....नाही
जगण्यास वाव नाही , मरणांस भाव नाही
आम्ही भणंग सारे, आम्हां उठाव नाही !
ओथंबली कितीक पडद्यात आसवांच्या
ही खुसखुशीत दु:खे यांना झराव नाही !
वणव्यांत आठवांच्या उरलो न मीच माझा
तुझिया मनांत माझा तरिही पडाव नाही !
फुलतो अजून येथे हा मोगरा टपोरा
केसांत माळण्याचा.....उरला सराव नाही !
------------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे, (१३ सप्टेंबर २०११)-----