Skip to main content

वाङ्मय

चॅलेंज - भाग ३

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 08/08/2017 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंज भाग ३ दिगंत म्हणाला, “who’s next?”. शौनकने मीरा आणि अवनीकडे बघितलं. त्यांपैकी कोणीच पुढे होत नाहीये असं पाहिल्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, मी वाचतो,” आणि त्याने वाचायला सुरुवात केली. “लिहिणंबिहिणं मला कठीणच आहे. दिगंत, तुम्हा फिलॉसॉफर लोकांना बरं जमतं असं लिहिणं. आम्ही डॉक्टर म्हणजे three times a day लासुद्धा TDS लिहिणारे.... बघूया कसं जमतंय. बुधावारचं ओ. टी. (ऑपरेशन थीएटर) चालू होतं. हर्नियाची mesh लावताना मधेच श्रीखंडे सरांनी मला विचारलं, “काय मग, या महिन्यात काय?”.

प्रिय श्री स्वधर्म

लेखक शरद यांनी शनिवार, 05/08/2017 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय श्री. स्वधर्म श्री. स्वधर्म, असे पहा, त्या काळी वर्ण ही संकल्पना समाजात रूढ झालेली होती. स्मृति त्यात बदल करण्यासाठी लिहलेल्या नाहीत. राजा असावा का नसावा, त्या ऐवजी लोकशाही असावी का ? हा स्मृतींचा विषयच नाही. राजा व म्हणून प्रजा आहेच, विवाहसंस्था आहे म्हणून पति व पत्नी आहेतच तसेच वर्ण आहेतच. तर यां संस्थांमधील घटकांचे एकमेकाशी संबंध कसे असावेत हे "नियम" सांगणे हे स्मृतींचे काम. आजच्या भाषेत बोलावयाचे तर स्मृति म्हणजे "घटना".

चॅलेंज भाग 2

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 03/08/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुन्हा महिन्याचा शेवटचा शनिवार. सहाला अजून पाच मिनिटं होती. पण शौनक आणि दिगंत वेळेआधीच पोहोचले होते. “कधी वेळेवर येणार रे या मुली?” शौनकने म्हटलं. “अजून सहा वाजायचे आहेत. त्या बघ त्या दोघी रिक्षातून उतरतायत.” दिगंतने कॅफेच्या मोठ्या काचेच्या खिडकीकडे हात करत शौनकला दाखवलं. अवनी आणि मीरा रस्त्याच्या दुसर्या बाजूला रिक्षातून उतरत होत्या. बोलत बोलत रस्ता ओलांडून दोघी कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्यांचे चेहरे बघून त्या काहीतरी महत्त्वाचं बोलतायत असं वाटत होतं. मीराचा चेहरा तर फारच ओढलेला दिसत होता. त्या दोघी कॅफेच्या आत शिरल्या.

जनरेशन गॅप आणि निळाई

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी बुधवार, 02/08/2017 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

चॅलेंज भाग 1

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 01/08/2017 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तिघंही ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला कॅफेत पोहोचले. “ही अवनी तर कधीच वेळेवर येणार नाही. मीरा फोन कर तिला, बघ किती वेळ आहे” शौनकने वैतागून म्हटलं. हात खांद्यान्मागे ताणून आळस देत तो पुढे म्हणाला, “I am knackered. घरी जाऊन झोपायचंय मला.” “कोणाला कापत होतास?” दिगंतने हसून विचारलं. “कापायला वेळ लागत नाही रे, जोडायला वेळ लागतो” शौनकने उत्तर दिलं. “अवनी अर्ध्या तासात पोहोचतेय. ट्रॅफिकमधे अडकलीये म्हणाली.” मीराने मोबाईल खाली ठेवत या दोघांना सांगितलं. “हो ट्रॅफिक, आम्ही हेलिकॉप्टरने आलोय ना, ट्रॅफिक काय आजच आहे का, ते असेल असं धरूनच तेवढा वेळ आधी निघायला पाहिजे ना!

मनुस्मृति भाग २

लेखक शरद यांनी रविवार, 30/07/2017 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति भाग २ (७) अध्याय ७ (श्लोक २२६) सृष्टीच्या रक्षणासाठी ईश्वराने राजाची निर्मिती केली आहे. कार्यशक्ती, देश आणि काल यानुरूप राजाला वेगवेगळे रूप धारण कराए लागते. त्याच्या प्रसन्नतेत लक्ष्मी, पराक्रमात जय आणि क्रोधात मृत्यू वास करतो.

मनुस्मृति (भाग १)

लेखक शरद यांनी रविवार, 23/07/2017 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति (भाग १) आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू. वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द.

विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण

लेखक शरद यांनी शनिवार, 15/07/2017 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण श्री. माहितगार यांच्या एका धाग्यात विश्वामित्राचा उल्लेख आला होता. याची कथा सगळ्यांना माहीत असेलच असे नाही. मनोरंजक आहे. प्राचिन काळी वर्ण बदलता येत होते याची ही कहांणी. गोष्ट विश्वामित्राच्या आधीच्या पिढीपासून सुरू होते. ऋचीक हा विद्वान ब्रह्मर्षी त्याचे लग्न गाधी या क्षत्रिय राजाची मुलगी सत्यवती हिच्याशी झाले. पतिपरायण सत्यवतीवर प्रसन्न होवून ऋचीकाने तिला वर मागावयास सांगितले. ही गोष्ट सत्यवतीने आपल्या आईला सांगितली. आई म्हणाली ’तुझे पती महान तपस्वी व समर्थ आहेत.

गायीचे आत्मवृत्त

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/07/2017 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी गाय आहे. माझ्यात देव वास्तव्य करत असल्यामुळे मला माणसाचं प्रबोधन करायचा हक्क आहे. म्हणून तर आता बोलायची हिंमत करते: मला माणसापेक्षा जास्त किंमत आहे. राजस्थानात गाय आणि वासरूच्या जोडीला एकशे पाच रूपये अनुदान मिळतं तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या माणसांच्या जोडप्याला सत्तर रूपये मिळतात. वि. दा.

लॉटरी

लेखक aanandinee यांनी बुधवार, 12/07/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे ते कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. “तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं.