Skip to main content

समाज

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?

पुस्तक परिचयः डॉ. आई तेंडुलकर

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 09/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः मूळ इंग्रजी पुस्तकः डॉ. आई गणेश तेंडुलकर, लेखिकाः लक्ष्मी तेंडुलकर धौल, मराठी अनुवादः सुनीता लोहोकरे, राजहंस प्रकाशन, प्रथमावृत्तीः फेब्रुवारी २०१५, किंमतः रु.३००/-

रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 08/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल. रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी. गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले.

मनकवडा डॉक्टर …

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 07/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पना करा, संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरात असताना, अचानक सर्व शहरातली लाईट गेली, आणि आपल्याकडे एकदम बुक्क अंधार झाला तर, अंधाराला डोळे सरवयापर्यंत, मनावर कशी एकप्रकारची अनामिक भीती एकटेपणाची काळोखी पसरते. आता त्या काही क्षणांच्या अनुभवावर अंध व्यक्तींचा जीवनातील काळोखीवर खर्‍या अर्थाने विचार करून, अंध बांधवांच्या दु:क्खाची भयाणता, डोळस व्यक्ती कल्पना करू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच अंधांचा जगाशी संपर्क येतो.

विश्वास आजूबाजूंच्यावरचा

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 06/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पोट गहीवरुन आले वात गेला निसटून दोष कुणाचा लपवण्यास गवाक्ष खुले हे झाले गुन्हा केला कोणी आरोपी कुणा ठरवावे बालंट ते नाकारण्यास सगळेच भोळे झाले चर्चा केली त्यांनी संशयित शोधण्याचे ठरले ढोंग सारे रचण्यात मग लोकही कडवे झाले चौकश्याचें सत्र होते आरोपी सर्वत्र होते कोठुनी गंध तो आला रोख मात्र इतरत्र होते हायसे झाले 'निरागसाला' नाव कल्लोळी वाचले संशयात हरले सगळे पण त्याचेही सोहळे झाले

काय दुखलंय...?

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 05/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रश्नाचे उत्तरः प्रसंग एकः बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

कविता - हापूस

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 01/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात.

जय मनु बाबा .....

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 30/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी आतल्या खोलीतून बायकांमधे 'बाय अडली कि काय ओ' अशी दबक्या आवाजातील काळजीयुक्त गलका उमटला, दाराच्या आडोश्याला उभ्या असलेल्या, मनुने हे ऐकले मात्र, त्याची नजर समोरच्या गाभार्यावर खिळून राहिली, तिकडे पाहून नमस्कार केला, मनात 'माझ्या बहिणीला व तिच्या बाळाला, माझ्या भाच्याला जीवनदान दे देवा, याच भाच्याच्या हाताने दरवर्षीच्या यळ्ळूर गडाच्या जत्रेत, बिशीबेळेहुळी अन्न शिरापुरी अस ११ लोकांना जेवू घालीन' असा नवस घातला.…. थोड्यावेळाने गावातल्या एका वयोवृद्ध सुईनीकडूनच बाळंतपणं सुखरूप झाल्याचं कळल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.

हडळीचा आशिक

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 30/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हडळीचा आशिक जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते, “ मला एक वचन द्या.