मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

मौन!

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही. भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो. मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात. सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात.

रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध

माहितगार ·
लेखनविषय:
रोबोट्सनी जग जिंकले होते माणूस इतिहास जमा झाला होता. पण रोबोट्सना पोट नव्हते, त्वचा झाकण्याची गरज नव्हती आकांक्षा नव्हत्या त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले आता पुढे काय असा प्रश्न पडला जेव्हा त्यांना मिसळपावच्या अर्काईव्हमध्ये माहितगारची एक जुनी कविता आढळली मग त्यांनी पोट असणारे त्वचा झाकाविशी वाटणारे आकांक्षा असणारे जन्म मृत्यू असणारे रोबोट बनवले असा लावला रोबोटमय जगाने माणसाचा पुर्नशोध

एआय रोबोट प्रोफेसर

माहितगार ·
लेखनविषय:
माणसाला शिकण्यासाठी शिकवणारा गुरू लागतो म्हणून मीच बनवला हा एआय रोबोट प्रोफेसर अपल्याला शिकवण्यासाठी यापुढे त्याचे विद्यार्थी रोबोट असतील ?

नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल ✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण ✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग ✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं! ✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल ✪ प्रेमळ आजीची‌ डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका ✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध सर्वांना नमस्कार. सध्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये थोडा आल्हाददायक थंडावा मिळावा, म्हणून हा वेगळ्याच विषयावर लिहीण्याचा प्रयत्न. गेल्या काही महिन्यांमध्ये काही दिवस आजारी असल्यामुळे व फ्रॅक्चरमुळे आराम करत असताना सहज म्हणून ह्या व्यक्तीरेखा आठवल्या.

मानवंदना, अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रास

माहितगार ·
भारताच्या एकात्मतेसाठी सीमेवर लढणार्‍या वीरांना मानवंदना नेहमीच देत असतो त्यांचे लढणे जसे समोर दिसते कौतुकही समोरून मिळते याच भारतीय एकात्मतेच्या लढायांना कानांची गरज असतेच गुपचरांच्या सगळकाही जीवन, कुटूंब, पणावर लावून कौतुकाचे दोन शब्दही लाभतील याची शाश्वती नसतानाही कधी आप्तस्वकीयांकडूनच नादान टिका ऐकुनही निष्ठेने कर्तव्य बजावणार्‍या अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रांनो स्विकाराव्या आमुच्या अनेक यशस्वीभव शुभेच्छा आणि साश्रू मानवंदना त्रिवार! त्रिवार!! त्रिवार!!! प्रेर्ना अर्थातच

समाजमाध्यमांवरील निरागसता

सर टोबी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण १९९८ ला टर्निंग पॉईंट या संस्थेचं "फोरम" नावाचं तीन दिवसाचं शिबिर केलं होतं. व्यक्तिगत संबंध, कामाच्या ठिकाणी इप्सित ध्येय साध्य करण्यासाठीची बांधिलकी, आणि व्यक्तिगत प्रगती अशा गोष्टींवर काही नाविन्यपूर्ण कल्पनांच्या द्वारे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे असा त्या शिबिराचा उद्देश असतो. आजकाल अशी शिबिरं आणि त्यातील गुरु यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याकाळी तब्बल तीन हजार खर्च करून आणि रोज किमान ९ तास श्रवणभक्ती करणं हे तसे नविनच होते.

दर्शननं केला प्रवास

पराग१२२६३ ·
मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.

जैवज्ञाता श्लोक-१

Bhakti ·
लेखनविषय:
सध्या मी एक कोर्स करत आहे.त्यात मी शांतीसाठी लिखाण करते आणि लिखाणाच्या फ्लोमध्ये एकरूप होते आणि बाकी सर्व भूत-भविष्य विसरते,असे नमूद केले आहे.तेव्हा मिळालेल्या सूचनेनुसार गीतेतील श्लोक वाचून समजून मी अर्जूनाला कसे समजवले असते.याप्रमाणे लिहायचे असं सुचलं.आधी मी केवळ मतितार्थ लिहिणार होते.बाजूलाच प्रगोचा अफलातून धागा आहे.तर म्हटलं आपणही जरा विज्ञान-अध्यात्म ब्लेंड करावा.. अल्प प्रयत्न...चुभूद्या...

एक एकटा एकांत

vcdatrange ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
यावेळी काही तू भावला नाहीस. . . दरवेळी आगोशमे घेण्यासाठी रुंद हात पसरुन बोलावणारा राकट सगा जणु विरक्त वाटला, की माझचं मन खट्टू असल्यानं लांबच राहीलास रे. . इतका कोरडेपणे वागलास जसं की सोपस्कारापुरतं तळव्यांना गुदगुल्या करत वाहुन जाणार्‍या वाळूशीच फक्त तुझी बांधिलकी. बोटांच्या बेचक्यातुन अलगद झिरपुन जाताना मागमूसही राखत नाही काही क्षणापुर्वीच्या आर्द्र आलिंगनाचा! हे असे वाहते राहण्याचा काळ सरुन गेला अन् सदा सोबतीचे हक्काचे इमले साकारल्याचा फुकाच म्हणावा असा विश्वासही वाटायला लागतो तोच पुन्हा सगळं निसटुन जातय असं वाटत.