Skip to main content

कविता

त्सुनामी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 28/07/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
उद्दंड जाहल्या लाटा तांडव करीती वारे स्तब्ध चंद्रमा नभात हरवुन गेले तारे... बेभान जाहली गाज सागरा जावु कसा रे सारे किनारे संपले कसा आवरु पिसारे... मिठीत घेण्या धरणी करशी किती पसारे डोळ्यात दाटले पाणी सांगु वेदना कशा रे पांघरशी स्वप्न निळे स्वप्नांचे धुंद मनोरे स्नेह तुझा ओसरला रे बघ खुंटले फुलोरे विशाल
काव्यरस

हागणदारीमुक्त गाव

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शनिवार, 25/07/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने नवीन नियम काढला हाय, आत उघड्यावर बसायचे नाय, सगळ्यानी शौचालय बांधायचे , आण गाव हागणदारीमुक्त करायचे. उघड्यावर गेल्यावर दोघांचे एका टमरेलात काम होतय, कधी कधी तर एका दगडातच काम भागतय, मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय, तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय आता आमच्या गावाला हागणदारीमुक्त म्हणत्यात, ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात , कारण गावातली हागणदारी मुक्त नाय, तिच्याभोवती पोलिसांचा पहारा हाय. गावातली माणसं पण लय हुशार असत्यात, पाटच्या एवजी राच्याला परसाला जात्यात, पोलिस बिचारे दिवसभर हागणदारीबाहेर थांबत्यात, आण राच्याच लेंडकांची राखण करत्यात. आता तर ग्रामपंचायतीने कमालच केली, हा

येडु.....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 24/07/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रखर वास्तव वादी नव कविता अरे भाड्या...सोड नाड्या ओढ विड्या...भकाभका तीन पिढ्या...करती काड्या सोडतीकिड्यां....चुकाचुका सोड पुड्या...शोध किड्या बग्ज फोड्या.... टक टका आला दुडू... जातो उडू हाती कार्डु...छम्म छमा बांधु माड्या... पगार मोड्या ई एम आय सोड्या..खण खणा घेऊ गाड्या....बनवु जोड्या लोन ओढ्या.... भुर्र भुर्र्या अप्रेजल आले...डोळे ओले रुमाल भिजले..टप टपा नको रडु.. हात जोडु पीएम कडु... हलकट्ट नको नडु...
काव्यरस

कधी एके काळी..

लेखक ज्ञानेश... यांनी गुरुवार, 23/07/2009 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
============================= कधी एक काळी असा काळ होता, जिथे स्वप्न सारे पुरे व्हायचे.. मनातून वारा तरारून येता कसे फूल प्रत्येक नाचायचे ! कधी ते पहाटे दिशाकोन सारेच आदित्य रंगात रंगायचे कधी रात्रीचे गोड अंधार सारे सुखाच्याच स्वप्नात संपायचे ! असो भोवतालात गर्दी कितीही, तुझे चोरटे नेत्र भेटायचे मनाचे मनी गूज यावे कळोनी, असे काहीसे छान बोलायचे ! कधी एकदा नीट एकांत येता, हातामधे हात गुंफायचे.. असा स्पर्श स्पर्शास स्पर्शून जाता, रोमांच रोमांच फुलवायचे ! कधी शांतता खूप बोलायची ..अन कधी शब्द सारे मुके व्हायचे, कधी पावसाळाच डोळ्यात येता, चारी दिशांना धुके व्हायचे.. कधी एवढा काळ भांडायचो की
काव्यरस

रिमझिम येता वळवाची सर---

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 23/07/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम येता वळवाची सर मातीतून मग तुझाच दरवळ पानोपानी तूच खेळ्सी ह्र्दय छेडते पुन्हा तुझे स्वर रिमझिम येता वळवाची सर स्वरांतूनी तू उमलुनी येसी माझी होउन मिसळूनी जासी विहारुनी त्या स्वरांतून मी सहजच येतो पुन्हा समेवर रिमझिम येता वळवाची सर चेहर्‍यावर तव अवखळ गोडी चंचलता ती यौवन वेडी अधीर उत्कट फुलूनी येती मोती अगणित तव अधरावर रिमझिम येता वळवाची सर सहज मोती ते टिपूनी घ्यावे अपूर्ण काही राहून जावे अन् वळवाचे वेड धरावे स्वर्गातुन मग यावे भूवर रिमझिम येता वळवाची सर

समर्पण

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 21/07/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
समर्पणाची आस उराशी, आतुर सरिता आली धावत ऐकशील का कधी सागरा अंतरिचा हा नाद अनाहत? लाटांचे हे तांडव आवर, या बेभान मनाला सावर व्यापुन राही कणाकणाला, तुझ्या भेटिची ओढ अनावर पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगर, कुरणे, दरिखो-यांतुन उसळत आले आवर्तातुन, कधि बांधांच्या चाको-यातुन कधी सोशिली ग्रीष्म काहिली, कधि शरदाची कौमुदि शीतल स्वातीचे कधि झेलित मोती, बहर वसंताचा कधि चंचल एकरूप होईन तुझ्याशी, नको दुरावा, नकोच अंतर सामावुन घे अंतरात मज, वाहुन थकले मीहि निरंतर

(वाटेवर मी तुझ्या लावले--)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 21/07/2009 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवर मी तुझ्या लावले दोन फटके गालावरले ह्रदयातून मग लक्ष लागले फटके खाऊनी गाल सुजले? जोरात ठेवला हात तिथे मी तुझ्या चुकीला शिक्षा किती ? धोत्र्याची फूले द्यावी तू मला? हाणायला मग कसली भिती? लुब्रा मेला टोमणे मारतो समजतो मला खुळी शीळ घालीत प्रीत मागतो विसरतो की मी न भोळी ? मोका मिळता मग उचलली पादत्राणे दोन हलकी गंध देउनी क्रोधभराने वाजवूनच ठेवीली खाली तू मेल्या तरीही तसाच हलकट आणि बाईल वेडा छळीसी कितीकां तसाच वाटे हाणाव्या दोन फडाफडा. मैत्रीणी टपल्या असती किती त्रस्त होऊनी तुला मारण्या रे बावळ्या वेश कावळ्या पैजार शस्त्रे घेऊनी हाती
काव्यरस

मज वाटे ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 21/07/2009 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मज वाटे पावसाशी नाते माझे नित्य असावे आसवांनी शुष्क माझ्या पावसात सचैल न्हावे पांघरुनी पाऊसधारा हिरवे मी गवत बनावे क्षणभंगुर जलथेंबाचे हलकेच तोल सावरावे हिरवाईचे हळवे स्पंदन श्वासांनी अलवार टिपावे मुग्ध ओल्या जाणिवांनी पावसाचे गाणे शिकावे पावसात अन भिजताना हलकेच तुज मनी स्मरावे ओलेत्या स्मृतीत तुझिया भान सखे क्षण विसरावे विशाल.