भूक
आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे !
तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं .
डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो.
त्या निमित्ताने देशात बर्याच ठिकाणी फिरलो .
आज महाराष्ट्र उद्या आंध्रमधे परवा आणि कुठे !
मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरांमध्येपण जायला लागायचं.
एकटाच फिरायला लागायचं. रात्री एस्टी , एशियाड मिळेल ती गाडी पकडायची आणि सकाळी मुक्कामी पोचायचा.
मिसळपाव