मालाडचा म्हातारा...

लेखनविषय:
काव्यरस
म्हातार्‍याचे भिरभिर डोळे- आठवणींचा भुगा भुगा छटाक उरले खोड, पोखरी कभिन्न काळाचा भुंगा म्हातार्‍याचे वखवख डोळे- लवथव गोलाई बघती दारु संपला जसा फटाका दावू न शकतो स्फोटभिती म्हातार्‍याचे टपटप डोळे- पापणीत पाऊसमेघ जसा वळीव कोसळतो कधिही तसा कढांचा आवेग म्हातार्‍याचे विझुविझू डोळे- पैलतिरी काऊ बघती कोकुनी हाकारितो अहर्निश उडून जा त्याला म्हणती

किचनमधून ती सांगते

लेखनविषय:
किचनमधून ती सांगते, पोहे करते आहे मी धावत जाऊन, शेंगदाणे तळून देतो किचनमधून ती सांगते, पुलाव करते आहे मी धावत जाऊन, भाज्या बारीक चिरून देतो किचनमधून ती सांगते, वरण करते आहे मी धावत जाऊन, फोडणी करून देतो किचनमधून ती सांगते, चहा ठेवते आहे मी धावत जाऊन, चहा तयार करून घेतो किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो -- घरून काम करताना.

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

काव्यरस
समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात

" समजूत "

लेखनविषय:
जरी नाहीस समोर तू, कायम सोबत असतेस तू .. एकांत रात्री ही सरतात सहज, कारण स्वप्नांमध्ये असतेस तू .. माझ्या ध्यानी मनी वसतेस तू, सुंदर विभ्रम करतेस तू .. कल्पांती नेतील प्रेमदूत माझे, मला मोहित करतेस तू ! वाऱ्याच्या झुळूकेबरोबर येतेस तू , आरशातही पाहताना दिसतेस तू .. पण प्राण अडकतो श्वासात, जेव्हा अवचित कधी दिसतेस तू ! अव्यक्त राहूनही जिंकतेस तू, कधीही कशीही आवडतेस तू .. कोरडी पडली होती जीभ सांगताना, "मला खूप आवडतेस तू" ! थोडी गडबडलीस तू, तरीही माफी मागत होतीस तू .. "मला नाही जमणार" सांगताना, मात्र निर्विकार होतीस तू ! खरी आहेस समजदार तू, माझ्या नकळत मला सांभाळतेस तू .. हळुवार जपल्या हळव्या

तुझे गाणे

मी पाऊस झालो सखे तू माती होशील का? स्पर्शाने माझ्या अलगद तू सुगंध होशील ना? मी दरीत येऊन पडलो तू वारा होशील का? शीर्षासन करून मग मी जग पायाखाली घेईल ना. तू रात्र अबोली हो ना मी चंद्र सखा तुज भेटेल. तू पहाट होशील तेव्हा मी तुझ्याच कुशीत झोपेन. सुख बिंदू झेलायला तू गवताचे पाते हो ना. आयुष्याच्या धक्क्यांना मग मी अलगद सोशीत जाईल. जरी विस्कटली घडी जीवनाची तू अशीच हसरी राहशील? मी वचनाने मज बांधून घेतो हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

ऐसे ऐकिले आकाशी

लेखनविषय:
काव्यरस
(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्हा तारे- भल्या पहाटे फिक्कट होतील- तेव्हा त्यांना तेज त्यातले थोडे थोडे देईन वाटून"

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

मोकळ्या करा पखाली

लेखनविषय:
काव्यरस
परिणती असो वा नियती पानगळीत पाने गळती पण, झाड उन्मळून पडता हा दोष कुणाच्या माथी? बहरून सळसळणारे झाड आपुल्या ताली जमिनीवर पडते तेव्हा ना त्याला उरतो वाली कोमेजून करपून जातील कोवळी फुले त्यावरची वेळीच छाटणी करवून रूजवात करा फुटव्यांची वादळ नवे येण्यापूर्वी मोकळ्या करा पखाली रूजणाऱ्या अंकुरांना घ्या मायेच्या हाताखाली - संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)

चांदणचुरा

वाहावतो चांदणचुरा तुझ्या उंबर्‍याशी दाटतो गहिवर मंद श्वासांशी|| चालतो अनवट वाटा पैंजणांच्या लयीने ऐकतो ह्रदयभाषा नयनांच्या तीराने|| उधळतो चांदणफुले गुंफलेल्या हातांनी झेलतो चंद्रमरवा गंधाळलेल्या मिठीने|| मिटते रात्र मंदफूल गवाक्षी झुले वारा पडते प्राजक्तभूल रंगला चांदणचुरा|| -भक्ती

पद्मश्री बा. भ. बोरकर सादर अभिवादन......

लेखनविषय:
लेखनप्रकार
सेवानिवृत्ती नंतरच्या गोष्टी ज्यांनी माझे मन प्रफुल्लित ठेवलं त्यांपैकी एक म्हणजे मराठी कवीता. शाळेत असताना कवीता फक्त टक्के वाढवण्यासाठी वाचल्या. त्यातील थोड्या लक्षात राहील्या बाकी आयुष्यात टक्के टोणपे खाताना विस्मृतीत गेल्या. सेवानिवृती मुळे वेळच वेळ आणी मराठी पुस्तके, मासिके व अतंरजाला वर वाचण्यासाठी भरपूर साहित्य. जितेंद्र अभिषेकी आवडते आणी " कट्यार व हे बंध रेशमाचे ", नाटकां मुळे जवळून पाहण्याची संधी मिळाली.त्यांचा व बोरकरांचा जवळचा संबध. ते बोरकरांचा उल्लेख नेहमी करायचे. पु ल देशपांडे आणी सौ सुनीताबाईचें यू ट्यूबवर कवीता वाचन आणी मुलाखती व चर्चा पाहिल्यावर उत्सुकता वाढत गेली.
Subscribe to कविता