सहज डोक्यात विचार आला. मिसळपाववर अनेकांनी वृत्तविषयक लेख लिहिले आहेत. पण साधारणत: वृत्त हे पद्याच्या ओळीशी निगडीत असतं, पूर्ण कवितेच्या आकृतिबंधाशी नाही.
.
गझलचा आकृतिबंध (poetic form) बर्यापैकी परिचयाचा आहे. हायकू आहे. पूर्वी लोक सुनीत लिहायचे (मुख्यत्वे शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये). पण याव्यतिरिक्त आकृतिबद्ध कविता मराठीत विशेष दिसत नाहीत.
जगातील साहित्य परंपरांमध्ये अनेक रोचक आकृतिबंध आहेत. मला वाटलं आपण मिसळपाववर आव्हानमाला चालू करायला हवी.
राजवंशी
वणव्यात भार गवताचे ते टाकुन गेले
वाहत्या गंगेत कसे हात धुऊन गेले
अंधार शोधण्या ते दीप घेऊन आले
आसवांच्या गावाला हुल देऊन गेले
रिक्त तर्कांची मते हाती घेऊन आले
भाट अर्थहीन शब्दांचा ढोल बडवुन गेले
घेऊनी विजय मनीषा हात जोडून आले
आणीबाणीत सारे कसे पांगुन गेले
उदकाहूनी निराळे तरंग मानून गेले
राजवंशी थाटात दिंडित राहुन गेले
- राहत
आतापर्यंत भूलचुकीमुळे काही काव्यशास्त्रविषयक लेख "जे न देखे रवी" मध्ये लिहीत होतो. कालचा लेख इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. क्षमस्व!
---
मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.
या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो
---
या लेखाच्या व्याप्तीच्या बाहेर:
१.
मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे.
.
या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत
१. हर्फ गिराना काय प्रकार आहे
२. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो
तुझ्या घरातले अनारसे
कधी खायला मिळतील?
माझ्या घरातले लाडू
आता कधीही फुटतील!!
तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या
मला चहा बरोबर चालतील
आमच्या चिवड्यांचे डबे
आता रिकामेच राहतील
तुझे ते चिरोटे (२)
कायम लक्षात राहतील
माझ्या त्या कडबोळ्या
वातड होऊन जातील
तुझ्या या फराळाला
घरातले ही 'दात' देतील
उन्हात टेरेसवर वाळवून
वर्षभर पुरवून खातील...
बोलणं होतंय, कळणं नाही.
पाहणं होतंय, रमणं नाही.
ऐकणं होतंय, समजणं नाही.
धावणं होतंय, थांबणं नाही.
भेटणं होतंय, मिसळणं नाही.
फिरणं होतंय, शोधणं नाही.
आठवणं होतंय, विसरणं नाही.
वाचणं होतंय, उमगणं नाही.
किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र
मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र
थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र
रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र
जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?
गंध साऱ्या पाकळ्यांना
जागवे जो जाणीवांना,
मोगऱ्याचे उमलणे,
सोसते का नकारांना ?
मोहण्याची हौस नाही
त्याविना जीणेच नाही
जगे कसा जीव कोरा
रंग ज्यात उरलेच नाही ?
विरहगीत हाय रे !
सुमन कसे सावरे
मधुप का स्तब्ध होई
पंख रोखून बावरे ?
हा उत्सव नित असे
दैवयोग मग हसे
गळून गेल्या आसवांना
प्रणय कोणाचा पुसे ?