ये, दिग्बन्ध तोडून ये, आजच्या कविते
ओसन्डत, फुफा॑डत, अनावर ये
भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश
कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पि॑जर्यावर
एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्य्॑त
घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी
एकच क्षण था॑ब,
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कफन घालून येतो
अता ही भेट टळणे शक्य आहे
(तुझे मजला वगळणे शक्य आहे)
जरासा जोर लावावास अजुनी
पहा माझे निखळणे शक्य आहे
नको इतकी मुजोरी आरशावर
तुझेही रुप ढळणे शक्य आहे
असे येऊ नये वेळीअवेळी
(कुणी काही बरळणे शक्य आहे)
जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या
तुझी काया वितळणे शक्य आहे
तुला पाहून येथे एकटीला
फुलांचे बावचळणे शक्य आहे
डॉ. सुनील अहिरराव
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला
दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला!
होती कथा विराणी,झाली गझल रुमानी
बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला!
शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन्
एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!
केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो
कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला!
टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी
बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला!
ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे
प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला!
केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी
हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला!
—सत्यजित
काही कविता मनात अलगद उतरतात, काही कविता अगदी खोलवर रुततात..
काही कविता हातात येता येता सूळ्ळकन निसटतात तर काही धडधडत वेगाने डोक्यावरून जातात
काही मनाला पटतात तर काही पटुनही नकोशा वाटतात
काही टच्चकन डोळ्यात पाणी आणणार्या, काही मात्र फक्त शब्द उधळणार्या...
काही कविता अंतर्मुख करणार्या तर काही कविता सुंदर पण परकाश्या वाटणार्या
काही असतात फील गुड कविता तर काही असतात 'काहीही हं' टाईप्स कविता
....
काही कविता मात्र सहज समजतात, मनमोकळ्या भेटतात, लयीत गुंफतात, जिभेवर वसतात, मनात भिनतात.....या कविता 'आहा..क्या बात है' अशी उत्स्फूर्त दाद क्षणार्धात घेऊन जातात!!
अशीच एक नितांत सुंदर कविता-- मिपाक
भंगलेल्या रात्री, किती जागवाव्या लागल्या
संवेदना हळव्या, किती चुरडाव्या लागल्या
प्राणांतिक वेदना, किती सोसायला लागल्या
अस्तित्वाच्या खुणा, किती जपाव्या लागल्या
तळहाताच्या रेषा, किती बदलाव्या लागल्या
हृदयातल्या जखमा, किती उघड्या कराव्या लागल्या
शब्द शब्दांना दिला, किती कविता कराव्या लागल्या
चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!
जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर हा कमजोर आहे!
तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!
ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!
जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!
वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!
—सत्यजित
चिउताई विणते सुरेख घरटं
तिला कुठे हव असते कुणाच कौतुक
कुणाचा support
किंवा एखाद पारीतोषिक..
ती बनवत असते आपल घरटं..
आपल्या चिमुकल्यासाठी
त्यांच्या काळजीपोटी.....
ती नाही हेवा करत..
आपल्यापेक्षा मोठ्या घरट्याचा
किंवा हट्ट नाही करत
मला अगदी सुगरणीचाच हवा खोपा
कारण तिला तिची झेपही माहीत आहे
आणि priority देखील...
माणसां सारखी वेडी नाही ती
जीवघेणी स्पर्धा करायला..
निर्जीव वस्तुंच्या मागे धावताना
जगणं ओवाळून टाकायला