अख्खा दिवस सरतो रणरणत्या उन्हात. सरत्या संध्याकाळी होणाऱ्या भेटीची वाट बघण्यात. उन्हं कलतात, साजरा संधिप्रकाश पसरतो आभाळभर. ठरल्या ठिकाणी जमू लागतात एक-एक करत सगळेच. जीवाभावाची मित्रमंडळी एकत्र आली की छान निवांत गप्पा होतात, खाणं-पिणं होतं, आठवणी जागवल्या जातात आणि कोणाच्यातरी तोंडून अभावितपणे मनातली भावना शायरीवाटे व्यक्त होते. त्याला प्रतिसाद म्हणून साजेशा ओळी समोरून येतात आणि मग रंगत जाते रात्र... मैत्रीची, आठवणींची, प्रेमाची, शायरीची...
जब रूह में उतर जाता है बेपनाह इश्क का समंदर
लोग जिंदा तो होते हैं, मगर किसी और के अंदर
दौलत नहीं, शोहरत नहीं, न वाह चाहिये
कैसे हो..?