाषिकांच्यात असलो असतो तर त्यांना माझ्यासाठी हिंदीत बोला हे कधीच सांगितले नसते. याचे कारण शारीरीक वा मानसिक दौर्बल्य हे नसून मला त्या लोकांच्या भाषाप्रेमाचीही कदर आहे . आणि असा मोठ्यामनाने वागण्याचा संस्कार माझ्यावर आहे. पण माझ्या शहराची, गावाची व्यवहार भाषा जर बदलत असेल तर तो बदल थांबवणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो . आणि ते सर्वांच्या प्रयत्नातूनच शक्य आहे. त्यासाठी मित्रांचे प्रबोधन करतो. आणि त्यासाठी योग्य तिथे बोलतो, इतर मराठी मित्रांना मराठी बोलताना मदत करतो. ते वापरत असलेल्या हिंदी शब्दाला योग्य तो मराठी शब्द सांगतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

"....पण माझ्या शहराची, गावाची व्यवहार भाषा जर बदलत असेल तर तो बदल थांबवणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो...." श्री.पु.पे. तुमच्या या मताचा मी नि:संशय आदर करतो इतके ते निखळ आहे. मी पाहिलेल्या (तसेच काम करीत असलेल्या काही) राज्यातील परिस्थिती मात्र अशी आहे की, त्या राज्याचे कायमचे रहिवासी झालेल्या बिहारी लोकांनी जशी स्थानिक बोलीभाषा आत्मसात केली आहे तद्वतच जर ते एखाद्या वेळी एखाद्या 'सिंग' बरोबर संवाद साधताना हिंदीचा आसरा घेत असतील तर ते सिंग याना खटकत नाही (नसावे....तसे पाहिल्यास शीख समाजालाही पंजाबीइतकीच उर्दु आणि हिंदी प्रिय आहे, हेदेखील कारण असू शकेल.). आत्ता लुधियाना (पॉवरफुल इंडस्ट्रियल बेल्ट) शहरात आणि तालुका पातळीवर मात्र अलिकडे निर्माण झालेल्या अशांततेच्या वातावरणामुळे छोट्यामोठ्या संघटना बांधून राहण्याची हे बिहारी बाबू दक्षता घेत आहेत आणि हिंदीशिवाय संवाद करीत नाहीत. (त्यासाठी नकळत वा छुप्या मार्गाने का होईना बिहार सरकारचादेखील पाठिंबा आहे). याला प्रत्युत्तर म्हणून लुधियानामधे शिखांच्या संघटनांनी आता हात सरसावले आहेत. (अर्थात ही परिस्थिती फक्त लुधियानामध्ये असल्याने पंजाबच्या अन्य जिल्ह्यात अजून परराज्यातील मायग्रंट्समध्ये भीतीसम वातावरण नाही.) मात्र महाराष्ट्रातच हे बिहारी (संघटनेच्या जोरावर) उर्मटपणे 'हिंदी' भाषेतूनच आपले व्यवहार करीत असल्याचे दिसत असल्याने त्यावर 'मनसे' चे जे काही उपाय असतीत ते असो, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निदान पहिली पायरी म्हणून का होईना मराठी लोकानीच रोजच्या व्यवहारात त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आलाच तर जाणीवपूर्वक मराठीचाच पाठपुरावा करणे हा एक सरळमार्गी आणि प्रभावी उपाय होऊ शकेल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सुहास.. 22/12/2010 - 19:20
महाराष्ट्रातच हे बिहारी (संघटनेच्या जोरावर) उर्मटपणे 'हिंदी' भाषेतूनच आपले व्यवहार करीत असल्याचे दिसत असल्याने त्यावर 'मनसे' चे जे काही उपाय असतीत ते असो, >>> धन्यवाद ! विषय संपला ! कुत्सीत हास्य >> मागची पिढी संपले.

In reply to by इन्द्र्राज पवार

पैसा 22/12/2010 - 20:34
८/१० दिवसांपूर्वीची गोष्ट. मी चष्मा घ्यायला बँकेच्या खालीच भर पणजी बाजारात एका दुकानात गेले, आणि "मातसो चष्मो दाखय मरे" म्हणून दुकानदाराला सांगितले. पठ्ठ्या मला म्हणतो," वो सब मुझे आता नहीं"म्हणजे 'कोकणी' हा शब्द सुद्धा तोंडातून काढायची तयारी नाही. तुम्ही कुठले म्हणून विचारताच "बिहार से" म्हणून उत्तर आलं. गोव्यातले लोक मराठी लोकांपेक्षा गरीब स्वभावाचे. त्यानी रस्त्यात दिसलेल्या कोणाही नवीन लोकांबरोबर निमूट राष्ट्रभाषेत बोलायला सुरुवात केलीय हल्ली!

In reply to by पैसा

चिंतामणी 25/12/2010 - 00:04
शक्यता नाकारता येत नाही. (मी एव्हढेच लिहून थांबणार नाही.) हा कोकण रेल्वेचा एक तोटा आहे असे म्हणावेसे वाटते. या कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशनवर केटरींग कॉन्ट्राक्टर बिहारीच असतो आणि काम करणारे सुद्धा. कोकण रेल्वेमुळे कोकण आणि गोवावासियांना प्रवास सोपा झाला एव्हढाच फायदा झाला असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

In reply to by इन्द्र्राज पवार

तुमचे सद्यपरिस्थितीचे वर्णन कदाचित बरोबर असेल. परंतु खलिस्तान चळवळ नक्की काय होती? तेव्हा पंजाब व्यतिरिक्त अन्य भारताबाबत शत्रुत्व नव्हते काय? नक्कीच होते. पंजाबमधील शीखांना हरयाणा, राजस्थान आणि त्याहीपेक्षा जास्त युपी, बिहार, बंगाल हे आपली लुबाडणुक करतात असेच वाटत होते. पंजाब चळवळीच्या सुरुवातीच्या काळात तरी शीखांवर भावनिक्-सांस्कृतीक-धार्मिक अतिक्रमण होते आहे, लुबाडणुक होते आहे ही भावना नक्कीच होती. जसजसा त्या चळवळीचा जोर ओसरला तसतशी ती भावना कमी होत गेली असेलही कदाचित. दुसरे म्हणजे पंजाबमधे मराठी माणसांकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाबाबतचा मुद्दा. मराठी माणसांकडे पंजाबी, काश्मिरी किंवा आसामी जनता शत्रुत्वाने पहात नाही हे खरेच आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या राज्यांमधे फुटिरतावादी वृत्ती जोर धरत होती तेव्हा महाराष्ट्रातील (आणि केवळ महाराष्ट्रातील) लोकांनी त्यांच्याबरोबर समान पातळीवर भावनिक नाते स्थापन करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केले. तुम्ही आणि आम्ही एकाच देशाचे भाग आहोत, आपले प्रश्न समान आहेत. बिहार, बंगाल सारख्या राज्यांची परिस्थिती वेगळी असली तरीही ती या देशाचेच भाग आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना समजावुन घेणे भाग आहे असा विचार या राज्यांत जाऊन तेव्हा केवळ मराठी माणसांनी दाखवला. याच संबंधांमुळे या राज्यांमधील माणसांचे महाराष्ट्राशी वेगळे भावनिक नाते आहे. दुर्दैवाने गेल्या दोन दशकात महाराष्ट्रातीलच परिस्थिती बदलत गेली आणि तेव्हा पंजाब, आसाममधील अनेक लोक करत तसा विचार मराठी माणसेही करु लागली. तरीही महाराष्ट्रात पंजाब, हरयाणाबद्दल संताप नाही. पंजाबी, हरयाणवीबद्दल राग देखील नाही. इथे लोकांमधे संताप आहे तो केवळ युपी, बिहार आणि हिंदीबाबतच.

In reply to by प्रसन्न केसकर

सुहास.. 23/12/2010 - 15:56
महाराष्ट्रात पंजाब, हरयाणाबद्दल संताप नाही. पंजाबी, हरयाणवीबद्दल राग देखील नाही. इथे लोकांमधे संताप आहे तो केवळ युपी, बिहार आणि हिंदीबाबतच. >>> एकदम सहमत. उगाच नाशकात एकदम चार सिटं लागली ..पब्लीक कुठल्या बाजुला वळतय हे देखील समजत नाही काही लोकांना... म्हणतात ना डोळे मिटुन...

In reply to by प्रसन्न केसकर

श्री.प्रसन्न जी... थोडा सविस्तर खुलासा करणे क्रमप्राप्त आहे. 'खलिस्तान' चळवळीच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास एक गोष्ट प्रखरपणे समोर येते की, देशाच्या स्वातंत्र्याची पहाट अगदी दोन-तीन आठवड्यावर आली होती आणि ज्यावेळी सिरिल रॅडक्लिफ ब्रिटिश-इंडियातील अवाढव्य अशा पंजाबच्या फाळणीचा नकाशा तयार करण्यात मग्न होते; त्यावेळीही जवळपास सर्वच शीख आणि त्याप्रांतात बहुसंख्येने असणार्‍या हिंदुना (अखंड पंजाबात हिंदू टक्केवारीने जास्त होते) असे वाटत होते की 'लाहोर' सह एकच पंजाब तयार होईल....लाहोर हे त्या काळातही पूर्णपणे 'मुस्लिम डॉमिनेटिंग सिटी' नव्हते आणि आजही तिथे उर्दु आणि पंजाबी भाषा गुण्यागोविंदाने नांदतात. पण फाळणी झाली आणि पुढे हिंसेचे जे काही रामायण घडले तीत फटका बसला होता तो प्रामुख्याने शिखांना (या विषयात जास्त खोल जात नाही). त्यामुळे झाले असे की, अगदी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी असो वा अकाल तख्त, यांच्यात 'आता जो काही पंजाब राहिला आहे तो हिंदू आणि मुस्लिम यांच्याशिवाय टिकविला पाहिजे' हा विचार बळावला आणि अगदी 'भारतीय प्रजासत्ताक घटना समितीने' तयार केलेल्या पहिल्या खर्ड्यात शीख प्रतिनिधीने त्यावेळी (सन १९४९) लेखी स्वरूपात त्यातील तरतुदीविषयी समस्त शीख समुदायाच्यावतीने विरोध दाखल केला होता. घटनेच्या त्या खर्ड्यानुसार घटक राज्यातील शीख, जैन आणि बुद्ध धर्मीयांना 'हिंदू' असेच ओळखले जाईल अशी तरतुद होती. म्हणजे अल्पसंख्य जैन आणि बुद्धांना त्याबद्दल तक्रार नसली तरी शीख 'ते' लेबल मान्य करतील अशी परिस्थिती नव्हती आणि पुढे तर ज्यावेळी फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पंजाबमधुन हिंदूंचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांना वेगळे करून अनुक्रमे हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाची निर्मिती झाली त्यावेळी तर राहिलेल्या 'पंजाब' चे स्वतंत्रच अस्तित्व का असू नये असे शिखांतील जहाल गटाला वाटू लागले आणि तिथून सुरू झाली ती 'खलिस्तान' चळवळ; जिला अकाली तख्ताचे आशीर्वाद होतेच पण अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या धनवान शीखांचे आर्थिक पाठबळ लाभले; त्यासाठी वा त्या दरम्यान तिथे जाऊन जगजितसिंग चौहानाने केलेल्या प्रभावी भाषणबाजीचाही हातभार लाभला. अगदी 'खलिस्तान'चे स्वतंत्र चलन आणि झेंडादेखील तयार करण्यापर्यंत त्या चळवळीने मजल मारली होती....पुढे भिन्द्रनवाले यांचा उदय आणि अंत, रक्तरंजीत इतिहास, ऑपरेशन ब्ल्यू स्टार...इंदिराजींची हत्या....या ठळक घडामोडी तर सर्वांनाच माहिती आहेत. सांगायचा मुद्दा असा की, पंजाबचे 'त्या' अर्थाने भारतातील अन्य राज्यांशी शत्रुत्व नव्हते...(म्हणजे युपी, बिहार, बंगाल आदी राजे हे आपली लुबाडणूक करतात असे वाटणे). त्यांची - खलिस्तानची - चळवळ ही 'स्वतंत्र अस्तित्व' यासाठीच होती आणि या घडीला ती अत्यंत क्षीण जरी झाली असली तरी ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे असे नवी दिल्लीदेखील मानत नाही. पण एक आहे की कोणत्याही अनुकुल्/प्रतिकुल परिस्थितीत पंजाबने आपली 'कष्टकरी' ही प्रतिमा डागाळून घेतलेली नाही. अगदी भिन्द्रनवाले यांच्या 'टेरर' काळातदेखील पंजाबात उत्पादन झालेला गहू सार्‍या देशाला पुरत होता. तीच गोष्ट लुधियाना बेल्टची, जिथे तंत्रज्ञानाशी निगडीत व्यापारउदीम फोफावला आहे....आणि इथे मात्र बिहारी अन्य राज्यांतील नागरिकांपेक्षा मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. (त्यामुळे त्या जिल्ह्यात दोन गटात होऊ घातलेल्या झगड्याविषयी चर्चा झालेलीच आहे, त्याची द्विरूक्ती इथे करत नाही). तुम्ही प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे 'मराठी' माणसाबद्दल तेथील हवेत भावनिक नाते आहेच आहे. महाराष्ट्रातून आलेली व्यक्ती ही त्याना 'आपली' का वाटते याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी गेल्या दोन वर्षातील तिथल्या भेटीदरम्यान घेतला असता असे आढळते की, एकतर 'शिवाजी' हे नाव पंजाबला अगदी देवासम वाटते (एक गंमतीची गोष्ट सांगतो : गुरुदासपूरमध्ये तर महाराजांची दाढी आणि जिरेटोप यांचे पंजाब्यांना आदरमिश्रीत कौतुक वाटते, इतके की त्या पेहरावामुळे ते त्याना आपल्यातीलच एक वाटतात, इतकेच नव्हे तर महाराजांप्रमाणे आताचा मराठा समाज दाढी का राखत नाही याचेही कुतहूल वाटतेच)....कारण अर्थातच शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला दिलेली यशस्वी टक्कर, शिवाय मुघलांचा खर्‍या अर्थाने अखेरचा सम्राट 'औरंगजेबा' चा मृत्यु झाला तो त्याच्या दख्खन स्वारीत, महाराष्ट्रातच. सैन्यातही शीख आणि मराठा रेजिमेंटस यांनी लढवय्ये म्हणूनच ओळखले जात असल्याने आर्मीत दोन्ही जमाती अगदी बंधूसम वागताना दिसतात. या बाबी पंजाबच्या इतिहासाला आवर्जुन नोंदाव्याशा वाटल्या आहेत. शिवाय फाळणीनंतर "मुंबई" ने शीखांना जी जवळीक दिली (जो आजही आहे) त्याचाही कुठे ना कुठे तरी संबंध आहे. त्यामुळेच असेल कदाचित मला (एक मराठा या नात्याने) त्या भागात कधीही परके वाटलेले नाही, किंबहुना तेथील स्थानिकांनी तसे कधीही जाणवूनही दिलेले नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

मी जे लिहिले होते ते ८०च्या दशकात मी जे अनुभवले, पाहिले आणि त्यानंतरही माझे शीख समाजाशी जे संबंध राहिले त्यावर आधारित होते. पाकिस्तान निर्मिती, पंजाबची फाळणी आणि भारतातील खलिस्तान चळवळीचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. (कॅनडामधे तसा तो लावला गेला पण तो फक्त अनेक युद्धे केलेल्या पाकिस्तानशी हातमिळवणी करण्याचे समर्थन होते.) हा इतिहास भिंद्रावाले यांनी कधीही सांगीतलेला नाही किंवा त्यांच्या आधिच्या निहंग नेत्यांनीही सांगीतलेला नाही. हरयाणाचा संदर्भ होता तो अबोहर-फाजिल्का, चंदीगढ पुरताच. तेथेही स्वातंत्योत्तर भारतातील आर्थिक विषमता हाच भाग मोठ्या प्रमाणात होता. सैन्याबाबत व अन्य दलांबाबत बोलायचे तर तेथे असंतोष होताच आणि ऑपरेशन ब्ल्यु स्टार नंतर तो अधिकच वाढला. याचे अनेक दाखले आहेत. ते देण्यासाठी ही योग्य जागा आहे असे मला वाटत नाही. सिव्हिलियन्समधे सध्या जी शीख-मराठी जवळिक दिसते ती ८० च्या दशकात महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकारामुळेच. आणि या जवळिकीबाबत सर्वाधिक समानत्व दिसते ते संत नामदेवांमुळे आणि गुरु गोविंदसिंहांमुळे.

In reply to by प्रसन्न केसकर

".....ते देण्यासाठी ही योग्य जागा आहे असे मला वाटत नाही....." ~ त्या दाखल्यांच्या निमित्ताने खूप चांगली चर्चा करता आली असती त्या विषयावर....पण तुम्ही म्हणता तसे "ही योग्य जागा आहे..." असे मलाही वाटत नाही. [सध्याच्या मिपावरील हवेत तर ते शक्यच नाही.] थॅन्क्स इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

धमाल मुलगा 22/12/2010 - 18:19
:) पंजाबात असाल तर ऊसतोडणी कामगार आणि अचानक वाढलेले गुन्हे ह्या दोन गोष्टींबद्दल अंमळ चौकशी करा. :) असो. आणि भौ, ते 'श्री.धमु' वगैरे नेऊन घाल तिच्यायला बारा गडगड्याच्या विहिरीत्त! च्यायला, झिरमिळ्यांची पगडी घालुन करवतकाठी उपरण्याच्या घड्यांशी खेळत उगाच शब्द चावत वाद घालायला उपक्रमावर जाऊन बसल्यागत वाटतं राव. :)

In reply to by धमाल मुलगा

क्रमांक १ ~ नक्कीच शोध घेतो....पण तरीही मी तिथे व्यवसायासाठी ये-जा करतो म्हणजे पूर्ण पंजाब प्रांतात माझी भटकंती असते असा अर्थ होत नाही. दोन जिल्ह्यात असतो, त्याशिवाय रोहटक या हरियाणाच्या आणखीन एका शहरात. तरीही विदा मिळविण्यास काही अडचण येईल असे वाटत नाही....मित्रपरिवार भरपूर आहे त्या भागात. क्रमांक २ ~ च्यामारी....ही बारा गडगड्याची विहीर (आणि हाळभावी) आमचे प्रिय लेखक जी.ए.कुलकर्णी यांची कॉपीराईट मालमत्ता असताना तुम्ही कशी काय वापरू शकता???? बाकी "झिरमिळ्यांची पगडी घालुन करवतकाठी उपरण्याच्या घड्यांशी"....वाचून अंमळ मोहन आगाशे आठवले...!! इन्द्रा

विजुभाऊ 22/12/2010 - 17:37
बीहारींबद्दल तिकडे ही अवस्था आहे http://www.bihartodayonline.com/2007/11/punjab-now-land-of-bihari-sardars.html आणि ही देखील आहे http://www.ambedkar.org/News/hl/Biharigirls.htm सर्वात महत्वाचे म्हणजे बीहारी लोकांच्या पंजाबमध्ये येण्याबद्दल पंजाबमध्ये असंतोषच आहे http://www.sikhsiyasat.net/2009/12/06/bihar-asked-punjab-to-explain-the-sitation-over-security-of-bihari-labour-in-punjab/ त्या बातमीतला हा मजकूर काय सांगतो It is notable that the Bihari migrating labour created much disturbance in Ludhiana and burned several vehicles and robbed the general public. आणि हा The intentions of the Indian state are clear now. They want to uproot Sikhs from Punjab and in-root Biharis here.” said Bhai Harpal Singh Cheema, a Sikh leader. “It is strange that Bihar Government is demanding security for those who created panic in the city without any reason” said a local resident. “The situation was such that locals felt insecure” he added while explaining the situation created by Biharis in the industrial city of the state. एकूण काय एक बिहारी सौ बीमारी आम्ही फक्त हरी हरी हरी हरी

In reply to by विनायक प्रभू

मेघवेडा 22/12/2010 - 18:02
आपल्या सिद्धांताचा व्यत्यास खरा असू शकतो असं वाटतं गुर्जी!

आजानुकर्ण 22/12/2010 - 18:03
विजुभौ एकंदर चर्चा वाचून चतुःसूत्री खालीलप्रमाणे आहे असे मला वाटते. १. मराठी भाषेतील लेखनाबाबत शुद्धलेखन-प्रमाणलेखन यांचे नियम मानणे वेडगळपणाचे आहे. ती जशी लिहीता किंवा बोलता येईल तशी वाकवली पाहिजे व जगवली पाहिजे. २. मात्र त्याचबरोबर मराठी भाषेची शुचिता सांभाळली गेली पाहिजे (!) व परकीय ( विशेषतः हिंदी) शब्दांपासून तिला वाचवणे आवश्यक आहे. ३. मराठी भाषा व संस्कृतीला रसातळाला नेण्यात महाराष्ट्रातील व पंजाबातील बिहारी लोकांचा महत्त्वाचा हात आहे. ४. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीत बोलतात व महाराष्ट्रातील सामान्य जनता आपल्या मुलाबाळांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालते याला उत्तरभारतीय जबाबदार आहेत. मराठी भाषेत याआधीच असलेले पोर्तुगीज, फारसी व इतरभाषिक शब्दांबाबत आपले मत जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by आजानुकर्ण

सन्जोप राव 22/12/2010 - 18:50
माझे कान अद्याप गुडघ्याइतके लांब झाले नाहीत, पक्षी माझा अद्याप आजानुकर्ण झालेला नाही, पक्षी माझी वाढ / उत्क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही. वस्तुस्थिती आहे आक, तुम्ही कशाला रागावता?

सुधीर काळे 22/12/2010 - 22:19
पूर्वी स्वत: लिहिलेल्या लेखांचे संपादन स्वतः करण्याची सोय होती. ती असती तर ही चर्चा अशी फरफटली न जाता मूळ विषयाशी प्रामाणिक राहिली असती. तरी नीलकांत वगैरे संचालकांना नम्र विनंती कीं ही सोय पुनश्च लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आज संपादकवर्गाला विनंती करावी लागते व त्यांच्या कामात उगीचच वाढ होते व त्यामुळे त्यांनी जे काम करायला हवे ते राहून जाते.

धनंजय 22/12/2010 - 22:41
चीनमध्ये अनेक भाषा आहेत. बातमीमधली भाषा कुठली? चीनची राष्ट्रभाषा "प्हूथोंगहुआ" (त्याला "मंत्री"/"मांदारीन" असे इंग्रजी नाव आहे) ती भाषा असावी. म्हणजे भारताने सर्वत्र हिंदी भाषेबद्दल कायदा केले तर जसे होईल तसे. राष्ट्रभाषेची सक्ती करणार्‍या चीनची अभिनंदने कशाला करता - त्यांच्यासारखे आपण व्हावे म्हणून? म्हणजे त्यांच्यासारखी एक राष्ट्रभाषा ठरवून तिची सक्ती सर्वत्र करावी म्हणून? सध्या जितकी मराठी चालते तेसुद्धा सलते की काय या "चीनसारखे-वागू"वाद्यांना? का असे म्हणायचे आहे, की महाराष्ट्र भारतातून फोडा, आणि त्या फुटीर "राष्ट्रा"ची मराठी भाषा आहे, तिने चीनचे अनुकरण करावे? असल्या फुटीरवादाला महाराष्ट्रात सध्या तरी खूप विरोध होईल, आणि माझ्याकडून तर विरोध होईलच. - - - मराठीच्या उत्कर्षासाठी खूप विधायक कार्यक्रम आपण हाती घेऊ शकतो. त्या सगळ्या कार्यक्रमांपैकी हा चीनचा कार्यक्रम मुळीच नको. (मात्र भारतातच जेथवर हिंदी बोलली जाते, त्या ठिकाणी हिंदीच्या उत्कर्षासाठी हा "चीनसारखा" कार्यक्रम राबवला तर काहीच हरकत नाही.) - - - (विजूभाऊंना मराठी सलते, असे मला मुळीच वाटत नाही. पण बातमीतली चिनी भाषा म्हणजे त्यांच्या देशातली हिंदीसदृश भाषा आहे, त्यांची मराठीसदृश भाषा नाही, याबद्दल त्यांचे क्षणिक दुर्लक्ष झाले असेल. या बातमीला त्यांनी कृती-मार्गदर्शक मानू नये. त्याआधी मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांचे जे काय प्रयत्न होते, ते पूर्ववत चालू ठेवावे. अशी विनंती.)

In reply to by धनंजय

आजानुकर्ण 23/12/2010 - 16:17
या बातमीला त्यांनी कृती-मार्गदर्शक मानू नये. त्याआधी मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांचे जे काय प्रयत्न होते, ते पूर्ववत चालू ठेवावे. अशी विनंती.
धनंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत असलो तरी वरील मुद्द्याशी असहमत आहे. विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.

In reply to by आजानुकर्ण

सुप्परमॅन 23/12/2010 - 16:44
विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.
सहमत. लेखातले पोटफोडे ष पाहता नरसिंहावतार धारण करून लेखकाला आडवा मांडीवर घेण्याचा मोह झाला.

विजुभाऊ 23/12/2010 - 10:30
मला एवढेच म्हणायचे आहे की चिनी लोक त्यांच्या भाषेबद्दल जागृत आहेत. त्यांचे कौतूक होते. आपण मराठी लोक मात्र आपल्या भाषेबद्दल एवढे जागृत नसतो. बिहारी हिन्दी वगैरे मुद्दे ...ते लोक त्यांची भाशा आपल्यावर लादतात आणि आपण ते सोशीकपणे स्वीकारतो. मी बंगळूरात अस्खलीत कन्नड बोलनारा बिहारी पानवाला पाहिला. तो केवळ दोन वर्षेच तिथे होता. महाराष्ट्रात राहून बिहारी लोक त्यांच्या भाषेचा आग्रह सोडत नाहीत. वर उर्मटपणे तुम्हीच हिन्दी बोला असा आग्रह धरतात. अशिक्षीत सोडा पण शिकलेले लोक सुद्धा तसाच आग्रह धरतात. पाच मराठी अस्तील आणि एक हिन्दी भाषीक असेल तर तो म्हणतो तुम्ही सारे माझ्याशी हिन्दीत बोला..... आपण त्याच्या सोयीसाठी समजा इंग्रजीत बोललो तर तो मात्र हिन्दी ची कास सोडत नाही. आपण मराठी लोक असा आपल्या भाशेचा आग्रह का चालवत नाही. असा माझा प्रश्न आहे. आहे. बाकी श्री श्री श्री अजानुकर्णजी यांच्या २. मात्र त्याचबरोबर मराठी भाषेची शुचिता सांभाळली गेली पाहिजे (!) व परकीय ( विशेषतः हिंदी) शब्दांपासून तिला वाचवणे आवश्यक आहे. ३. मराठी भाषा व संस्कृतीला रसातळाला नेण्यात महाराष्ट्रातील व पंजाबातील बिहारी लोकांचा महत्त्वाचा हात आहे. या शोधाबद्दल त्याना खास कोणतेतरी जागतीक पारितोषीक दिले पाहिजे. मी शक्यतो वैयक्तीक लिहीत नाही. पण ओढून ताणून त्यानी जे मुद्दे जुळवले आहेत त्याबद्दल त्यांच्या बुद्धीमत्तेची वाखणणी करावी तेवढी थोडीच आहे. पंजाबातील उदाहरण कोणीतरी पंजाबात बिहारींचा प्रॉब्लेम नाही का ? या साठी उत्तर म्हणून दिला. मराठीवर हिन्दी भाषा आक्रमण करीत आहे याला कारण हिन्दी भाषीकांचा हिन्दीच रेटून नेण्याचा अट्टाहास आणि मराठी भाषीकांची मातृभाषेबद्दलची अनासक्ती. या चीन सरकारने जे केले ते मराठी लोकानी का करू नये?

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 23/12/2010 - 10:52
मी शोध लावलेला नाही. चर्चेत जी विविध मते वारंवार आली त्यावरून चार निष्कर्ष मी काढले. ते निष्कर्ष तुम्ही खोडलेले नाहीत. मराठीतील फारसी, पोर्तुगीज वगैरे शब्दांबाबत तुम्ही मत सांगितले नाही. या कोणत्याही मुद्द्यांचे खंडन न करता 'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत हळूच वैयक्तिक बोललात :-)

विजुभाऊ 23/12/2010 - 12:20
'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत हळूच वैयक्तिक बोललात अजानुकर्णजी आपण पुन्हा एकदा माझ्य अवाक्यातील सोयीस्कर शब्द घेतलेत मी लिहीले होते. मी शक्यतो वैयक्तीक लिहीत नाही. शक्यतो हा शब्द तुम्ही सोयीस्करपणे गाळलात. मराठी भाषेत इतर भाषांमधून बरेच शब्द आले आहेत. तसे ते प्रत्येक भाषेत असतात. फारसी कन्नड गुजराती अशा बर्‍याच भाषांमधून मराठीत खूप शब्द आले आहेत.ते तसे आले तर भाषा समृद्ध होते. काही शब्दाना मराठीत शब्दच नाहीत. ते शब्द ज्या वातावरणातील आहेत त्या प्रदेशातील भाषेतून ते शब्द आपल्या भाषेत येतील माझा आक्षेप आहे तो हिन्दी लोकांच्या "माझी भाषा हिन्दी आहे...म्हणून तू देखील हिन्दीतच बोलले पाहिजे. तू या अरेरावीचा" तुम्ही मांडलेले मुद्दे हे शुद्धलेखन : मुद्दा या चर्चेत गैरलागू आहे मुद्दा क्र २ : वरती स्पष्टीकरण दिले आहे मुद्द क्र ३: पंजाबातील बिहारीलोकांचा या इथे काय संबन्ध मुद्दा क्र ४ : महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री हिन्दीत बोलतात याला माझा आक्षेप नाही. आक्षेप आहे तो हिन्दी चॅनेलवाले लोक माजुर्डेपणाने मुख्यमन्त्र्याना सुद्धा हिन्दीत बोला असे ऐकवू लागले आहेत. असो. मुद्दे भरकटवून टाकायची ही कला वाखाणण्याजोगीच.

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 23/12/2010 - 13:29
विजुभाऊ तुमचा मूळ चर्चाप्रस्ताव वाचून माझा समज असा झाला की मराठीत भेसळ करणारे हिंदी शब्द हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण आता तुम्ही म्हणता आहात की महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम आहे. नक्की प्रॉब्लेम काय आहे हे निश्चित झाले नाही तर सोल्युशन कसे सापडणार. बाय द वे, तुम्हाला हिंदीच्या भेसळीचा इतका तिटकारा असूनही 'जी' हे नखशिखान्त हिंदी संबोधन तुम्ही माझ्यासाठी का वापरत आहात. राव, पंत, साहेब वगैरे मराठी संबोधने आहेत ना. तसेही मराठीत काहीही संबोधन वापरले नाही तरी बिघडत नाही.

विजुभाऊ 23/12/2010 - 16:02
महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम आहे पुन्हा गल्लत करताय महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणारे आणि मराठी लोकांवर हिन्दी लादणारे लोक तसेच ही मुस्कटदाबी न जाणवून घेणारे मराठी लोक हा मुद्दा आहे. हिंदीच्या भेसळीचा इतका तिटकारा असूनही 'जी' हे नखशिखान्त हिंदी संबोधन तुम्ही माझ्यासाठी का वापरत आहात. मी हिन्दीचा /भेसळीचा तिटकारा आहे असे कधीच म्हंटले नाही. मराठीत अनेक भाषातील शब्द आहेत. तुमच्या नावापुढे "जी" लावले याचे कारण " जी" शब्दाव्वर हिन्दीची मक्तेदारे नाही. तानाजी .बाजी येसाजी असे अनेक "जी" इथे होऊन गेलेत. अर्थात तुमच्या एकुण्च प्रतिसादांवरून महान असलेल्या तुम्हाला " जी" असे संबोधावे असे वाटले. ( एखाद्याला " फार शहाणा आहेस" असे म्हंणतोना तसेच हे काहीसे )

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 23/12/2010 - 16:14
महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणारे आणि मराठी लोकांवर हिन्दी लादणारे लोक तसेच ही मुस्कटदाबी न जाणवून घेणारे मराठी लोक हा मुद्दा आहे.
मूळ मुद्दा मराठी भाषेतील भेसळीचा आहे की मराठी लोकांवर हिंदी लादण्याचा हे आधी फैनल करा बुवा. मुस्कटदाबी न जाणवून घेण्याचा प्रॉब्लेम मराठी लोकांचाच आहे त्यासाठी बिहारी लोक कसे काय जबाबदार धरले तुम्ही?
मी हिन्दीचा /भेसळीचा तिटकारा आहे असे कधीच म्हंटले नाही
मग चीन सरकारने त्यांच्या भाषेत भेसळ बंद करण्याचा आदेश दिला आहे हा मुद्दा चर्चेला घेण्याचे कारणच नव्हते ना.
तानाजी .बाजी येसाजी असे अनेक "जी" इथे होऊन गेलेत.
या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?)
अर्थात तुमच्या एकुण्च प्रतिसादांवरून महान असलेल्या तुम्हाला " जी" असे संबोधावे असे वाटले.
थ्यांक्यू. पण मला मराठी प्रत्यय लावलेले आवडतील.

In reply to by आजानुकर्ण

या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?) नाही पण तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असा शिवाजीमहाराजांनी केल्याचे अनेक शाहीरांच्या तोंडी ऐकले आहेत. बाळ किंवा बाळ नावाच्या व्यक्तिंचे पुढे बाळाजी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 15:52
नाही पण तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असा शिवाजीमहाराजांनी केल्याचे अनेक शाहीरांच्या तोंडी ऐकले आहेत. बाळ किंवा बाळ नावाच्या व्यक्तिंचे पुढे बाळाजी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही. (तसे पुरावे दिल्यास हे मान्य करता येईल) टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत. शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे?

In reply to by आजानुकर्ण

बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही. पडळकर कुलवृत्तांत मिळाला बाजारात तर त्यामधे आताच्या पडळकरांच्या १७पिढ्या आधीचा मनुष्य पडळकरांच्या वंशाचा मूळ पुरुष मानला जातो. त्यांचे नाव बाळा(प्रभू) अथवा बाळाजी असे लिहीलेले सापडेल. टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत. टिळकांच्या जमान्यात जी लावायची पद्धत कमी झाली होती असे दिसते. किंवा फार कमी प्रमाणात अस्तित्वात होती. तेव्हा आडनावांना महत्व प्राप्त झाले होते. आणि साहेब किंवा राव असे प्रत्यय (विभक्ती नव्हे आदरार्थी) जोडणे चालू झाले होते. शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे? जुने पोवाडे काढून वाचलेत तर त्यात सापडेल.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 20:43
जुने पोवाडे काढून वाचलेत तर त्यात सापडेल.
जुने पोवाडे कुठे वाचायला मिळतील? एखाद्या पुस्तकाचे नेमके नाव सांगितले तर ते पाहता येईल.

विजुभाऊ 24/12/2010 - 10:11
या निमित्ताने अनेकांशी चर्चा घडली. काही विचारवन्ताना मराठी भाषेचे काहीही झाले तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही हे जाणवले. अवांतरः विचारवन्त हा नक्की कोणाच्या डोक्याने विचार करतो? अती अवांतरः विचारवन्ताची लक्षणे ही स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणेच असतात का? तज्ञानी मार्गदर्शन करावे

In reply to by विजुभाऊ

आजानुकर्ण 24/12/2010 - 10:19
विजुभाऊ, अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे नुकसान होत नाही तर परभाषेतून मराठीत आयात होणाऱ्या शब्दांमुळे मराठीचे नुकसान होते या तुमच्या सिद्धांताला कोणताही भाषाशास्त्रीय आधार नाही. अवांतरः वीरेन शाह वगैरे शाह मंडळी मराठी पाट्यांच्या विरोधात आहेत याबाबत तुमचे मत तुम्ही सांगितले नाही. ;)

In reply to by आजानुकर्ण

अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे नुकसान होत नाही तर परभाषेतून मराठीत आयात होणाऱ्या शब्दांमुळे मराठीचे नुकसान होते या तुमच्या सिद्धांताला कोणताही भाषाशास्त्रीय आधार नाही. भाषा ही भाषाशास्त्राच्या नियमानुसार चालते, वाढते, बहरते का?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 11:54
भाषा ही भाषाशास्त्राच्या नियमानुसार चालत, वाढत किंवा बहरत नाही. भाषाशास्त्राचे नियम या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याचे वर्णन करतात. भाषाशास्त्राच्या सिद्धांतानुसार भाषेच्या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याला अशुद्धलेखनामुळे खीळ बसू शकते. त्याचबरोबर परभाषेतून मराठीत आयात होणारे शब्द बंद केल्यास भाषेचे डबके होऊन भाषेच्या चालण्या, वाढण्या व बहरण्यावर मर्यादा येऊ शकते.

In reply to by आजानुकर्ण

भाषाशास्त्राच्या सिद्धांतानुसार भाषेच्या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याला अशुद्धलेखनामुळे खीळ बसू शकते. त्याचबरोबर परभाषेतून मराठीत आयात होणारे शब्द बंद केल्यास भाषेचे डबके होऊन भाषेच्या चालण्या, वाढण्या व बहरण्यावर मर्यादा येऊ शकते. आमच्या अल्पबुद्धीनुसार शब्द हे न वापरल्यामुळे भाषाबाह्य होतात. मूळ मराठी भाषेतले शब्द अन्य भाषेतील आक्रमित शब्दांमुळे भाषाबाह्य होत असतील तर ते मूळ आग्रहाने वापरल्याने टिकून राहतात. राहीला शब्द परभाषेतून मराठीत शब्द घेण्याचा तर ज्या गोष्टींसाठी शब्द नाहीत त्यासाठी शब्द घेणे ठीक पण ज्यासाठी शब्द अस्तित्वात आहेत त्यासाठी परभाषेतला शब्द वापरणे ही लाचारी किंवा आळस कींवा दोन्हीही.

वेताळ 24/12/2010 - 12:00
तिथे भाषेचे डबके झाले. कालांतराने ते डबके आटले व त्याचा र्‍हास झाला.

विजुभाऊ 24/12/2010 - 16:31
मराठीत परभाषीक शब्द येण्यावर कुणाचेच आक्षेप नाहीत. इंग्रजी भाषेत इतर भाषेतले शब्द आले म्हणून तीचा इतका विस्तार झाला. आक्षेप आहेत ते इतरानी माजुर्डेपणाने इथल्या भाषेला नाकारून त्यांची भाषा इथल्या समाजावर लादण्याबद्दल. रेल्वे रूळा साठी तुमच्या भाषेत शब्द नसेल तर जो अन्य भाषेत आहे तो च शब्द वापरला जातोय ना.

नरेशकुमार 24/12/2010 - 20:40
मीपाल धोका, देशाला धोका, मरठिला धोका, शिवाजिला धोका, दादोजिला धोका, कळयान्ना धोका, फळान्ना धोका, लोकांना धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका,
चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे. http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते. मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे. गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे.

एक प्रश्न...

अवलिया ·

यकु 22/12/2010 - 11:14
पैशाचे मूल्य गृहित धरले जाते - ती फक्त त्या-त्या काळची मान्यता असते... फक्त एक मान्यताच - बाकी काहीही नाही... एरव्ही ती एक अत्यंत निरूपयोगी गोष्ट आहे.. उद्या रूपया मातीमोल झाला तर इतर देशातल्यासारख्याच इथेही हातगाड्यावर नोटांची बंडले विकायला येऊ शकतात.. अन्नाचे मूल्य पैशांत होत असले तर त्याची वेगळी अशी सत्ता आहे जी सर्व माणसांवर, सर्व परिस्थितीत लागू होते... कदाचित त्या काळात अशीच परिस्थिती उद्भवली असेल जेव्हा अन्न अत्यंत दुर्मिळ आणि पैसा माकूल झाला असेल.. म्हणून कदाचित " For the money has failed." असा एक अंदाज... निश्चित तपशील माहित नाहीत

गवि 22/12/2010 - 11:28
For the money has failed म्हणजे विकत घ्यायला सर्वजण तयार असून विकायला कोणी नाही (विकायला काहीच नाही..) अशी स्थिती. (कधीमधी याचे छोटेसे उदाहरण शेयर बाजारात बघायला मिळते) शेतकर्‍यांच्या वर्णनापलीकडल्या भयानक उपेक्षेमुळे जी स्थिती येत्या काही वर्षांत भारतात येणार आहे ती. ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतजमीन विकत घेऊन ठेवावी कारण अजून वीस तीस वर्षांनी ज्वारी एक हजार रुपये किलो होईल आणि आपला पगार वीस लाख प्रति महिना होईल, अशा समजुतीत राहणार्‍यां "सेवाविक्रेत्यांनी" ही शक्यता गृहित धरावी की पगार पन्नास लाखही असेल पण ज्वारीच नसेल. ती आपल्यापुरती पिकवू शकेल तो जगेल.

नानबा ह्या विशिष्ठ ओळी विषयी इथे वाचले होते. आता त्यातले कितपत तुझे समाधान करेल ते सांगता येत नाही. When the economy of Egypt collapsed during the days of Joseph, the inhabitants came to him and cried, "Give us bread, for why should we die in your presence? For the money has failed." Nothing in this world is "too big to fail." Both countries and companies can collapse. Leaders can fall. Economies can crater. Our most revered institutions can and will one day collapse. No single individual can control his or her own ultimate financial destiny. What cannot fail? Joshua told the Israelites "Not one thing has failed of all the good things which the LORD your God spoke concerning you" (Joshua 23:14). According to 1 Kings 8:56, "There has not failed one word of all His good promise." The psalmist said, "My flesh and my heart fail; but God is the strength of my heart and my portion forever." The Lord never fails (Isaiah 42:4) nor do His compassions. They fail not, they are new every morning (Lamentations 3:22-23). Heaven and earth may pass away, but Jesus never fails.

यकु 22/12/2010 - 11:14
पैशाचे मूल्य गृहित धरले जाते - ती फक्त त्या-त्या काळची मान्यता असते... फक्त एक मान्यताच - बाकी काहीही नाही... एरव्ही ती एक अत्यंत निरूपयोगी गोष्ट आहे.. उद्या रूपया मातीमोल झाला तर इतर देशातल्यासारख्याच इथेही हातगाड्यावर नोटांची बंडले विकायला येऊ शकतात.. अन्नाचे मूल्य पैशांत होत असले तर त्याची वेगळी अशी सत्ता आहे जी सर्व माणसांवर, सर्व परिस्थितीत लागू होते... कदाचित त्या काळात अशीच परिस्थिती उद्भवली असेल जेव्हा अन्न अत्यंत दुर्मिळ आणि पैसा माकूल झाला असेल.. म्हणून कदाचित " For the money has failed." असा एक अंदाज... निश्चित तपशील माहित नाहीत

गवि 22/12/2010 - 11:28
For the money has failed म्हणजे विकत घ्यायला सर्वजण तयार असून विकायला कोणी नाही (विकायला काहीच नाही..) अशी स्थिती. (कधीमधी याचे छोटेसे उदाहरण शेयर बाजारात बघायला मिळते) शेतकर्‍यांच्या वर्णनापलीकडल्या भयानक उपेक्षेमुळे जी स्थिती येत्या काही वर्षांत भारतात येणार आहे ती. ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतजमीन विकत घेऊन ठेवावी कारण अजून वीस तीस वर्षांनी ज्वारी एक हजार रुपये किलो होईल आणि आपला पगार वीस लाख प्रति महिना होईल, अशा समजुतीत राहणार्‍यां "सेवाविक्रेत्यांनी" ही शक्यता गृहित धरावी की पगार पन्नास लाखही असेल पण ज्वारीच नसेल. ती आपल्यापुरती पिकवू शकेल तो जगेल.

नानबा ह्या विशिष्ठ ओळी विषयी इथे वाचले होते. आता त्यातले कितपत तुझे समाधान करेल ते सांगता येत नाही. When the economy of Egypt collapsed during the days of Joseph, the inhabitants came to him and cried, "Give us bread, for why should we die in your presence? For the money has failed." Nothing in this world is "too big to fail." Both countries and companies can collapse. Leaders can fall. Economies can crater. Our most revered institutions can and will one day collapse. No single individual can control his or her own ultimate financial destiny. What cannot fail? Joshua told the Israelites "Not one thing has failed of all the good things which the LORD your God spoke concerning you" (Joshua 23:14). According to 1 Kings 8:56, "There has not failed one word of all His good promise." The psalmist said, "My flesh and my heart fail; but God is the strength of my heart and my portion forever." The Lord never fails (Isaiah 42:4) nor do His compassions. They fail not, they are new every morning (Lamentations 3:22-23). Heaven and earth may pass away, but Jesus never fails.
Genesis 47 (New King James Version) वाचतांना खालील वाक्य वाचले. 15 So when the money failed in the land of Egypt and in the land of Canaan, all the Egyptians came to Joseph and said, "Give us bread, for why should we die in your presence?

स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!

चिगो ·

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चिगो 22/12/2010 - 17:18
बरोबर.. गोची झाल्यावर मान्य करण्यात काय कमीपणा !? ;-)

सुहास.. 21/12/2010 - 22:55
अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !! वेलकम टु द क्लब !!! ( भेटलास की कोपरा जिंदाबाद ची तयारी ठेवा ! )

In reply to by चिगो

सुहास.. 21/12/2010 - 23:10
हाडं बाकी ठेवा अंगात >>> हॅ हॅ हॅ ! साळ्याने लय जोरात कान पिळला >> देवाचे आभार मान की तिथे (आडनावाने)हा साळ्या नव्हता , नाहीतर बाकीचे फोटु बिगर-कानाचे आले असते ;) असो . जोडीने घरी जेवायला येणार असाल तरच हाडांचा ईच्चार केला जाइल याची नोंद घ्यावी .

गणेशा 21/12/2010 - 23:23
अभिनंदन भावा .... पुढील तेजोमय प्रवासास लक्ष शुभेच्छा.. - फोटो दिसले पाहिजे होते राव मला .. (मागचे तुझे ट्रिप्चे फोटो दिसत होते .. हे का नाही दिसत कळाले नाही .. उत्सुकता आहे .. वहिनीसाहेबांना पण पाहिचे आहेच .. )

यकु 21/12/2010 - 23:29
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर : पण त्यामुळे ट्रीप्स कमी होऊन उत्तमोत्तम छायाचित्रे असलेल्या आम्च्या घरबैठ्या सहलींचा चानस डीलीट न होओ. अतिअवांतरः हैलो, माईक टेस्टींग समीर सूर, समीर सूर कुठे आहेत.. ;-)

असुर 21/12/2010 - 23:42
गृहस्थाश्रमी श्री. व सौ. चिगो, आपले दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! महत्वाचं: प्यार्टीचं कोणी काय बोल्ला नाय??? का नाय बोल्ला???? :-) अवांतर: नेहेमीप्रमाणेच दणदणीत फटू!!! --असुर

In reply to by असुर

चिगो 22/12/2010 - 17:25
धन्यु असुरभौ... आसामात आले की कळवा.. पार्टी तयार आहे.. सध्या एक ब्लॅक लेबल (12 years old), अर्थातच गिफ्ट मिळालेली, आहे स्टॉकात.. आले की फोडू.. :-)

In reply to by संदीप चित्रे

गणपा 22/12/2010 - 02:29
तुम्हा दोघांच्या सुखी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !
असेच म्हणतो. :) नव्या इनिंगसाठी ऑल दी बेस्ट.

आयुष्यात हवीहवीशी वाटणारी बेडी एकच लग्नाची आपल्या कडे लग्न हा करार नसतो तर कमीटमेंट असते .ह्या पवित्र बंधनात जखडल्या बद्दल अभिनंद अवांतर - सध्या निसर्गाची कृपा आहे तुमच्यावर .दृष्ट लागेल अशी कडाक्याची (तुमच्यासाठी गुलाबी ) थंडी पसरली आहे .भारतात असे वाचून आहे . तेव्हा ये शाम मस्तानी मदहोश किये जाय.

गुंडोपंत 22/12/2010 - 05:56
अभिनंदन! खुप मजा करा... सध्या मिपावर वेळ घालवला नाही तरी चालेल... पुढे आपसूक यालच ;)

शहराजाद 22/12/2010 - 09:28
अनागोंदी राजवटीचा त्याग करून स्वतंत्र कल्याणकारी सुराज्य ( वेलफेअर स्टेट ) स्थापन केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. :) तुम्हा उभयतांना हे नवे संयुक्त स्वातंत्र्य सुखाचे आणि भरभराटीचे जावो.

गवि 22/12/2010 - 09:35
आता तुम्ही हे राजीखुषीने अक्कलहुशारीने आणि नशापाणी न करता ठरवून आणि ऑलरेडी करुन बसला आहात तर आता काहीच इलाज नाही.. ;) आता नांदा सौख्यभरे.. (आणि कधीकधी भांडाही..) :) शुभेच्छा..

उल्हास 22/12/2010 - 09:48
आपण गमावलेल्या बॅचलर व आपल्या पत्नीने कमावलेल्या मास्टर डीग्री बद्दल दोघांचे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

"स्वातंत्र्य" गमावितानाही चेहर्‍यावरील हास्य टवटवीत ठेवले त्याबद्दल विशेष अभिनंदन, चिन्मय ! वहिनींच्या नावाप्रमाणेच उभयतांचे वैवाहिक आयुष्यही ऐश्वर्यसंपन्न होवो (होणारच) या सदिच्छा ! इन्द्रा

हार्दीक अभिनंदन आणि नवजीवनाच्या अनेकानेक शुभेच्छा! हनिमुनसाठी कुठे इतरत्र जाणार असाल तर त्याचे ही प्रवासवर्णन (फोटूंसहीत) येऊ द्यात ;) अवांतरः बाकी लग्न झाले कुठे?तुमचा आणि वहींनींचा पेहराव आणि एकुणच लग्नस्थळामध्ये केलेली सजावट पाहता लग्नस्थळ महाराष्ट्राबाहेर असावे असे वाटते. (जोरू का गुलाम) योगेश.

In reply to by कानडाऊ योगेशु

चिगो 22/12/2010 - 17:41
महाराष्ट्राच्या राजधानीतच आहे.. @आशिष, हॉलचे नाव मंचेरजी जोशी हॉल. पारशी कॉलनी, दादर (पुर्व) मुंबई.. रिसेप्शन माझ्या गावी, ब्राम्हणीला (जि. नागपुर) झाले..

सुधीर काळे 22/12/2010 - 14:13
लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय्! नांदा सौख्यभरे! सूनबाईंचे नाव (ऐश्वर्या) कळले, पण चिगोंचे अजून कळायचे आहे! (व्यनि'वर पाठविणे) काका

Pearl 22/12/2010 - 14:39
चिगोचे नाव चिन्मय असावे :-) (संदर्भः वर दिलेले फोटो)

समीरसूर 22/12/2010 - 17:23
चिगोपंत, आपले व आपल्या पत्नीचे दोघांचेही अगदी मनःपूर्वक अभिनंदन!! :-) आपला संसार सुखाचा होवो, आपल्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना! --समीर

धमाल मुलगा 22/12/2010 - 20:05
तरीच बेट्या इतके दिवस गायब होतास. :) झकास झकास! (आला आणखी एकजण क्लबात. ;) ) आता लवकरात लवकर ती आसाम-नागालँडची नुसतीच भिजत पडलेली सफरीची कल्पना प्रत्यक्षात आणावी लागते बाप्प्पा... 'समक्ष्व' येऊनच हाबिणंदण करावं असा इच्चार चालला हाय. :)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

धमाल मुलगा 22/12/2010 - 20:33
म्हणजे हिच्या सौंदर्य-टिप्सला टी.आर.पी. मिळेल. :P काय महिलामंडळ चालवायचंय का? त्या चिन्म्याला जरा सुखानं मिपा मिपा खेळू द्या की राव.

In reply to by धमाल मुलगा

चिगो 22/12/2010 - 22:13
तसाही तिला मिपा आणि "सुशिं"चा इंट्रो पराशेठच्या भन्नाटमधून करुनच देतोय.. आणि ये की तू भाऊ, काय नुस्ता "लांडगा आला रे आला" लावतोस? :-) हा बेष्ट सिझन आहे इकडे फिरायला.. बाकी अय्याजचा मित्र आलाय म्हणे फिरायला..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चिगो 22/12/2010 - 17:18
बरोबर.. गोची झाल्यावर मान्य करण्यात काय कमीपणा !? ;-)

सुहास.. 21/12/2010 - 22:55
अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !! वेलकम टु द क्लब !!! ( भेटलास की कोपरा जिंदाबाद ची तयारी ठेवा ! )

In reply to by चिगो

सुहास.. 21/12/2010 - 23:10
हाडं बाकी ठेवा अंगात >>> हॅ हॅ हॅ ! साळ्याने लय जोरात कान पिळला >> देवाचे आभार मान की तिथे (आडनावाने)हा साळ्या नव्हता , नाहीतर बाकीचे फोटु बिगर-कानाचे आले असते ;) असो . जोडीने घरी जेवायला येणार असाल तरच हाडांचा ईच्चार केला जाइल याची नोंद घ्यावी .

गणेशा 21/12/2010 - 23:23
अभिनंदन भावा .... पुढील तेजोमय प्रवासास लक्ष शुभेच्छा.. - फोटो दिसले पाहिजे होते राव मला .. (मागचे तुझे ट्रिप्चे फोटो दिसत होते .. हे का नाही दिसत कळाले नाही .. उत्सुकता आहे .. वहिनीसाहेबांना पण पाहिचे आहेच .. )

यकु 21/12/2010 - 23:29
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर : पण त्यामुळे ट्रीप्स कमी होऊन उत्तमोत्तम छायाचित्रे असलेल्या आम्च्या घरबैठ्या सहलींचा चानस डीलीट न होओ. अतिअवांतरः हैलो, माईक टेस्टींग समीर सूर, समीर सूर कुठे आहेत.. ;-)

असुर 21/12/2010 - 23:42
गृहस्थाश्रमी श्री. व सौ. चिगो, आपले दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! महत्वाचं: प्यार्टीचं कोणी काय बोल्ला नाय??? का नाय बोल्ला???? :-) अवांतर: नेहेमीप्रमाणेच दणदणीत फटू!!! --असुर

In reply to by असुर

चिगो 22/12/2010 - 17:25
धन्यु असुरभौ... आसामात आले की कळवा.. पार्टी तयार आहे.. सध्या एक ब्लॅक लेबल (12 years old), अर्थातच गिफ्ट मिळालेली, आहे स्टॉकात.. आले की फोडू.. :-)

In reply to by संदीप चित्रे

गणपा 22/12/2010 - 02:29
तुम्हा दोघांच्या सुखी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !
असेच म्हणतो. :) नव्या इनिंगसाठी ऑल दी बेस्ट.

आयुष्यात हवीहवीशी वाटणारी बेडी एकच लग्नाची आपल्या कडे लग्न हा करार नसतो तर कमीटमेंट असते .ह्या पवित्र बंधनात जखडल्या बद्दल अभिनंद अवांतर - सध्या निसर्गाची कृपा आहे तुमच्यावर .दृष्ट लागेल अशी कडाक्याची (तुमच्यासाठी गुलाबी ) थंडी पसरली आहे .भारतात असे वाचून आहे . तेव्हा ये शाम मस्तानी मदहोश किये जाय.

गुंडोपंत 22/12/2010 - 05:56
अभिनंदन! खुप मजा करा... सध्या मिपावर वेळ घालवला नाही तरी चालेल... पुढे आपसूक यालच ;)

शहराजाद 22/12/2010 - 09:28
अनागोंदी राजवटीचा त्याग करून स्वतंत्र कल्याणकारी सुराज्य ( वेलफेअर स्टेट ) स्थापन केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. :) तुम्हा उभयतांना हे नवे संयुक्त स्वातंत्र्य सुखाचे आणि भरभराटीचे जावो.

गवि 22/12/2010 - 09:35
आता तुम्ही हे राजीखुषीने अक्कलहुशारीने आणि नशापाणी न करता ठरवून आणि ऑलरेडी करुन बसला आहात तर आता काहीच इलाज नाही.. ;) आता नांदा सौख्यभरे.. (आणि कधीकधी भांडाही..) :) शुभेच्छा..

उल्हास 22/12/2010 - 09:48
आपण गमावलेल्या बॅचलर व आपल्या पत्नीने कमावलेल्या मास्टर डीग्री बद्दल दोघांचे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

"स्वातंत्र्य" गमावितानाही चेहर्‍यावरील हास्य टवटवीत ठेवले त्याबद्दल विशेष अभिनंदन, चिन्मय ! वहिनींच्या नावाप्रमाणेच उभयतांचे वैवाहिक आयुष्यही ऐश्वर्यसंपन्न होवो (होणारच) या सदिच्छा ! इन्द्रा

हार्दीक अभिनंदन आणि नवजीवनाच्या अनेकानेक शुभेच्छा! हनिमुनसाठी कुठे इतरत्र जाणार असाल तर त्याचे ही प्रवासवर्णन (फोटूंसहीत) येऊ द्यात ;) अवांतरः बाकी लग्न झाले कुठे?तुमचा आणि वहींनींचा पेहराव आणि एकुणच लग्नस्थळामध्ये केलेली सजावट पाहता लग्नस्थळ महाराष्ट्राबाहेर असावे असे वाटते. (जोरू का गुलाम) योगेश.

In reply to by कानडाऊ योगेशु

चिगो 22/12/2010 - 17:41
महाराष्ट्राच्या राजधानीतच आहे.. @आशिष, हॉलचे नाव मंचेरजी जोशी हॉल. पारशी कॉलनी, दादर (पुर्व) मुंबई.. रिसेप्शन माझ्या गावी, ब्राम्हणीला (जि. नागपुर) झाले..

सुधीर काळे 22/12/2010 - 14:13
लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय्! नांदा सौख्यभरे! सूनबाईंचे नाव (ऐश्वर्या) कळले, पण चिगोंचे अजून कळायचे आहे! (व्यनि'वर पाठविणे) काका

Pearl 22/12/2010 - 14:39
चिगोचे नाव चिन्मय असावे :-) (संदर्भः वर दिलेले फोटो)

समीरसूर 22/12/2010 - 17:23
चिगोपंत, आपले व आपल्या पत्नीचे दोघांचेही अगदी मनःपूर्वक अभिनंदन!! :-) आपला संसार सुखाचा होवो, आपल्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना! --समीर

धमाल मुलगा 22/12/2010 - 20:05
तरीच बेट्या इतके दिवस गायब होतास. :) झकास झकास! (आला आणखी एकजण क्लबात. ;) ) आता लवकरात लवकर ती आसाम-नागालँडची नुसतीच भिजत पडलेली सफरीची कल्पना प्रत्यक्षात आणावी लागते बाप्प्पा... 'समक्ष्व' येऊनच हाबिणंदण करावं असा इच्चार चालला हाय. :)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

धमाल मुलगा 22/12/2010 - 20:33
म्हणजे हिच्या सौंदर्य-टिप्सला टी.आर.पी. मिळेल. :P काय महिलामंडळ चालवायचंय का? त्या चिन्म्याला जरा सुखानं मिपा मिपा खेळू द्या की राव.

In reply to by धमाल मुलगा

चिगो 22/12/2010 - 22:13
तसाही तिला मिपा आणि "सुशिं"चा इंट्रो पराशेठच्या भन्नाटमधून करुनच देतोय.. आणि ये की तू भाऊ, काय नुस्ता "लांडगा आला रे आला" लावतोस? :-) हा बेष्ट सिझन आहे इकडे फिरायला.. बाकी अय्याजचा मित्र आलाय म्हणे फिरायला..
मी पारतंत्र्यात आलो... जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो... (ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं.

सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा!

सुधीर काळे ·

टारझन 21/12/2010 - 22:08
कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे
खुलाश्याबद्दल धन्यवाद. बरं मग ? बाकी , कोणते डॉण वृत्तपत्र ? आम्ही ओळखत नाही. आणि ओळख करुन घ्यायची इच्छा ही नाही. सचिन ची दखल सरसकट वॄत्तपत्रे घेतात . शेकडो वृत्तपत्रांनी दखल घेतल्याबद्दल आता शेकडो लेख पाडावेत काय ? डॉन ने सचिन ला मुजरा केला म्हणुन काय मोठी ब्रेकिंग न्युज झाली आहे की त्याची आम्ही दखल घ्यावी ? असल्या फडतुस धाग्यांचा खरडफळा करणे उत्तम . अवांतर : खरडफळा बंद पडलाय काय ?

In reply to by शेखर

टारझन 21/12/2010 - 22:33
शेखरराव , आपल्याला काल ढंडाळ्या लागल्या होत्या त्या थांबल्या का ? तेंव्हा आम्ही मोराल वैद्याच्या वेषात आपली मदतंच केली होती .. आम्हाला असे वेगवेगळे वेष धारण करावे लागतात , जगकल्याणासाठी ;)

सुधीर काळे 21/12/2010 - 22:19
ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध होणार्‍या 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'च्या वाचकांनी सचिनला डॉन ब्रॅडमनपेक्षा श्रेष्ठ ठरविले! http://tinyurl.com/2bta4lq

विजुभाऊ 21/12/2010 - 22:25
डॉन ने काय म्हंटले त्यापेक्षा वसीम अक्रम ने सचिन बद्दल जे गौरवोद्गार काढले ते महत्वाचे आहेत http://www.rediff.com/cricket/slide-show/slide-show-1-india-sa-tour-2010-tendulkar-is-the-best-batsman-in-the-history-of-the-game/20101221.htm डॉन ने त्याचे कौतूक केले यात नवल नाही. जगभरातील सगळी वृत्तपत्रे त्याचा गौरव करीत आहेत. पण डॉन ने कौतूक केले हा विषय चर्चेचा आहे का?

In reply to by विजुभाऊ

सुधीर काळे 22/12/2010 - 07:59
विजुभाऊ, सचिनचे सगळेच कौतुक करतात. 'डॉन'नेही केले यात 'तसे' कांहीं विशेष नाहीं. पण डॉन काय किंवा वसीम काय नाहीं म्हटले तरी पाकिस्तानचे. यातले सचिनचे अजातशत्रुत्व मला भावले. त्याशिवाय मला 'डॉन'ची इंग्रजी भाषाही भावली! तुम्हीही वाचाल अशी आशा आहे. ये तो अपनी-अपनी पसंद है! वसीम अक्रमचा सचिनबद्दलचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. खरोखर मनापासून आणि अतीशय सुंदर शब्दात लिहिले आहे वासिमने.

शुचि 21/12/2010 - 22:26
>> अतीशय स्पर्धात्मक अशा आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात २० वर्षे खेळू शकणे हाच एक विक्रम ठरेल. >> खरं आहे!!! डाऊन टू अर्थ आणि कोणत्याही वादाच्या भोवर्‍यात न पडता कारकीर्द उत्तम रीत्या सांभाळून विक्रम गाजविणार्‍या सचिनचं कौतुक आहेच.

सुधीर काळे 22/12/2010 - 08:05
असज्जनः सज्जनसंगि संगात् करोति दुःसाध्यमपीह साध्यम् । पुष्याश्रयात् शम्भुशिरोधिरूठा पिपीलिका चुम्बति चन्द्रबिम्बम् ॥ वा, वा, शचिताई! सुरेख श्लोक! सचिन तर भारतीय संघातील सगळ्या खेळाडूंचा अनभिषिक्त coach आहेच. बघू किती गुण उतरतात या खेळाडूंत..... पण मला सगळ्यात आवडला तो श्रीसंतने ठोकलेला 'त्रिवार' सॅल्यूट! खरडफळ्यावर मी दिलेल्या दुव्यावर पहाता येईल.

टारझन 21/12/2010 - 22:08
कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे
खुलाश्याबद्दल धन्यवाद. बरं मग ? बाकी , कोणते डॉण वृत्तपत्र ? आम्ही ओळखत नाही. आणि ओळख करुन घ्यायची इच्छा ही नाही. सचिन ची दखल सरसकट वॄत्तपत्रे घेतात . शेकडो वृत्तपत्रांनी दखल घेतल्याबद्दल आता शेकडो लेख पाडावेत काय ? डॉन ने सचिन ला मुजरा केला म्हणुन काय मोठी ब्रेकिंग न्युज झाली आहे की त्याची आम्ही दखल घ्यावी ? असल्या फडतुस धाग्यांचा खरडफळा करणे उत्तम . अवांतर : खरडफळा बंद पडलाय काय ?

In reply to by शेखर

टारझन 21/12/2010 - 22:33
शेखरराव , आपल्याला काल ढंडाळ्या लागल्या होत्या त्या थांबल्या का ? तेंव्हा आम्ही मोराल वैद्याच्या वेषात आपली मदतंच केली होती .. आम्हाला असे वेगवेगळे वेष धारण करावे लागतात , जगकल्याणासाठी ;)

सुधीर काळे 21/12/2010 - 22:19
ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध होणार्‍या 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'च्या वाचकांनी सचिनला डॉन ब्रॅडमनपेक्षा श्रेष्ठ ठरविले! http://tinyurl.com/2bta4lq

विजुभाऊ 21/12/2010 - 22:25
डॉन ने काय म्हंटले त्यापेक्षा वसीम अक्रम ने सचिन बद्दल जे गौरवोद्गार काढले ते महत्वाचे आहेत http://www.rediff.com/cricket/slide-show/slide-show-1-india-sa-tour-2010-tendulkar-is-the-best-batsman-in-the-history-of-the-game/20101221.htm डॉन ने त्याचे कौतूक केले यात नवल नाही. जगभरातील सगळी वृत्तपत्रे त्याचा गौरव करीत आहेत. पण डॉन ने कौतूक केले हा विषय चर्चेचा आहे का?

In reply to by विजुभाऊ

सुधीर काळे 22/12/2010 - 07:59
विजुभाऊ, सचिनचे सगळेच कौतुक करतात. 'डॉन'नेही केले यात 'तसे' कांहीं विशेष नाहीं. पण डॉन काय किंवा वसीम काय नाहीं म्हटले तरी पाकिस्तानचे. यातले सचिनचे अजातशत्रुत्व मला भावले. त्याशिवाय मला 'डॉन'ची इंग्रजी भाषाही भावली! तुम्हीही वाचाल अशी आशा आहे. ये तो अपनी-अपनी पसंद है! वसीम अक्रमचा सचिनबद्दलचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. खरोखर मनापासून आणि अतीशय सुंदर शब्दात लिहिले आहे वासिमने.

शुचि 21/12/2010 - 22:26
>> अतीशय स्पर्धात्मक अशा आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात २० वर्षे खेळू शकणे हाच एक विक्रम ठरेल. >> खरं आहे!!! डाऊन टू अर्थ आणि कोणत्याही वादाच्या भोवर्‍यात न पडता कारकीर्द उत्तम रीत्या सांभाळून विक्रम गाजविणार्‍या सचिनचं कौतुक आहेच.

सुधीर काळे 22/12/2010 - 08:05
असज्जनः सज्जनसंगि संगात् करोति दुःसाध्यमपीह साध्यम् । पुष्याश्रयात् शम्भुशिरोधिरूठा पिपीलिका चुम्बति चन्द्रबिम्बम् ॥ वा, वा, शचिताई! सुरेख श्लोक! सचिन तर भारतीय संघातील सगळ्या खेळाडूंचा अनभिषिक्त coach आहेच. बघू किती गुण उतरतात या खेळाडूंत..... पण मला सगळ्यात आवडला तो श्रीसंतने ठोकलेला 'त्रिवार' सॅल्यूट! खरडफळ्यावर मी दिलेल्या दुव्यावर पहाता येईल.
सचिनला कराचीच्या 'गॉन'चा मानाचा मुजरा! कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'गॉन' या वृत्तपत्राचा मी नियमित वाचक आहे 'मिपा'वर बर्‍याच लोकांना माहीत आहे. आज या पाकिस्तानी वृत्तपत्राने अतीशय सुंदर भाषेत सचिनला मानाचा मुजरा केला आहे! वाचा खाली दिलेल्या दुव्यावर! http://www.dawn.com/2010/12/21/tendulkar-s-feat.html Tendulkar’s feat December 21, 2010 ताजमहालाला वीट लावण्याचा प्रयत्न न करता मी एवढेच लिहितो कीं हे वृत्तपत्र म्हणते कीं सचिनचा पराक्रम केवळ क्रीडाक्षेत्रापुरता मानणे चुकीचे ठरेल तर तो शास्त्र, कला, साहित्य या सर्व क्षेत्रातील विक्रमाच्या तोडीचा आहे.

पुन्हा एकदा चंद्र दर्शन...

मदनबाण ·

स्पा 21/12/2010 - 20:17
हो आज.. मस्त पिवळा धम्मक दिसतोय चांदोमामा.. स्टेशन वर असताना टिपायचा प्रयत्न केला. पण मोबिल च्या कॅमेरात तो एखादा 'बल्ब' दिसावा तसा दिसत होता.. मग डोळे भरभरून पाहून घेतला... बाकी बाणा फोटू तर खासच

कालच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. ३७२ वर्षांनी विंटर सॉलस्टाईस (अवष्टंभ?)च्या दिवशी उत्तर गोलार्धातून ग्रहण दिसलं. फोटो छानच.

In reply to by गणेशा

मदनबाण 21/12/2010 - 22:05
मला येथे बर्याचदा फोटो दिसत नाहित , त्यामुळे निराशा होते . ह्म्म...जर तुमच्याकडे पिकासा ब्लॉक असेल तर माझे फोटु तुम्हाला दिसणार नाही... मागे फ्लिकरवरवर फोटो चढवु नका असे मला सांगितले होते... (बर्‍याच जणांच्या हापिसात हे बॅन आहे म्हणुन) म्हणुन मग हल्ली पिकासावर चढवतो आहे.

स्पा 21/12/2010 - 20:17
हो आज.. मस्त पिवळा धम्मक दिसतोय चांदोमामा.. स्टेशन वर असताना टिपायचा प्रयत्न केला. पण मोबिल च्या कॅमेरात तो एखादा 'बल्ब' दिसावा तसा दिसत होता.. मग डोळे भरभरून पाहून घेतला... बाकी बाणा फोटू तर खासच

कालच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. ३७२ वर्षांनी विंटर सॉलस्टाईस (अवष्टंभ?)च्या दिवशी उत्तर गोलार्धातून ग्रहण दिसलं. फोटो छानच.

In reply to by गणेशा

मदनबाण 21/12/2010 - 22:05
मला येथे बर्याचदा फोटो दिसत नाहित , त्यामुळे निराशा होते . ह्म्म...जर तुमच्याकडे पिकासा ब्लॉक असेल तर माझे फोटु तुम्हाला दिसणार नाही... मागे फ्लिकरवरवर फोटो चढवु नका असे मला सांगितले होते... (बर्‍याच जणांच्या हापिसात हे बॅन आहे म्हणुन) म्हणुन मग हल्ली पिकासावर चढवतो आहे.

अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश : भारत

गांधीवादी ·

डावखुरा 21/12/2010 - 20:11
आपली संस्कृतीच आहे ती.. आणि हा देश गांधींचा आहे...(दुसरा गाल पुढे करणारा..) प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.. मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग , अजमल कसाब , अफजल गुरु ह्या परमात्म्यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेऊन अनेक जण आता असे महान कार्य करायला आणि आपले आदरतिथ्य स्वीकारायला तयार आहेत.. आपणही मागे न हटता त्यांच्यासाठी चांगल्या कारागृहांची व्यवस्था करुन ठेवायला हवी.. (तशी शिफारस कर्णारे पत्र पंतप्रधान/राष्ट्रपतींना पाठ्वीन म्हणतो..सवडीने) तसेच सामान्य करदात्यांनीही अजिबात दिरंगाई न करता जे अनेक कर सरकारने लादले आहेत ते सर्व भरावेत..आणि अजुन लादले तरी काकु करु नये कारण ते आपल्या शाही पाहुण्यावरच खर्च होणार आहेत ना शेवटी आपली संस्कृती काय म्हणते "अतिथी देवो भव" मुर्ख लोक आहेत जे संतापुन त्यांना चौकात आणुन फासावर देण्याच्या गोष्टी करतात .... अहो त्यांच्या आदरातिथ्याने आपल्या संस्कृतीचा,परंपरेचा डंका चहुकडे नाहीए का पसरत.. अमेरिकेसारखा मुर्ख देश तर मी आजवर पाहीला नाही... सद्दाम ला मुद्दाम पकडला त्याच्यावर घाईघाईत खटला भरला आणि दोशी ठरवुन फाशी पण दिली अरे आधी आमचा सल्ला तर घेत्ला असता.. येवढे हाताशी आलेले अतिथी सेवेचे पुण्य घालावले छ्या....

In reply to by डावखुरा

गांधीवादी 22/12/2010 - 06:18
>>मुर्ख लोक आहेत जे संतापुन त्यांना चौकात आणुन फासावर देण्याच्या गोष्टी करतात .... मूर्खच नव्हे तर आजकाल व्यवस्थेविरुद्ध ब्र देखील काढला कि लगेच 'हिंदू दहशतवादी' म्हणून नामकरण होईल.

नितिन थत्ते 21/12/2010 - 21:19
परवाच एका चर्चेत 'हिंदू दहशतवादी' हा विषय चालू असताना "सिद्ध कुठे झालेय?" अशा अर्थाचा प्रतिसाद वाचल्याची आठवण झाली. असो. हा तर न्यायालयाचा आदेश आहे. (बोटचेप्या सरकारचा नाही).

In reply to by नितिन थत्ते

आत्मशून्य 22/12/2010 - 21:03
छळण्यासाठी. बाकी कोणी इस्लामी दहशतवादावीरूध्द लढा देत असेल आणी तो धर्माने हिंदू असलाच तर त्याला हिंदू दहशतवादी कसे म्हणता येइल, भलेही तो कायदेशीर व्याखेत दहशत्वादी म्हणून अडकला तरी जोपर्यंत तो असे म्हणत नाही की मी रामाचे, श्रीक्क्रुष्णाचे राज्य संपूर्ण प्रूथ्वीतलावर नीर्माण व्हावे म्हणून हल्ले घडवत आहे ? आणी समजा तसे म्हटलाच तर हिंदू त्याला अक्कलशून्य नाही का म्हणनार कारण रामाचे, श्रीक्क्रुष्णाचे राज्य जर प्रूथ्वीवर यायचे आहे तर ते स्वतः अवतार घेतील यूध्दात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामील होतील. ऊगीच धर्मरक्षणाचा क्लेम करणारा कोणत्याही हल्लेखोर इसमास कशाला पूढे करतील ? जय हो जय हो जय हो जय हो जय हो .......... (सदरील प्रतीसाद उपहासात्मक असून गांभीर्याने घेऊ नये ही विनंती)

In reply to by नितिन थत्ते

सुधीर काळे 22/12/2010 - 16:19
सरकारवर हवी तेवढी टीका करता येते, पण न्यायालयावर? ना बाबा ना! लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे. पण म्हणजे ते टीकापात्र नाहींत किंवा बोटचेपे नाहींत असे नाहीं पण असे बोलायची (या लोकशाहीतसुद्धा) चोरी!

In reply to by सुधीर काळे

टारझन 24/12/2010 - 11:13
लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे.
शक्यता नाकारता येत नाहि. - वकिल

शुचि 21/12/2010 - 21:43
"प्रिझनर्स राईट्स्/ह्युमन राईट्स" ह्या विषयावर काही लँड्मार्क निर्णय झालेले असू शकतील. हाच अतिरेकी काही काळाने जर सुटला तर आत जाताना ज्या वाईट मानसिक अवस्थेत गेला होता कमीत कमी त्याच अवस्थेत बाहेर यावा, त्याहून वाईट अवस्थेत येऊ नये ही कोर्टाची धारणा या मागे असू शकते. "प्रिझनर्स रिफॉर्म" नावची देखील काही गोष्ट असते. या गोष्टींचा साधक बाधक विचार होऊन - कुराण, वर्तमानपत्र आदि पुरविण्यात येत असावे.

In reply to by शुचि

डावखुरा 21/12/2010 - 23:00
शुचि तै छान युक्तीवद आहे... समजा तथाकथित हिंदु पाकिस्तानात पकडला गेला (आपले कोळी-मच्छिमार) तर त्याला पाकिस्तानात त्याच्या दैनंदिन गर्जेच्या निदान जगायला आवश्यक खाणेबल खाद्य तरी पुरवतात का? की त्याचेच मारुन मारुन भरीत करुन टाकतात? (कृपया व्यक्तिगत घेउ नये..)

In reply to by शुचि

गवि 22/12/2010 - 10:42
शुचि ताईंचे हे म्हणणे मान्य.. पाकिस्तानसारखीच आपलीही वागणूक असणे हे काही फार आय एस ओ प्रमाणपत्र नाही. हाल हाल करत ठेवावे असे नाही. पण अति चैनीचे लाईफही देऊ नये. उपरिनिर्दिष्ट कोर्टाने दिलेल्या गोष्टींमधे अतिचैनीची गोष्ट आहे का हा सापेक्ष विचार झाला. मला तरी त्यात काही ऐष वाटत नाही. लवकर निर्णय न देणे / फाशीचे एक्झेक्युशन न करणे या दुरित गोष्टीच आहेत. पण त्याच्या बाजूला कैद्यांना पाकिस्तान छळात ठेवते अशा माहितीने आपणही काहीसे तसे करावे हे कुठले लॉजिक? ही सूडबुद्धी झाली. मग सरळ सूडगत न्याय आणावा..जो बळी पडलाय त्याला/ त्याच्या अफेक्टेड जवळच्यांना न्यायदानाच्या प्रक्रियेत अधिकार द्या.

In reply to by शुचि

"My Years in a Pakistani Prison" हे किशोरीलाल शर्मा यांचे पुस्तक वाचा. कुठे काय चालू असते ते लक्षात येईल. आणि अतिरेक्यांना कसला आलाय प्रिझनर्स राईट?? निष्पाप लोकांच्या Right to Live शी खेळताना काही वाटले नाही का त्यांना?

सुनील 21/12/2010 - 23:34
सरबजीत सिंग गेली २१ वर्षे पाकिस्तानी तुरुंगात आहे. पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावून आणि त्याच्या दयेचा अर्ज फेटाळला जाऊन आता ५ वर्षे लोटली आहेत. पाकिस्तानी सरकारने त्याच्या कुटुंबियांना, त्याला भेटण्यासाठी, पाकिस्तानचा विसादेखिल उपलब्ध करून दिला होता. थोडक्यात भारत एकमेव नाही! बाकी चालू द्या..

In reply to by सुनील

गांधीवादी 22/12/2010 - 06:22
गेल्या २१ वर्षात त्याचे कीही हाल केले असतील देव जाने. इकडे कसाब, अफजल, बेग (कधीतरी सुटण्याच्या आशेत सुद्धा) ऐश मध्ये राहातायेत. असो, कारगिल विसरलात का ? इथे अमेरिकेचा आदर्श का ठेऊ नये ?

In reply to by अविनाशकुलकर्णी

चंद्रू 22/12/2010 - 01:00
आता सगळ्या आतंकवाद्यांचा बाप निधर्मि आतंकवाद जलमला हाय. . हिंदू झाले, मुस्लीम झाले, ख्रिश्चन (बोडो) झाले, नक्षली झाले. लयच आतंकवादी व्हायला लागलेत. सगळ्या जगातले आतंकवादी भारतातच कसे काय र्‍हायला आले? या सगळ्या आतंकवादी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी रामाने नायतर कृष्णानेच पुना जलम घ्यायाला हवा आहे. राम कुटे जलम घेणार? तेवा आता बाबरी मशीदीच्या जागी राम जलमस्थान बांधायला लवकर घ्यायाला हवं.

In reply to by चंद्रू

डावखुरा 22/12/2010 - 01:12
चंद्रु आधी मुस्लीम,बोडो झाले हिंदुंबद्दल अजुन कोर्टात मॅटर हाये समजलं का? तवा जरा सांभाळुन काय... क्रम संपादित करा राव अजुन आपल्याला तो मान मिळायला कोर्टाच्या पायर्या झिजवाव्या लाग्ण्रे... ;) >>>>राम कुटे जलम घेणार? तेवा आता बाबरी मशीदीच्या जागी राम जलमस्थान बांधायला लवकर घ्यायाला हवं. >>>> (अवांतर : हा युक्तिवाद त्या रामलल्ला दावेदार पेक्षा भारी नाही का वाटत?)

In reply to by डावखुरा

चंद्रू 24/12/2010 - 02:50
मिपावर लिवलं जातं ते सगळच कोर्टात(खालच्या नव्हे सुप्रीम) सिद्ध् झालेलं असतंय असं थोड़ंच हाय? अजून रामाच्या जलमस्थाणाबद्दल पण काय पण सिद्ध झालं नाय ? म्हणून काय आपण गेली तीस वर्ष जो घोळ घातलाय तो काय फुकट गेला काय? रामलल्लाचा सखा, दोस्त तर कोर्टाने मान्य केला का नाय ? तसंच हे पण माण्य होऊन जाईल. आपण थांबायची गरज नाय. आपन हिंदू काय कमी हौत की काय? सादा दहशतवाद आपल्याला जमत नाय हे म्हजे कायतरीच हा !

In reply to by चंद्रू

गांधीवादी 22/12/2010 - 06:29
आपण कदाचित उपहासाने लिहिले असेल पण इथे एक गंभीरपणे नमूद करतो. सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे. कोणीही शिवाजी, राम, गांधी आता पुनर्जन्म घेणार नाही याची त्याला खात्री पटू लागली आहे. रोजचे मरण डोळ्यासमोर पाहून पाहून नाहीतरी त्याची दृष्टी सुन्न होतंच आहे. एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल. मग त्याला 'क्रांती' नाव द्या कि 'दहशतवाद'. त्याने काही फरक पडत नाही.

In reply to by गांधीवादी

डावखुरा 22/12/2010 - 11:03
गांधीवादी मी उपहासाने बोललो...पण जे शक्य नाही त्यावर विचार करत बसण्यापेक्षा आपण स्वतःच का काहितरी करु नये असा विचार मनाला शिवतो... आपण गांधीवादी नाव धारण करुन मिपावर असल्याने मी आपणाला सुरवातीला वेगळा समजलो होतो परंतु आपण थोडेतरीसमविचारी आहोत हे पाहुन आनंद वाटला.. अवांतरःवेन्स्डे करायचा का?

विजुभाऊ 22/12/2010 - 10:28
सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे अशा प्रकारच्या वाक्याना इंग्रजीत प्लाटीट्यूड असे म्हणतात. एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल. एकदा जोरदार टाळ्य होऊन जाउ देत या वाक्यावर. गांधीवादी भारतातील लोकाना आतंकवाद किंवा सर्व तथाकथीत वादांवर एक जालीम हत्यार सापडले आहे. त्याचे नाव " जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है"

In reply to by विजुभाऊ

आत्मशून्य 22/12/2010 - 15:47
सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल. भारताच्या ज्ञात इतिहासात हे फक्त ईग्रजां वीरूध्द घडले आहे ते सूध्दा हातात काठी पण न घेता, बाकी देश त्याने स्वतंत्र झालाय का हे एक संशोधन ठरेल. तेव्हां असल्या भ्रामक कल्पना बाळगू नका भारतीयांबाबत. नाही म्हणायला या वेळच्या बीहारच्या नीवडनूका तसा सूखद धक्काच ठरला पण ...

जरी मनाला पटत नसले तरी.... हिन्दू अथवा मुस्लीम कीन्वा भारतीय वा पाकीस्तानी यापेक्शा याकडे निरपेक्शपने पाह्ण्याची गरज आहे.पूर्वग्रहद्रूश्टीने न बघता हा फक्त एका कैद्याची कुराण, वर्तमानपत्राची मागणी मान्य झाली असे बघावे व इतर कैद्यान्च्या बाबतीत दूजाभाव का हा एक प्रश्न होउ शकतो..

श्री.गांधीवादी..... तुमच्या "देश आणि सरकार" या विषयावरील इथले (इथलेच) विविध लेख मी नेहमी वाचत असतो. विषयाचे सादरीकरण करत असताना तुम्ही ऑनलाईन वर्तमानपत्रातील 'तशा' संदर्भातील बातम्यांचा उपयोग करता. हे जरी स्तुत्य असले तरी त्या त्रोटक (किंवा कायद्याच्या भाषेत Curtailed Pieces) स्वरूपात देत असल्याने बहुतांशी वाचकांचे त्यामुळे ज्या व्यक्तीविषयी (इथे कोर्ट श्रीमती उषा ठाकरे) चटकन प्रतिकूल मत बनते. (तुमच्या अशा विषयांतील भावनांशी सहमती दाखवूनच हे लिहित आहे.) "कुराण" द्यायला कोर्टाने सांगितले म्हणजे ठाकरे मॅडमनी फार मोठा गुन्हाच केला असे काहीसे धाग्यातील तुमच्या मांडणीने ध्वनीत होते. प्रत्यक्षात न्यायाधिश उषा ठाकरे यानी बेगच्या वकिलानी (श्री.रेहमान) केलेल्या मागणी अर्जावर 'दहशतवादविरोधी पथकाची हरकत आहे का?" असे विचारले असता त्या पथकाने तशी हरकत नसल्याचे म्हटले आहे. इतकेच काय येरवडा कारागृहाची त्या मागणीबाबत काही हरकत आहे का हेही विचारले गेल्यावर श्री.लटपटे (अधिक्षक) यानीही त्यास हरकत घेतली नाही. त्यामुळे मागणीचा तो अर्ज नामंजूर करण्याचे काही कारण न्यायाधिशांसमोर येतच नाही.....(त्यांना त्या खुर्चीवर बसल्यावर स्वतःचे मत नसते, जे काही चालते ते कायद्यातील तरतुदीनुसारच, हे तर तुम्ही मान्य कराल असे वाटते.) बाकी 'कुराण' वाचून अतिरेक्याच्या मूळच्या मनोवृत्ती काही फरक पडेल वा ना पडेल, हा स्वतंत्र धाग्याचा विषय असल्याने त्याबाबत भाष्य करीत नाही. इन्द्रा

गांधीवादी आता तुम्ही दर १२/१२ तासांनी असले वांझोटे विषय काढून आम्हा समस्त मिपाकरांचा जिव घेता. तरी आम्ही तुमचे लेखन वाचतो वर प्रतिसाद पण देतो का नाही ? तसेच आहे त्या हिमायतचे ;) ह . घ्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ए पर्‍या, तुझ्याकडे डायर्‍या शिल्लक आहेत का? गांधीवादावर उपचार म्हणून वाट रे थोड्या!

वेताळ 22/12/2010 - 11:25
अजुन एक बातमी वाच . त्यात हनिफ ला ऑस्ट्रेलियाला किती नुकसान भरपाई द्यावी लागली ते कळेल. नाहक कुणालाही शिक्षा होवु नये. न्यायालये त्याची कामे व्यवस्थित करत आहेत असे मला वाटते.तुम्ही जर न्यायाधिश असता तर खुप केसेस सुनावणी अगोदरच निकालात निघाल्या असत्या असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. सगळे मुस्लिम दहशतवादी असतात व सर्व हिंदु निधर्मी असतात ही तुमची धारणा खुप चुकीची आहे.

In reply to by वेताळ

चंद्रू 24/12/2010 - 03:00
हिंदू म्हनल्यावर तो निधर्मी कसा काय ? तो हिंदू धर्मिय नाय का ? तुमाला धर्मनिरपेक्ष म्हनायचं काय? पन धर्मनिर्पेक्ष हा शब्द लय बदनाम हाय (आडवानीना विचारा). कृपाकरून हिंदूंना धर्मनिरपेक्ष म्हनू नका? धर्मनिर्पेक्ष लोक लय डेंजर असतात.

तिमा 22/12/2010 - 13:04
आणीबाणीत महाराष्ट्रातल्या तुरुंगात आरेसेसवाले एकादशीचा उपवास छानपैकी साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी खाऊन साजरी करत होते. सकाळ संध्याकाळ तुरुंगात शाखाही भरवण्यात येत असत म्हणे.

ओ गांधीवादी, असले लेख थांबवा राव! कंटाळा यायला लागलाय. तुमच्या भावना काहीही असोत, आमच्या भावना काहीही असोत... एखादी असली बातमी घ्यायची आणि सारासार विचार न करता + थोडेसे अतिरंजित + किंचित भडक पद्धतीने लिहायचे. तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की भारतात न्यायव्यवस्था नसावी? सुविधांचा अतिरेक नसावा वगैरे ठीकच आहे. तुमचा सात्विक संताप असेल तर तेही समजू शकतो. पण जर का कायद्याप्रमाणे काही सुविधा सगळ्यांनाच दिल्या गेल्या असतील तर मग भेदभाव कसा करता येईल?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गांधीवादी 22/12/2010 - 15:19
आपण एक सदस्य म्हणून लिहित आहात असे मानून, >>ओ गांधीवादी, असले लेख थांबवा राव! हे असले म्हणजे कसले ? हे जरा स्पष्ट कराल काय. >>कंटाळा यायला लागलाय. मी काय करू शकतो ? लेख वाचणे/टाळणे आपल्या हातात आहे. मलासुद्धा इथल्या काही मान्यवरांचे लेख कंटाळवाणे वाटतात. असो, कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे तत्वतः जरी खरे असले तरी 'या कायदा पालनातून अतिरेक्यांना काय संदेश जातो' हे जास्त महत्वाचे ठरत नाही का ? आणि ह्या अतिरेक्यांच्या बाबतीत असे टोकाचे कायदे पाळून, भले आपले काही मान्यवर जगभर ताठ मानेने फिरू शकत असले तरी शेवटी बळी सामान्यांचाच जातो, कारण हे असले उद्योग करून 'त्या' अतिरेक्यांना काय जरब बसते, हे मी काय सांगायला हवे. अ. भारतात अतिरेकीपणा केला कि आपल्याला भयंकर शिक्षा होऊ शकते, ब. भारतात अतिरेकीपणा केला कि मग खेळा त्याच्याशी त्यांच्याच कायद्याच्या मुंडक्यावर बसून. यातील कोणता पर्याय आपल्याला निवडावासा वाटेल. प्रामाणिकपणे मनोमन स्वतःला उत्तर द्या, अवांतर : जे आमचे लेख वाचून सहन करतात, त्यांच्या सहनशक्तीची आम्ही प्रशंसा करतो. असो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. 'संस्थळावर लेखांचा अतिरेक' आणि 'अतिरेक्यांशी दयाबुद्धीने (राजकारणाने) प्रेतीत होऊन वागण्याचा अतिरेक' मोजण्याचे काही प्रमाण असेल तर नक्की (व्यनितून) कळवावे. तूर्तास ह्या चर्चेतून रजा घेत आहे. प्रतिसाद दिलेल्या, न दिलेल्या सर्वांचे आभार

अविनाश कदम 24/12/2010 - 02:36
दहशतवादाचा विषय दुर्लक्षून चालणार नाही तो आता कधीही तुमच्या दाराशी येऊन पोहचू शकतो.मुंबईत कालच काही दहशतवादी घुसल्याची बातमी आहे. या विषयाची टवाळकीने चर्चा करण्याऐवजी गांभिर्याने करावी नाहीतर करूच नये. मराठी मध्यमवर्गाला प्रत्येक विषयाच्या टवाळकीचं भारीच वेड लागलेलं आहे. त्याला ते विनोद म्हणतात. टवाळा आवडे विनोद---इती समर्थ रामदास

In reply to by अविनाश कदम

गांधीवादी 24/12/2010 - 05:26
सहमत आहे. आज भारतात कोणताही सन उत्सव असो, त्यावर ह्या दहशतवादाची संकटछाया असतेच. ताज, लोकल्स, शाळा, धार्मिक स्थळे, हॉटेल्स,वाहतुकीची ठिकाणे, हॉस्पिटल्स, मॉल्स, अश्या किती ठिकाणी आणि किती दिवस सुरक्षा ठेवणार. आज कुठेही बाहेर पडायची भीती कायम वाटत असते. कोणत्याही मंदिरात गेलो कि काय होईल सांगता येत नाही. नव्या माहितीप्रमाणे ४ दहशतवादी सध्या मुंबई मध्ये फिरातेयेत. मुंबई - मुंबईत घुसखोरी केलेल्या लष्करे तैयबाच्या चार दहशतवाद्यांपैकी वालिद जिना या दशतवाद्याचे छायाचित्र पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिले. मनुष्य ह्या गोष्टींचा रोज रोज विचार करून कंटाळा करतो, आणि मग काही काळासाठी निर्धास्त होतो, हेच तर अतिरेक्यांना हवे आहे. कायमचा तोडगा कोणालाच नको का ? अतिरेक्यांना भारतीय न्यायव्यवस्था अशी काही वागणूक देत आहे कि ते अतिरेकी नसून आपले पाहुणे आहेत, त्यांनी गुन्हे केले नसून त्यांनी भारतावर उपकार केलेले आहेत, ते तुरुंगात शिक्षा भोगत नसून ते महान भारताच्या महान परंपरेची लज्जत लुटतायेत. आणि अश्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत असतील आणि दुर्दैवाने त्या प्रसिद्ध होऊन त्याच अतिरेक्यांच्या कानावर पडत असतील तर किती मिश्कीलपणे हसत हसतील, याचा विचार कोणी केला आहे का ? आपण त्यांच्या देशात जातो, त्यांच्या लोकांना मारतो, त्यांच्याच कायद्याची थत्त उडवितो, ऐश मध्ये राहतो, वेळ आली कि सुटून सुद्धा येऊ शकतो. हा खंड, आम्हा सामान्यांना जगण्यासाठी आहे कि अतिरेक्यांना पोसण्यासाठी आहे ?

डावखुरा 21/12/2010 - 20:11
आपली संस्कृतीच आहे ती.. आणि हा देश गांधींचा आहे...(दुसरा गाल पुढे करणारा..) प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे.. मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग , अजमल कसाब , अफजल गुरु ह्या परमात्म्यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेऊन अनेक जण आता असे महान कार्य करायला आणि आपले आदरतिथ्य स्वीकारायला तयार आहेत.. आपणही मागे न हटता त्यांच्यासाठी चांगल्या कारागृहांची व्यवस्था करुन ठेवायला हवी.. (तशी शिफारस कर्णारे पत्र पंतप्रधान/राष्ट्रपतींना पाठ्वीन म्हणतो..सवडीने) तसेच सामान्य करदात्यांनीही अजिबात दिरंगाई न करता जे अनेक कर सरकारने लादले आहेत ते सर्व भरावेत..आणि अजुन लादले तरी काकु करु नये कारण ते आपल्या शाही पाहुण्यावरच खर्च होणार आहेत ना शेवटी आपली संस्कृती काय म्हणते "अतिथी देवो भव" मुर्ख लोक आहेत जे संतापुन त्यांना चौकात आणुन फासावर देण्याच्या गोष्टी करतात .... अहो त्यांच्या आदरातिथ्याने आपल्या संस्कृतीचा,परंपरेचा डंका चहुकडे नाहीए का पसरत.. अमेरिकेसारखा मुर्ख देश तर मी आजवर पाहीला नाही... सद्दाम ला मुद्दाम पकडला त्याच्यावर घाईघाईत खटला भरला आणि दोशी ठरवुन फाशी पण दिली अरे आधी आमचा सल्ला तर घेत्ला असता.. येवढे हाताशी आलेले अतिथी सेवेचे पुण्य घालावले छ्या....

In reply to by डावखुरा

गांधीवादी 22/12/2010 - 06:18
>>मुर्ख लोक आहेत जे संतापुन त्यांना चौकात आणुन फासावर देण्याच्या गोष्टी करतात .... मूर्खच नव्हे तर आजकाल व्यवस्थेविरुद्ध ब्र देखील काढला कि लगेच 'हिंदू दहशतवादी' म्हणून नामकरण होईल.

नितिन थत्ते 21/12/2010 - 21:19
परवाच एका चर्चेत 'हिंदू दहशतवादी' हा विषय चालू असताना "सिद्ध कुठे झालेय?" अशा अर्थाचा प्रतिसाद वाचल्याची आठवण झाली. असो. हा तर न्यायालयाचा आदेश आहे. (बोटचेप्या सरकारचा नाही).

In reply to by नितिन थत्ते

आत्मशून्य 22/12/2010 - 21:03
छळण्यासाठी. बाकी कोणी इस्लामी दहशतवादावीरूध्द लढा देत असेल आणी तो धर्माने हिंदू असलाच तर त्याला हिंदू दहशतवादी कसे म्हणता येइल, भलेही तो कायदेशीर व्याखेत दहशत्वादी म्हणून अडकला तरी जोपर्यंत तो असे म्हणत नाही की मी रामाचे, श्रीक्क्रुष्णाचे राज्य संपूर्ण प्रूथ्वीतलावर नीर्माण व्हावे म्हणून हल्ले घडवत आहे ? आणी समजा तसे म्हटलाच तर हिंदू त्याला अक्कलशून्य नाही का म्हणनार कारण रामाचे, श्रीक्क्रुष्णाचे राज्य जर प्रूथ्वीवर यायचे आहे तर ते स्वतः अवतार घेतील यूध्दात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामील होतील. ऊगीच धर्मरक्षणाचा क्लेम करणारा कोणत्याही हल्लेखोर इसमास कशाला पूढे करतील ? जय हो जय हो जय हो जय हो जय हो .......... (सदरील प्रतीसाद उपहासात्मक असून गांभीर्याने घेऊ नये ही विनंती)

In reply to by नितिन थत्ते

सुधीर काळे 22/12/2010 - 16:19
सरकारवर हवी तेवढी टीका करता येते, पण न्यायालयावर? ना बाबा ना! लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे. पण म्हणजे ते टीकापात्र नाहींत किंवा बोटचेपे नाहींत असे नाहीं पण असे बोलायची (या लोकशाहीतसुद्धा) चोरी!

In reply to by सुधीर काळे

टारझन 24/12/2010 - 11:13
लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे.
शक्यता नाकारता येत नाहि. - वकिल

शुचि 21/12/2010 - 21:43
"प्रिझनर्स राईट्स्/ह्युमन राईट्स" ह्या विषयावर काही लँड्मार्क निर्णय झालेले असू शकतील. हाच अतिरेकी काही काळाने जर सुटला तर आत जाताना ज्या वाईट मानसिक अवस्थेत गेला होता कमीत कमी त्याच अवस्थेत बाहेर यावा, त्याहून वाईट अवस्थेत येऊ नये ही कोर्टाची धारणा या मागे असू शकते. "प्रिझनर्स रिफॉर्म" नावची देखील काही गोष्ट असते. या गोष्टींचा साधक बाधक विचार होऊन - कुराण, वर्तमानपत्र आदि पुरविण्यात येत असावे.

In reply to by शुचि

डावखुरा 21/12/2010 - 23:00
शुचि तै छान युक्तीवद आहे... समजा तथाकथित हिंदु पाकिस्तानात पकडला गेला (आपले कोळी-मच्छिमार) तर त्याला पाकिस्तानात त्याच्या दैनंदिन गर्जेच्या निदान जगायला आवश्यक खाणेबल खाद्य तरी पुरवतात का? की त्याचेच मारुन मारुन भरीत करुन टाकतात? (कृपया व्यक्तिगत घेउ नये..)

In reply to by शुचि

गवि 22/12/2010 - 10:42
शुचि ताईंचे हे म्हणणे मान्य.. पाकिस्तानसारखीच आपलीही वागणूक असणे हे काही फार आय एस ओ प्रमाणपत्र नाही. हाल हाल करत ठेवावे असे नाही. पण अति चैनीचे लाईफही देऊ नये. उपरिनिर्दिष्ट कोर्टाने दिलेल्या गोष्टींमधे अतिचैनीची गोष्ट आहे का हा सापेक्ष विचार झाला. मला तरी त्यात काही ऐष वाटत नाही. लवकर निर्णय न देणे / फाशीचे एक्झेक्युशन न करणे या दुरित गोष्टीच आहेत. पण त्याच्या बाजूला कैद्यांना पाकिस्तान छळात ठेवते अशा माहितीने आपणही काहीसे तसे करावे हे कुठले लॉजिक? ही सूडबुद्धी झाली. मग सरळ सूडगत न्याय आणावा..जो बळी पडलाय त्याला/ त्याच्या अफेक्टेड जवळच्यांना न्यायदानाच्या प्रक्रियेत अधिकार द्या.

In reply to by शुचि

"My Years in a Pakistani Prison" हे किशोरीलाल शर्मा यांचे पुस्तक वाचा. कुठे काय चालू असते ते लक्षात येईल. आणि अतिरेक्यांना कसला आलाय प्रिझनर्स राईट?? निष्पाप लोकांच्या Right to Live शी खेळताना काही वाटले नाही का त्यांना?

सुनील 21/12/2010 - 23:34
सरबजीत सिंग गेली २१ वर्षे पाकिस्तानी तुरुंगात आहे. पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावून आणि त्याच्या दयेचा अर्ज फेटाळला जाऊन आता ५ वर्षे लोटली आहेत. पाकिस्तानी सरकारने त्याच्या कुटुंबियांना, त्याला भेटण्यासाठी, पाकिस्तानचा विसादेखिल उपलब्ध करून दिला होता. थोडक्यात भारत एकमेव नाही! बाकी चालू द्या..

In reply to by सुनील

गांधीवादी 22/12/2010 - 06:22
गेल्या २१ वर्षात त्याचे कीही हाल केले असतील देव जाने. इकडे कसाब, अफजल, बेग (कधीतरी सुटण्याच्या आशेत सुद्धा) ऐश मध्ये राहातायेत. असो, कारगिल विसरलात का ? इथे अमेरिकेचा आदर्श का ठेऊ नये ?

In reply to by अविनाशकुलकर्णी

चंद्रू 22/12/2010 - 01:00
आता सगळ्या आतंकवाद्यांचा बाप निधर्मि आतंकवाद जलमला हाय. . हिंदू झाले, मुस्लीम झाले, ख्रिश्चन (बोडो) झाले, नक्षली झाले. लयच आतंकवादी व्हायला लागलेत. सगळ्या जगातले आतंकवादी भारतातच कसे काय र्‍हायला आले? या सगळ्या आतंकवादी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी रामाने नायतर कृष्णानेच पुना जलम घ्यायाला हवा आहे. राम कुटे जलम घेणार? तेवा आता बाबरी मशीदीच्या जागी राम जलमस्थान बांधायला लवकर घ्यायाला हवं.

In reply to by चंद्रू

डावखुरा 22/12/2010 - 01:12
चंद्रु आधी मुस्लीम,बोडो झाले हिंदुंबद्दल अजुन कोर्टात मॅटर हाये समजलं का? तवा जरा सांभाळुन काय... क्रम संपादित करा राव अजुन आपल्याला तो मान मिळायला कोर्टाच्या पायर्या झिजवाव्या लाग्ण्रे... ;) >>>>राम कुटे जलम घेणार? तेवा आता बाबरी मशीदीच्या जागी राम जलमस्थान बांधायला लवकर घ्यायाला हवं. >>>> (अवांतर : हा युक्तिवाद त्या रामलल्ला दावेदार पेक्षा भारी नाही का वाटत?)

In reply to by डावखुरा

चंद्रू 24/12/2010 - 02:50
मिपावर लिवलं जातं ते सगळच कोर्टात(खालच्या नव्हे सुप्रीम) सिद्ध् झालेलं असतंय असं थोड़ंच हाय? अजून रामाच्या जलमस्थाणाबद्दल पण काय पण सिद्ध झालं नाय ? म्हणून काय आपण गेली तीस वर्ष जो घोळ घातलाय तो काय फुकट गेला काय? रामलल्लाचा सखा, दोस्त तर कोर्टाने मान्य केला का नाय ? तसंच हे पण माण्य होऊन जाईल. आपण थांबायची गरज नाय. आपन हिंदू काय कमी हौत की काय? सादा दहशतवाद आपल्याला जमत नाय हे म्हजे कायतरीच हा !

In reply to by चंद्रू

गांधीवादी 22/12/2010 - 06:29
आपण कदाचित उपहासाने लिहिले असेल पण इथे एक गंभीरपणे नमूद करतो. सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे. कोणीही शिवाजी, राम, गांधी आता पुनर्जन्म घेणार नाही याची त्याला खात्री पटू लागली आहे. रोजचे मरण डोळ्यासमोर पाहून पाहून नाहीतरी त्याची दृष्टी सुन्न होतंच आहे. एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल. मग त्याला 'क्रांती' नाव द्या कि 'दहशतवाद'. त्याने काही फरक पडत नाही.

In reply to by गांधीवादी

डावखुरा 22/12/2010 - 11:03
गांधीवादी मी उपहासाने बोललो...पण जे शक्य नाही त्यावर विचार करत बसण्यापेक्षा आपण स्वतःच का काहितरी करु नये असा विचार मनाला शिवतो... आपण गांधीवादी नाव धारण करुन मिपावर असल्याने मी आपणाला सुरवातीला वेगळा समजलो होतो परंतु आपण थोडेतरीसमविचारी आहोत हे पाहुन आनंद वाटला.. अवांतरःवेन्स्डे करायचा का?

विजुभाऊ 22/12/2010 - 10:28
सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे अशा प्रकारच्या वाक्याना इंग्रजीत प्लाटीट्यूड असे म्हणतात. एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल. एकदा जोरदार टाळ्य होऊन जाउ देत या वाक्यावर. गांधीवादी भारतातील लोकाना आतंकवाद किंवा सर्व तथाकथीत वादांवर एक जालीम हत्यार सापडले आहे. त्याचे नाव " जब जब जो जो होना है तब तब सो सो होता है"

In reply to by विजुभाऊ

आत्मशून्य 22/12/2010 - 15:47
सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा आता अंत जवळ आलेला आहे एके दिवशी तोच काहीतरी करून पेटून उठेल. भारताच्या ज्ञात इतिहासात हे फक्त ईग्रजां वीरूध्द घडले आहे ते सूध्दा हातात काठी पण न घेता, बाकी देश त्याने स्वतंत्र झालाय का हे एक संशोधन ठरेल. तेव्हां असल्या भ्रामक कल्पना बाळगू नका भारतीयांबाबत. नाही म्हणायला या वेळच्या बीहारच्या नीवडनूका तसा सूखद धक्काच ठरला पण ...

जरी मनाला पटत नसले तरी.... हिन्दू अथवा मुस्लीम कीन्वा भारतीय वा पाकीस्तानी यापेक्शा याकडे निरपेक्शपने पाह्ण्याची गरज आहे.पूर्वग्रहद्रूश्टीने न बघता हा फक्त एका कैद्याची कुराण, वर्तमानपत्राची मागणी मान्य झाली असे बघावे व इतर कैद्यान्च्या बाबतीत दूजाभाव का हा एक प्रश्न होउ शकतो..

श्री.गांधीवादी..... तुमच्या "देश आणि सरकार" या विषयावरील इथले (इथलेच) विविध लेख मी नेहमी वाचत असतो. विषयाचे सादरीकरण करत असताना तुम्ही ऑनलाईन वर्तमानपत्रातील 'तशा' संदर्भातील बातम्यांचा उपयोग करता. हे जरी स्तुत्य असले तरी त्या त्रोटक (किंवा कायद्याच्या भाषेत Curtailed Pieces) स्वरूपात देत असल्याने बहुतांशी वाचकांचे त्यामुळे ज्या व्यक्तीविषयी (इथे कोर्ट श्रीमती उषा ठाकरे) चटकन प्रतिकूल मत बनते. (तुमच्या अशा विषयांतील भावनांशी सहमती दाखवूनच हे लिहित आहे.) "कुराण" द्यायला कोर्टाने सांगितले म्हणजे ठाकरे मॅडमनी फार मोठा गुन्हाच केला असे काहीसे धाग्यातील तुमच्या मांडणीने ध्वनीत होते. प्रत्यक्षात न्यायाधिश उषा ठाकरे यानी बेगच्या वकिलानी (श्री.रेहमान) केलेल्या मागणी अर्जावर 'दहशतवादविरोधी पथकाची हरकत आहे का?" असे विचारले असता त्या पथकाने तशी हरकत नसल्याचे म्हटले आहे. इतकेच काय येरवडा कारागृहाची त्या मागणीबाबत काही हरकत आहे का हेही विचारले गेल्यावर श्री.लटपटे (अधिक्षक) यानीही त्यास हरकत घेतली नाही. त्यामुळे मागणीचा तो अर्ज नामंजूर करण्याचे काही कारण न्यायाधिशांसमोर येतच नाही.....(त्यांना त्या खुर्चीवर बसल्यावर स्वतःचे मत नसते, जे काही चालते ते कायद्यातील तरतुदीनुसारच, हे तर तुम्ही मान्य कराल असे वाटते.) बाकी 'कुराण' वाचून अतिरेक्याच्या मूळच्या मनोवृत्ती काही फरक पडेल वा ना पडेल, हा स्वतंत्र धाग्याचा विषय असल्याने त्याबाबत भाष्य करीत नाही. इन्द्रा

गांधीवादी आता तुम्ही दर १२/१२ तासांनी असले वांझोटे विषय काढून आम्हा समस्त मिपाकरांचा जिव घेता. तरी आम्ही तुमचे लेखन वाचतो वर प्रतिसाद पण देतो का नाही ? तसेच आहे त्या हिमायतचे ;) ह . घ्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ए पर्‍या, तुझ्याकडे डायर्‍या शिल्लक आहेत का? गांधीवादावर उपचार म्हणून वाट रे थोड्या!

वेताळ 22/12/2010 - 11:25
अजुन एक बातमी वाच . त्यात हनिफ ला ऑस्ट्रेलियाला किती नुकसान भरपाई द्यावी लागली ते कळेल. नाहक कुणालाही शिक्षा होवु नये. न्यायालये त्याची कामे व्यवस्थित करत आहेत असे मला वाटते.तुम्ही जर न्यायाधिश असता तर खुप केसेस सुनावणी अगोदरच निकालात निघाल्या असत्या असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. सगळे मुस्लिम दहशतवादी असतात व सर्व हिंदु निधर्मी असतात ही तुमची धारणा खुप चुकीची आहे.

In reply to by वेताळ

चंद्रू 24/12/2010 - 03:00
हिंदू म्हनल्यावर तो निधर्मी कसा काय ? तो हिंदू धर्मिय नाय का ? तुमाला धर्मनिरपेक्ष म्हनायचं काय? पन धर्मनिर्पेक्ष हा शब्द लय बदनाम हाय (आडवानीना विचारा). कृपाकरून हिंदूंना धर्मनिरपेक्ष म्हनू नका? धर्मनिर्पेक्ष लोक लय डेंजर असतात.

तिमा 22/12/2010 - 13:04
आणीबाणीत महाराष्ट्रातल्या तुरुंगात आरेसेसवाले एकादशीचा उपवास छानपैकी साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची भाजी खाऊन साजरी करत होते. सकाळ संध्याकाळ तुरुंगात शाखाही भरवण्यात येत असत म्हणे.

ओ गांधीवादी, असले लेख थांबवा राव! कंटाळा यायला लागलाय. तुमच्या भावना काहीही असोत, आमच्या भावना काहीही असोत... एखादी असली बातमी घ्यायची आणि सारासार विचार न करता + थोडेसे अतिरंजित + किंचित भडक पद्धतीने लिहायचे. तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की भारतात न्यायव्यवस्था नसावी? सुविधांचा अतिरेक नसावा वगैरे ठीकच आहे. तुमचा सात्विक संताप असेल तर तेही समजू शकतो. पण जर का कायद्याप्रमाणे काही सुविधा सगळ्यांनाच दिल्या गेल्या असतील तर मग भेदभाव कसा करता येईल?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गांधीवादी 22/12/2010 - 15:19
आपण एक सदस्य म्हणून लिहित आहात असे मानून, >>ओ गांधीवादी, असले लेख थांबवा राव! हे असले म्हणजे कसले ? हे जरा स्पष्ट कराल काय. >>कंटाळा यायला लागलाय. मी काय करू शकतो ? लेख वाचणे/टाळणे आपल्या हातात आहे. मलासुद्धा इथल्या काही मान्यवरांचे लेख कंटाळवाणे वाटतात. असो, कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे तत्वतः जरी खरे असले तरी 'या कायदा पालनातून अतिरेक्यांना काय संदेश जातो' हे जास्त महत्वाचे ठरत नाही का ? आणि ह्या अतिरेक्यांच्या बाबतीत असे टोकाचे कायदे पाळून, भले आपले काही मान्यवर जगभर ताठ मानेने फिरू शकत असले तरी शेवटी बळी सामान्यांचाच जातो, कारण हे असले उद्योग करून 'त्या' अतिरेक्यांना काय जरब बसते, हे मी काय सांगायला हवे. अ. भारतात अतिरेकीपणा केला कि आपल्याला भयंकर शिक्षा होऊ शकते, ब. भारतात अतिरेकीपणा केला कि मग खेळा त्याच्याशी त्यांच्याच कायद्याच्या मुंडक्यावर बसून. यातील कोणता पर्याय आपल्याला निवडावासा वाटेल. प्रामाणिकपणे मनोमन स्वतःला उत्तर द्या, अवांतर : जे आमचे लेख वाचून सहन करतात, त्यांच्या सहनशक्तीची आम्ही प्रशंसा करतो. असो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. 'संस्थळावर लेखांचा अतिरेक' आणि 'अतिरेक्यांशी दयाबुद्धीने (राजकारणाने) प्रेतीत होऊन वागण्याचा अतिरेक' मोजण्याचे काही प्रमाण असेल तर नक्की (व्यनितून) कळवावे. तूर्तास ह्या चर्चेतून रजा घेत आहे. प्रतिसाद दिलेल्या, न दिलेल्या सर्वांचे आभार

अविनाश कदम 24/12/2010 - 02:36
दहशतवादाचा विषय दुर्लक्षून चालणार नाही तो आता कधीही तुमच्या दाराशी येऊन पोहचू शकतो.मुंबईत कालच काही दहशतवादी घुसल्याची बातमी आहे. या विषयाची टवाळकीने चर्चा करण्याऐवजी गांभिर्याने करावी नाहीतर करूच नये. मराठी मध्यमवर्गाला प्रत्येक विषयाच्या टवाळकीचं भारीच वेड लागलेलं आहे. त्याला ते विनोद म्हणतात. टवाळा आवडे विनोद---इती समर्थ रामदास

In reply to by अविनाश कदम

गांधीवादी 24/12/2010 - 05:26
सहमत आहे. आज भारतात कोणताही सन उत्सव असो, त्यावर ह्या दहशतवादाची संकटछाया असतेच. ताज, लोकल्स, शाळा, धार्मिक स्थळे, हॉटेल्स,वाहतुकीची ठिकाणे, हॉस्पिटल्स, मॉल्स, अश्या किती ठिकाणी आणि किती दिवस सुरक्षा ठेवणार. आज कुठेही बाहेर पडायची भीती कायम वाटत असते. कोणत्याही मंदिरात गेलो कि काय होईल सांगता येत नाही. नव्या माहितीप्रमाणे ४ दहशतवादी सध्या मुंबई मध्ये फिरातेयेत. मुंबई - मुंबईत घुसखोरी केलेल्या लष्करे तैयबाच्या चार दहशतवाद्यांपैकी वालिद जिना या दशतवाद्याचे छायाचित्र पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिले. मनुष्य ह्या गोष्टींचा रोज रोज विचार करून कंटाळा करतो, आणि मग काही काळासाठी निर्धास्त होतो, हेच तर अतिरेक्यांना हवे आहे. कायमचा तोडगा कोणालाच नको का ? अतिरेक्यांना भारतीय न्यायव्यवस्था अशी काही वागणूक देत आहे कि ते अतिरेकी नसून आपले पाहुणे आहेत, त्यांनी गुन्हे केले नसून त्यांनी भारतावर उपकार केलेले आहेत, ते तुरुंगात शिक्षा भोगत नसून ते महान भारताच्या महान परंपरेची लज्जत लुटतायेत. आणि अश्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत असतील आणि दुर्दैवाने त्या प्रसिद्ध होऊन त्याच अतिरेक्यांच्या कानावर पडत असतील तर किती मिश्कीलपणे हसत हसतील, याचा विचार कोणी केला आहे का ? आपण त्यांच्या देशात जातो, त्यांच्या लोकांना मारतो, त्यांच्याच कायद्याची थत्त उडवितो, ऐश मध्ये राहतो, वेळ आली कि सुटून सुद्धा येऊ शकतो. हा खंड, आम्हा सामान्यांना जगण्यासाठी आहे कि अतिरेक्यांना पोसण्यासाठी आहे ?
जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला येरवडा कारागृहात वाचण्यासाठी कुराण, वर्तमानपत्र द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश उषा ठाकरे यांनी दिला. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका बॉम्ब स्फोटाने १७ निष्पापांचा जीव घेतला आणि ५०-६० लोकांना जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग याला (७ महिन्यांनी) अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथून अटक केली.