Skip to main content

समाज

आमचे असतील लाडके (सच्याची २००वी कसोटी)

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 04/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

गुरुंजींचे भावं विश्व! भाग-३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 30/08/2013 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुंजींचे भावविश्व! भाग २-http://www.misalpav.com/node/25318 ... पुढे ... हा सवाल-जबाब टाकलेला आमचा कोल्हापुरी मित्र वाणीनी तिखट असला,तरी मनानी अगदी लोण्यासारखा मऊ आहे.एकदा बाहेरगावी एका "अठवडी" कामाला गेलो असतांना,रात्रीचं जेवण झाल्यावर सोबतीनं तंबाखू मळता मळता मला एक मजेशीर प्रश्न विचारून गेला , "आत्म्या.. हा आपला धंदा आणी ह्यातली ही आपल्यासारखी मानसं..कोणच्या पन क्षेत्रात गेली,तरी अशीच हिट'ला जातील का रं !?

Come on बारक्या.....fight!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 29/08/2013 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज २९ ऑगस्ट - आपला राष्ट्रीय क्रीडा दिवस. लहानपणी .. म्हणजे लपाछपी, चोर - पोलीस, आप्पारप्पी, लगोरी वगैरे खेळांतून "ग्रॅज्युएट" होऊन "स्पोर्ट्स" ह्या प्रकारांत गणले जाणारे खेळ खेळायला लागलो तेव्हा......त्या पांढरे कपडे घालून तांबड्या चेंडूनी खेळायच्या खेळानी वेड लावलं आणि आयुष्यात पहिल्यांदा हिरव्यागार मैदानांवर पाऊल पडलं. कपिल देवसारखी अॅक्शन करणं... "वन डाऊन" बॅट्समन असल्यामुळे हेल्मेटखाली संजय मांजरेकरसारखी पट्टी बांधणं वगैरे चावट उद्योग चालू होते. अझरुद्दीन, इम्रान, रिचर्ड्स वगैरे हीरोज होते... शाळेतून पळून जाऊन मित्राच्या घरी टीव्ही बघणं व्हायचं... सगळं यथास्थित चालू होतं.

कृष्णलीला..

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 29/08/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती.. कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं.. कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्‍या... कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे.. कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या नऊ-दहा थरांचा थरार.. कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं.. कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी.. कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी.. कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली.. उत्तराखंडमधली मोठ्ठी नैसर्गिक आपत्ती..पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी दाभोळकर

ज्ञानदीप उजळू दे..

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 29/08/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा? नूतन समर्थ विद्यालय, विजय मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २. विद्यार्थीवर्ग? आजूबाजूच्या वेश्यावस्तीतील आणि इतर कामकरी वर्गातील मुले. दुसर्‍या एका संस्थळातर्फे चालवल्या जाणार्‍या काही चांगल्या उपक्रमांमध्ये मला सहभागी व्हायची संधी मिळाली आहे, त्यापैकी हा एक उपक्रम. ह्या उपक्रमातून गेली काही वर्षे ह्या छोट्यांना शिक्षणासाठी मदत करत आहोत आणि सातत्य राखण्याचाही प्रयत्न करत आहोत.सावली सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत केली जाते.

मोर पंखी कावळा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 28/08/2013 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
एक काळा कावळा, मोरांच्या देशी गेला. मोर पंखी ‘बपतिस्मा’, लाऊन घरी परतला. ‘श्रेष्ठत्वाची’ जाणीव, त्याला आता झाली. पोरांसाठी वेगळी, ‘संस्कृती’ शाळा बांधली. जेवणाची सोय ही, त्याने वेगळी केली. पाण्याची विहीर आता, कालबाह्य होती. ‘त्यागण्या’ साठी बांधले, टॅायलेट चकाकी. सुगंधित लहारदार, कोक पेक्षा स्वादिष्ट आवडत होते त्याला, त्याचेच शिवाम्बू कुणा शुद्राच्या घामाच्या, दुर्गंधी कसे झाले? मोरपंखी कावळ्याची, इनसल्ट कोणी केली? तुज्याच पूर्वजाने, केली होती विहीर अशुद्ध.
काव्यरस

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 26/08/2013 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 23/08/2013 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२) 

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 21/08/2013 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत. ज्याकाळी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते, तेव्हा आपले पूर्वज उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वतापासून तर दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरापर्यंतच पृथ्वीचा सर्व विस्तार असल्याचे मानत असत.