मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

एक मराठा लाख मराठा

खिलजि ·
" एक मराठा लाख मराठा " पूर्वी गुंजला होता नाद गिनीज बुकात नाव नोंदवुनी मराठ्यांनी घेतली होती दाद नव्हता कुणाचा अंकुश तेथे नव्हते कुणीही नेते गल्लोगल्ली येऊनि मिसळले लाख लाख मराठे काकासाहेब गेले बुडुनी (?) झाला मोठा आघात बंद पुकारला खरा तरीही पण चढला हिंसेचा माज मी हि मराठा तरी भेदत आलो चक्रव्हुय ते सारे शांततेतच खरा जोर असे नको हिंसेचे वारे मराठा असूनही आज मला वाटत आहे लाज पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा नको आरक्षणाचा साज सिद्धेश्वर विलास पाटणकर

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

सुधीर मुतालीक ·
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

माझे नेहरवायण १

माहितगार ·
लेखनप्रकार
* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__ विविध कारणांनी विविध ठिकाणी आस्था असतात , तशी अगदी शालेय वयात असताना वाचलेल्या नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथा बद्दल आस्था आहे. तसे नेहरू लिखित दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया अद्यापही कॉपीराईटेड असावे पण कुठूनसे बऱ्याच वर्षांनंतर डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पीडीएफ हाती आली.

न्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राज्य सभा , बरखास्ती प्रस्ताव आणि काही वेगळे प्रश्न या महिन्यात भारताच्या सर्वोच्च न्यायाधिशां विरुद्ध बरखास्तीचा प्रस्ताव राज्यसभेतील जवळपास ६५ खासदारानि राज्यसभा अध्यक्ष (उपराष्ट्रपती) व्यंकय्या नायडू यांच्या कडे पाठवला तो राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळला आहे तूर्ततरी दिसते . एकंदर प्रकाराबद्दल मला काही जरासे वेगळे प्रश्न पडले . राज्यसभा हे भारतीय संसदेच वरीष्ठ सभागृह.

“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”

गब्रिएल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
व्हॉसपवर एक म्येसेज फिर्तो आहे. आमाला लई इचार करनारा वाट्ला. फकस्त आप्ल्या फायद्याकडं नजर आसलेल्या बुद्दीमान लोकांला जरा तरी बुद्दी यावी या कारनाने या टिकानी द्येत हाहे. ================================================= “आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत” ©कल्पेश गजानन जोशी देशातली आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ब्रिगेडीअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा एक सत्य भाकित वर्तविणारा लेख आठवतोय. गेल्या वर्षी डोकलाम प्रश्नी मा. महाजन सरांचा “आॅपरेशन स्मिअर आणि भारत” हा लेख दैनिक पुढारीला वाचण्यात आला होता. त्यात त्यांनी स्वत:च्या सैनिकी पेशाला शोभेल असे एक गुढ सत्य मांडले होते.

टिपू आणि अकबर

माहितगार ·
लेखनविषय:
स्विकार्यता, आणि स्विकार्यतेसाठी लेजिटीमसी/योग्यतेचे चित्र उभे करणे ही सर्वकालीन राज्यकर्त्यांची गरज असते म्ग काळ कोणताही असो, अकबराचा , टिपूचा , ब्रिटीशांचा ,महात्मा गांधीचा , की आता मोदी आणि राहुल गांधीचा . जयंती कुणाचीही साजरी करता येते. - आपली संस्कृती उदार आहे, विघ्नकर्त्यांच्या पुजेसही मान्यता देते - आपण कुणाच्या जयंत्या साजर्‍या करत आहोत त्या बद्दल इतरांना काही प्रश्नचिन्हे आहेत का या बद्दल सोईस्कर दुर्लक्ष करता येते (किंवा संशयही निर्माण करता येतात) किंवा झाकपाक करता येते पण झाकलेली प्रश्नचिन्हे परत फिरुन येणारच नाहीत असे ही नसावे.

ग्राम"पंचायत" लागली..!! - 10

विशुमित ·
https://www.misalpav.com/node/41800 मन्या चिंगाट घराकडे सुटला. काही तासच उरले होते. त्याची अस्मिता सकाळी सकाळी पदवीची शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या माहेराला जाणार होती. ती परत दीड महिन्यांनीच येणार होती. मोठा ग्याप पडणार होता. पदवीचा विषय आहे भूगोल. भूगोलसाठी दीड महिना? मी तर आयुष्यात (म्हणजे शाळेत, १० वी पर्यंत) २ तासाच्या वर कधीच अभ्यास केला नाही भोगल्याचा. मला हर्षा भोगले आवडायचा पण भूगोल... ह्या. ती भूगोल घेऊन पुढे काय करणार आहे तो मन्याचं जाणे.

आनंद नगर

शब्दानुज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही कथा दुर्दैवाने काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा वास्तवाशी बराच संबंध आहे. तो लागल्यास निव्वळ योगायोग समजू नये. आनंदनगरात क्रिकेटची मॅच रंगात आली होती. गणेश ,सुर्याजी विरुद्ध अहमद , सिद्धार्थ असे गट पडले होते. अहमदची विकेट आधीच पडली होती. बॅटिंग करायला सिद्दार्थ उभा होता. या पठ्याला बॅटिंग जमायचीच नाही. या चौघात तो लहान होता. जी अवजड बॅट त्याला उचलायचाच कष्ट पडायचे त्याने खेळणे खुपच लांबची गोष्ट ! गोलंदाजीसाठी सुर्याजी उभा होता. आपल्या खेळीतून त्याने अहमदच्या टिमसमोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान ठेवले होते.

'आप' तो ऐसे ना थे..!

अँड. हरिदास उंबरकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'आप' तो ऐसे ना थे..! सत्ता नावाची गोष्टच अशी असते कि ती भल्याभल्याना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचवत राहते. सत्तेचा उपयोग नीती आणि विवेकाने केला तर तिच्यामुळे माणसातले माणूसपण फुलते. मात्र, हीच सत्ता डोक्यात शिरली कि ती माणसाच्या नैतिक अधःपतनालाही कारणीभूत ठरू शकते. कुणी सत्तेचा वापर जनहितासाठी करतो.. तर कुणी या सत्तेच्या भरवश्यावर आपला स्वार्थ साधून घेतो. सत्ता माणसाला घडवतेही आणि बिघडवतेही. हातात सत्ता असताना नीती नियम आणि तत्तवांचे पालन करून घडलेल्या व्यक्तीची इतिहास नोंद घेतो. तर सत्तेसाठी तत्व सोडून स्वार्थ जपणाऱ्या व्यक्तीला इतिहासही माफ करत नाही, हा सुद्धा एक इतिहास आहे.

निर्दोष घोटाळा !

अँड. हरिदास उंबरकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निर्दोष घोटाळा ! देशाच्या अर्थकारणालाच नाही तर राजकारणालाही कलाटणी देण्यास कारणीभूत ठरलेला 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी मंत्री ए. राजा यांच्यासह सर्व १९ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. देशात घडलेल्या एकंदर गैरव्यव्हारापैकी 2 जी स्पेक्ट्रम चा गैरव्यवहार सर्वात मोठा समजला जात होता. ‘कॅग’सारख्या संस्थांनी तर यात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याचे अहवाल दिले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश सीबीआय ला दिला.