लेखकअरुण मनोहरयांनी सोमवार, 17/01/2011 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नव्हती तशी, हवा थंडगार होती
सुर्याने कापसाची रजाई ओढली होती
हवेच्या झुळूका गुदगुल्या करून जाती
ग्लासांनी भज्यांची ऑर्डर सोडली होती
नाकाने इकडेतिकडे पाहीले थोडे हुंगून
पिणारे केव्हाचेच गेले होते रंगून
पेय ओरडले भजी!
लेखकमृगनयनीयांनी शनिवार, 15/01/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!...
भोगीच्या दुसर्या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली!
संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा!
आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा....
हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका...
स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-?
पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल!
उतरत्या वयातही नवर्याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल"
रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम!
"जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!
लेखकविदेशयांनी शुक्रवार, 14/01/2011 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार ,
सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार
शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार
वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार -
देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार
शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार -
आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार !
सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार
'अभिनयाच्या अंगा'स्तव 'तो' 'स्त्री-वेषी' न होणार
'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत बोलणार
निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार
'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!
लेखकअभिसरिकायांनी शुक्रवार, 14/01/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
नाती
नाती नाती नाती...........
जुळ्लेली, जोडलेली, लादलेली......
खरच हवी असतात का आपल्याला ही नाती ?
वाटत', बरेच वेळा आपल्याला ग्रुहितच धरतात ही नाती....!
नाती....काही प्रेमाची, काही मैत्रीची, काही कर्तव्याचीही,
दमछाकच होते मात्र निभावताना ही नाती...!
नाही तोडून टाकता येत त्याच्यापासून आपल्याला.....
मग वह
लेखकअसुरयांनी शुक्रवार, 14/01/2011 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली सरळ काही सुचत नाही
एक वाक्य धड लिहीता येत नाही
पण व्याकरणावर रण माजवतो
सध्या आम्ही कविता करतो
चार ओळी इकडून उचलून
चार ओळी तिकडून उचलून
तरीही वामनाचे आम्हीच वारस
आम्हीदेखील कविता करतो
कुणी वाचो, अथवा न वाचो
कुणी निंदो, कुणी वंदो
घंटा कुणाला फरक पडतो
म्हणूनच आम्ही कविता करतो
मदत, कौल, काथ्याकुटाचा
आता जरी का कंटाळा आला
वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो
त्यासाठीच तर आम्ही कविता करतो
कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य
बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य
'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो
बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो
कवितेच्या खेळात या
लेख जगती, लेख मरती
चांगल्या
लेखकगणेशायांनी गुरुवार, 13/01/2011 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य
मग ..शब्द काय आहेत ?
बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्या ..दुसरे काय ..
आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..?
अव्यक्त मनाला व्यक्त करण्याचे साधन..?
की मनात काहीच नाही म्हनुन विचार करणारे एक चलन ?
काहीच कळत नाही...
भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ?
की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ?
अस असेल तर काय असत मग ..
वृत्त ..लय .. मुक्तछंद.. ?
मला वाटत आपणच नियम केले आहेत सारे
आणि गुरफ़टलोय या नियमात ..या प्रश्नात
आयुष्य .. आयुष्य ही असच गुरफ़टलय .. या नियमात
का नाही कळल मला.. आयुष्य .. अन आयुष्याची कविता...?