Skip to main content

कविता

अरे या ना रे

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 01/12/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
अरे या ना रे कि जीव गेला कि जग गेलं, झोपा रे अरे या ना रे की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे ना सांज ना सकाळ, सगळा अंधारच अंधार आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा ना अंधरुन ना रजाई ना उतरण ना चढाई आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे जळतच गेली जळत जळत गेली दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी नाही विझली नाही विझली हवेनेही नाही विझली ही जिंदगी एक फुंकर मारली सगळा धूर ऊडून गेला तो श्वास होता, एक ध्यास होता जो घेऊन गेला, सत्यानाश होता मायेच्या काळजाचा एक नाद होता अरे या ना रे ============================ सौजन्य:
काव्यरस

एका प्रेमाची गोष्ट

लेखक विश्वव्यापी यांनी मंगळवार, 01/12/2015 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा, झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा. आठवतो मज दिवस तो पहिला ,जेव्हा आपला परिचय झाला , परिचयाच्या या वाटेवरुनी ,प्रेमाचा अंकुर उमलला.

धुक्यात हरपले कुंचले

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 01/12/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
खारीचं शेपूट अलगद फिरावं तसा तो कुंचला फिरवायचा दरीत कोसळल्या संध्येचे रंग चोरून कागदावर उतरवायचा त्यात थोडसं धुकं भरून. मी मात्र अनामिष डोळ्यांनी न्याहाळायचो फिरत्या रंगांचे गूढ अन त्याच्या ,ओठात , बोटात अडकलेला कुंचला. मनाला आर्त साद घालणारी त्याची ती रंगसंगती बेभान करायची डोळ्यातल्या आसवांची कासवे डोळ्यातच मरायची, मात्र एक अनामिक हूरहूर आसमंत भारून टाकायची.

एल्गार स्वरांचा

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 01/12/2015 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा स्वप्नांवर ताबा केवळ चांदण्यांचा पाखरे अशी येतात कुठून येथे साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा काल पर्यंत होते सारे षंढ इथे आज होतो एल्गार स्वरांचा जगतानाच त्यांनी जाळले मला इथे मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा #जिप्सी
काव्यरस

बाबा तू चुकला रे

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 01/12/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो.

तुमुल कोलाहल कलह मे - एक अलौकिक काव्य.

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 30/11/2015 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही कविता केवळ अलौकिक असतात. त्यातिलच ही एकः जयशन्कर प्रसाद यान्ची शब्दरचना , आशा भोसले यान्चा सुम्॑धुर आवाज आणि जयदेव साहेबान्चे अप्रतिम सन्गीत यामुळे ही कविता हिन्दि भाषेला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. ही कविता आणि मला उमगलेला तिचा भावार्थ देत आहे.

माहिती हवी - तळपते विक्रम संहारिणी

लेखक कहर यांनी सोमवार, 30/11/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी (जेव्हा लोक सकाळी रेडीओ ऐकत कामे आवरत ) त्याकाळी रेडीओ वर एक गाणे लागायचे . त्याचे शब्द पूर्ण लक्षात नाहीत पण ध्रुवपद "तळपते विक्रम सौदामिनी / संहारिणी" असे काहीसे होते. अभिमन्यूच्या चक्रव्युहातील पराक्रमाचे वर्णन या गाण्यात केले होते. त्यावेळी इतके लहान होतो कि या गाण्याचे गीतकार, गायक लक्षात ठेवण्याचीही अक्कल नव्हती. पण मनाच्या गाभार्यात लुप्त झालेली चाल आणि अस्पष्ट शब्द पुन्हा ओठावर येऊ लागले " द्रोण कृप … …. शल्य जयद्रथ , दुर्योधन …. … कर्ण महारथ, तरी तयाचे कौतुक झळके द्रोणांच्या लोचनी , तळपते विक्रम सौदामिनी" या गाण्याबद्दल कोणाला काही आठवण / माहिती असेल तर कृपया सांगा.

| विस्थापित वेदना |

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी सोमवार, 30/11/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
घे हळूच जाताना चुलीतील काही निखारे भर हीमवर्षावातही तरंगतात एकाकी शिकारे | निर्वासित म्हणूनी जाताना घे इथली थोडी माती डोंगरातील भग्न देवळे तुझ्या वाटेवर नजर लावती | लपून हळूच जातांनाही ठेव उघडे कवाड भावना गोठलेल्या गावात घरासही पडू दे गार | विसरू नकोस जाताना आहे पाठीशी पीर थोडेसे दान देऊनी जा वाट पाहील फकीर | पांढ-या कच्च बर्फात रक्तही दिसे ठसठशीत कितीही भय पसरू दे जा फकिरच्या कुशीत | भय पसरविणा-या काळाचा आहे फकिरास राग वेशीवरच्या उजाड मारुतीस काढू दे तुझा माग | फार जाऊ नको दूरवर जरी जाहलास विस्थापित यायचे आहे परत तुला बर्फ पडणा-या गावात | विजयकुमार ०७.०६.२००६

अमृतप्याला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 30/11/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा कविता - अमृतप्याला प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0 www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html ---------------------------------------------------------------- अमृतप्याला आज ऐकुनि रुचले नाही काय म्हणावे सुचले नाही दिला ठेवुनि फोन तसाचि जे झाले ते पचले नाही दिशाहीन मी चालत सुटलो विचार मागे रेटत सुटलो दगडा दगडा मधे तरीही तुलाच वेडा भेटत सुटलो जा

मावळत्या या संध्याकाळी ....

लेखक सत्य धर्म यांनी रविवार, 29/11/2015 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
मावळत्या या संध्याकाळी ....
मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना.... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. मावळत्या या संध्याकाळी, सूर्य बिम्ब ते लाल गुलाबी, क्षणभर ते रंग उधली आण हळूच होई क्षितीजाखाली. मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. मावळत्या या संध्याकाळी, काय वाटे त्या सुर्याला, उगावत्यास नमस्कार मावळत्यास पाठ करी हीच जगाची रित खरी. मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. - स्वागत
काव्यरस