Skip to main content

कविता

पुन्हा नव्याने...

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 13/04/2011 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : हा प्रतिसाद पुन्हा नवा खेळ मांडूया पुन्हा अनोळखी होऊया पुन्हा नव्याने भेटूया चल पुन्हा नव्याने जगूया ओंगळ दु:खांना स्वछ पुसून गोजीर्‍या सुखांना गिरवूया जन्मांतरीचे आपले रेशमी नाते नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया चल सखे................. सुंदर प्रेमाचे साजिरे रूप नव्याने एकवार लेवूया हुकलेल्या सार्‍या स्वप्नांना मनाच्या गाभार्‍यात रुजवूया चल सखे................... सोड आता हा समंजसपणा काही क्षण फिरून धुंद होवुया विसरुनी हा विरस शहाणपणा पुन्हा नव्याने कोवळे वेड पांघरुया |- मिसळलेला काव्यप्रेम
काव्यरस

चांदण्यांस मिठी मारतांना

लेखक निनाव यांनी बुधवार, 13/04/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यांस मिठी मारतांना चंद्रास गोड का वाटत असेल? त्यास आलिंगनात भरतांना रात्रीस मोह का आवरत असेल? दिवस उजाडुच नये कधी वाटत तिला ही असेल मोहक चंद्रा च्या पाशातुन सुटतांना जीव तारकांचा का आवळत असेल? चंद्रा च्या कुशी खालून अलगद पदर खेचून पहाटे आंथरुणातून उतरत रात्र जेंव्हा असेल सुटलेल्या केसांमधुनी लाज आवरत पदरा खालील मन तिचे का बांवरत नसेल? मधु-चंद्र काय असावे चंद्रास का ते कळत असेल? रोजच असते रात्र त्याचीच मोह मिलना चे का उमगत असेल? चांदण्यांस मिठी मारतांना चंद्रास गोड का वाटत असेल? चंद्रास आलिंगनात भरतांना रात्रीस मोह का आवरत असेल?
काव्यरस

न्याय तुमचा खास आहे

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी मंगळवार, 12/04/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
............ न्याय तुमचा खास आहे तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे. आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे. कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे. भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे. पेरले मी, राखले मी.

नारो शंकराची घंटा ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 12/04/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दगडी देवळाच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या अर्धवर्तुळात ती घंटा पितळेची ,कदाचित पंचधातूची पुरुषभर उंचीची घनघोर आवाजाची खालूनच नदी वाहतेय गोदावरी आखीव रेखीव काठ शिसवी रंगाच्या कभिन्न दगडांनी बांधलेला किनारां पावसाळ्यात त्यावरून वाहणारे झुळझुळ पाणी पायावरून वेलांटत नागमोडी पसरत सरकणारे पाय भिजवीत महादेवाच्या दर्शनाला गेल्याची बारीकशी आठवण मंदिरात घुसताना घंटेचे दर्शन घाबरून जायचो तिच्या आकाराने बेलाचे पान वाहताना डोळे मिटून घ्यायचो तेव्हा घंटाच यायची डोळ्यासमोर घंटा तशी बर्याच उंचीवर महापुरात देखील पाणी नाही लागत तिच्या पायाला जेव्हा लागेल तेव्हा सगळे गाव जाईल वाहू
काव्यरस

काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 12/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो? न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे गवताची पाती सजली या भयाण राती काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहे ------ शब्दमेघ

सरसरणारे यौवन तुझे ते

लेखक निनाव यांनी मंगळवार, 12/04/2011 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर सर सर सर थेंब गालावर ओले मोती ते ओघळणारे पडता पडता थेट तुझ्यावर मन माझे ते जळणारे थांबायचे? सरकायचे? प्रश्न त्यास पडले भिजवायचे-लाजवायचे मनी असे ठरले केसांमधुनी ओठांवरती थेंब ते कोसळणारे श्वासांमधल्या गंघामधुनी प्रेम ते दरवळणारे बोलायचे? न बोलायचे? प्रश्न त्यास पडले भुलवायचे, भिजवायचे मनी असे ठरले लाजत लाजत गुलाबी मनावर नाजुक इतुके ओठ लाजणारे येताच जवळ मी होत बांवरे गोड भितीनं ते थरथरणारे स्पर्शायचे? फुलवायचे? प्रश्न त्यास पडले पाहायचे, साठवायचे मनी असे ठरले उन्मद लाटा हरवुन वाटा किनार्यावर आदळणारे सोडत बंधन हळुच सारे तन तुझे आज पाघळणारे नेसायचे? सावरायचे?

अक्षय पात्र

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 11/04/2011 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
तु मला अजुनहि जानलं नाहिस कारण तुझा स्वभाव च तसा आहे त्याला मि तरि काय करु. मि तर भरभरुन देतो... तुला घेता च येत नाहि , त्याला मि तरि काय करु. मि देता देता थकत नाहि, पण तु घेता घेता च थकतेस, त्याला मि तरि काय करु. मि तुला देतो ते हि तुला आवडत नाहि, मि तिला देतो ते हि तुला आवडत नाहि. कारण तुझा स्वभाव च तसा आहे.. त्याला मि तरि काय करु. मि तुला तिला सर्वानाच देतो ... तरि माझं पात्र रिकामं होत नाहि. मि सदैव त्रुप्त तु सदैव अत्रुप्त . आज मि तुला माझं अक्षयपात्र च देतो.. ते तरि तु निस्वन्शयि मनाने घे. नि मि जसा देतो तसं तु भरभरुन दे.

का केली मैत्री ही अशी...?

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी रविवार, 10/04/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगायचं तर..... आज-काल मैत्री करयची देखील खुप भीती वाटते । कारण.... कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते । बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या नात्यातले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देउन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात । ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो । हर्षद अ.प्रभुदेसाई....