Skip to main content

मुक्तक

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

सैरभैर .......

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 15/08/2011 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
काचेतुन बाहेर लॉन वर एक कावळा दिसतोय. कावळाच असावा. तीच चालण्याची ऐट, तेच मान वाकडी करुन निरखुन पहाण, तोच अलर्टनेस . खरच कावळ्या सारख तरतरीत पाखरु नाही दुसर! पण मग हा पांढरा रंग? मला हसुच फुटल. कावळ्याची अन बगळ्याची गोष्ट आठवली. त्यात बगळ्या सारख गोर होण्यासाठी नदीवर जाउन साबू लावून, घासून घासून अंग पांढर करायच्या प्रयत्नात रक्तबंबाळ झालेला कावळा आठवला. याला माहित असेल का ही गोष्ट? नुसता साता समुद्रा पल्याडचा नव्हे तर दक्षिण गोलार्धातला कावळा हा! आपल्या भारतीय संस्कृतीच माप याला लावुन चालेल काय? च ... काय हे ? कुठून कुठ ?

स्वत:ला प्रेरित कसे कराल ?

लेखक माझीही शॅम्पेन यांनी शनिवार, 13/08/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
Get happiness out of your work or you may never know what happiness is. - Elbert Hubbard ऑफिस मध्ये पाय टाकायच्या आपल्या डोक्यात कामाची एक यादी असते , माझा असा अनुभव आहे कि कामाची यादी खूप लाम्बलचक असेल किवा हाती आलेलं काम खूप किचकट असेल तर सुरु करायचा खूप कंटाळा येतो. किवा सुरु केल तरी आरंभ-शूर होवून मध्येच ते सोडून पण देतो. कामाच्या ठिकाणी आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असताना लक्ष देवून काम करणे किती कठीण आहे ह्याचा अनुभव बरेच जणांना असेलच. आपली कामाची एकाग्रता कुठल्याही कारणाने विचलित होवू शकते. जसे १.

तळतेस भजी तू जेव्हां -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 11/08/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -) तळतेस भजी तू जेव्हां - जीव 'सुटका सुटका' म्हणतो.. मिरच्यांचे वरती तुकडे तोंडात घास का फिरतो ? बघ फेटून पीठ- कसाही का गोळा कच्चा जळतो ! ही जिव्हा रुचीहीन होते - अन्

ड्रीमकॅचर

लेखक चित्रा यांनी बुधवार, 03/08/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
काळपट ओट्यावरून पाण्याचा हात फिरवून झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात तिने पाहिले खिडकीबाहेर ते स्वप्न खुणावत अजून उभेच होते - ** पलंगावर टाकून आपले श्रांत क्लांत अंग भिंतींवरून सरकणार्‍या गाड्यांच्या सोबतीने झोपण्याआधी तिच्या लक्षात आले स्वप्न आत येऊ पाहत होते लगबगीने ** उठून तिने स्वप्नांची काढली गाळणी ठेवणीतली लटकावून दिली बेडरूममधील खिडकीवर. कुशीवर मग वळून तिला झोप कधी लागली कळलेच नाही.
काव्यरस

हायकू -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 02/08/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्री तुपाशी बळीराजा उपाशी घोडे कागदी - पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! घास हातात बाळ परदेशात पाणी डोळ्यात .. रात्र काळोखी अंधार अनोळखी दिवे चोरांचे ! अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी ..

लोकशाहि

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 30/07/2011 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
!! लोकशाहित या सगळेच भाडखाऊ !! लोकशाहि मुळेच मिळते-लिहिणे,बोलणे,विरोध,मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य, त्याचा मनसोक्त उपभोग घेणारे भाडखाऊ लोकशाहि म्हणजे काय?
काव्यरस

भार गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद.....

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 20/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अप्पा गेले. नाही विश्वास बसत अजून. अप्पा जाणं कसं शक्य आहे? अहो आत्ता उठतील आणि फिरायला जातील, भगवदगीतेतील श्लोक म्हणतील, नातू- नातींशी गप्पा मारतील, तब्बेतीची चौकशी करायला आलेल्याचीच काय चाललंय म्हणून चौकशी करतील, हसत हसत फिरकी घेतील, एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला न मागता, न विचारता देतील, असे कसे जातील? नाही. खरंच अप्पा गेले. जीवन जगावं कसं आणि मरणाला स्वीकारावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अप्पा. पु ल देशपांडे म्हणाले होते, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय उरले नाहीत. माझं सुदैव की असे पाय मला,आम्हाला लाभले.