Skip to main content

मुक्तक

कविता

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 31/10/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आत सतत काहीतरी वाजतंय कोण आहे? सारखी टक टक टक . . . सहन होत नाहीये आता कोण आहे आत? . . . बहुतेक एक कविता अडकली आहे . . गोजीर्‍या शब्दांची, साजीर्‍या उपमांची, खूप काळ लोटला आहे अडकली आहे, तळघरात . . तिने बराच प्रयत्न केला, बाहेर पडण्याचा पण सगळं निष्फळ . . . . . एकदा त्सुनामी सारखी उसळून बाहेर आली . . . बाहेर पडलीय तर छिन्नविछिन्न अन् रक्तबंबाळ . . . डॉक्टर म्हणाले आता ती अन् तिचे नशीब |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१०/२०११)
काव्यरस

नातं

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 28/10/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच येतो मी इथे रमणीय तळ्याकाठी इथली खास शांतता अनुभवण्यासाठी विस्तिर्ण काठाचं हे तळं मला नेहमीच वेगवेगळ्या रुपात भासतं काठाच्या दाट शेवाळी पाणवनस्पतीवर सतत चमचमणार्‍या पाण्याच्या रेघा त्यावरून डौलाने चालणारे बगळे मध्येच डुबकी घेणारे पाणपक्षी, बेडूक आंत पाण्याच्या मोठ्या तुकड्यावर अमाप छोटी गुलाबी कमळं असतात त्यावर दिसतात फुलपाखरं, चतुर ह्यांच्या भरार्‍या हे तळ्याचं नेहमीचं रुप पण हिवाळ्यात काही काळ हे बदलतं अचानक एके दिवशी तिथे येतात देशांतरीत पाहुणे गुलाबी, पांढर्‍या रंगाचे कलकलाटांनी तळ्याची अभिजात शांतता भंग करीत. पानथळीजागेवर पानापानातून त्यांची मायेची घरटी वसतात. नवी वीण घालतात. हवी
काव्यरस

महत्त्वाकांक्षेचे रॉकेट ..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक... आकाशात सर्वात उंच जावून व्हावा नेत्रदिपक महान यशाचा स्फोट.. सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!! - निमिष न. सोनार, पुणे
काव्यरस

जीवनाचे गाणे !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 20/10/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व जन्मी पुण्य गाठी चालू जन्मी पाप पाठी गॅस नाही हो मिळत घास नाही तो गिळत पेट्रोलचा किती जाळ रॉकेलचाही दुष्काळ रेशनला रांग मोठी माल संपल्याची पाटी दिसे भांग तुळशीत असे माल भेसळीत म्हणे पापभीरू मन हवे पांढरेच धन नको लाचलुचपती नको भ्रष्ट उचापती नेकीनेच चालू रस्ता खात खात खूप खस्ता एका डोळयात ते हासू दुजा डोळ्यात ये आसू महागाईची अंगाई रोज सरकार गाई दरबारी झोप जडे डोळे आमचे उघडे असे कष्टातले जिणे बने जीवनाचे गाणे !
काव्यरस

मनस्वी

लेखक भक्ति यांनी मंगळवार, 18/10/2011 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं धरण बांधून अडवितात नदीला... तेव्हा कसं वाटत असेल तिला ? अंतिम मिलनाची प्रचंड आस घेऊन लहरत जाता जाता अचानक आडवं आलेले धरण ... आणि त्याच्या उभ्या आडव्या विस्तारापुढे आपल्या सारया भावना, जाणिवा, आशा आकांक्षा अश्या थिजून राहिलेल्या एका जागी... उत्कट असोशीची सळसळती शलाका एका ठिकाणी येऊन अशी अबोल झालेली ... वाहणे हा जगण्याचा आदिम स्वभाव विसरून धरणाच्या दगडी छातीवर धडका देणारी ... मनात निराश.. हतबल झालेली ??? खरेच का ??? हतबल??? तसाच "ती" चा प्रवास... "मनस्वी ... " नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी जग पाहताना...