Skip to main content

कविता

कलम, आज उनकी जय बोल - रामधारी सिंह दिनकर

लेखक शुचि यांनी मंगळवार, 18/01/2011 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर भटकत असताना अतिशय गेय अशी एक कविता माझ्या वाचनात आली. वीररसाने ओथम्बलेली ही रचना हिंदीतील नामवंत कवी "रामधारी सिंह दिनकर" यांची असून खाली उधृत केलेली आहे. अनाम ,नामवंत, अमर, लहान, थोर अशा स्वातंत्र्यवीरांना ही कविता अर्पण केलेली आहे. पहीले कडवे चटका लावणारे आहे आणि ते वाचत असताना भगतसिंग, राजगुरु, चाफेकर बंधूंची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. "जो चढ़ गये पुण्यवेदी पर लिए बिना गर्दन का मोल।" हे वाचतानाच काळजात चर्र होते. दुसर्‍या कडव्यातील रुपक अप्रतिमच आहे.

भज्जी पार्टी

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/01/2011 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नव्हती तशी, हवा थंडगार होती सुर्याने कापसाची रजाई ओढली होती हवेच्या झुळूका गुदगुल्या करून जाती ग्लासांनी भज्यांची ऑर्डर सोडली होती नाकाने इकडेतिकडे पाहीले थोडे हुंगून पिणारे केव्हाचेच गेले होते रंगून पेय ओरडले भजी!

उंदीरमामा आणि मनीमावशी -

लेखक विदेश यांनी रविवार, 16/01/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी ! उंदीरमामा हसले मिशीत , टेबलावरती चढले खुषीत - फोन लावला कानाला जोरात लागले बोलायला - " उंदीरमामा मी इकडे ; कोण बोलतय हो तिकडे ? " - विचारले मामानी झटकन उत्तर आले की पटकन- " मी तुमची मनीमावशी, कालपासून आहे उपाशी ." - मनीमावशी भलती हुषार , टुणकन मामा बिळात पसार !!
काव्यरस

काव्यक्षण (कविता संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 16/01/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मिसळपाव वर प्रकाशीत झालेल्या सर्व कविता एकत्रीत स्वरूपात येथे देत आहे. - निमिष न.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 15/01/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!... भोगीच्या दुसर्‍या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली! संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा! आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा.... हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका... स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-? पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल! उतरत्या वयातही नवर्‍याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल" रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम! "जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!

' नववर्षी-संकल्प ' जाणता ...

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 14/01/2011 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार , सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार - देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार - आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार ! सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार 'अभिनयाच्या अंगा'स्तव 'तो' 'स्त्री-वेषी' न होणार 'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत बोलणार निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार 'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!
काव्यरस

नाती

लेखक अभिसरिका यांनी शुक्रवार, 14/01/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
नाती नाती नाती नाती........... जुळ्लेली, जोडलेली, लादलेली...... खरच हवी असतात का आपल्याला ही नाती ? वाटत', बरेच वेळा आपल्याला ग्रुहितच धरतात ही नाती....! नाती....काही प्रेमाची, काही मैत्रीची, काही कर्तव्याचीही, दमछाकच होते मात्र निभावताना ही नाती...! नाही तोडून टाकता येत त्याच्यापासून आपल्याला..... मग वह
काव्यरस

मन माझं गोगलगाय !

लेखक मितान यांनी शुक्रवार, 14/01/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझं गोगलगाय खुट्टं वाजता शंखात जाय प्राजक्ताचा दरवळ घेऊन रांगत पहाटवारा आला शिंका येतील ! आल्या शिंका !! नाक हाती शंखात पाय ! मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय खुणावताना हिरव्या वाटा मनास दिसतो केवळ काटा काटा टोचेल ! टोचला काटा !! मान फिरवून शंखात जाय मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय समोर फुटती लाट अनावर सरसरून ये नभ धरणीवर थेंब उडतिल ! कपडे भिजतिल भिजेल डोकं !

आम्ही कविता करतो

लेखक असुर यांनी शुक्रवार, 14/01/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सरळ काही सुचत नाही एक वाक्य धड लिहीता येत नाही पण व्याकरणावर रण माजवतो सध्या आम्ही कविता करतो चार ओळी इकडून उचलून चार ओळी तिकडून उचलून तरीही वामनाचे आम्हीच वारस आम्हीदेखील कविता करतो कुणी वाचो, अथवा न वाचो कुणी निंदो, कुणी वंदो घंटा कुणाला फरक पडतो म्हणूनच आम्ही कविता करतो मदत, कौल, काथ्याकुटाचा आता जरी का कंटाळा आला वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो त्यासाठीच तर आम्ही कविता करतो कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य 'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो कवितेच्या खेळात या लेख जगती, लेख मरती चांगल्या
काव्यरस

काय असते कविता ?

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 13/01/2011 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य मग ..शब्द काय आहेत ? बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्‍या ..दुसरे काय .. आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..? अव्यक्त मनाला व्यक्त करण्याचे साधन..? की मनात काहीच नाही म्हनुन विचार करणारे एक चलन ? काहीच कळत नाही... भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ? की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ? अस असेल तर काय असत मग .. वृत्त ..लय .. मुक्तछंद.. ? मला वाटत आपणच नियम केले आहेत सारे आणि गुरफ़टलोय या नियमात ..या प्रश्नात आयुष्य .. आयुष्य ही असच गुरफ़टलय .. या नियमात का नाही कळल मला.. आयुष्य .. अन आयुष्याची कविता...?