Skip to main content

कविता

रत्नांच्या बघ राशी झाल्या..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 05/06/2012 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नांच्या बघ राशी झाल्या, माझ्या काचखड्यांच्या काटे भरल्या वाट होती , मखमल पायघड्यांच्या ओले हिरवे झाले माझे, मौसम निष्पर्णाचे निळे जांभळे फ़ूल श्रावणी, देही गोकर्णाचे तुझ्यासोबती वाटा सार्‍या, यमनामधले गाणे घमघमणार्‍या सुरावटींशी, नाते लोभसवाणे रोमरोमी भिजते मीही, हळवा श्रावण दे ओघळते मी प्राजक्तासम, भिजलं अंगण दे उधाणू दे ना सागरलाटा, तुझ्या किनार्‍यावरी तुझी पौर्णिमा होऊन आले, तुझ्याच मी अंबरी -प्राजु
काव्यरस

नियती

लेखक हरवलेल्या जहाजाचा कप्तान यांनी मंगळवार, 05/06/2012 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी, सैरभैर, प्रश्नांकित होऊन, शरिर स्वतःला हरवुन बसतं गर्दीत लहान मुलासारखं आणि कधी आपण मनाला हरवु देतो कधीकधी वेगळं जगता यावं म्हणुनसुद्धा.... पण नियती कधीच हरवुन बसत नाही स्वतःला ती आंधळ्या डोळ्यांनी नी बांधलेल्या हाताने धापा टाकत, मूकपणे चालत रहाते. तिच्यात सापळ्याआड धडधडणारं असं काहीच नसतं. कुण्याच्याही स्पर्शाने उभे रहाणारे किंवा सुटणारे प्रश्न नसतात. भंगणारी आकांक्षा, फाटलेलं ह्र्दय शोकाचे सुर पश्चातापाचे निश्वास जखमा आणि सारं काही असतं शवपेटीत बंद. आणि चालताना सोबत असते फक्त एक न संपणारी शवयात्रा

उत्सव

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 04/06/2012 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छ किनारी हिरव्या दारी नभी खगांची सोनभरारी आकाशी विरघळे चांदवा दिवस; उषेच्या दरबारी पुनव जशी; शीतल अंबारी स्वप्न पापण्यांच्या मखरी ओतप्रोत गाण्यांच्या लहरी जळ; प्रतिमेच्या गाभारी गोड पिसे स्वच्छंद अंबरी दिसे दूरचे जवळ उरी उत्सव हा जुळल्या धाग्यांचा रोज असावा संसारी .............................अज्ञात
काव्यरस

Blood Hymns - 1

लेखक हरवलेल्या जहाजाचा कप्तान यांनी सोमवार, 04/06/2012 05:06 या दिवशी प्रकाशित केले.
ही माणसं एकत्र का रहातात? कपल्स म्हणुन? कुटुंब बनवुन? शहरं वसवुन? देश, धर्म?? पावलं घेऊन जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा जाणवलं, जिथे जिथे पोकळी आहे, तिथे कुंटणखाने निपजलेले आदिम संस्कृतीला पर्याय म्हणुन? कुणास ठाऊक पण, पोकळीला पर्याय नव्हते संदर्भ नव्हते तिथे आतमध्ये खुप सोप्पंय किंचाळू नका श्वास घ्या धपापु नका हपापुन घ्या पाऊस पाडा पिकं घ्या एकबारी, दुबारी..कितीही.. एक स्तन वासनेचा दुसरा स्तन मायेचा बाहेर व्यवहार - अर्थहिन आतले व्यवहार - अर्थपुर्ण? तशात मोकळी दारं घेऊन एक नाशवंत बाई माझ्या पायथ्याशी येते येळकोट येळकोट स्तनाग्र दिठी, स्नायुंची मिठी मासावरच्या त्वचेसकट थरारते मांडी शल्याचे अर्थ ख

माझ्या निसर्गास..

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 01/06/2012 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
विषादाने मन ओतप्रोत भरलेलं असताना, अंगावर येणारी झुळूक, तुझं आस्त्तित्व जाणवून देणारी.. तुझं सुंदर हिरवंगार, रूप पाहून मळभाने दूर सरावंच! निराशा झटकण्यासाठी, नव्या जोमाने लढण्यासाठी, चैतन्याला जिवंत ठेवण्यासाठी, खरं तर- जगण्याचंच बळ मिळवण्यासाठी, पुन्हा तुझाच आधार, तुझीच गरज...! कधी कधी मग आपसूकच मिळतं उत्तर- का तुझ्या इतकी जवळ आहे ते.. फक्त, तू प्रलय घडवून आणू नकोस...!

थोडी सुखी, थोडी कष्टी

लेखक शरद यांनी गुरुवार, 31/05/2012 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
"आली माहेरपणाला ('http://www.misalpav.com/node/18384) या इंदिरा संत यांच्या कवितेत आपण एका माहेरवाशीणीची व्यथा पाहिली होती.पण ही अशी एखादीच व्यथा असू शकते असे नाही. या माहेरच्या भेटीत अनेक पैलू पहाता येतात.स्वत:च्या पहिल्या मंगळागौरीकरिता वा बाळंतपणा करिता येणारी,घरातील दुसर्‍या एखाद्या मंगलकार्याकरिता येणारी, ... अशा आनंददायक घटनांबरोबरच घरातील एखादी वृद्ध व्यक्ती गमावणे अशा दुख:द प्रसंगाकरिताही ती माहेरी येणे अपरिहार्य असते. अनेक कवितांचे बीज ह्या भेटीत कवीला खुणावत असते. विंदा करंदीकरांनी अशीच एक हळुवार कहाणी पुढील कवितेत गायिली आहे.

सतावणारा प्रश्न तुझा " मी जाऊ "

लेखक रघु सावंत यांनी मंगळवार, 29/05/2012 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
सतावणारा प्रश्न तुझा " मी जाऊ " तुझ्याकडे पाहून तुला हवय काय माझ्या शिवाय कुणाला कळेल काय डोळ्यातले भाव ह्रदयातील ताना माझ्या शिवाय कधी कळतील काय ओझरता स्पर्श अनं भरलेले ऊर माझ्या शिवाय कधी मिळतील काय जाशील तू दूर पण सवयीचा श्वास माझ्या शिवाय कुठे मिळेल काय असशील सुखात पण प्रेमाची शाल माझ्या शिवाय कुणी पांघरेल काय येताजाता तुझ्या प्रेमाचा कटाक्ष माझ्या शिवाय कुणी झेलेल काय ते आसुसलेले ओठ ती प्रेमाची भूक माझ्या शिवाय कुणी क्षमवेल काय रुपगव्रीते तुझ्या तारुण्याची तारिफ माझ्या शिवाय कुणी करेल काय रंगल्या रात्री तुझ्या प्रेमाचा मिलाप माझ्या शिवाय कुणी करेल काय तुझ्या ह्रदयाला हाक प्रेमाची
काव्यरस

दूर-आशा

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 29/05/2012 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
पापण्यांचे सोस माझ्या पंजरी बिलगून हे अंतरी ओल्या खळ्याचे श्वास अजुनी नागवे अंकुरे खडकातही; ध्यासातले आलेख हे खोल रुतलेले; कळे ना कोण संधी जागवे ओतणे निर्व्याज पाणी आणि अगणित जोगवे थेंब थेंबाचा उसासा शार माती जोजवे गुदमराला एक रेषेचे उताविळ घर नवे दूर-आशा गात येई कोंब घेउनिया सवे .................................अज्ञात

लाच लाच लाच

लेखक निश यांनी मंगळवार, 29/05/2012 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
लाच लाच लाच... जिथे तिथे चहुकडे द्यावी लागते लाच. जन्म घेण्यासाठी मुलगा की मुलगी ह्याची द्यावी लागते देवाला नवसाची लाच. जन्म नोंदणी करण्यासाठी लागते द्यावी लाच. शाळेत दाखल करण्यालापण द्यावी लागते लाच. पोरग परीक्षेत पहिल याव म्हणुन आई बापाची पोराला बक्षिसरुपी लाच. नोकरी लावायला मग घेतो साहेब लाच. काम करुनही ओफीसात चांगली मिळत नाही बढती , बढती साठी मग द्यावी लागते लाच. देवाच्या देवळात वियापी स्पेशल पासाची लाच. डॉ़क्टररुपी देवालाही हवी असते लाच. सैनिकांच्या शवपेटीत असतेकी हो लाच. गांधी टोपी खाली दडलेली असते की हो लाच. टीव्ही असो कि पेपर असो मिडियावाल्याना बातमी लपवायला किंवा दुसर्‍याची

ऐन वसंतात ....

लेखक मनिषा_माऊ यांनी सोमवार, 28/05/2012 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ || भरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा कोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा झुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१|| मेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला नवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला हळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२|| मन कावरं बावरं , मन केवड्याच रान किती सावरू आवरू आज सुटले हे भान किती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३|| नाही संपला अजुनी सये तुझा वनवास तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४|| सनईचा सूर का गं असा बेसूर लागला वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला किती दाबला हु
काव्यरस