प्रवास .....
वाटेवरून चालताना हलकीच ठेच लागते,
कुणीतरी “जा” म्हणाले तरी थांबावेसे वाटते
थांबताच मनातल्या आठवणी काहूर करतात ,
आणि कधीचे दाटलेले पाणी डोळे भरून टाकतात ,
जड जड पायांनी परत आपण चालू लागतो वाट ,
अंधारातून चालता चालता होऊ लागते पहाट ,
ओंजळ भर मोगरा बाकी पारिजताकाच सारा ,
निळ्या निळ्या आकाशात शुभ्र ढगांचा पसारा ,
मन सकाळीच तेवढे प्रसन्न , मग गहिवरून येते ,
वाऱ्यासंगे वाहता वाहता परत फुलापाशी थांबते ,
मेघ येतात दाटून मग ,बरसून जातात संध्याकाळी ,
तेव्हाच बहरतो निशिगंध आठवणींच्या वेळी ,
विसरव म्हणले तरी विसरता येत नाही ,
दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही ,
पाउस पडून गेल
लेखनविषय:
याद्या
1151
मिसळपाव