प्रस्थापितांचे सामाजिक भान: भाग ३

लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील दोन भागात आपण पहिले तर असे दिसते कि प्रस्थापित त्यांच्या क्षमतेनुसार जितके समाजासाठी उपयोगी पडायला हवे तितके ते पडत नाहीत. असे खरंतर इतरत्रही म्हणजे इतर देशांमध्येही होत असते. समाजकारण काही प्रत्येक जण करीत नाही आणि त्याची गरजही असतेच असे नाही. भारतात मात्र आपले आयुष्य इतके सत्ताकेंद्रांमुळे प्रभावित असते कि प्रस्थापितांनी जमेल तेव्हडी मदत (जातपात, पूर्वग्रह, राजकीय मतं यापलीकडे जाणारी) करणे आवश्यक असते. दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. या उलट प्रस्थापित त्यांच्या क्षमतेनुसार सामाजिक दुही, निसर्ग ओरबाडणे या आणि अशा इतर गोष्टींमध्ये मश्गुल असतो.

गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!

लेखनविषय:
गणेश पूजा... सन १९७२ बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!! भाग १ हवाईदलातील माझ्या आठवणी... १९७१साली बांगलादेशच्या लढाईची सांगता भारत विजयी होऊन झाल्याने आनंदी वातावरणात गणेशाचे आगमन झाले होते. हवाईदलातील चंदिगढ स्टेशनमध्ये मला पहिल्या पोस्टींगवर रुजू होऊन ५-६ आठवडे झाले होते. तेंव्हा सेक्टर १९ मधील एका मंदिरात सिव्हिलियन्स सोबत हवाईदलातील एयरमन गणेशोत्सव साजरा करत असत. त्यावेळेस झालेली विसर्जनाची मिरवणूक आजही लक्षात राहिली आहे. कल्पना करा, गणेशाच्या मोठ्या मोठ्या १०० च्या वर मूर्ती हार-माला घालून आर्मीच्या ट्रकवर सजवून निघालेल्या आहेत.

आर्टिकल 15

आर्टिकल 15 चा प्लॉट 2014 साली उत्तरप्रदेशातल्या एका गावात झालेल्या तीन मुलींच्या गॅंग रेपवर आधारित आहे. डेली लेबरवर काम करणाऱ्या तीन 15 वर्षांच्या मुली मालकाकडे तीन रुपये वाढवून मागतात आणि त्याने नकार दिल्यावरही अडून बसतात. गँगरेप करून ´त्यांच्या´ समाजाला धडा मिळावा म्हणून त्या मुलींपैकी दोन मुलींचा बलात्कार करून त्यांना जीवे मारून झाडाला लटकावलं जातं , तिसरी निसटण्यात यशस्वी होते . केस बंद करण्यासाठी त्या मुलींच्या वडिलांनाच त्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असतो .

जीवनाचे धडे

लेखनविषय:
लेखनप्रकार
काल बऱ्याच दिवसांनी माझ्या वर्गमित्राचा फोन आला होता. भरपूर गप्पा झाल्या. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तशा अनेक खपल्याही निघाल्या. “काय म्हणताहेत तुझी मुलंबाळं?” मी नेहमीचा प्रश्न विचारला आणि तो एकाएकी गंभीर झाला. “यार... बरं झालं तू लग्न केलं नाहीस...” त्याने म्हटले आणि मी चाट पडलो. खरंय ना... जो माणूस ‘मिल्या... तूही उरकून टाक आता... किती दिवस संट्या राहणार?’ असं म्हणायचा त्याच्याकडून असे वाक्य अपेक्षितच नव्हते. “कारे? काय झालं?” मी थोडं गंभीर होत विचारलं. “यार... माझा मुलगा मागील वर्षी दहावीला होता. खूप हुशार आहे तो.

संध्याकाळी तू गंगेतीरी

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

एका 'डोळस' प्रेमाची गोष्ट

लेखनविषय:
लेखनप्रकार
लग्न ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची घटना असते. त्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडणे हा वाटतो तितका सोपा प्रश्न नसतो. ‘बघून’ करावयाच्या लग्नांमध्ये जोडीदार-निवडीचे अनेक निकष (फूटपट्ट्या) लावले जातात. असे निकष कोणते असावेत आणि कशाला किती महत्व द्यायचे हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यात काही गैर नाही. या लेखाच्या अनुषंगाने मला फक्त एका निकषाकडे लक्ष वेधायचे आहे. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीतील शारीरिक व्यंग. विवाहेच्छू तरुण-तरुणींकडे जर आपण एक नजर टाकली तर काय दिसते? जी व्यक्ती शरीराने धडधाकट आहे ती आपला जोडीदार निवडताना त्याच्यात कुठलेही ठळक व्यंग नको हे जरूर पाहते.

जॅकी

लेखनविषय:
लेखनप्रकार
जॅकी हा माझ्या करिअरमधील न विसरता येणारा सहकारी. म्हणायला तो माझ्यावरच्या पदावर होता, पण त्यानं कधीच ते जाणवू दिले नाही. गडी सतत हसतमुख असायचा. बॉसचे बोलणं कितीही ऐकायला लागो, की क्लायंट शिव्या देवो. जॅकी सतत खूष असायचा. सर्व काही हसण्यावारी घेण्यानं विरोधकांना काही किमतच उरायची नाही. जॅकी इतका चिकणा (कोडगा) होता की त्याला तेलात बुडवलं तरी तो तेलकट होणार नाही. इतका स्थितप्रज्ञ ( निर्लज्ज) की समोरचा निर्बुद्ध ठरायचा. जॅकी कार्यालयात कधीच वेळेवर उगवायचा नाही. सकाळी बायकोच्या नावावर एजंट म्हणून आर. डी. ची वर्गणी गोळा करून तो पोस्टात जमा करायचा. एक दीड वाजला की त्याला ऑफिस आठवायचे.

शोक कुणाला? खंत कुणाला?

हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

दुनिया

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी आजी नेहमी अनेक म्हणी रोजच्या बोलण्यात सहजच बोलून जायची. " दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे " , "उसनं मांडं नी उसनं दांडं ", "दिलं तर गोड नाहीतर दोड" अश्या अनेक म्हणी आपोआप तिच्या बोलण्यात यायच्या. लहानपणी मला तिच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ लागायचा नाही. माझं बालपण खेड्यात गेले. कोणत्याही सुविधा त्या काळात नव्हत्या. तंगडतोड करतच तालुक्याच्या गावाला जाऊन दवाखाना, भाजीपाला बाजार, म्हटलंच तर सिनेमा बघणे या गोष्टी कराव्या लागायच्या. माझ्या प्राथमिक शाळेतील वर्गमित्र व मी सर्वच शेतकऱ्याची मुले होतो. काही शेतमजुरी करणारांची होती. सगळ्यांची घट्ट अशी मैत्री होती.

देवघर

देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या
Subscribe to समाज