Skip to main content

कविता

पहावे अंतर्यामी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणे देव भक्ताचा भुकेला वारकरी मेला वारीतच विश्वात्मक ऐसे इथे काही नाही तुच तुला पाही आत मध्ये तुझ्या अस्तित्वाचा एकच पुरावा मी पणा पहावा अंतर्यामी अंतर्यामी घ्यावा शोध ज्याचा त्याने विचार स्पंदने निरिक्षावी सांडे अहंकार वासना विकार जेव्हा निर्विकार पाहसी तू...!!
काव्यरस

निसर्गाची भाषा

लेखक शुचि यांनी शनिवार, 25/09/2010 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आई फक्त माणूसच बोलू शकतो का? नाही बाळा, सारी सृष्टी बोलते आपल्याशी ऐक जरा. फक्त भाषा भिन्न असते. ____ चंद्राची भाषा चांदणे, सूर्याची भाषा रवीकिरणे वार्‍याची भाषा झुळकेची, समुद्राची अलवार गाजेची ||१|| पिंपळवृक्षाची सळसळ, नदीनाल्यांची खळखळ सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||२|| कमळ बोलतसे उमलण्यामधुनी, मधमाशी ती कष्टांमधुनी पहाड बोले अचलपणांतुनी, नभ ते त्याच्या पोकळीतुनी||३|| मौन होउनी संवाद साध बघ, आकळेल निसर्ग तुला सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||४||
काव्यरस

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

तू येतोस ...

लेखक ढब्बू पैसा यांनी शुक्रवार, 24/09/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न! गेलं एक वर्ष खूप वाचलंय इथे. लिहिण्याचं धाडस मात्र आज पहिल्यांदाच करतेय. थोडी धाकधुक आहेच. जे लिहिलंय त्याला कविता किंवा मुक्तक काय म्हणायचं हे मलाही ठरवता येत नाही. ह्या कवितेला मला सुचली होती ती "इश्किया" चित्रपटानंतर.
काव्यरस

भक्तीगीतः गणपती त्यांच्या घरी गेले

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/09/2010 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती त्यांच्या घरी गेले
गणपती त्यांच्या घरी गेले मनाला रुखरुख लावूनी गेले ||धृ|| दहा दिवस थांबले घरी आनंद आणला त्यांनी दारी पुजा अर्चनाने घर पवित्र झाले गणपती त्यांच्या घरी गेले ||१|| म्हटल्या आरत्या मोठ्या आवाजाने ओवाळले निरांजन भक्तीभावाने प्रसादाचे मोदक कितीक वाटले गणपती त्यांच्या घरी गेले ||२|| हर्षाचा उत्सव पुर्ण झाला आता नाच नाचून देहभान हरपता "पुढल्या वर्षी लौकर या" सारे बोलले गणपती त्यांच
काव्यरस

Conditions apply ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 23/09/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येइल... तेव्हा तेव्हा मी परत अवतार घेइन... तु सांगितलं होतंस रे कृष्णा... पण विसरलास ना....? conditions apply चा क्लॉज टाकायला...! विसरलास रे देवा... धर्माची तुझी व्याख्या सांगायला, आम्ही अडकलोय.. हिंदु-मुस्लीम अन शिख, इसाईच्या फसव्या चक्रव्युहात का नाही सांगितलीस तेव्हा...? व्याख्या .... मानवतेची .... तुला अभिप्रेत असलेल्या माणुसधर्माची...? विशाल कुलकर्णी
काव्यरस

विडंबन परिपूर्ती करा

लेखक योगप्रभू यांनी गुरुवार, 23/09/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिलेल्या ओळीची विडंबन परिपूर्ती त्याच मीटरमध्ये करा. तुमची ओळ हसू येणारी हवी, पण अश्लील नको. परिपूर्तीसाठी ओळ आहे राजसा जवळी जरा बसा आता तुम्हाला त्यापुढे गेयता टिकेल असे दोन-तीन शब्दच टाकायचे आहेत. उदाहरणार्थ राजसा जवळी जरा बसा, लाळ ती पुसा किंवा राजसा जवळी जरा बसा, रडा ढसढसा (पुन्हा एकदा विनंती : अश्लील सूचक शब्द टाकू नयेत)
काव्यरस

अनंत.....

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 23/09/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
सोहोळ्यातुन सोहळ्याकडे चालले आयुष्य सारे, सोहळा हरेक घडी क्षणी बदलताच वारे ॥ चाहुल लागता जन्माची प्रथम सोहळा घडे, मातृपद देउन तिजला हळुवार पाउल पुढे ॥ नामकरण अन उष्टावण भरभरुन जमती जन, वाढदिसांची त्यातच गणती वर्षांचे उठवुन व्रण ॥ सोहळे शिक्षणा आधी सोहळे शिक्षणा नंतर, कळे न जीवनी कशास सोहोळ्यांचा हवा मंतर ॥ सोहळा प्रत्येक पायरी विवाह; नोकरी; यश भर त्यातच सणासुदिंची उस्तव, आठवुन तो ईश ॥ आला संपत जन्म पण सोहळे पुरुन उरले, रौप्य, सुवर्ण, हिरक जरतारी वस्त्र लाभले ॥ उपस्थिती चे संपले सोहळे अन, अनुपस्थिती आता, श्राद्ध, वर्षस्मरण, पुण्यतीथीच्या घडती जनात बाता
काव्यरस

मुंबई

लेखक अथांग यांनी गुरुवार, 23/09/2010 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी तुम्ही म्हणाल, सध्या सण-वारांचे दिवस, सर्वत्र उत्साही वातावरण. थोडक्यात 'आल इझ वेल' असताना, ही कुठल्या रसाची कविता का पब्लिश केली आहे? त्याचं काय आहे की अनेक सल, जखमा, व्रण वागवत आपली वाटचाल सुरु असते. जो जिवंत आहे त्याला जगणे चुकत नाही. परंतु, काल नेट वर कहीतरी शोधत/वाचत असताना मुंबईतील हल्ल्यांचा व स्फोटांचा संदर्भ आला व त्या अनुशंगाने तेंव्हा लिहीलेली ही कविता आठवली. जखमेवरची खपली निघाली व ती जखम उघडी पडली.. तुम्हाला दु:खी करण्याचा किंवा नको त्याची आठवण करून देण्याचा मानस नक्कीच नाही.