Skip to main content

कविता

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 15/01/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!... भोगीच्या दुसर्‍या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली! संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा! आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा.... हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका... स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-? पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल! उतरत्या वयातही नवर्‍याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल" रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम! "जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!

' नववर्षी-संकल्प ' जाणता ...

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 14/01/2011 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार , सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार - देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार - आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार ! सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार 'अभिनयाच्या अंगा'स्तव 'तो' 'स्त्री-वेषी' न होणार 'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत बोलणार निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार 'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!
काव्यरस

नाती

लेखक अभिसरिका यांनी शुक्रवार, 14/01/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
नाती नाती नाती नाती........... जुळ्लेली, जोडलेली, लादलेली...... खरच हवी असतात का आपल्याला ही नाती ? वाटत', बरेच वेळा आपल्याला ग्रुहितच धरतात ही नाती....! नाती....काही प्रेमाची, काही मैत्रीची, काही कर्तव्याचीही, दमछाकच होते मात्र निभावताना ही नाती...! नाही तोडून टाकता येत त्याच्यापासून आपल्याला..... मग वह
काव्यरस

मन माझं गोगलगाय !

लेखक मितान यांनी शुक्रवार, 14/01/2011 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझं गोगलगाय खुट्टं वाजता शंखात जाय प्राजक्ताचा दरवळ घेऊन रांगत पहाटवारा आला शिंका येतील ! आल्या शिंका !! नाक हाती शंखात पाय ! मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय खुणावताना हिरव्या वाटा मनास दिसतो केवळ काटा काटा टोचेल ! टोचला काटा !! मान फिरवून शंखात जाय मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय समोर फुटती लाट अनावर सरसरून ये नभ धरणीवर थेंब उडतिल ! कपडे भिजतिल भिजेल डोकं !

आम्ही कविता करतो

लेखक असुर यांनी शुक्रवार, 14/01/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सरळ काही सुचत नाही एक वाक्य धड लिहीता येत नाही पण व्याकरणावर रण माजवतो सध्या आम्ही कविता करतो चार ओळी इकडून उचलून चार ओळी तिकडून उचलून तरीही वामनाचे आम्हीच वारस आम्हीदेखील कविता करतो कुणी वाचो, अथवा न वाचो कुणी निंदो, कुणी वंदो घंटा कुणाला फरक पडतो म्हणूनच आम्ही कविता करतो मदत, कौल, काथ्याकुटाचा आता जरी का कंटाळा आला वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो त्यासाठीच तर आम्ही कविता करतो कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य 'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो कवितेच्या खेळात या लेख जगती, लेख मरती चांगल्या
काव्यरस

काय असते कविता ?

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 13/01/2011 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य मग ..शब्द काय आहेत ? बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्‍या ..दुसरे काय .. आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..? अव्यक्त मनाला व्यक्त करण्याचे साधन..? की मनात काहीच नाही म्हनुन विचार करणारे एक चलन ? काहीच कळत नाही... भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ? की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ? अस असेल तर काय असत मग .. वृत्त ..लय .. मुक्तछंद.. ? मला वाटत आपणच नियम केले आहेत सारे आणि गुरफ़टलोय या नियमात ..या प्रश्नात आयुष्य .. आयुष्य ही असच गुरफ़टलय .. या नियमात का नाही कळल मला.. आयुष्य .. अन आयुष्याची कविता...?

मी पण एक कविता करणार आहे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 13/01/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा मित्रानो ..!! थोडेसे क्षणभर थांबा दम घेउद्या मला सूर जराशे लावूद्या अन बघा मी काय करतोय ते मित्रानो..!
काव्यरस

केवढे हे क्रौर्य! - ना वा टिळक

लेखक शुचि यांनी गुरुवार, 13/01/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
ना वा टिळक यांची अतिशय सुंदर आणि कारुण्यरसाने ओतप्रोत भरलेली रचना म्हणजे "केवढे हे क्रौर्य!". ही कविता वाचून , डोळ्यात पाणी न आलेला माणूस विरळाच. ही कविता खूप चटका लावते. माझ्या आवडत्या कवितांपैकी ही एक कविता आहे. अतिशय चित्रमय वर्णन असलेल्या या कवितेच्या पहील्या कडव्यात कवीने एका जखमी पक्षीणीच्या वेदनामय आणि करुण शारीरीक स्थितीची वर्णन रेखाटले आहे. ही पक्षीण बाणाने विद्ध झाल्याने तिच्या कोमल शरीरातून भळभळा रक्त वहात आहे. अतिरक्तस्त्रावामुळे तिला वारंवार ग्लानी येत आहे आणि तरीही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही पक्षीण आपले घरटे शोधीत उडत आहे.

मन!

लेखक राघव यांनी बुधवार, 12/01/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं! जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं.. मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास! जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!! मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप.. जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप! मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार.. जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर! मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड! जशी पावसाची सर..अलगद..अलवार.. मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात.. जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!! राघव
काव्यरस