पानिपत माझ्या माहितीप्रमणे १७६१...
अजून काही शब्द....आणि ते अठरा विश्वे (दारिद्र्य) या शब्दाची व्युत्पत्ती ..... त्यातले विश्वे हे विश्वे नसून विसवे आहे..म्हणजे अठरा विसवे... म्हणजे एटीन टाईम्स ट्वेन्टी...म्हणजे टोटल ३६० ... म्हणजे वर्षातले ३६० दिवस म्हणजे सगळेच दिवस दारिद्र्य.... :).... २४ * ७ दारिद्र्य...
त्यातले विश्वे हे विश्वे नसून विसवे आहे..म्हणजे अठरा विसवे... म्हणजे एटीन टाईम्स ट्वेन्टी
चांगली माहीती आणि बरोबर वाटणारी....तरी पण अठरा आणि वीस हे क्रमांकच का? १२ आणि ३०, ३६ आणि १० का नसावेत?
हा खुलासा मी दूरचित्रवाणीवर शन्नांच्या तोंडून ऐकला होता.
आता 'अठरा विसवे'च का ते पाहू. पाढे मराठीत म्हणताना एखादी संख्या गुणिले दहा हे ......दाहे....... असे म्हणतात. त्याचप्रमाणे अठरा दाहे ऐंसासे, अठरा अकरे.............अठरा विसवे तीनशे साठ.
एका वर्षातील दिवस= ३६५
म्हणजेच साधारण ३६० मानायला हरकत नाही. अठरा विसवेचे पुढे अपभ्रंश होऊन अठरा विश्वे झाले.
१ मैल = १७६० यार्ड. दोन्ही प्रमाणे जुन्या काळी प्रचलित होती. याचा काही संबंध असू शकेल का? बाकी अठरा विसवे ची व्युत्पत्ती सही आहे.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली. मनांत विचार आला की पूर्वी म्हणत असतील, "१७६० च्या गोष्टी सांगत बसू नकोस (पाल्हाळ नको, मुद्द्याचे बोल)." त्यावरूनच कदाचित् वाक्प्रचार झाला असेल, "१७६० गोष्टी सांगणे".
हम्म.. Good Guess! :)
तात्या.
मुंबईच्या भेंडीबाजारची ही गोष्ट एका मासिकात वाचली होती:
पुर्वी या ठिकाणी इंग्रजांची छावणी होती त्याच्याच मागील बाजूस आठवड्याचा बाजार भरायचा त्यामुळे या छावणीतील अधिकारी पत्रव्यवहार करताना 'Behind The Bazar' असा उल्लेख करायचे,कालांतराने त्याचा 'भेंडीबाजार' झाला. अलेक्झांडरचा 'शिकंदर' असाच झाला होता.
आमच्या पुण्यातील वडगाव मावळ मधे इश्टूर फाकडा नामक व्यक्तीच्या नावाने ऊरुस(जत्रा) भरतो. हा इश्टूर फाकडा म्हणजे मूळचा स्टूअर्ट फोर्ड-इंग्रज लष्करातील एक अधिकारी. त्याने या गावात बरीच समाजकार्ये केली त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर गाववाल्यांनी त्याची इथेच समाधी बांधली आणि दरवर्षी त्याच्या नावाने जत्रा भरू लागली.
कलकत्त्याच्या बाबतीत वाचलेली ही गोष्टः(किती खरी किती खोटी? माहित नाही)
एक इंग्रज अधिकारी वाट चूकून या गावात आला.जवळच एक शेतकरी गवताच्या गंज्या एकावर एक रचून ठेवत होता,या इंग्रज अधिकार्याने त्याला गावाचे नाव विचारले(अर्थात इंग्रजीमधून) मात्र त्याची भाषा न समजल्याने शेतकर्याने तो गवताच्या गंजीबद्दल विचारत असावा असा समज करुन घेतला आणि त्याने इंग्रज सायबाला उत्तर दिले-कोल काटा(काल कापले).याच कोलकात्याचे इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार कॅलकटा केले आणि काही काळापूर्वी बंगाली जनतेच्या आग्रहास्तव त्याचे पुन्हा कोलकाता झाले.
आणखी बर्याच गमतीदार गोष्टी आहेत सवडीने लिहीन.
मुंबईतील हार्बर लाईन वरील कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव तिथे असलेल्या सुताच्या गिरण्यांमुळे आले असावे का? (ह्. घ्या.)
-अमित
------------------------------------------
Doing what you don't like is being employed and not liking what you do is common human nature!
अमितराव,
पुर्वी या हार्बर लाईन जवळ आजूबाजूच्या झोपड्यातले लोक खाटा (कॉट) टाकून झोपायचे आणि वर हिरव्या (ग्रीन) गोधड्या पांघरायचे म्हणून त्याला 'कॉट एन ग्रीन' म्हणायचे,काही काळानंतर त्याचे 'कॉटन ग्रीन' झाले.( हे पण ह. घ्या.)
अजून काहीतरी गमतीदार वाचायला मिळावे... हीच अपेक्षा
(इनोदी) -इनोबा
लंकेची पार्वती..
म्हणजे नक्की काय? तर काहीही आभूषणे न घातलेली अगदीच साधी होऊन एखाद्या शुभ कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेली स्त्री... पण पार्वतीच का? कारण पार्वती कधी लंकेत गेली होती? तिथे अशोक वनात तर सीता होती..
नेहमी भेडसावणारा प्रश्न..
- प्राजु
प्रतिक्रिया
पानिपत
लोकसत्तामध्ये
सतलज चे बरोबर आहे .........
एक प्रश्न
'अठरा विसवे'च
हा खुलासा मी दूरचित्रवाणीवर शन्नांच्या तोंडून ऐकला होता.
आता 'अठरा विसवे'च का ते पाहू. पाढे मराठीत म्हणताना एखादी संख्या गुणिले दहा हे ......दाहे....... असे म्हणतात. त्याचप्रमाणे अठरा दाहे ऐंसासे, अठरा अकरे.............अठरा विसवे तीनशे साठ.
एका वर्षातील दिवस= ३६५
म्हणजेच साधारण ३६० मानायला हरकत नाही. अठरा विसवेचे पुढे अपभ्रंश होऊन अठरा विश्वे झाले.
अहो तेच तर
१७६०
असू शकेल.
छान..
आणखी काही
कॉटन ग्रीन
हा हा हा
तसेच..
छान सदर आहे. ......
उत्ताप्पा