Skip to main content

समाज

अडगळीतल्या आठवणींचा पसारा..

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 16/09/2013 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
सुरवातीला मी अगदी घारीच्या नजरेनं पुस्तकं राखत असे (कारण मित्रांची बरीच पुस्तकं मी हक्कानं ढापलीत). पण आताशा तेवढा आग्रह राहिला नाही. त्यामुळे पुस्तकांना पाय फुटले आणि आवडीची बरीच पुस्तकं परागंदा झाली. उरलेली पुस्तकं थोडी कपाटात, तर बाकीची घरात इकडे, तिकडे, चोहीकडे पसरलेली असतात. त्यात निवांत बसून पुस्तकं वाचायचं ठिकाण म्हणजे टॉयलेट असा माझा ठाम विश्वास. त्यामुळे तिथेही एखाद्-दुसरे पुस्तक सापडलं की आई आणि हिचा ओरडा खावा लागतो. म्हणून एक शनिवार कपाटं आवरण्यासाठी सार्थकी लावायचा ठरवला. बरेच दिवस न आवरल्यानं वरच्या कप्प्यातल्या पुस्तकांवर धूळ साचुन राहिलेली. आधी ती झटकायला घेतली.

नर्मदेच्या खो-यातून ....(२)

लेखक आतिवास यांनी सोमवार, 16/09/2013 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुनर्वसन नेमकं किती कुटुंबाचं करायचं यामध्ये अजून घोळ आहेत. ‘घोषित’ कुटुंबांची मध्य प्रदेशमधली संख्या आहे ५२५७; पण यात सरकारने ‘वयस्क पुत्र’ (१८ वर्षांवरील मुलगे) धरलेले नाहीत. यातही सरकारने आकड्यांचा खेळ केला आहे. उदाहरणार्थ भिताडा गाव प्रत्यक्ष पाण्याखाली गेलं ते २००६ मध्ये पण तिथलं ‘कट ऑफ’ वर्ष आहे १९९३. म्हणजे १९९३ ची कुटुंबं २००६ सालीही तशीच आणि तेवढीच राहायला हवीत सरकारच्या मते. मुलगे मोठे होणार, त्यांची लग्न होणार, त्यांना मुलबाळं होणार, ते वेगळं घर करणार – या शक्यता सरकारने कधी गृहित धरल्याच नाहीत!

सरडा आणि इतर क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 14/09/2013 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
सरड्यांकरता आता सुगीचे (निवडणुकीचे) दिवस आले आहे: लाल-पिवळा, हिरवा-निळा सरडा तुझा रंग कोणता? ज्या रंगाचा किडा, त्या रंगाचा चोला. शिकारी मी आला, रंगनिरपेक्षवाला. *चोला = वस्त्र **आला = मोठा (उदा: आला अधिकारी) (२) डोळे झाले अधू दिसत नाही दिल्ली. मिळेल कुठे तो जादूचा चश्मा दावेल मला जो लालकिल्ला. (३) द्विभाषिक क्षणिका शरीर असले जरी म्हातारे दिल अभी जवान है. वरेल का मला ती सुंदरी उम्मीद अभी कायम है.
काव्यरस

एका काव्यप्रकाशन सोहळ्यात.....

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 12/09/2013 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : जातीपातीचा आणि आदरणीयांचा उल्लेख प्रसंगाच्या अनुषंगाने, सत्यम शिवम........!! .. . . बापानी आत्महत्या केली साहेब माझ्या.............मला पुढे काय बोलायचे तेच सुचेना........ . . . . उम्या शी मैत्री कधी, कशी आणि का जुळली ते कळलेच नाही...खर तर त्याला मी उम्या म्हणुन हाक मारत नव्हतो...उमेश कोठीकर अस भारदस्त नाव आणि तितकाच भारदस्त सरकारी हुद्दा असलेला, हा हसर्‍या चेहर्‍याचा मनुष्य कविता करतो, त्या ही वास्तवाशी निगडित, जळजळीत वास्तवाशी निगडित!!!

चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 12/09/2013 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥ कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला । मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥ न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥ मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे । कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥ न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥ प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया । धरून कायदा करी, खला शिकस्त देउया ॥ नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥ तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्

गुडबाय मि. चिप्स

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/09/2013 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल. छोट्या आकारातली शे - सव्वाशे पाने वाचायला असा कितीसा वेळ लागणार. एका बैठकीतच संपवले. इतका मंत्रमुग्ध झालो की लगोलग दुसर्यांदा वाचले आणि मग जाणवले की कथानायकाचे नावच संपुर्ण पुस्तकात नाही. गुडबाय मि.

नर्मदा खो-यातून ...(१)

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 06/09/2013 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
गेली अनेक वर्ष ‘आंदोलन’ मासिक (http://www.andolan-napm.in) नियमित वाचनात असल्याने “सरदार सरोवर” विषय अद्याप संपलेला नाही याची माहिती होती. गुजरात आणि महाराष्ट्रात माझ्या कामाच्या निमित्ताने धरणग्रस्त परिसरातल्या लोकांशी बोलायची संधी यापूर्वी अनेक वेळा मिळाली होती. मे २०१२ मध्ये ‘सरदार सरोवराला’ भेट दिली होती. तिथल्या तीन दिवसांच्या मुक्कामात शासकीय अधिका-यांसोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाली होती. त्याचवेळी ‘पुन्हा एकदा धरणग्रस्त परिसराला भेट दिली पाहिजे आणि यावेळी ती भेट आंदोलनाच्या जाणकार लोकांसमवेत केली पाहिजे’ असं ठरवलं होतं.

विजय आणि भूक (शतशब्दकथा)

लेखक एच्टूओ यांनी शुक्रवार, 06/09/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
(मि पा वर लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. जुन्याजाणत्या मि पा करांनी सांभाळून घेणे. चू भू दे णे ) या वर्षीच्या नागपंचमीला आमच्या "वनमित्र" संघटनेच्या आंदोलनात जवळपास ५० नागांना गारुड्यांच्या तावडीतून जंगलात सोडलं.पोलिसांचीही लगेच मदत मिळाली आणि तत्पर कारवाई करून १२ गारुड्यांना तुरूंगात टाकलं. आधीच मिडिआला फोन केल्यामुळे, "अध्यक्ष" या नात्याने मी आंदोलनचे यश प्रेस कॉन्फरन्स मध्ये विजयी मुद्रेने मांडले. घरी आलो. आजीशी बोलतांना तिने विचारलं "नागांना रानात सोडलं,चांगलच केलं. पण गारूड्यांना तुरूंगात का डांबल?" " अगं आजी, कायदाच आहे तसा" "ते काही मला कळत नाही सोन्या !