Skip to main content

मुक्तक

भंगार, डबडा, पंचर आणि अजुन ही काही !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 28/11/2011 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्व-प्रकाशित वपुंच एक वाक्य आहे, की माणूस प्रेमात पडला रे पडला की सर्वात प्रथम काय करतो ते म्हणजे कविता आणी त्यांनी अशीच एका नवकवीची (आनंद बक्षी ..आपल हे..नक्षी...आपल हे..पक्षी : नव प्रेमीची ) कविता ऐकविली. ' देइन मी तुला इडली ' ' तु दे मला डोसा ' ' पाहिन कोणी आपल्याकडे ' ' तर देइन त्याला ठोसा ' अर्थात हे कितपत सत्य आहे ते मला माहीत नाही आणि करुन घ्यायचे पण नाही !

सहज

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहज असे वाटले कि स्वप्नांच्या गावी फिरून यावे .. थोडेसे आठवणींचे गाठोडे घेऊन एकटेच बाहेर पडावे .. निवांत स्वतः स्वतःला शोधून पाहावे. काही तरी जुने फिरून नव्याने मिळते का पाहावे .. नाही जरी मिळाले तरी जुने विश्व पुन्हा एकदा अनुभवावे .. म्हणून मग आठवणींचे गाठोडे उघडून बसले नि - त्यात कधी हरवून गेले माझे मलाच कळले नाही. स्वप्नांच्या गावी जाण्याची गरजच जणू उरली नाही. जुनीच स्वप्ने पुन्हयांदा नवी वाटू लागली. मला पण माझी भीती वाटू लागली. पण स्वप्नेच ती किती वेळ सुखावण्याची ताकद असणार त्यांच्यात ?? परिस्थितीचे भान दिल्याशिवाय ती तरी कशी सत्यातून जाणार ? मी पण मग हट्टाला पेटले.

चाहूल

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
हुरहूर मनी दाटता चाहूल तुझी लागता क्षणात वाटे आला वारा अलवार केस उडवणारा तुझा तो तनगंध करे मज बेधुंद हळुवार तलम स्पर्श फुलवे मनी हर्ष कधी जातील विरह क्षण कधी संपतील हे वर्ष
काव्यरस

माणूस

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/11/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला चला चला गाढव पहायला माराच ओझ घेऊन फुकटच राबतय माणूस शोधतय ? चला चला चला पाहू गोगलगाईला शिंग वर दाखवी नि पोटात पाय - माणसाचं काय ! चला चला चला बैल बघायला मानेवर जूं नाही हूं की चूं माणूस ना तू ? चला चला चला कुत्रा पाहू चला शेपूट ते वाकडे इमानदार किती माणसाला भीती ! चला चला चला सापाला पहायला दूध पाजले तरी सवय चावायची - जात माणसाची ! चला चला चला माणूस पाहू चला - निघाले की सगळे ! घाई घाई करून स्वत:लाच विसरून ?

मन

लेखक गार्गी_नचिकेत यांनी मंगळवार, 15/11/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
ह्रदयीच्या या भावनांचे शब्द नाही सोबती, काहुर हुरहुर मात्र माझ्या काळजाला घेरती. गुंतला गुंता सुटेना, बांध मनिचा ही फुटेना धाव घेइ मन कुठे मग, आठवांच्या मागुती...... ह्रदयीच्या या भावनांचे, शब्द नाही सोबती.

शब्दावेगळे

लेखक यकु यांनी सोमवार, 14/11/2011 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
यु. जी. कृष्‍णूर्तींचे साहित्य वाचताना त्यांच्या रूपांतरणोत्तर आयुष्‍यात घडलेल्या एका अगदीच सूक्ष्‍म पण अत्यंत महत्त्वाच्या फरकाचा उल्लेख येत रहातो. हा अगदीच छोटासा फरक 'युजी' हा माणूस आणि बाकीचे जग यांतला कळीचा मुद्दा आहे. कदाचित आध्‍यात्माच्या वाटेवर चालून ती वाट संपवलेल्या सर्वांच्यामधला व बाकी माणसांच्या मधला तो फरक असावा; इतरांचं मला जास्त माहित नाही, पण युजींनी मात्र सतत या फरकावर जोर दिला आहे. हा फरक म्हणजे शब्द आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिमा! युजींच्या अंतर्पटलावर शब्दांतून कसलीही प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही.

पाणी अन् माती

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 10/11/2011 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
(१) कसं असतं ना माती आणि पाणी यांच नातंच निराळ पाण्यातल्या मातीचे प्रमाण जास्त असेल तर पाणी दिसत नाही अन् मातीतल्या पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर माती दिसत नाही . . माणसाचही असंच असतं काहीसं कधी मातीच्या देहात डोळ्यातले पाणी दाटते तर कधी डोळ्यातल्या पाण्यात मातीचा देह विरघळतो अन् मग . . कधी माती, कधी पाणी कधी पाणी, कधी माती (२) मातीत पाणी नसेल तर बीजे रुजत नसतात मातीत पाण्याशिवाय फक्त निवडुंग फुलतात . अन् पाण्यात माती नसेल तर फक्त मनीप्लांट रुजतो . . . कधीही फुले न येणारा (३) कुठल्याही पाण्यात कुठलीही माती मिसळली तर मृदगंध दरवळत नसतो . जमिनीला तडा देणा-या अनेक रणरणत्या दिवसांमधून तापलेल्या म
काव्यरस

ज्युनियर लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

लेखक मी-दिपाली यांनी गुरुवार, 10/11/2011 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वांनी 'अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र' कधी ना कधीतरी वाचले असेलच, ज्यात एका पालकाच्या भूमिकेतून शिक्षकांकडून असलेल्या सर्वच श्रेयस अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत. पण ज्याच्याबद्दल ह्या सर्व अपेक्षा आहेत, तो केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थी, त्याच्या मनोव्यापाराचं काय?

ती वाट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 08/11/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
ती वाट गोकुळातून कुंजवनाकडे जाणारी आजही ती त्याच वाटेवर प्रतीक्षा करतेय कदाचित, तिचा प्राणसखा कधीतरी अवतरेल कुंजवनातील राधिकेला भेटायला आलाच तर तिचेही भाग्य उजळेल . त्याच्या पाऊलखुणांचा वेध घेत धूळभरल्या वाटेवर अजूनही त्या स्पष्ट होत्या पण फक्त आत जाणार्‍या बाहेर येणार्‍या काहीश्या विरळ झालेल्या . त्या कुंजवनातील तो डेरेदार कदंब अजूनही, चमचमत आहे त्या चांद्रवैभवाने त्याच्या पानापानात ते मंतरल्या मुरलीचे भारलेले स्वर अजूनही दाटून आहेत तिला तो कदंब दिसतोय, पण देवकीनंदन, तो नाही तिथे..... . क्षणभर डोळ्यांसमोर रासक्रिडेत दंग गोपीका अन्, गोपीकांमध्ये उजळून दिसणारी ती अल्लड राधिका मधोमध उभा, मुरली
काव्यरस