मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

दोन कविता

दत्ता काळे ·
लेखनविषय:
मधुकर जरी पिऊनी आता झालास तू बेहोष.. शोषून फुलांचे सारे जरी मधुकोष .. हा व्यर्थ तुझा आवेश, तुझा हा अंध.. पाकळया फुलांच्या तुजसाठी झाल्या बंद रुसलेले गीत रुसले गीत शब्दात अडखळे शब्द ओठावर ये ऊन झाले ते नि:शब्द येऊन तळमळे अधरावरती गाणे नशिबात कळीच्या निर्माल्याचे जिणे

मग मी असा ..शांत ...

निखिलचं शाईपेन ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
http://2.bp.blogspot.com/_9X0j7S4MiZw/SQnOxxeLa1I/AAAAAAAAAKs/bRims_stODs/s1600-h/mag+me+asa+shant.JPG किंवा ...क्लीक करा.. http://2.bp.blogspot.com/_9X0j7S4MiZw/SQnOxxeLa1I/AAAAAAAAAKs/bRims_stODs/s1600-h/mag+me+asa+shant.JPG OR http://purwant.blogspot.com/ फोटो नी कविता एकत्र यावी म्हणून ..लिंक टाकली आहे. -निखिल

पालखी

बेसनलाडू ·
लेखनविषय:
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८ 'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी? आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

चतुरंग ·
लेखनविषय:
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'आवरताना काल मिळाल्या काही कविता' वाचली आणि आम्हाला भेटलेल्या काही 'कविता' डोळ्यांसमोर तरळून गेल्या!

आजीची काठी

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आजी, आजाला काठीवीना चालण्याचे आपले मनोदय सांगत असताना,ते संभाषण तानुच्या कानावर पडते.स्वपनाळू तानु दुसऱ्या दिवशी आपले स्वप्न आजाला सांगते. चिमुकल्या तानुला स्वप्न पडे पाहाटेला आजी आणि काठी एकमेकांशी बोलताना काठी म्हणे आजीला नको सोडू कधी मला संगतीत राहून तुझ्या महत्व आलेच मला आजी सांगे काठीला नकोच घालू गळ मला इतक्या वर्षाच्या सोबतीने आला कंटाळा तुझाच मला ऐकून त्यांच्या संभाषणाला म्हणे तानु स्वत:ला स्वप्नांत का असेना पाहीन माझ्या आजीला काठीवीना चालताना श्रीकृष्ण सामंत

उठ तरुणा उठ आता..!

चन्द्रशेखर गोखले ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उ ठ तरुणा उठ आता घडवु या नव भारता गड्या रे घडउ या नवभारता ही बघ भारत जननी का अश्रु तिच्या त्या नयनी..? ना कळे तुला रे अजुनी..? का रडते वीरांगिनी...? निर्लज्जा परी स्वस्थ कसा तू..? तव मातेचे दुखः जाण तू अश्रु आईच्या नयनीचे चल उठ पुसू आता.. उठ तरुणा उठ आता घडवू या नवभारता याद कर भगतसिंगांची तू आठव राजगुरु धेय्या साठी आपण आपुल्या मरु पुन्हा अवतरु कुठे गेले ते गांधी आणिक कुठे गेले ते नेहरु....? हल्लीचे हे नव्हेत नेते हे तर माथेफिरु नकोत आम्हा उपदेश किंवा नकोच कोणी नेता अखंड भारत धेय्य आमुचे आम्हा हवी एकता..! उठ तरुणा उठ आता घडवू

निःशब्द होता सारा परिसर

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-रिझवी) जहाली असता अर्धी रात्र निःशब्द होता सारा परिसर दाहलेल्या मनाची ऐका रंजलेली ही नीतिकथा धुमसलेले उश्वास येती वणव्यातून चांदण्या सांगती डोळे मिचकावून लोळ हा धुराचा असेल आला धरतीवरून सांगुया ढगाना विझविण्या पाणी शिंपडून चंद्र सांगे चांदण्याना ऐकून हा कोलाहल नसे तसे काही जाहले त्या धरतीवर गोरगरीब बिचारे राहती त्यांच्या वस्तीवर घामाच्या दाहाने जाळ पेटती हृदयावर सांगती चांदण्या प्रवाही होण्या सागराला जलधारा ओसंडण्या सांगती त्या मेघाला सांगे चंद्रमा जेव्हा आग लागे हृदयाला अश्रूंच्या जलधारा विझवीती त्या आगीला श्रीकृष्ण सामंत

पहाट

दत्ता काळे ·
Taxonomy upgrade extras
दीप निवले रात्रीचे पहाटही अशी फुले केसातील मोगरयाचा गंध अजून, अजून खुले शब्द नव्हे ओठांवर नाजुकसे चांदणे टिपले जरी, परी ऊमले ओठांच्या स्पर्शाने लाजलीस जेव्हा तू वेड मला लागले श्वासातील गंधभान स्पर्शातच जागले पहाटेला भेटण्यास रात्र परत आली उगवली पुन्हा फिरूनी क्षितीजावर चांदणी

सहज सुचलं म्हणून

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सजणा! माझ्या दुनियेत दोन दिवस राहूनी प्रीतिसागरात पोहलो असतो दोघे मिळूनी निष्टूरा! जाणार होतास जर दूर मला सोडूनी का नाही गेलास प्रीतिचे दोन शब्द बोलूनी

आजाचं गुपीत

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रथमच तानुली आज आजा,आजीला सोडून सियरा मौन्टनवर बर्फ़ावरची मौजमजा करायला गेली होती.आजा,आजी तिच्याबरोबर येणार नाहीत म्हणून ती खूप उदास झाली होती. "तुम्हाला थंडीचा त्रास होत असेल तर डबल डबल कपडे का नाही घालत?" म्हणून मागे लागली होती.प्रेमळपणा हा तानुचा उपजत गूण आहे.तानुच्या गैरहजेरीत रात्री ती स्वपनात आली.