Skip to main content

समाज

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 28/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. पण त्यांच्या सरकारात-कामाला गेलं,की त्यांचं धोरण पाळणं अटळ असे. कारण जर का ते एकदा जरी चुकलं,की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायची..ती कायमचीच! पुढे चालू... ================================================== या त्र्यंबक गुरुजींच्या सहवासात, मार्केटींग फंडे असं ज्याला हल्ली म्हणतात ते मी अगदी भरपूर म्हणजे भरपूर पहात होतो. पण तरिही मला असं वाटायचं, की खरा व्यावसायिक तोच ज्याच्याजवळ स्वतःचे ग्राहक गोळा होतातं.

अ‍ॅलीना रोमरः मराठी विषयाची विद्यार्थिनी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते, माझे नाव अ‍ॅलीना रोमर आहे. मी नॉर्वेची नागरीक आहे. मी पुन्यात शिकते. मी पुने युनिवर्ससिटी मदे मराठी सब्जेक्टमदे बीए करते आहे. मला मराठी खुप खुप आवडते. मी रोज युनिवर्ससिटी मदे जाते. मला माझे कॉलेज खुप आवडते. मी माझ्या घरमालकांकडे पेईंगगेस्ट आहे. मी कोथरूडला राहते. मी दररोज पायी चालत कॉलेजला जाते. चालत जातांना मला नागरीक दिसतात. दुकानदार दिसतात. रिक्षा दिसतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यामुळे मला दररोज नविन गोष्टी समजतात. म्हणून मी चालत कॉलेजला जाते. यावेळी मला भारतातले नागरीक दिसतात.

महात्मा घेता का ,महात्मा ??

लेखक नितिन शेंडगे यांनी बुधवार, 22/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल आरक्षण विषयी ची बातमी दर दोन दिवसाआड येते . कितीतरी संघटना, पक्ष त्यावर भांडत असतात. हे सगळे चालू असताना कुणी त्यांची पत्रक किंवा जे ब्यानर लावले जातात त्या कडे पाहिले आहे का ? कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीचे चित्र त्यावर असते. त्याचा अर्थ काय ? आज आपण कितीही पुढे गेलो तरी काही राजकीय पुढारी आणि समाजातील स्वताला श्रेष्ठ समजणारी माणसे आपल्याला जाती आणि धर्मा मध्ये वाटून टाकतात . कितीतरी मोठ्या व्यक्तींना ह्या लोकांनी एखाद्या जाती आणि धर्मामध्ये अडकवून ठेवले आहे. आणि आम्हीपण ते मान्य केले आहे . खाली काही उदाहरणे देत आहे, छत्रपति शिवराय : मराठा महात्मा फुले : माळी डॉ .

‘ती’ चा प्रवास....

लेखक प्रियंका देसाई यांनी बुधवार, 22/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
चविष्ट स्वयंपाक बनवणारी ‘ती’, नटण्या-मुरडण्याची आवड असणारी ‘ती’, नवीन साड्या पाहून हरखून जाणारी ‘ती’, मुलाबाळांचं वात्सल्यानं संगोपन करणारी ‘ती’, काटकसरीनं संसार चालवणारी ‘ती’....वर्तमानपत्रातून, टीव्हीवरील बातम्यांमधून, मालिकांमधून अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून ‘ती’ आपल्याला नेहमीच भेटत असते. तिच्या वेगवेगळ्या रुपांमधून ‘ती’ उलगडत जाते. मीही अशाच ‘ती’ला भेटलेय, अगदी तुमच्या माझ्यासारखी सामान्य स्त्री. मात्र तिच्या असामान्य कर्तुत्वाने चारचौघींपेक्षा वेगळी असलेली ‘ती’. चविष्ट स्वयंपाक बनवायला ‘ती’लाही आवडतं पण कच्चं-पक्कं कसही दोन वेळा लेकरांच्या पोटात जाव ह्या प्रयत्नात ‘ती’ असते.

न्याय मला दिसला होता......

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 21/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय मला दिसला होता...... लोकशाहीच्या, दुर्गंधी पसरवणाऱ्या, सडक्या प्रेताचे, उघडे बटबटीत डोळे, आपल्या अणकुचिदार चोचीने फोडणाऱ्या, धनिक, राजकारणी गिधाडांच्या नख्यांच्या, धारदार अचूक पकडीत, न्याय मला दिसला होता. भ्रष्ट, रक्तपिपासू लांडग्यांनी बनवलेल्या, क्रूर परिस्थितीच्या फासात अडकून मेलेल्या, स्वाभिमानी माणसांच्या मढ्यावरचे प्रसिद्धीचे लोणी खाऊन, करपट ढेकर देणाऱ्या, विकाऊ माध्यमांच्या कावीळ झालेल्या पिवळ्या डोळ्यांत, न्याय मला दिसला होता. आपल्या विचारांच्या टोकदार लेखणीत, जळजळीत अनुभवाची शाई भरून, रखरखीत सत्याची कविता रेखणाऱ्या एका साध्या नि:शस्त्र म्हाताऱ्या कारकूनाला

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 20/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाची देवाला विनंती: असूनही रणरणत्या उन्हाची वेळ का चालवलायस तू पावसाचा खेळ? बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ? देवाचे सडेतोड उत्तर: माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ
काव्यरस

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 20/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. अश्या तर्‍हेनी अखेर हे नावाला नाटकापुरतं-धरलेलं नाटक होऊन.. बर्‍याचश्या करमणुकि नंतर पब्लिक आपापल्या घरी पांगलं... पुढे चालू... ============================================== पांगलं ते पांगलं खरं,पण आंम्ही सगळी देवीच्या देवळापासून घरी चालत चालत येता येता हीचं अजुन एक नाटक सुरु झालं. ही:-आत्मू... मी:- काय? ही:-तू गाणी कधीपासून लिहितोस? मी:- १ अठवड्यापूर्वीपासून...(पलिकडून काकाचा हशा!) ही:- सांग ना???? मी:- अगं खरच १ अठवड्यापूर्वीपासून...काका म्हणाला-लिही!

समतेचा संदेश देणारं नाटक : कोण म्हणतं टक्का दिला ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 19/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कला शाखेच्या पदवीच्या वर्गाला अभ्यासक्रमात असलेल्या नाटकावर खूप दिवसापासून लिहायचं ठरलं होतं. अभ्यासक्रम बदलला पण लिहिणं काही होत नव्हतं. आज नाटकावर लिहिलंच पाहिजे असं वाटलं म्हणून कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचा हा परिचय. कोण म्हणतं टक्का दिला ? हे लेखक संजय पवार यांचं नाटक. दलित नाट्यक्षेत्रात न आलेला एक वेगळा विषय नाटककार, दिग्दर्शक संजय पवार यांनी हाताळला आहे. नाटकाचे मूळ उद्दिष्ट समाजातील विषमता समोर आणून समतेचे बीज रोवले जावे. आणि म्हणूनच हे नाटक वेगळे ठरते. नाटकाच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात लेखकाने देव आणि राक्षस यांच्या मनोभूमीतून काही पात्रे रंगविली आहेत.

महिला दिन’: मोझाम्बिकचा: भाग २

लेखक आतिवास यांनी रविवार, 19/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ वाचून, ऐकून, पाहून स्त्रियांच्या स्थितीबाबत माझं जे मत तयार होतंय, ते तपासून घ्यायची एक उत्तम संधी अशा दृष्टिकोनातून मग मी ७ एप्रिलची वाट पाहायला लागले…. प्रत्येक शहरात सार्वजनिक समारंभाच्या जागा ठरलेल्या असतात, तशीच इथली जागा म्हणजे एक बाग आहे. मानिका प्रांताची राजधानी असलेल्या चिमोयो शहरात ’२५ सप्टेंबर’ हा खड्डा नसलेला एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर विधानसभा आहे, राज्यपाल निवास आणि बरीच मंत्रालयं आहेत. त्यामुळे हा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. त्याच्या एका टोकाला असलेली ही बाग. बाग हे आपलं उगाच दिलेलं नाव आहे खरं तर.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४१ .. (खेडेगावातील नाटक..)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि अश्या वातावरणात मग ते नाटकं सुरु झालं. नाटकाचं नाव होतं............... पुढे चालू... ====================================== रामाची सीता... हां ...... , पण ह्यात गोंधळाल हां तुम्ही. आता 'रामाची सीता...' ह्या नावाची ट्रॅजिडी म्हणजे, खरं तर या वर्षी ठरलेलं नाटक होतं- सीता स्वयंवर . पण पहिल्यांदा तालमी सुरु झाल्या आणि हुंबैस्नं मिलवलेली प्रोपेशनल नटी ठरल्या मानधनाच्या दुप्पट मागायला लागली. आणि मग आली पंचाइत सगली.