Skip to main content

कविता

क्षण

लेखक निनाव यांनी रविवार, 24/04/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण वाहणारे हातातून निसटणारे येतील का पुन्हा जुळून विसरता न येणारे क्षण भरणारे आठवणींतून झरणारे येतील का पुन्हा दाटून बु़जवता न येणारे क्षण चमकणारे निराशेस विझवणारे येतील का पुन्हा उजळून लपवता न येणारे कुणास ठाऊक ते येतील कधी धरतील हातात हात मैत्रीचे कधी मिठीस घेऊन एक्-मेकांस विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा क्षण लांबणारे हवे हवेसे ते वाटणारे येतील का उतरून पुन्हा आयुष्यास ते हसवणारे - निनाव २४ अप्रिल २०११

शब्दांच्या मालगाड्या

लेखक निनाद यांनी रविवार, 24/04/2011 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल परवा कधी तरी रक्तवर्णी वारुणी सोबत मिसळपाव पाहतांना मिकासोबत खरडाखरडी झाली त्यात मी दिलेला हा प्रतिसाद बहुदा कविता आहे असा 'सौंक्ष्यय' आला. फक्त मिकानेच का माझ्या काव्याचे भोग भोगावेत? या विचाराने मला दया आली. दु:ख वाटल्याने कमी होते असे शाहरूख खान म्हणतो, म्हणून ही एक शब्द करूण आणि भयाण कविता सगळ्यांनाच वाटून टाकत आहे.
काव्यरस

असेलही कुठे कुठे

लेखक bhaktipargaonkar यांनी शुक्रवार, 22/04/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल जिणे कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
काव्यरस

प्रथम क्रमांक स्पर्धा विजेता कविता

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/04/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे? "घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही? सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे? कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कस

नवा खेळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 21/04/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०४/२०११)
काव्यरस

पत्राचे दिवस ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 21/04/2011 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी कसे छान दिवस होते तारुण्याचे कसे एक गाणे होते पत्र येईल येईल म्हणून मन वाट बघायचे निळ्या पत्रात मन हरवून जायचे शब्दांची रांगोळी कशी छान वाटायची निळ्या निळ्या आभाळात कशी पाखरे उडायची तिच्या घरासमोरचा पिंपळ सळसळताना दिसायचा संध्याकाळी ती खिडकीतून दूरवर नजर टाकीत वाट बघायची [अशी कल्पना त्याच्या डोक्यात यायची] नुसत्या आठवणीने किती बहरून जायचे मन जुनी पत्र चाळताना किती हरवून जातेय मन ...! पोस्टमनची वाट बघता बघता कसा दिवस हरवून जायचा स्वप्नात तिचा भास छळत राहायचा ..!! पत्राची एक निराळीच गंमत होती तिच्या लिहिलेल्या शब्दाशब्दावर जीव फुलत होता अधून मधून चोरून पत्र वाचत र
काव्यरस

वासंतिका‏

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 20/04/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वागता पुन:र्मिलनाच्या उत्तरा अन रविच्या घेऊन बहार साचा आला वसंत आला || विरह तो सहा मासांचा तिज शुष्क थंड शिशिराचा गर्भात फुलवीत आशा पुन:रुपी वसंत आला || रंगेल सोहळा आता विरहीत दोन जीवांचा उभारीत गुढ्या पर्णांच्या विलासी वसंत आला || लेऊन गर्द हिरवाई कोरून पुष्प काशिदाही रसरशीत फळे ही पदरी मिलनास अधिर अवनी ही || आला वसंत आला .......... __/\__ अपर्णा
काव्यरस

भातुकलीचा खेळ ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/04/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच वर्षांची आपली निस्सीम मैत्री "संपवून" ठरवले करूयात दोनाचे चार हात ... वरवरून सगळे छान होते सगळा आनंद होता ...

पावसात भिजतांना

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/04/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
बरसणार्‍या मेघधारांना वार्‍यावर पेटतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना ग्रीष्माचा दिवस सारून श्रावणसांज अवतरतांना पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना ओलेत्याने तिला माझी कविता गुणगुणतांना पहायचेय मोहरून तो कोकीळकंठ पालवतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०४/२०११)
काव्यरस