आदरणीय तात्याराव,
आमची पिढी ही जास्त पत्रलेखनावर भर देत नाही. सरळ सरळ जाऊन बोलण्यावरच आमचा भर असतो... खरंच हे पत्र नं लिहिता सरळ तुम्हाला भेटणंच शक्य असलं असतं तर?? असा एक विचार मनातून चमकून गेलाय आत्ताच.. आणि त्याच विचाराला अधिष्ठान मानून हे पत्र लिहीत आहे. तात्या, एका शब्दप्रभूला शब्दांनीच आदरांजली वाहणे आणि तीही मराठा भाषेच्याच दिनी योग्य म्हणून हा यथाशक्ती पत्रप्रपंच.
तात्या, २६फेब्रुवारी १९६६ रोजी तुम्ही प्राणोत्क्रमण केलेत, त्या दिवशी जी काही प्रचंड मोठी अंत्ययात्रा दादरला निघाली होती, ती अंत्ययात्रा दोन चिमुकले डोळे त्याच्या घराच्या सज्ज्यातून अनुभवत होते.