Skip to main content

समाज

देवघर

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 19/08/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?* (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - दोन.

लेखक सुनिल प्रसादे यांनी सोमवार, 19/08/2019 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?* (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - दोन. -------------- जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन ------------------------------------------------------------- पहिल्या भागात आपण पाणी आणि जमीन ह्यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे याचा शोध घेतला. त्या नात्यामध्ये लपलेला सृष्टीचा नियम काय सांगतो हे आपण पाहिलं आणि त्यानुसार एक तंत्र बनवलं. त्या तंत्राच्या साहाय्याने आकाशातून इमारतींच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला आपल्या मर्जीनुसार कसं वळवायचं हे आपण पाहिलं.

त्सो मोरिरी : एक समृद्ध अनुभव

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 15/08/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात लेह लडाखला जाण्याचा योग आला. या अविस्मरणीय ट्रिप बद्दल सविस्तर लिहिण्याचा विचार आहे पण तूर्तास एक अशी घटना जी मनात कायम कोरलेली राहील.. शीत वाळवंट असलेल्या लडाखचे निसर्ग सौन्दर्य एकदम वेगळेच.. आधी कधीच न पाहिलेले.. राखाडी आणि तपकिरी रंगाच्या छटा बघताना निसर्गाच्या पॅलेट मधला मधला हिरवा रंग हरवलेलासा वाटला. एक प्रकारची गूढ शांतता, ठिकठिकाणी रचलेले दगडांचे मनोरे आणि बौद्ध धर्माचे मंत्र वाऱ्याद्वारे आसमंतात पसरवणाऱ्या रंगीत पताका संपूर्ण प्रवासात साथ देत राहिल्या.

प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting')

लेखक सुनिल प्रसादे यांनी बुधवार, 14/08/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - एक. -------------- 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' ही इसवीसनपूर्व बारा हजार वर्षांचा इतिहास असलेली संकल्पना आहे. माणसं तेव्हापासून हे करत आली आहेत. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'च्या आजपर्यंतच्या व्याख्येमध्ये पावसाचे जमिनीवर पडलेले पाणी गोळा करणे आणि ते साठवणे ह्या दोनच गोष्टींचा समावेश आहे. आपल्या देशातही आपण 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची कामं वेगवेगळ्या पद्धतींनी मागील अनेक वर्षे करत आलो आहोत. परंतु ते करत असताना आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे ह्याचा आपण फार गंभीरपणे विचार केला आहे असं दिसतं नाही.

डिप्रेशन

लेखक nishapari यांनी शनिवार, 10/08/2019 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
डिप्रेशनची कारणं असंख्य आहेत . आयुष्याच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात म्हणजे - शिक्षण , नोकरी , अर्थार्जन , विवाह / संसार यात आलेलं अपयश हे कारण तर सर्वज्ञात आहे . पण डिप्रेशनचं दुसरंही एक तितकंच प्रभावी कारण म्हणजे अपराधीपणाची भावना , गिल्ट हेही असतं हे कदाचित कमी लोकांना माहीत असेल .. म्हणजे जे त्या अनुभवातून गेलेले नाहीयेत असे इतर डिप्रेशन फ्री हेल्दी लोक ... काहीवेळा वरच्या कारणाशी ते निगडीत असतं तर काहीवेळा स्वतंत्र ...

अंधानुकरण

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 10/08/2019 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
"अंधानुकरण" काही वर्षांपूर्वी पाहिलेला एक व्हिडिओ आज पुन्हा बघायला मिळाला, हेच निमित्त. आंधळा माणूस इंग्रजीमध्ये क्रिकेट समालोचन करतो, एवढंच नव्हे तर गर्दीचा आवाज हुबेहूब काढतो. सरावलेला समालोचक असावा अशी शब्दफेकीची शैली. " हे कसं जमवलं? " असं विचारलं असता म्हणतो की रेडिओ व टिव्ही ऐकून ऐकूनच शिकलो, इंग्रजी येत नाही त्यामुळे चूका होण्याची शक्यता आहे. हे सांगताना थोडासा ओशाळल्यासारखा हसतो. असंच एकदा एका सभेनंतर पांढरी काठी टेकवत टेकवत जाणाऱ्या व्यक्तीला पाहिले. त्याच्या अंगाखांद्यावरून सुटलेल्या सभेची गर्दी ओसांडत होती.

काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक

लेखक तमराज किल्विष यांनी शुक्रवार, 09/08/2019 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल. पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो. काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे.

रक्षाबंधन - भाग १

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 05/08/2019 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
' रक्षाबंधन ' भाग १ भारतीय समाज केव्हा बरं अडचणीत सापडतो, असा विचार केल्यावर काय काय सुचेल? आकाशात जेवढे ग्रह तारे एवढी उत्तरे आठवली तरी एक उत्तर नक्कीच ध्रुव ताऱ्यासारखे असणार. 'सण आले की..'हेच ते तेजस्वी उत्तर असे वाटते. वरवर पाहता हे पटणार नाही किंवा लिहिणारा गोंधळात पडलेला आहे असे वाटेल कदाचित, पण आता असे वाटतंय तर लिहून तर बघू. आपल्या देशात महिनाभर सुट्ट्या सणांमुळे असतात, त्यामुळे मुख्य पंचाईत अशी की कोणत्या सणाचा गोंधळ साजरा करायचा?

युनिटी इज स्ट्रेंथ

लेखक लोकेश तमगीरे यांनी शुक्रवार, 02/08/2019 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
गोपनार.....भामरागड तालुक्यातील १२१ गावांपैकी एक माडिया आदिवासीबहुल गाव. साधारणतः २२०-२५० पर्यंत लोकसंख्या असलेलं गाव. हेमलकसाहून १३ किलोमीटरचा कुठे पक्का तर कुठे कच्चा रस्ता ओलांडला की कुक्कामेटा फाटा येतो. या फाट्याहून डावीकडे साधारणतः ८-९ किलोमीटरची जंगलवाट आहे. वाटेत ३ मोठ-मोठे नाले आहेत. ६ महिने हा रस्ता सुरळीत चालू असतो. पण एकदा का पाऊस पडला की, मग ४-५ महिने कुठलीही दुचाकी जाऊ शकत नाही. कुक्कामेटा गाव ओलांडलं की समोर वाटेत लाहेरी नदीचं एक मोठं पात्रं लागते. ते लाकडी डोंग्याने पार केल्यावर लष्कर गाव येतं. लष्कर हून २.५ किलोमीटर अंतर गाठलं की अखेरीस गोपनार गाव येते.

दिव्यांची कहाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/08/2019 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.