पाहूच की
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची
अन् आरशाला प्रतिमांची
.
आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची
कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते
अंधार असो वा उजेड
नावड असो वा आवड
त्याला लिहावीच लागते,
हृदयातून उमटणारी ओळ
.
जसे पाण्याला घ्यावाच लागतो,
त्यात मिसळणारा रंग
.
पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला
पाण्याचा रंग आणि
कवीची ओळ
म्हणूनच मी निवांत आहे
.
माझ्या ओळीच्या प्रारब्धिही
असेलच कि उजेड
उजळेल तेव्हा पाहूच की
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०९/२०११)
काव्यरस
मिसळपाव