Skip to main content

कविता

एक होती चाळ...

लेखक निश
शुक्रवार, 13/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीं आठवता आठवता,अशी माझी चाळ होती दोन खोल्यांच घर आमच,तरी सगळ्या चाळीशी आपुलकी होती. चाळ कधी वाटलीच नाही ती, चाळकरी लोकांच ते एक कुटुंबच होत. परक्या लोकानाही आपलस वाटाव अस मायेच छप्पर होत. नेहमीच येता जाता पाठीवर शाबासकीची थाप होती. चुका केल्या तर कानफडात मारणारी आप्त होती. एका घरात चहा झाला तर दुसर्‍या घरात खाण व्हायच. रात्री आई बाबाना घरी यायला उशीर झाला तर शेजारुन घरपोच जेवण यायच. जाती पातीला इथे नेहमीच दुय्यम स्थान होत. माणसातल्या माणुसकीला नेहमीच पहिल मानाच पान होत. घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती. गावाहुन आलेल्या लोकांची इथे रहायची हक्काची सोय होती. संकट आल एखाद्या घ

घरातल्या भिंतींना...

लेखक अज्ञात
मंगळवार, 10/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच वेळा आपल्या घरातील लहानगे भिंती रंगवतात... त्या रंगवेल्या भिंतींचा कौतुकही कोणाला एवढ नसत किवा त्या कोणाला खराबही वाटत नाही, पण काळाच्या ओघात त्या भिंतींना नवीन रंग दिले जातात आणि त्या नक्षी रंगाच्या पडद्या आड लपल्या जातात... थोडासा प्रयत्न ह्या आठवणी चाळण्याचा... आणि मनाच्या कोपर्यात जिवंत ठेवण्याचा... घरातल्या भिंतींना आता नवीन रंग दिलाय... त्याच्यामागे एक काळ झाकला गेलाय... समोरची हि मोठ्ठी भिंत...
काव्यरस

वारीसोबत चार पावलं....

लेखक मन
रविवार, 08/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेमकं लवकर उठून शुचिर्भूत होताच समोर दिंडी चाललेली दिसली. त्यावर ज्ञानेश्वर ,तुकाराम ह्यांचेही फोटो दिसले, वारिचे रिंगण बहुदा बनवले जात होते. मनातल्या मनात त्यांच्यासोबत चार पावलं फिरुन आलो. "जे न देखे रवी" मध्ये प्रथमच लिहीत आहे. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ मझिया मना देइ भगवंता. तुझिया कृपेने झालो मी अमर मेलो मी तक्त्क्षणी उरलो हा नश्वर. तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा ज्वाळा ह्या शांत, बुडविती अनंता आता काय होणे सांगी पांडुरंगा ठाकलो उभा दारी तुझ्या वाजवी टाळ सजवी मृदुंगा टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा ---मनोबा---
काव्यरस

सर्सर आल्या सरीत...

शुक्रवार, 06/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सर्सर आल्या सरीत कोणी दोन मैत्रिणी शोधत होत्या एक आसरा, त्या ओल्या क्षणि! डोक्यावरुनी घेत ओढणी चालत भरभर जशा सरी त्या येतच होत्या सर्सर सर्सर ! चेहर्‍यावरती चिंता होती चिंब तनांची मनात गणिते चालू आणिक क्षणाक्षणांची! शोधक नजरा, अंगचोरट्या, थरथर देही ओघळणारे थेंब टपोरे सचिंत तेही! वारा वाहे, उठे शिरशिरी चिंब तनातून ओला श्रावण हळूच डोकावला मनातून! मनात भरता श्रावण कोणा हवा अडोसा? चिंब भिजावे, ओलेती बोलावी भाषा ! त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे ! म्हणून भिजल्या सरीत अवखळ,दोन मैत्रिणी होउन गेल्या चिंब चिंब त्या थेंब श्रावणी! -चैतन्य दीक्षित

खंड कपारी

गुरुवार, 05/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अभिषेकाचे ओढे नाले वाहुन गेले माघारी शिरी बोडके उरले कातळ हिरवळ सुकली संसारी तळी साचले मुके सरोवर किमया प्रतिबिंबित सारी अगणित लेणी खंड कपारी दिसल्या मजला गाभारी काठ किनारे भिजलेले आकाश पृष्ठ्भर निजलेले रंगात निळ्या लहरींवरती पवनाचे स्पर्श पहुडलेले जड एक कोपरा माझाही काळजात काहुर दडलेले कजळरात्री अंधार नभी चांदणे भ्रमात विखुरलेले .........................अज्ञात
काव्यरस

'उरा'तली सर!

लेखक मेघवेडा
मंगळवार, 03/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. :) परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर!
काव्यरस

जुनी गोष्ट...

लेखक विदेश
मंगळवार, 03/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
चिमणे चिमणे दार उघड, म्हणत कावळा थांबत होता बाळाला तीट लावत लावत.. चिमणीचा वेळ जात होता शेणा-मेणाच्या त्यांच्या घरात पाऊस दंगा करत होता बाळ मजेत आईच्या कुशीत, रंगीत स्वप्नात शिरत होता ! ...पावसाची वाट पहात पहात, चिमणी खूपच थकली आहे दाराबाहेरच्या कावळ्याने, मान बाजूला टाकली आहे जुनी गोष्ट..नव्या पिढीतली आई बाळाला सांगत आहे बाबाचा जीव सिमेंटच्या घरांत वरखाली टांगत आहे !

कळले ते अंडे

लेखक ऋषिकेश
मंगळवार, 03/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
थकल्या भुकेस पटकन केवळ कळले ते अंडे नेमक्यावेळी पचका करूनी जळले ते अंडे खरपूस वास, तोंडी पाणी, भट्टी जमली वाट्टं परंतु केकच्या झाकणामागे हसले ते अंडे गणिताच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी तरी पेपरावरती शेवटी उरले ते अंडे कठोर तपाच्या नंतर देवा मनभावे स्मरले. विश्वाचे इंगीत म्हणूनी दिसले ते अंडे रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान पण स्टेजवर बसल्याबसल्या झेलले ते अंडे **सध्याच्या अंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही

आई बाप खरे गुरुंचेही गुरु.

लेखक निश
मंगळवार, 03/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आईबापा विना कोण गुरु मोठा ? पायी असे त्यांच्या देव विसावला. झिजवी देह सदा आई व बाप दुजा गुरु काय करील असे तप? बोट धरुनिया दाखविती जग, स्वसुखे सारुन बाजुसी , जगती आई बाप. करती मोठा त्याग विनामोबदला, असती गुरु माझे आई व वडिल. आई बाप आहेत देवाचेही देव तेच आहेत गुरु पुजनिय. निशदास म्हणे , शोधु नये कधी बाहेरचा गुरु. आईबाप खरे गुरुंचेही गुरु. आईबाप खरे गुरुंचेही गुरु.

गुरु...

मंगळवार, 03/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गुरु रे गुरु तो कसा रे असावा...? न चिडता ओरडता,डबलसीट बसावा पुढुन वहान येता,मागुन बोंब मारावा असा गुरु कमी,मित्र जास्ती असावा धरो कान त्यानी जसा मी चुके रे रडो तो ही जर कान माझा दुखे रे उभयता असे प्रेम नसतो दुरावा डोळे झाकुनी तेथे,प्लस वन भरावा कसे ओळखावे,गुरु श्रेष्ठ आहे जरा मी घसरता,करी तो ही - ह्हे...!
काव्यरस