विडंबन
भस्म्या
मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे.
>>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या
ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील.
काव्यरस
क्रांतीकारी कुटुंब !!!
भारतात एक क्रांतीकारी कुटुंब आहे.
त्या कुटुंबाची, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात सर्वांना माहिती व्हावी म्हणुन या लेखाचा प्रपंच.
त्या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे वडील यांनी अनेक कुटुंबांना पोलीओ चे महत्त्व समजावून सांगितले आहे.
अनेक जाहिरातीत सुद्धा ते अधून मधून विविध वस्तूंचे महत्त्व लोकांना समजावतात.
तसेच सध्या एका कार्यक्रमाद्वारे ते अनेकांना करोडो रुपये वाटत आहेत.
खुप साधे सोपे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारुन विचारुन ते अनेकांना श्रीमंत बनवत आहेत.
तिथे जायचा कंटाळा असेल तर घरीच बसून तुम्ही लखपती सुद्धा होवू शकता बरे का, लोकांनो!
याहून पैसे मिळवणे सोपे ते कसे असू शकेल बरे?
म
(भांडणं..तिचं)
जयश्रीताईंची सांज ही अशी थांबली आणि आम्हाला आमची लांबलेली (गुलाबी) सांज ही अशी आठवली -
लांबलेली सांज,
कातरवेळ...
मनात तीच..
तशीच नेहमीसारखी !
तेच जीवघेणं मौन ,
तीच नजर करारी.
त्या नजरेची दहशत,
ते गर्भगळीत होणं...नकळत !!
ते बहाणे, ती धडपड, ती धडधड...
लवकर कल्टी मारण्यासाठी.
मग कबुली, ते न पटणं, समजून न घेणं
मी फिक्सर, ती हिटलर ....
सार्या संध्येचा विसर !
बागेतलं भटकणं,
पावसातलं भिजणं,
बारमधलं रमणं,
शर्टावरल्या गुलाबी खुणा....
...
..
अन् अचानक...
अचानक तिचं प्रकटणं ..
मग तिचं अस्तित्व,
खरं, वास्तवातलं
कानफटातलं, बुक्क्यांतलं !
त
काव्यरस
विड्या एक फुंकणे
( विनायक पाचलग यांचा स्मृतीरंजनात्मक लेख वाचून आमच्याही काही बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या)
आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळांएवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन आधुनिकता कशी वाईटच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते.
(पडुन आहे गात्र कुजुनि)
प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे.
लेले..
अब्द फाटलेले आभाळ रापलेले
इडलीमधून वाफा उ:श्वास तापलेले.
ओठांतुनी निघाला चमचा तसाच उष्टा
त्या कृष्ण कुन्तलाने सांबार गाठलेले..
पार्श्वात काय माझ्या ही वेदना कळेना
पंकातल्या बुटांनी नाकाड घासलेले.
स्वप्नात का असेना तो मेघ प्राशलेला
आयुष्य मात्र सारे श्वानास घातलेले.
पोलीस राइस
स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या आसपास चा परिसर
वेळ : साधारण रात्रीचे ८
अशीच एक स्त्याच्या कडेची चायनिस ची गाडी ...
कुठल्याही सामान्य इतर खाण्याच्या गाड्या असतात तशीच , लालभडक रंगात रंगवलेली
द्र्यागन ची भडक चित्र असलेली , आणि तसंच काहीसं नाव असलेली ..
फक्त C .S .T . परिसरात म्हणून, सोन्याची किंमत..
गाडीच्या आजूबाजूला ४ फळकुट ,४ टेबलं, गाडीच्या आतल्या बाजुला गिऱ्हाइकांच "उरलेलं ,उष्ट-माष्ट" टाकण्यासाठी एक डबा, पाण्याचं एक पिंप एवढीच काय ती investment
आजूबाजूच्या ५ स्टार,2 स्टार , किंव्हा अतिशय सामान्य हाटेलात सुद्धा जायची ऐपत नसणाऱ्या लोकांचं आश्रय स्थान .
(पुन्हा टवाळी)
प्रेरणा - प्राजु यांची शुभेच्छापर कविता 'पुन्हा दिवाळी'.
वळवळती त्या जिभा, गुलाबी कट्ट्यावरती संध्याकाळी
चुगल्या, लफडी, गॉसिपमधुनी मुक्त चालु दे पुन्हा टवाळी
कुणी कुणाच्या खोलीमधुनी.. ओल्या नवथर सोनसकाळी
सलज्ज लपुनी आले निघुनी, विचारते बघ पुन्हा टवाळी
सजून जाती तरुणी काही, रंग रंगुनी कॉस्मेटिक्सनी
शिट्या मारुनी, गाणी म्हणुनी, हसत चालु दे पुन्हा टवाळी
मिसळपावची लज्जत ऐसी, झणझण तर्री जिव्हा जाळी
आणि चहाचा दरवळ न्यारा, घेउन येतो पुन्हा टवाळी
हास्य-विनोदी झरा वाहु दे, परमेशा!
काव्यरस
मिसळपाव
अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका