Skip to main content

कविता

उन्हाळी दुपार...

लेखक वैभव देशमुख यांनी शुक्रवार, 17/09/2010 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळी दुपार सुस्तावले रान मुके पानपान जाहलेले आंब्याच्या पानात पाखरे गुडुप मेंढ्यांचा कळप आंब्याखाली बाभूळ झाडाची फाटकी सावली तेथे विसावली गुरे काही सुक्या नदिकाठी नग्न उभे साग आकाशात आग लागलेली कुणी एक बाई सरपण शोधात लेकरू पोटात वाढताना... - वैभव देशमुख

माहीत नव्हतं...

लेखक अथांग यांनी शुक्रवार, 17/09/2010 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
नशीबाला दोष देता देता नशीबाचा कौल घेता घेता, नशीबात तू पण असणारेस..... माहीत नव्हतं ! खडतर पायवाट तुडवत जाता काट्यांना त्यावर चुरडत फिरता, फुलासारखं तू जपणारेस..... माहीत नव्हतं ! अस्ताव्यस्त आयुष्य विखरता कणा-कणाने झुरता-झुरता, आपसुक, अलगद सावरणारेस..... माहीत नव्हतं ! आत खोल काहीसं तुटता मरत-मरत जगता-जगता, श्वास होऊन तारणारेस....... माहीत नव्हतं !!!

फसू नका तुम्ही फसू नका

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/09/2010 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
फसू नका तुम्ही फसू नका
विज्ञानाची कास धरा तुम्ही ज्योतिषांच्या नादी लागू नका फसू नका तुम्ही फसू नका ||धृ|| लांब दाढी कपाळी टिळा बोटात अंगठ्या गळ्यात माळा समोर पोपट चिठ्ठी काढतो त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो गद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय? अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका फसू नका तुम्ही फसू नका ||१|| देई गंडा ताईत दोरा अंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा
काव्यरस

माझ्या झोपेची झाली आता येळ

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/09/2010 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या झोपेची झाली आता येळ
माझ्या येथील काव्याचे हे विडंबन म्हणावे की स्वतंत्र काव्य हे तुम्हीच ठरवा. आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ|| दिसभर मी राबराबतो कष्टानं दमून जातो किती आटवन तुझी मला येई कामामदी बी लक्ष लागत न्हाई दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ माझ्या झोपेची झाली आता येळ ||१|| कधी दिवसपाळीत दिस जाई कधी रातपाळी आडवी येई हातामधी हात तुझा कधी मी घेई? त्यासाठी ज
काव्यरस

शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/09/2010 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ
आग कारभारनी झाली का झुनका भाकर? शेतात जायाची माझी झाली आता येळ ||धृ|| निसती मिरची कुट ग जरा तीचा खर्डा कर ग चवीला बरा भाकरीबरूबर लागं तिखाट जिभंला मंग पानी प्यावं म्हंतो पोटाला बेगीनं आवर आन चुलीत पेटव जाळ शेतात जायाची माझी झाली आता येळ ||१|| त्याच्यासंग दे ग तू कांदा पातीचा लाव भाकरीला एक हात लोण्याचा घरी राकून ठेव प्वाराला दुध गाईचं उरल्यालं मला दे तांब्यात वाईचं लवकर टाक त्यात उलीसा गुळ श
काव्यरस

कधीपासून ?

लेखक अथांग यांनी बुधवार, 15/09/2010 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेला नाव देण्याची (ठेवण्याची) आमच्यात प्रथा नाही, पण इथे आपली चार अक्षरं प्रकाशित करायची म्हणजे तिचे आधी नामकरण करणे आवश्यक असल्याने ही नवी कला आत्मसात करायच्या प्रयत्नात आहे. जिथे काही नाव सुचणार नाही तिथे कवितेची पहिली ओळच शीर्षकात घालावी म्हणते.

आभाळ लागले मिळू

लेखक स्वानंद मारुलकर यांनी मंगळवार, 14/09/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
आता कुठे उजाडले आभाळ लागले मिळू सविता प्रकाश लागला या चांदण्यात विरघळू वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला तव चोरटा कटाक्ष गे मग लागला जिवा छळू येशील भेटण्यास तू जेव्हा पुन्हा मला प्रिये प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू ना सांगता कधी तुला ना बोलता कधी मला माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू नाही कुठे उणेपणा संसारवेल मोहरे एकेक स्वप्न साजिरे साकारते हळूहळू -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस

हवी कशाला मग तलवार ?

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 14/09/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
हवी कशाला मग तलवार ? मकरंदाहुनि मधुर तरीही शर शब्दांचे धारदार तळपत असता जिव्हा करारी हवी कशाला मग तलवार ?......!! शब्दच असती कवच कुंडले शब्दच चिलखत होती शब्दच होती आयुधे ऐसी नभास भेदुनि जाती शब्द खड्ग अन शब्द ढालही परतवती ते हर वार.......!! नवनीताहुन मऊ मुलायम कधि कणखर वज्रे आसवांनी भिजती पापण्या कधि खळखळ हसरे हीनदिनांचे सांत्वन करिती गाजविती दरबार....!! भुंग्यासम शब्दांची गुणगुण कधि व्याघ्राची डरकाळी शब्द फटाके,शब्द फुलझडी कधि नीरवता पाळी जोशालागी साथ निरंतर कधि विद्रोही फूत्कार ....!! सृजनशीलता-करुणा-ममता संयम विभूषित वस्त्रे हजरजबाबी, तलम,मधाळहि परि कधि निर्भिड अस्त्रे

जुना जमाना गेला आता नवा जमाना आला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/09/2010 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला
जुना जमाना गेला आता नवा जमाना आला शालिनता गेली सारी कुठं, दिखावूपणा राहीला ||धृ|| आईवडील मोठे करती मुलाला आजारपणात साथ देती त्याला शिक्षण देती गुणाचा व्हायला म्हातारपणी मुलगा पांग फेडी वृद्धाश्रमी धाडी म्हातार्‍या आईबापाला जुना जमाना गेला आता नवा जमाना आला ||१|| शिक्षक विद्यार्थी नाते किती पवित्र असे शिष्य गुरूला आधी वंदन करीत असे आदराने मान झुकवूनी विद्यार्थी बोलायचा शिक्षकही आदर्श व्यक्ती त्याला बनवायचा आता शिक्षक
काव्यरस

कसं सांगू मी तुला,

लेखक अमोल मेंढे यांनी सोमवार, 13/09/2010 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
कसं सांगू मी तुला, माझ्या प्रितीच्या फुला, तुझ्या वाचुनी मला, आता करमत नाही...... मी झालो वेडा-पिसा, हा रोग असा कसा, चारचौघांमधे मी, आता मिरवत नाही...... एकांतात बसुनी, तुझे चिंतन मनी, आठवण दुसरी, आता करवत नाही...... स्वप्नी छळते फार, खरं कधी येणार, मिठीत येना धीर, आता धरवत नाही..... मिठीत येना धीर आता धरवत नाही..... ही आमची उचापत
काव्यरस