Skip to main content

समाज

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 21/08/2013 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत. ज्याकाळी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते, तेव्हा आपले पूर्वज उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वतापासून तर दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरापर्यंतच पृथ्वीचा सर्व विस्तार असल्याचे मानत असत.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 20/08/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

घटस्फोट.......संस्कृतीशी

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 12/08/2013 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
घटस्फोट.......संस्कृतीशी - गुरुवार. ग्रंथालयातील पुस्तके बदलायचा माझा दिवस. पुस्तके हुडकत होतो. माझ्यामागे तिशीतल्या दोन महिला काही बोलत होत्या- " बघ ना, बिचारीचे खूप वाईट हाल झाले, शेवटी नशिबाचा भाग असतो. आता तिचे आई-वडील नवीन स्थळ बघत आहेत. पण दुसरे लग्न म्हणले कि जरा अडचणी येतातच ना, अगदी सगळ्या अपेक्षा कशा पूर्ण होणार. ए; तुझ्या माहितीत जरी कोण असेल एखादा चांगला मुलगा तर सांग हं. दुसरी महिला म्हणाली -अग हो आणि तुला त्या मंदिराजवळच्या काकू माहित आहेत ना, त्यांना भेट ना, त्या ”घटस्फोट स्पेशियालिस्ट” आहेत, त्या नक्की तुला मदत करतील. एवढे बोलून त्यांचा संवाद संपला आणि माझा विचार चालू झाला.

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

लेखक धन्या यांनी रविवार, 11/08/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते.

शोध

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 09/08/2013 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
शोध..... टकटक दार वाजले, काऊदादांनी उघडले बाहेर उभी चिऊताई, तिची फ़ारच घाई काऊदादा काऊदादा हे नाणे घे पिल्लाला खायला भरपूर दाणे दे रागावला काऊ म्हणे इतकी महागाई अन नाण्यात बाजार करते ही खुळाबाई चल हो चालती वेळ नको खाऊ भरपूर पैसे आण ओरडला काऊ पिलू आहे भुके, मी करू तरी काय? नाण्यात काही मिळेना, कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार बाकी सारे तू वाण्याला्च विचार तेथूनच आणतो मी पैसे देऊन फ़ार चिमणी गेली वाण्याकडे, वाणीदादा करू काय? नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय? मला काय पुसतेस, खर्च कोण देणार? वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार बाकी सारे तू घाऊकशेठला

गुरुजींचे भावं विश्व! भाग-२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 05/08/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ http://misalpav.com/node/25298 >>> पुढे... त्या-मला ना...आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी आहे? इथेच द्याल का? हा कर्यक्रम संपल्यावर... सुशी ओरडणार नै कै मला...(ही त्यांची- सुशी..म्हण्जे आमच्या यजमानांच्या सुविद्य पत्नी असतात..असं नंतरहून आंम्हाला..त्यांचा(ही) सह भाग मुलाखतीत झाल्यानंतर कळतं.. ================================= त्या-(मुलाखतकार मोड ऑन) नमस्कार...धर्मसमाज मासिकातर्फे तुमचं स्वागत! आंम्ही-(सर्व मोड ऑफ करून!!!) धन्यवाद त्या-तुमचं नाव काय? आंम्ही-आत्माराम सदाशिव बापट.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/08/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) http://www.misalpav.com/node/25292 ------------------------------------------------------------------------------- ४. अभीराणी उवाच : अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं.