मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

शब्द

विश्वव्यापी ·
लेखनविषय:
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार शब्दांची घरटी , शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी..

अरे या ना रे

जव्हेरगंज ·
लेखनविषय:
काव्यरस
अरे या ना रे कि जीव गेला कि जग गेलं, झोपा रे अरे या ना रे की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे ना सांज ना सकाळ, सगळा अंधारच अंधार आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा ना अंधरुन ना रजाई ना उतरण ना चढाई आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे जळतच गेली जळत जळत गेली दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी नाही विझली नाही विझली हवेनेही नाही विझली ही जिंदगी एक फुंकर मारली सगळा धूर ऊडून गेला तो श्वास होता, एक ध्यास होता जो घेऊन गेला, सत्यानाश होता मायेच्या काळजाचा एक नाद होता अरे या ना रे ============================ सौजन्य: https://m.youtube.com/watch?v=

एका प्रेमाची गोष्ट

विश्वव्यापी ·
लेखनविषय:
विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा, झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा. आठवतो मज दिवस तो पहिला ,जेव्हा आपला परिचय झाला , परिचयाच्या या वाटेवरुनी ,प्रेमाचा अंकुर उमलला.

धुक्यात हरपले कुंचले

पालीचा खंडोबा १ ·
लेखनविषय:
खारीचं शेपूट अलगद फिरावं तसा तो कुंचला फिरवायचा दरीत कोसळल्या संध्येचे रंग चोरून कागदावर उतरवायचा त्यात थोडसं धुकं भरून. मी मात्र अनामिष डोळ्यांनी न्याहाळायचो फिरत्या रंगांचे गूढ अन त्याच्या ,ओठात , बोटात अडकलेला कुंचला. मनाला आर्त साद घालणारी त्याची ती रंगसंगती बेभान करायची डोळ्यातल्या आसवांची कासवे डोळ्यातच मरायची, मात्र एक अनामिक हूरहूर आसमंत भारून टाकायची.

एल्गार स्वरांचा

महासंग्राम ·
लेखनविषय:
काव्यरस
पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा स्वप्नांवर ताबा केवळ चांदण्यांचा पाखरे अशी येतात कुठून येथे साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा काल पर्यंत होते सारे षंढ इथे आज होतो एल्गार स्वरांचा जगतानाच त्यांनी जाळले मला इथे मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा #जिप्सी

बाबा तू चुकला रे

मित्रहो ·
(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो.

तुमुल कोलाहल कलह मे - एक अलौकिक काव्य.

शान्तिप्रिय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही कविता केवळ अलौकिक असतात. त्यातिलच ही एकः जयशन्कर प्रसाद यान्ची शब्दरचना , आशा भोसले यान्चा सुम्॑धुर आवाज आणि जयदेव साहेबान्चे अप्रतिम सन्गीत यामुळे ही कविता हिन्दि भाषेला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. ही कविता आणि मला उमगलेला तिचा भावार्थ देत आहे.

माहिती हवी - तळपते विक्रम संहारिणी

कहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी (जेव्हा लोक सकाळी रेडीओ ऐकत कामे आवरत ) त्याकाळी रेडीओ वर एक गाणे लागायचे . त्याचे शब्द पूर्ण लक्षात नाहीत पण ध्रुवपद "तळपते विक्रम सौदामिनी / संहारिणी" असे काहीसे होते. अभिमन्यूच्या चक्रव्युहातील पराक्रमाचे वर्णन या गाण्यात केले होते. त्यावेळी इतके लहान होतो कि या गाण्याचे गीतकार, गायक लक्षात ठेवण्याचीही अक्कल नव्हती. पण मनाच्या गाभार्यात लुप्त झालेली चाल आणि अस्पष्ट शब्द पुन्हा ओठावर येऊ लागले " द्रोण कृप … …. शल्य जयद्रथ , दुर्योधन …. … कर्ण महारथ, तरी तयाचे कौतुक झळके द्रोणांच्या लोचनी , तळपते विक्रम सौदामिनी" या गाण्याबद्दल कोणाला काही आठवण / माहिती असेल तर कृपया सांगा.

| विस्थापित वेदना |

पालीचा खंडोबा १ ·
लेखनविषय:
घे हळूच जाताना चुलीतील काही निखारे भर हीमवर्षावातही तरंगतात एकाकी शिकारे | निर्वासित म्हणूनी जाताना घे इथली थोडी माती डोंगरातील भग्न देवळे तुझ्या वाटेवर नजर लावती | लपून हळूच जातांनाही ठेव उघडे कवाड भावना गोठलेल्या गावात घरासही पडू दे गार | विसरू नकोस जाताना आहे पाठीशी पीर थोडेसे दान देऊनी जा वाट पाहील फकीर | पांढ-या कच्च बर्फात रक्तही दिसे ठसठशीत कितीही भय पसरू दे जा फकिरच्या कुशीत | भय पसरविणा-या काळाचा आहे फकिरास राग वेशीवरच्या उजाड मारुतीस काढू दे तुझा माग | फार जाऊ नको दूरवर जरी जाहलास विस्थापित यायचे आहे परत तुला बर्फ पडणा-या गावात | विजयकुमार ०७.०६.२००६

अमृतप्याला

वेल्लाभट ·
ब्लॉग दुवा हा कविता - अमृतप्याला प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0 www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html ---------------------------------------------------------------- अमृतप्याला आज ऐकुनि रुचले नाही काय म्हणावे सुचले नाही दिला ठेवुनि फोन तसाचि जे झाले ते पचले नाही दिशाहीन मी चालत सुटलो विचार मागे रेटत सुटलो दगडा दगडा मधे तरीही तुलाच वेडा भेटत सुटलो जावे वाटे घरी नकोसे हवे हवे ते जरी नकोसे विचार होती लाखो गोळा माझे असले तरी नकोसे इथेच बसुनि राहिन आता जलाशयाच्या या काठाला बुडत्य