अपराध
हा दोन दिवसांपासून ऐश्वर्यसंपन्न सोहळा पाहत होता. सरबराईने समाधानी होता. पण कोठेतरी माशी शिंकावी तशी याच्या मामेभावाची बातमी समजली. जुनी खपली निघाली.
हा त्वरेने सभेत आला.
भावी वधूचे हरण करणाऱ्या त्या काळ्या मामेभावाला पाहताच याचे मस्तक भणाणलं. बाहू फुरफुरले. आज भर सभेत त्याची लायकीच काढायची म्हणून तो गरजला.
"ना ज्ञानी, ना गुणी, ना कर्ता, ... या कूलहीन, पळपुट्या, नीच, कपटी माणसाचं काय कौतुक लावलाय ?..... अक्कल गहाण टाकली काय तुम्ही सर्वानी?" सरबत्तीच केली याने.
सारी सभा अवाक झाली. घटकाभर रान पेटले.
आणि भरला...पापाचा घडा भरला. शंभर अपराध पूर्ण. बस्स....सुईंईं...आवाज करत वायुवेगाने सुदर्शन चक्र सुटले आणि याचे मस्तक आकाशात उडाले.
टीप : महाभारतातील प्रसंगावर आधारित.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
18 Apr 2020 - 9:39 pm | जव्हेरगंज
कसलाच संदर्भ लागला नाही!! पण इंटरेस्टिंग वाटतेय!!
18 Apr 2020 - 11:23 pm | ज्योति अळवणी
पांडवांनी खांडव वन राख करून इंद्रप्रस्थ स्थापन केले. त्यानंतर अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरले आणि तसा अश्व सोडण्यात आला. भारतवर्ष फिरून तो अश्व परतला आणि यज्ञाच्या संगतेची तयारी करण्यात आली. यज्ञाला सुरवात करताना अग्र पूजेचा पांडवांनी श्रीकृष्णाला देण्याचे जाहीर करताच शिशुपालाने वरील कथेमध्ये सांगितलेले अनुचित उद्गार काढले.
शिशुपालाच्या मातेस, म्हणजे श्रीकृष्णाची आत्या हिला श्रीकृष्णाने वचन दिले होते की तो शिशुपालाचे शंभर अपराध पोटात घालेल. मात्र त्यानंतर त्याची गय तो करणार नाही. वरील अनुचित उद्गार हा शिशुपालाचा शंभरावा अपराध होता. त्यामुळे त्याने असे म्हणताच श्रीकृष्णाने सुदर्शन चक्रास आव्हान करून शिशुपालाचा वध केला
19 Apr 2020 - 10:12 am | जव्हेरगंज
रोचक!!
+१ कथेसाठी!!
19 Apr 2020 - 1:29 am | शलभ
+1
19 Apr 2020 - 9:07 am | स्वलिखित
+१
25 Apr 2020 - 12:02 am | मुक्त विहारि
+1