एक होती चाळ...
आठवणीं आठवता आठवता,अशी माझी चाळ होती
दोन खोल्यांच घर आमच,तरी सगळ्या चाळीशी आपुलकी होती.
चाळ कधी वाटलीच नाही ती, चाळकरी लोकांच ते एक कुटुंबच होत.
परक्या लोकानाही आपलस वाटाव अस मायेच छप्पर होत.
नेहमीच येता जाता पाठीवर शाबासकीची थाप होती.
चुका केल्या तर कानफडात मारणारी आप्त होती.
एका घरात चहा झाला तर दुसर्या घरात खाण व्हायच.
रात्री आई बाबाना घरी यायला उशीर झाला तर शेजारुन घरपोच जेवण यायच.
जाती पातीला इथे नेहमीच दुय्यम स्थान होत.
माणसातल्या माणुसकीला नेहमीच पहिल मानाच पान होत.
घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती.
गावाहुन आलेल्या लोकांची इथे रहायची हक्काची सोय होती.
संकट आल एखाद्या घ
मिसळपाव