Skip to main content

कविता

(अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 29/07/2009 06:34 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्टावलेला तो उंच ऊस मला म्हणतो आता नको खाऊस ओली चिंब झाली झाडे कपडे ही ओले चिंब झाले तुझं ते हळुवार खेचणं माझ्य़ावर टिचकी मारून ऐकणं आणि हळुच चीर काढणं आणि माझा रस थेंब थेंब पडणं नेहमीच हात चिकट चिकट होणं प्रत्येक उसाला टक लावून बघतोस आणि एकाला ऊचकतोस तुझं उचकणं आणि आमचं पडणं झालय आता संवयीचं शेताला कधी कळणार रे मुळासकट खाऊं नये उसाला? श्रीकृष्ण सामंत
काव्यरस

ताई

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 29/07/2009 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
नाही कधीच बसले ते पाठीवरी धपाटे, जाण्या कुशीत रडण्या नशीब झुरले आहे खेळातले भांडणे वा लाडातले गालगुच्चे, ताईकडे झोपण्याला नशीब चुकले आहे ताऊचा घास पहिला भरविता म्हणे आई, "सोन्या, तुझ्या पाचवीला नशीब पुजले आहे" फोटोत फक्त हसते किती गोड माझी ताई! घेण्यास बघ मुका तो नशीब मुकले आहे रेषा कुठली चुकीची कळण्यास वाव नाही, भरल्या हातावरूनी नशीब उठले आहे (काही बदलांसह पूर्वप्रकाशित)
काव्यरस

(विडंबन केलं आहे)

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 29/07/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळणारा तो मंद बाजार, सध्या जडलाय कसलासा असाध्य आजार.. ओले चिंब झाले आकडे तन ही ओले चिंब झाले तुझ ते हळुवार चढणं माझ्याकडे टक लावुन बघणं आणि दणकन् खाली पडणं आणि माझी विजार चिंब चिंब होणं झालय नेहमीचच गार्‍हाणं नेहमीच असं टक लावुन बघतोस आणि मला भिजवतोस तुझ पडणं आणि माझा भिजणं झालंय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझ्या खिशातील भावना तुला? प्रेरणा: विडंबन हवं आहे ही विनंती, आर्थिक मंदी, बरेचदा कोसळणारे शेअर् बाजार आणि हवालदील सामान्य गुंतवणूकदार
काव्यरस

श्रावणातला पाऊस

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 28/07/2009 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा क्षणात हसणारा, क्षणात रुसणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा खट्याळ, खोडकर, उगाचच छेडणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा दु:खावर हळुवार फुंकर घालणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा अवेळी अडवून चिंब भिजवणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा कणाकणात हिरवी स्वप्नं रुजवणारा श्रावणातला पाऊस तुझ्याचसारखा अवचित येणारा, अचानक जाणारा
काव्यरस

त्सुनामी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 28/07/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
उद्दंड जाहल्या लाटा तांडव करीती वारे स्तब्ध चंद्रमा नभात हरवुन गेले तारे... बेभान जाहली गाज सागरा जावु कसा रे सारे किनारे संपले कसा आवरु पिसारे... मिठीत घेण्या धरणी करशी किती पसारे डोळ्यात दाटले पाणी सांगु वेदना कशा रे पांघरशी स्वप्न निळे स्वप्नांचे धुंद मनोरे स्नेह तुझा ओसरला रे बघ खुंटले फुलोरे विशाल
काव्यरस

हागणदारीमुक्त गाव

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शनिवार, 25/07/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने नवीन नियम काढला हाय, आत उघड्यावर बसायचे नाय, सगळ्यानी शौचालय बांधायचे , आण गाव हागणदारीमुक्त करायचे. उघड्यावर गेल्यावर दोघांचे एका टमरेलात काम होतय, कधी कधी तर एका दगडातच काम भागतय, मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय, तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय आता आमच्या गावाला हागणदारीमुक्त म्हणत्यात, ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात , कारण गावातली हागणदारी मुक्त नाय, तिच्याभोवती पोलिसांचा पहारा हाय. गावातली माणसं पण लय हुशार असत्यात, पाटच्या एवजी राच्याला परसाला जात्यात, पोलिस बिचारे दिवसभर हागणदारीबाहेर थांबत्यात, आण राच्याच लेंडकांची राखण करत्यात. आता तर ग्रामपंचायतीने कमालच केली, हा

येडु.....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 24/07/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रखर वास्तव वादी नव कविता अरे भाड्या...सोड नाड्या ओढ विड्या...भकाभका तीन पिढ्या...करती काड्या सोडतीकिड्यां....चुकाचुका सोड पुड्या...शोध किड्या बग्ज फोड्या.... टक टका आला दुडू... जातो उडू हाती कार्डु...छम्म छमा बांधु माड्या... पगार मोड्या ई एम आय सोड्या..खण खणा घेऊ गाड्या....बनवु जोड्या लोन ओढ्या.... भुर्र भुर्र्या अप्रेजल आले...डोळे ओले रुमाल भिजले..टप टपा नको रडु.. हात जोडु पीएम कडु... हलकट्ट नको नडु...
काव्यरस

कधी एके काळी..

लेखक ज्ञानेश... यांनी गुरुवार, 23/07/2009 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
============================= कधी एक काळी असा काळ होता, जिथे स्वप्न सारे पुरे व्हायचे.. मनातून वारा तरारून येता कसे फूल प्रत्येक नाचायचे ! कधी ते पहाटे दिशाकोन सारेच आदित्य रंगात रंगायचे कधी रात्रीचे गोड अंधार सारे सुखाच्याच स्वप्नात संपायचे ! असो भोवतालात गर्दी कितीही, तुझे चोरटे नेत्र भेटायचे मनाचे मनी गूज यावे कळोनी, असे काहीसे छान बोलायचे ! कधी एकदा नीट एकांत येता, हातामधे हात गुंफायचे.. असा स्पर्श स्पर्शास स्पर्शून जाता, रोमांच रोमांच फुलवायचे ! कधी शांतता खूप बोलायची ..अन कधी शब्द सारे मुके व्हायचे, कधी पावसाळाच डोळ्यात येता, चारी दिशांना धुके व्हायचे.. कधी एवढा काळ भांडायचो की
काव्यरस

रिमझिम येता वळवाची सर---

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 23/07/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम येता वळवाची सर मातीतून मग तुझाच दरवळ पानोपानी तूच खेळ्सी ह्र्दय छेडते पुन्हा तुझे स्वर रिमझिम येता वळवाची सर स्वरांतूनी तू उमलुनी येसी माझी होउन मिसळूनी जासी विहारुनी त्या स्वरांतून मी सहजच येतो पुन्हा समेवर रिमझिम येता वळवाची सर चेहर्‍यावर तव अवखळ गोडी चंचलता ती यौवन वेडी अधीर उत्कट फुलूनी येती मोती अगणित तव अधरावर रिमझिम येता वळवाची सर सहज मोती ते टिपूनी घ्यावे अपूर्ण काही राहून जावे अन् वळवाचे वेड धरावे स्वर्गातुन मग यावे भूवर रिमझिम येता वळवाची सर