Skip to main content

वाङ्मय

ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला. सकाळीच डॉ.आनंद यादव गेल्याच्या बातमीने धक्काच बसला. डॉ आनंद यादव खूप वर्षापूर्वी औरंगाबादला आले तेव्हा आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेत त्यांची भेट झाली होती. मिसळपाववर मी आनंद यादवांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा धागा काढला होता. डॉ. आनंद यादव यांच्या भेटीत फ़ारशी ओळख नसतांनाही काही लेखक मंडळींच्या आणि त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या आम्हीही त्यात होतो तेव्हा 'वाचत राहा' हा सल्ला त्यात होता. त्यांच्या गप्पांच्या आठवणींनी आज आत जरा जरा गलबलून आलं होतं.

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

शिव कन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे. सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या, त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)] पहाडातला जख्ख दद्दू सरोवरात नाव सोडून पलीकडे निघून गेला तेव्हापासून, नाव हलत नाही, डुलत नाही, पण जराशीही कुजत नाही! सरोवरात कुणाला येऊ देत नाही, सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही! सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर.... भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

एक पत्र "पप्पा"साठी

कऊ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय पप्पा, मुळात आधी एकाच घरात राहत असताना पत्र लिहिलचं का?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस झाला. पण तेव्हा तुम्हाला सांगितलच नाही की तुम्ही बनवलेली बिर्याणी मस्त झाली होती. दुसर्याच दिवशी अंकिताने message केला की "कऊ तुझे पप्पा किती भारी आहेत ग,अस वाटलचं नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो." माझ्या वाढदिवसाला तुम्ही खूप काही केलं.पण आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तो साजरा नाही करणार हे माहित आहे.त्यापेक्षा गणपतीच्या मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घ्यायला तुम्हाला आवडत पण पप्पा मला हे माहिती आहे की तुम्ही स्वतः साठी काही मागत नाही.

गेम (शतशब्दकथा)

चांदणे संदीप यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता. चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!" पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले.

डॉ.अक्षयकुमार काळे : एक ओळख. (अ.भा.मराठी साहित्य संमेलन उमेदवार)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
राम राम मंडळी. डोंबिवली येथे नियोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु झाली आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेत डॉ.अक्षयकुमार काळे यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. आम्ही त्यांचे पाठीराखे, आणि मतदार असल्यामुळे आम्हीही त्यांच्या सोबत होतोच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य समाज आणि संस्कृतीच्या चिंतनाचं एक व्यासपीठ आहे, असे आम्ही समजतो. मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीचा विचार त्या विचारपीठावरुन मांडल्या जातो हे अनेकांना माहिती आहेच.

दिवाळीचे दिवस - डॉ. सुधीर रा. देवरे

डॉ. सुधीर राजा… यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बालपणी दिवाळी आली की नव्या कपड्यांपेक्षा फटाकड्यांचीच जास्त ओढ लागायची. पंधरा दिवस दिवाळी पुढे रहायची अशा बेताने मी आण्णांच्या मागे फटाकडे आणण्याचे टुमणं लावत असे. दुसरीकडे माझी आकाशदिव्याची तयारी सुरू व्हायची. तेव्हा सुध्दा विरगावला व्यापार्‍यांच्या दोन तीन घरांमध्ये रेडीमेड आकाशदिव्यांची फॅशन सुरू झाली होती. पण सर्वच गाव टोकरांच्या कामड्यांपासून तयार केलेल्या घरगुती आकाशदिव्यातच समाधान मानणारे होते. मला विमान आणि चांदणीचे आकाशदिवे करता येऊ लागले होते. म्हणून एका वर्षाआड मी आकाशदिवा करत असे. सलग दोन वर्ष मी तोच आकाशदिवा लावत असे.

दिसत जावं माणसानं

मंदार दिलीप जोशी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही.

लोकसंस्कृतीच्या आकाशात

डॉ. सुधीर राजा… यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे (मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होत असलेल्या ‘...सहज उडत राहिलो’ या माझ्या आत्मकथनातून...) मी तसा आज आमच्या विरगावपासून खूप लांबवर राहतो असे नाही. मी स्थायिक झालेल्या सटाण्यापासून अवघ्या दहा किमी अंतरावर विरगाव आहे. तरीही विरगावातल्या आठवणींनी मी व्याकुळ होतो. आज मनात आले तेव्हा मी दहा मिनिटात विरगावला जाऊन येऊ शकतो. मात्र बालपणीचे हरवलेले दिवस आज विरगावला जाऊनही सापडत नाहीत, हे माझं खरं दु:खं आहे. बालपणी विरगावात मित्रांसोबत जे दिवस घालवले ते पुन्हा येणे आज शक्य नाही. गाव तेच असले तरी बालपणीचे मित्र दूर गेले आहेत.

मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

धारपांच्या या पुस्तकांपैकी कोणती तुमच्याकडे आहेत का ?

nishapari यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नारायण धारपांच्या या पुस्तकांपैकी कोणती तुमच्याकडे आहेत का ? - अवकाशाशी जडले नाते , अधःपात , अघोरी हिरावट , कालगुंफा , आसमंत, गुढात्मा , चेटूक , तळघर , न्यायमंदिर ,पानघंटी, बहुरूपी , बंध , मोहिनी , मैफल , युगपुरुष , विलक्षण सूड , विश्वसम्राट , विश्वव्यूहाचा भेद , विषारी वारसा , शोध , शिवराम , कुलवृत्तांत , किमयागार, कृष्णा , सरिता .