Skip to main content

विडंबन

(घट डोईवर घट कमरेवर)

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 05/01/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा पी. सावळाराम यांची माफी मागून, घट सगळे धर चल सखये, नळ मोरीमधला बंद झाला, बंद झाला रे ॥धृ.॥ धुणि कशि होतील, अर्धीच र्‍हातील, जो तो आता रांगही लावील सर्व कुळाच्या संडासाला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥१॥ बघ तो वरचा भट शिंदळिचा, कितके घट तो आणि एकटा मध्येच लायनित तो घुसला रे, बंद झाला रे बंद झाला रे ॥२॥ नेलीस जोडी, भरे तेवढी तोवर करतो जिन्यात कोंडी छकुली तूही धर हा पेला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥३॥ मूळ गीत : घट डोईवर घट कमरेवर
काव्यरस

लाखाचा असो वा कोटीचा, तुमचे आमचे सेम असते..........

लेखक अमोल देशमुख यांनी शुक्रवार, 31/12/2010 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आदर्श म्हणॆ लवासाला तु किती लाखाचा तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला तु किती कोटीचा एक घोटाळा म्हणे दुस-याला काडीने खाल्ले काय अन हाताने खाल्ले काय शेण म्हणजे शेण असते लाखाचा असो वा कोटीचा तुमचे आमचे सेम असते अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली.

(गाडी सुटली , रुमाल हलले)

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 16/12/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता : संदीप खरे गाडी सुटली , हमाल हलले , काढा चाळीस पटकन बोले, गाडी सुटली , पाकीट निघता , हमाल डोळे हसरे झाले, गाडी सुटली नोट वीसाची , हातामधुनि तरी सुटेना , चार बोचकी चाळीस रुपडे , पटू दे म्हटले तरी पटेना, का रे इतका जीव जाळुनी , नोट वीसाची हाती मिळते, डोळ्यादेखत गायब होते , खुर्दा चिल्लर हाती उरते. गाडी गेली फलाटावरी , लालपणाचा गलका झाला, गाडी गेली , सोडा मारुन जीव तापला हलका झाला. हे भलते अवजड असते , कुणी प्रचंडसे पेटारे , ते लांब लांब नेताना, डोक्याच्या उप्पर आणि काहिसे खूप घेताना,

(एक बाई ठेवावी म्हणतोय!)

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 15/12/2010 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल :) एक बाई ठेवावी म्हणतोय.... एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला गरमागरम भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!! शुभ्र दळलेली जवार बनवी होऊनि तदाकार अस्सल मर्‍हाटी भाकर सुबक, पातळ, गोलाकार एक बाई ठेवावी म्हणतोय दिसायला असु द्या कशीतरी नसो अंगी बाकी काही गुण फक्त भाकरी मिळो ऊनऊन तर एक बाई ठेवावी म्हणतोय! (मित्रहो, तुमचा काय सल्ला?) :)
काव्यरस

एक नवा घोर

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 14/12/2010 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे. ______ काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला.

तुम्हिच सुचवा शीर्षक .........

लेखक पियुशा यांनी सोमवार, 13/12/2010 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
(जाहिरातींचे विडंबन आहे सहज म्हनुन! खुप डोक खाजवल पन नाहि सुचल तुम्हिच करा बारस !) सकाळचे सहा वाजले पहिला गजर झाला आणि आणि कोणत्या गाढवाने (मीच )लावला हा असे म्हणत तो रागारागात बंद करून मी पुन्हा झोपी गेले ,आई आली ए म्हशे (प्रेमाने म्हणते )उठ आता लवकर किती वेळ लोळणार ? ए ss तू जा .........

(पोट मागते ते - चरण्या अजून काही...)

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 30/11/2010 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: मयुरेश साने यांची शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई... ही सुंदर गझल. तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही तोडून नळीबिळीला - मी मगज तो खाई पुन्हा कसे मिळेना - मागतो ज्याला त्यालाही चाटून ही ताटाला - आले न पोटी काही भूक अजून मजला - देतो हीच ग्वाही सांगून ही कितीदा - धुतले न हात माझे आतून भांड्यांचा ही - कितीदा आवाज होई उठवून ही मला - मी उठलो कधीच नाही पाच भाकर्‍या अन - वडे पाच खाई लाजून ही स्वतःला - उरले काहीच नाही पोट मागते ते - चरण्या अजून काही टाळून ही मला तू - मी टळलोच नाही जरी ज
काव्यरस

शब्दान शब्द

लेखक यकु यांनी मंगळवार, 30/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कसल्याशा संशोधनासाठी आमचा एक मित्र उत्तर ध्रुवावर मुक्काम ठोकून असतो. तिथून तो मराठी अंतर्जालावर आणि त्यातील नगांवर नजर ठेऊन असतो. अंतर्जालातील काही नगांवर आजकाल त्याची विशेष नजर आहे; कारण त्याला उत्तर ध्रुवावरून आल्यानंतर मराठीत एक वेगळेच, आगळेच म्हणतात ना तसे मसं सुरू करायचे आहे. सगळंच खुल्लम खुल्ला व्हावं असं त्याचं म्हणणं आहे. जिथे कुणीही आयसोलेटेड, कंपूनिष्ठ असणार नाही. अर्थातच त्यासाठी याच नगांची गरज आहे. मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणावर त्याचे विशेष प्रेम आहे. म्हणून त्याने खाली दिलेल्या नगांचे बायोडाटे (विदागार) तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) (Nasates Ghari Tu Tevha...)

लेखक बोलघेवडा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) मराठी मध्ये सध्या विडम्बनाला चांगले दिवस आहेत. याच लाटेचा फायदा घेऊन मी हि 'पोळी' गरम तव्यावर भाजून घेतली आहे. या कवितेचे मूळ कवी श्री. संदीप खरे आणि संगीतकार श्री. सलील कुलकर्णी, तमाम मराठी वाचक यांची माफी मागून आणि कै. आचार्य अत्रे यांना स्मरून मी हि माझी "फणसाची फुले" आपल्याला सदर करत आहे. कृपया गोड मानून घ्यावीत. नसतेस घरी तू तेव्हा... नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो, गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो. दुध नासून साय विरावी, कल्लोळ तसा ओढवतो, हा चहा चवहीन होतो, तरी मलाच प्यावा लागतो.
काव्यरस