स्मरणातल्या बाप्पा

लेखनविषय:
काव्यरस
बाप्पाला आणायचात तुम्ही भक्तीनं अन् हौसेनं तुम्ही देखणे आणि बाप्पाही आम्ही पळायचो मस्तीनं आताच्यासारखी तेंव्हा सजावट नसायची खूप जुन्याच मोत्याच्या माळेने बाप्पांचं खुलायचं रूप एक रंगीत लाईटचा दिवा तुम्ही सांभाळून लावलेला बाप्पांपुरताच कोनाडा डिस्टेम्परने सजलेला मोठमोठ्यानं म्हणायची तुमच्यासोबत आरती शब्द विसरायचा एखादा नजर जायची खालती भूलवायचा आम्हाला मोदकांचा ढीग घरोघरच्या प्रसादाची लावायची रीघ जुनाच कागदाचा पंखा आणि टिकल्यांचे तोरण त्या रत्नांच्या क्षणांचे सतत होते स्मरण दहा दिवस जायचे कसे भुर्रकन उडून विसर्जनाच्या दिवशी घ्यायचे गुपचूप रडून बाप्पांचा निरोप घ्यायला मुद्दाम लावायचा वेळ कळायचा न

नोटबंदीचे अभंग

एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।। कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी। निकडीची रोकड मग। निघतीया।। रांगेत बहु जन। स्वतःचेच धन। घामेजलेले तन। ताटकळ्या।। ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच। शिव्या कचाकच। निघतीया।। ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी। तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।। एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का। 'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।। सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास। काय ३१ डिसेंबरास। करतोया??? - भारी समर्थ!

शोर

लेखनविषय:
शोर एक बैरागी के मन का एक शोर, न पा सका खुद को न पा सका भगवान को, बस टूटता बिखारता चालता गया, न थम सका शोर न थम सकी सासें, बुंद, बुंद टपकाता शोर रुह को चिरता शोर, बैरागी थक गया शोर से छाल गया, गुमनाम शोर को साथ लकेर सो गया............ - अबोली

(नाक गळतंय माझं..)

लेखनविषय:
प्रेरणा (मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..) नाक गळतंय माझं तसं ते नेहमीच गळतं पण पाऊस आला की येतात जोराच्या दोन चार शिंका अन नाक येते कफही होतो जरासा नाक गळतंय माझं रुमाल ओलागिच्च झालाय केंव्हाचं तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची हाताशी व्हिक्स आहेच पण विकोरील मिळेना.. जौदे ,निचरेल ...

घर गळतंय माझं.....

काव्यरस
घर गळतंय माझं तस ते नेहमीच गळत पण पाऊस आला कि उडतात छतावरच्या दोन चार काड्या अन पाऊस येतो आत येतो जोराचा घर गळतंय माझं थेंबाच शहर झालाय पाण्याने तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची छताला भोक आहेच पण जमिनीला करतेय निचरेल ...

मुळांनी धरू नये अबोला

लेखनविषय:
मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे? - संदीप चांदणे

रस - रस - रसायन

लेखनविषय:
रस - रस - रसायन [रसायनंसर्वत्रचआहेतअनादिकालापासूनमगमनुष्यआलामनुष्याचीप्रगतीझालीरसायनशास्त्राची देखीलपाळण्यापासूनसरणापर्यंतरसायनंमाणसाचीसोबतीझालीसुंदरकुरूपतरुणवयस्ककुठल्याही प्रकारच्यामाणसालाभूकलागतेतेव्हा जठरातकाहीरसायनंस्त्रवतअसतात ] सकाळ पासून खोलीत कसलासा वास येतो अर्धवट झोपेतच हा वास नाकात घुसतो आणि ढिले पडलेले न्यूरॉन एकदम धावपळ करू लागतात कसला हा उग्र वास , याचा शोध घेऊ लागतात झोप चाळवते , स्वप्नं तुटतात जिना धुताना कोणाकडून तरी रसायनाची बाटली फुटते बिल्डिंग भर त्याचा गन्ध भरून राहतो फिकट हिरव्या रंगाच्या या बाटलीवर मोगऱ्याची फुलं आहेत पण भस्सकन रसायन सांडल्यावर मोगऱ्याच्या फुलांचा म

सय संद्याकाय

लेखनविषय:
झाली सय संद्याकाय दिवे लाव्याचा वखतं वाट पायता राघुची तोंड चाललं सोकतं डोये फाळूनं फाळूनं काय वाटी नं पायतं धंदा पळला घरात जीव काहाले जायतं? चिळ्या रायल्या भऱ्याच्या झाला किती वारखोळं राघू साठी मैना तूहं कुठी अळलं व घोळं? अशी तिसऱ्या पायरी बस्तं धरूनं ऊंबठा तोही झिंजते घासूनं तूह्या पायाचा आंगठा नंदा ईचारती तव्हा होटं उलतच नाई आता काहाले दाठ्ठ्यातं ऊभी रायतं व बाई?
Subscribe to कविता