Skip to main content

समाज

डोंबिवली डाटाबेस.....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 26/10/2013 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या १७ नोव्हेंबरला दिवाळी कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. साधारण पणे दर ३/४ महिन्यांतून एकदा तरी एकत्र येण्याचा मानस आहे. बर्‍याच जणांची कट्ट्याला हजेरी लावायची इच्छा असते पण वेळेवर निरोप न मिळाल्यामुळे, इच्छा आणि वेळ असून देखील, प्रत्येकवेळी ते शक्य होतेच असे नाही. त्यामुळे मला असे वाटते, की आपण एक डाटाबेस तयार केला तर? त्यात मोबाईल नं. आणि इमेल आय.डी. असेल तर प्रत्येक वेळी त्यांना निरोप हमखास मिळेल. त्याची एक एक्सेल शीट तयार करू आणि मग ती वेळोवेळी अपडेट करून ग्रुप मधल्या सगळ्यांना पाठवु. सध्या सोयीसाठी म्हणून फेसबूकवर मिपा डोंबिवलीकर कट्टा बनवला आहे.

हायकू -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 25/10/2013 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाठमोरी तू सळसळणारी तू मनात फडा . . . भिंतीला कान कानात गोळा प्राण वाद अबोल . . . एक मनात दुसरेच जनात हेही जिणेच . . . पान पिकले मन हिरवटले नसती नशा . . . गुलाबी गाल उत्साहाची धमाल वेळ गेलेली . . .
काव्यरस

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 21/10/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो. सुरुवातीला इंटरनेट हे फक्त वाचनीय होते म्हणजे Read-only.

मुलं - काही नोंदी

लेखक मितान यांनी सोमवार, 21/10/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे. अवनी. वय १७. गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय..

एक धाव पोटासाठी

लेखक बलि यांनी शुक्रवार, 18/10/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी लवकर जाग आली म्हणून सहज फिरायला म्हणून गेलो होतो . थंड हवेचा आस्वाद घेत असताना समोर २ वेगवेगळ्या घटना दिसल्या . एक स्त्री सायकलवरून जाताना दिसली . एकंदरीत पेहरावावरून गरीब घरातली असावी . सायकलला पुढे एक थोडीशी मलिन झालेली पिशवी होती . बहुधा जेवणाचा डबा असावा त्यात . धापा टाकत , हळुवारपणे , सावध गिरीने रस्त्यावरील इतर वाहनांचा अंदाज घेत ती सायकल चालवत होती . प्रचंड घामाघूम झालेली . दुसरी घटना म्हणजे थोड्याच वेळाने तिथून आणखी एक लट्ठ अशी स्त्री मॉर्निंग वॉक साठी जाताना दिसली . तीही प्रचंड घामाघूम झालेली, रस्त्याचा अंदाज घेत चालत होती अधून मधून पळत होती .

न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग.

लेखक खटपट्या यांनी शुक्रवार, 18/10/2013 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग. अमेरिकेत काम करत असताना, माझा एक अमेरिकन सहकारी मला म्हणाला कि तो उद्या ज्युरी ड्युटीवर आहे. मी त्याला विचारले कि ज्युरी ड्युटी म्हणजे काय? तर त्याने सांगितलेली माहीती खालील प्रमाणे. अमेरिकेत प्रत्येक मतदात्यास तेथील न्यायव्यवस्थेत सहभागी होण्याची एक दिवस संधी मिळते, त्या दिवसाला ते ज्युरी ड्युटी असे म्हणतात. शासनाकडून प्रत्येकास एक पत्र येते कि तुमची निवड ज्युरी ड्युटी करता झाली आहे. आणि या या दिवशी अमुक न्यायालयात तुम्हाला हजर राहायचे आहे. सधारण ५० लोकांना एका दिवशी बोलावले जाते. मुख्य न्यायाधीश त्यातून १२ लोकांची ज्युरी म्हणून नीवड करतात.

कथा एका निवडणुकीची

लेखक हर्षद खुस्पे यांनी बुधवार, 16/10/2013 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रामधील सातारा जिल्हा म्हणजे दऱ्या डोंगरांनी भरलेला. बारमाही वाहत असलेल्या नद्या असलेला परीसर जास्तीत जमिनीवर असलेले नगदी ऊसाचे पिक ह्यामुळे हातामध्ये खुळखुळत असलेले पैसे. ह्यामधुन शेतीतून उरणारा वेळ व त्यातून वेळ घालविण्यासाठी म्हणुन गावाच्या राजकारणामध्ये असलेला सहभाग. कातोली असंच एक गाव. कुठल्याही गावामध्ये असतात तसे इथेही दोन गट होतेच, आबा आणी नाना. आबा आणी नानां साखर कारखाना आपापल्या ताब्यात ठेवण्यासाठी अश्या अनेक गावांमधील लोकांना झुलवत ठेवत त्यातून गावांमध्ये मारामाऱ्या , दंगल, झालाच तर खून इ. ला तर निवडणूक काळामध्ये तर अगदी उत येत असे.

( चला नांगरूया शेत सारे )

लेखक मोदक यांनी मंगळवार, 15/10/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल. चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा.. *************************************************** बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगर

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 11/10/2013 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.