Skip to main content

कविता

टेंन्शन...

सोमवार, 22/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर झोपलं तरी,नीट झोप लागत नाय...! देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ दिवसभराच्या थकव्यात, असं वाटत असतं... की कधी येकदा रातच्याला,आपलं घर दिसतं... पोटभर जेवून,एकदाचे पसरावे पाय...॥१॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय??? ॥धृ॥ पोटासाठी कामाची वाट,तशिही चुकत नाही... समजा...आयतं मिळालं,तर मग सुखाची काय ग्वाही? सालं...असल्याच विचारानी टेंन्शनला,वेगवेगळे फुटतात पाय...॥२॥ देवाधिदेवा यालाच , टेंन्शन म्हणावं काय???

सावलीत माझ्या

शुक्रवार, 19/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सावलीत माझ्या , सुर्यही विसावला, अमावस्येला आज , चंद्र कसा डोकावला , तु नसता समीप , पाऊसही सोकावला विजेचे येता भान , मागे मग सरसावला भिजवूनी चिंब धरतीला, , तोही मग सुखावला ओटी भरुन हिरवी तिची , तो , क्षणभरी विसावला.
काव्यरस

वसंततिलका

गुरुवार, 18/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : वसंततिलका (वसंत ऋतू. (Spring) त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणी त भ ज ज ग ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. वसंततिलका वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने.(माझे म्रुत्युपत्र) ही सावरकरांची कविता होय. .) कवितेचे नाव : वसंततिलका वृत्त : वसंततिलका कवितेचा विषय :वसंततिलका (Spring) वसंत ऋतू. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक.

'अल्लाह्'- 'अल्लाह्' मधील फरक

लेखक प्रदीप
गुरुवार, 18/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच तरूण मित्रमैत्रिणींच्या तोंडून नसरत फते अली खाँ ह्यांच्या 'अल्लाह् हू' विषयी ऐकले होते. सगळेच ऐकलेले केवळ कौतुकच होते, तेव्हा आज वेळ काढून मुद्द्दाम ते यूट्यूबवर पाहिले/ऐकले. हे संपूर्ण सुमारे पंचवीस मिनीटांचे सादरीकरण आहे. अगदी खरेच सांगतो-- कसेबसे शेवटपर्यंत पाहिले/ ऐकले. कारण जी स्तुति मी ऐकले होती, त्याचे कारण मला कुठेच सापडले नाही, तेव्हा 'आता काही सुंदरसे, आतून हलवणारे येईल, नंतर येईल' असे करत राहिलो. शेवट झाला आणि अत्यंत निराशाच पदरी पडली. एखाद्या गायकाने/ गायिकेचे गाणे, माझ्या मते, नुसते ऐकावे.

आठवण

सोमवार, 15/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण म्हणजे एक प्रवास मनात माझ्या तुझा फ़क़्त सहवास | ती येते काही क्षणासाठी पण हे मग स्वप्न तरी कशासाठी | मन हे खूळ तुझ्या स्वप्नात साजणे कधी येशील माझ्या मनात | -- मयुर

ह्या कन्नडीगांना आलाय माज

गुरुवार, 11/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कन्नडीगांना आलाय माज ह्या कन्नडीगांना आलाय माज तो माज आता काढू मोडून अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ|| लई तुरूंगवास करवला रे तुम्ही काय सहन नाही केलं आम्ही मराठीसाठी किती रक्त वाहवलं ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं लई झालं आता उठला मराठी माणूस पेटून चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१|| अरे गल्या-बोळांना नावं आमची सार्‍या दुकानांना नावं आमची सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या सारी आडनावं आमची आमची बेळगाव महानगरपालीका आमची एका ठरावानं होईल का तुमची? आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन चलार
काव्यरस

मी आणि तू

लेखक रेशा
मंगळवार, 09/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी खोडकर ..माझी बडबड ..माझे प्रेम ..माझी गडबड तू खेळकर .. तुझी धडपड ..तुझा हट्ट ...तुझी तडफड.. मी हळवी .. माझी स्वप्न ...माझा रुसवा ..माझी तगमग तू जिद्दी .. तुझी नजर ..तुझा रुतबा .. तुझी झगमग.. मी चंचल.. माझे लाजणे.. माझी भीती... माझा चंद्र तू खंबीर.. तुझे हसणे.. तू धाडसी .. तुझी रात्र मी स्तब्ध.. तू लुब्ध .. माझे मौन ... तुझी प्रीती.. माझे भांडण..तुझी मिठी.. माझे हास्य.. तुझे आयुष्य

खबरदारी -

लेखक विदेश
मंगळवार, 09/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून, मी थोडातरी विरघळेन, असे वाटले असेल तुला - माझ्या य:कश्चित जिवासाठी तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस... माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस माझ्या कठोर काळजातही ते अश्रू जपून साठवताना - माझी किती तारांबळ होत आहे हे तुला न दिसण्याची मी खबरदारी घेत आहे ! .
काव्यरस

जंगलातले चालणे

रविवार, 07/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
(c) pashanbhed
जंगलातले चालणे
दुर रानात रानात शीळ घुमली कानात पाखरांची किलबील पानात पानात उभा बाजूला डोंगर झरा वाहतो समोर पाणी पिण्यासाठी त्यात सोडले कुणी जनावर शिवालय शांत भग्न गुंतले त्यात मन थेंब थेंब पाण्याचा होई अभिषेक अर्पण होती बरोबर शिदोरी झाली तीची न्याहरी दुपारी होईल काहीबाही त्यालाच काळजी सारी एकटेच चालायाचे स्वत:शीच बोलायाचे जंगल मोठे निबिड निघून एकटेच जायचे आला सुर्य माथ्यावर थेंब घामाचे अंगावर पाय
काव्यरस

द्वंद्व

शनिवार, 06/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जिव्हाळा आसक्ती द्वंद मनामधे मन झाले मिंधे हतबल कुढत बसणे त्यांचा न स्वभाव उरातला घाव साहतो मी कळे ना मजसी ऐसे कैसे झाले प्रश्नांची वादळे घोंगावती मीही ठरविले नाही रडणार सांडती अपार अश्रू परी सुटता सुटता सुटेना हे कोडे झालो आम्ही वेडे जनांसाठी बुडवली गाथा पुन्हा इंदायणी वाचुनीया कोणी संत झाला....???