Skip to main content

कविता

पाउलखुणा

लेखक गणेशा यांनी सोमवार, 03/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत.. सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा आणि मागोवा .. कश्यासाठी ...? कोणासाठी...? बहुदा एका प्रश्नमालिकेतून पुन्हा दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्यासाठीचा अखंड प्रवास गुरफ़टलेली तर ही रात्र ही आहे .. उदयस्ताच्या रंगात न्हाऊनही कालवंडली आहे बिच्चारी माझे काय मग त्यापुढे.. अता माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर माझ अस्तित्वच संपत चाललय .. पण या रात्रीच्या सोबतीनेच मी जगते आहे..

लतादेवीची आरती

लेखक JAGOMOHANPYARE यांनी सोमवार, 03/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जय देवी जय देवी जय लता देवी शंभर वर्षे माझेही करियर करवी | त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही सारे श्रमले तरी तू गात राही काही विवाद करिता पडले प्रवाही तुझा गायन निर्झर अखंड हा वाही |१| जय देवी... सांगलीवरुनी उड्डाण मुंबई-पंढरी किती गायिकांची भरली शंभरी वीणा, नुपूर आणि आली बासुरी तुझिया वाणी आल्या परा वैखरी |२| जय देवी.... तुझिया कृपेने सारे मंगल होऊ दे पेडर रोडवर माझा बंगला होऊ दे भारतरत्न माझ्या घरी येऊ दे 'कोल्हापूर-नंदन' सुखिया होऊ दे |३| जय देवी...

किती सांगू मी आनंद झाला-

लेखक विदेश यांनी शनिवार, 01/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल:- किती सांगू मी सांगू कुणाला-) किती सांगू मी आनंद झाला , भाव भाज्यांचा खाली ग आला ! गडे जाऊ चला , भाज्या आणू चला- रुपयाला किलो कांदा झाला ! ।१। नवर्‍याच्या संगती ग , पिशव्या हाती घेऊन मी आले ‘नको हसू गालात , नको चालू तोर्‍यात-’ नवरोजी कुरकुरले ! चुका-दोडका-लसूण , कोबी-आलं-सुरण , नवलकोलात फ्लॉवर दिसला ! ।२। मेथी शेपू भेंडी ग , पालकाची पेंढी भुलले ग्राहक किती ! कुणी मागे गवार , कुणी घेवडा-मटार शेंगांना नांवे किती ! रोज फोडी करून , ते बटाटे चिरून- सांज सकाळी कंटाळा आला !

..गंधमुग्ध

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी शनिवार, 01/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यामध्येच रमले होते.. तुझ्या मूळेच फुलले होते... उमलले तुझ्यामुळे गंधले तुझ्यामुळे... कोवळ्या अन मुग्ध या रेशीम स्पर्शी पाकळ्या खुलल्या तुझ्यात अन् उमलल्या तुझ्यामुळे.. गंध भरल्या पाकळ्यांची ही नजाकत मखमली टवटवी अन् हा तजेला.. लाभला तुझ्यामुळे .. बहर सरला... गंध विरला.... झाले मुक्त फुलुनी उतरली धुंदी नजाकत वेळ झाली मिटायची परत बंद....परत मुग्ध.... मिटेन मी तुझ्यामध्ये गंधमुग्ध, स्पर्शमुक्त मिटेन मी तुझ्यामध्ये मिटेन मी तुझ्यामध्ये ......
काव्यरस

महाराष्ट्र्गीत

लेखक पिनुपवार यांनी शनिवार, 01/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय आम्ही नायक राष्ट्राचे मराटी आमचि माता इतिहास घडला फडकला पतका इथे एक जाती -धर्म सातपुडा दक्शिनेची गंगा हेच आहे इथे मर्म महाराष्ट्र दैवत माझे
काव्यरस

नूतन वर्षाच्या शुभेच्छांसाठी

लेखक भाववेडा यांनी शनिवार, 01/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
थिजलेला पारा, निजलेला वारा, गुलाबी पहाटे, भिजलेल्या तारा, धरतीवर दाट, धुके पहुडले, त्यात गुपित, नव्या वर्षाचे दडले, उगवेल दिनकर, धुके विरेल, उघडेल गुपित, जादू घडेल, हीच जादू आपल्या, आयुष्यात घडावी, आमच्या शुभेच्छांची लहर, त्या सोबत जडावी || हे मिपावरील माझे पहिले लेखन आहे, तेव्हा काही चुकले असल्यास माफी असावी. ख्रिस्ती नूतन वर्षाच्या सर्व मिपाकरांना मनःपूर्वक शुभेच्छा।

नुतनवर्षास....

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 01/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
.. रे नववर्षा रे नववर्षा ये नेमाने वल्हवित अंकुर नवजोमाने एक कवडसा चैतन्याचा जा फुलवीत ही उदास राने ....! ना अस्त्राने वा शस्त्राने उकलन व्हावी सद्भभावाने मत्सर-हेका ना गर्जन-केका बाहुबलीचे नको भूजाने .....! दानवाने ना देवाने राज्य करावे बळीराजाने आत्मग्लानी क्लेश त्यजुनी जगावा पोशिंदा सन्मानाने ...! रे नववर्षा दे अभयाने दे भरुनी दुरडी भगोणे वित्तपातल्या लक्तरांना भरव मुक्तीचे चार दाणे ...! ..

आरती गुरूदत्ताची

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 31/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, शब्दगारवा २०१० मध्ये गुरूदत्ताची आरती गेल्या दत्तजयंतीला प्रकाशीत झालीय. ती येथे देतोय. शब्दगारवा २०१० त आणखीही लेख अन कविता आहेत. त्या आपण नजरेखालून घालाव्यात. (कवितेत सार्थ बदल प्रकाशकाकांनी केले आहेत.
काव्यरस

प्रत्येक दिवस नूतन आहे...

लेखक ज्ञानराम यांनी शुक्रवार, 31/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव.. सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ? किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर, किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल, नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं क

कधीही काहीही होऊ शकते ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 31/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रचंड शहर खास पोटापाण्यासाठी राखीव कुरण गरिबांचे शहर श्रीमंताचे शहर मौज-मस्तीचे शहर संस्कृतीचे शहर सांस्कृतिक शहर चिंचोळ्या गल्लीतून दिसणाऱ्या खिडकीचे शहर आता हे शहर आहे बंदुकीच्या टोकावर गोळी कधीही उडू शकते बोंब कधीपण फुटू शकतो गाडीमध्ये ... स्टेशनमध्ये ...... भर गर्दीत ... कोठेही कधीही ..! सावध ..! नि फक्त सावध ..!! काय करू शकतो...? मी? ,तुम्ही ,??आपण ??? तुमच्या पाठीत कधीपण घुसू शकतात संगीनीची टोके आजकाल मरायच्या नि मारायच्या गोष्टी फार सोप्या होऊन गेल्यात अम्बुलंसवाला सहज सांगतो ;थकलो साहेब ,शंभर बोड्या सोडून आलो काय मजाक आहे का ? नि साले बोनस देत नाहीत .....
काव्यरस