सरकारने नवीन नियम काढला हाय,
आत उघड्यावर बसायचे नाय,
सगळ्यानी शौचालय बांधायचे ,
आण गाव हागणदारीमुक्त करायचे.
उघड्यावर गेल्यावर दोघांचे एका टमरेलात काम होतय,
कधी कधी तर एका दगडातच काम भागतय,
मग सांगा जिथ प्यायला पाणी नसतय,
तिथ आख्खी बादली कोण कशाला संडासात वततय
आता आमच्या गावाला हागणदारीमुक्त म्हणत्यात,
ही लोकं खोटा खोटाच बोर्ड लावत्यात ,
कारण गावातली हागणदारी मुक्त नाय,
तिच्याभोवती पोलिसांचा पहारा हाय.
गावातली माणसं पण लय हुशार असत्यात,
पाटच्या एवजी राच्याला परसाला जात्यात,
पोलिस बिचारे दिवसभर हागणदारीबाहेर थांबत्यात,
आण राच्याच लेंडकांची राखण करत्यात.
आता तर ग्रामपंचायतीने कमालच केली,
हागणदारीमध्ये लाइट बसवली,
आता गावकरी लख्ख प्रकाशात हागत्यात ,
आण गावाचे नाव रोशन करत्यात.
सरपंच म्हणे गावात स्वछता कमिटी येणार हाय,
पण कमिटी काय गावाची नीट तपासणी करणार नाय,
साहेब मस्त कोंबडी आण बोकड्यावर ताव मारतील,
आणि आमच्याच गावाचा पयला नंबर देतील.
याद्या
2820
प्रतिक्रिया
7
लेखनविषय:
मिसळपाव
चांगली कविता!
नक्कीच
+१
In reply to नक्कीच by फ्रॅक्चर बंड्या
एकिकडे हे
वा !! छाण !!
अतिशय चपखल रूपक
वा ! मस्त