Skip to main content

मुक्तक

रोज मरतो

लेखक निश यांनी गुरुवार, 29/12/2011 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
रोज मरतो रोज मरतो रोज मरतो सकाळी कामावर निघालो की कचरा कुनडीवर कचरा वेचणारी भुकेने रडणारी ति अनाथ मुल बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो स्टेशनवर येतो तिथे दिसत एक म्हातार जोडप व ते अडचण आहेत नविन घरात अस मानुन त्याना गावाला पाठवणार तरुण जोडप,ते बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो लोकल येते फलाटावर नेहमिसारखी डब्ब्यानमध्ये गुरानसारखी घुसलेली मानस बघुन. रोज मरतो रोज मरतो रोज मरतो दुपारी जेवणात येणारी आकार लहान झालेलि वाढणार्‍या महागाईने बिनतेलाची असलेलि रोजच असलेलि बटाटा भाजी व पोळी ,ते बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो तरी पण ह्या मरण्यातुनच रोज येते नवि उभारी जगण्याची जेव्हा घरी ये

मी हा गेम पूर्ण खेळणार..

लेखक ajay wankhede यांनी गुरुवार, 29/12/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तारुण्याच्या उंबरठयावर प्रवेश केलेला मी. सळसळतं रक्त,ओहटी न येणारं अविरत उधाण. सतत खळखळणारं मन स्वप्नांचे ढिगभर मनोरे, तरी पण का बरं वाटतं एवढं बोअर कुठून येत असेल ही अस्वस्थता जग भन्नाट वेगानं बदलतय मीच मागे पडतोय काय? का छळतेय ही बेचैनी ? का गुदमरतो जीव? का मोकळा श्वास घेताच येत नाही ? असेल प्रेम भंगाचा विरह? प्रेम तरी का म्हणावं त्याला? की असेल उतुंग भरारी घेतांनाच झालेला संधीपात? नि मग वाटते मरून जावसं... का बरं वाटत असावं असं..का? का हाच माझ्या जन्माचा हेतू? नाही नाही नाही .... आई बाबांना सांग, अर्धवट सोडून जाणार नाही हा गेम. नवं वर्षाच्या पूर्व संध्येला....
काव्यरस

एकी १

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 28/12/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
एकी १ आईने केला केक, दुरकी २ बाबांना केला फोन ! तीरकी ३ ताईने दीला पेन, चौकी ४ आमचा बाळू हुशार ! पाची ५ मिळून करू नाच, साही ६ आमचा नाच पहा ! साती ७ आमची न्यारी बात, आठी ८ घडेल का आई बाबांची भेट? नौवे ९ मिळून सारे गाऊ, दाही १० बाळूला आवडते माऊ !
काव्यरस

मनातलं जनांत

लेखक गणपा यांनी सोमवार, 26/12/2011 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात ;) ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही.

वोडार

लेखक ajay wankhede यांनी रविवार, 25/12/2011 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी ओडार, नाही हो नागरिक या देसाचा जागा दिसली खुली का ताण डेरा न.. मंग सकाळ पासून दे दनादन घाल घाव काळ्या ठीक्कार दगडावर... घामाच्या धारा,छेनि, हातोडी टक.. टक..

कधीकाळी झालेल्या कविता

लेखक यकु यांनी शुक्रवार, 23/12/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल

प्रिय मित्रा

लेखक शरद यांनी मंगळवार, 20/12/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रा, आज बरेच दिवसांनी "सुहृदगाथा" बाहेर काढले. बराच वेळ मुखपृष्टावरील अवचटांचे अजिंठाचे रेखाटन पहात बसलो. आतल्या कवितांना साजेसे गूढ. रंग सुद्धा आतील कवीतांसारखेच. पुस्तक उघडून पहिले पान पाहिले आणि एक मोठा धक्का बसला. त्यावर तू लिहले आहेस शब्द संपतात तिथून सुरू होणार्‍या दोस्तीला मला एवढेच कळवायच संध्याकाळची प्रत्येक कविता मी बकुळफुलात जपून ठेवलीय २६-१-१९७९ बस. एवढेच. सहीसुद्धा नाही. तुला त्याची गरज वाटली नाही. व त्यावेळी मलाही. पु.शि. रेग्यांचा कविता संग्रह व ग्रेसची आठवण करून देणारा, दोस्तीला बकुळफुलांचा सुगंध देणारा ...

घालमेल .. भाग १

लेखक navinavakhi यांनी सोमवार, 19/12/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच निर्णय आता दैवाच्या हवाली करणे चालले होते. मनाची घालमेल संपता संपत नव्हती. त्यात रोज एक वाईट बातमी कानावर पडत होती. रोज कुणीतरी देवघराच्या वाटेवरचा वाटसरू बनत होते. ना त्यांचे वय झाले होते, ना आजारपण त्यांच्या आसपासही पूर्वी फिरकले होते; तरीदेखील ह्या घटना घडत होत्या. त्यांच्या आप्तेष्टांचे काय हाल होत असतील, हा विचार करून मेंदूचा भूगा होत होता. शेवटी स्वतःच मनाला समजावून दैनंदिन कामे उरकली जात होती. शिवाय माझ्या आयुष्यात अनपेक्षित घडामोडी घडणार होत्या. त्याची चाहूल खूप तीव्रतेने व्हायला लागली होती. माझा मात्र खूपच वेगळ्या पातळीवर विचार चालू होता.

(काय साला त्रास आहे!)

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 15/12/2011 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :) भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला!

एकदा वाटलं कविता करावी...

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 01/12/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाटलं कविता करावी... सोप्पं तर असतं.. 'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट', त्यात काय एवढं... जमेल की आपल्यालाही एवढे काय आपण 'हे' आहोत... थोडे छान, थोडे दुर्बोध, थोड रुपकात्मक,थोडे तरल, काही मात्र अगदीच वास्तव लिहू आपण चार शब्द... मात्रा देखील जमतीलच की, वृत्त थोडी अडखळ्तील ही, कवयत्रिचे देउन नाव, निभावून ही जाईलच की... मग वाटले नको असे, मग वाटले नकोच ते, मिळेल फटका, होईलही कौतुक, पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना..... ( इतरत्र पूर्वप्रकाशित)
काव्यरस