मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

॥ रमू नको या जगात ॥

खिलजि ·
लेखनविषय:
काव्यरस
रमू नको या जगात दुःखांचा राजा तू दुःख कनवटीला असे घे दुःखांची मजा तू विरह असो , प्रेम असो असो प्रेमाचा भंग तो कुणीही तुला काही म्हणो तू मात्र अभंग हो जळो कुणी , कुणी मरो जगण्यात काय ते जळीस्थळी दुःख ज्याला त्याला मरण्यात काय ते दुःख दुःख दुःख कुणी पहिले नसेल ते सुख सुख सुख कुणी स्पर्शिले नसेल ते वंद तू धर्मास या कर्माचे मर्म जाण मोक्ष असा ना मिळतो विरहाचे कर्मकांड अंतरी तू शोध घे विरहाचे काय ते सोड वस्त्र देहाचे आत्म्याचे पाय ते उडून जा किरणासम भेद घे तू आत्म्याचा मोक्ष प्राप्त होई तुज आवाज हा परमात्म्याचा सिद्धेश्वर विलास पाटणकर C

<नाव सुचवा>

निशांत_खाडे ·
लेखनविषय:
तुझ्या त्या निरागस आनंदामागेही थोडेसे बालिश शौर्य असेल बहुतेक बागेत सापडलेल्या नारळाला धागे बांधून बनवलेले टेलिफोन मी झोपी गेलो तू तरीही बोलतच राहिलास तू बोललास मरणाला काय घाबरायचे? मुलींचे कपडे घालून काढलेल्या फोटोंची मात्र तुला भीती वाटत असावी. नाहीतर कुलूप लावून पेटीत का लपवले होतेस? खरेतर ज्या दिवशी तू निघून गेलास, तेव्हा मला वाईट वाटले नाही. जेव्हा तू गाडीचा दरवाजा धाडकन बंद केलास मी सुखावलो होतो जरासा.

सोनरंग

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी

सुदाम्याचे पोहे

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
पुन्हा पुन्हा लिहितात, अन पुन्हा पुन्हा खोडतात, दिवसभर मोबाईलशी, हात, खेळत बसतात. मनातले शब्द शेवटी मनातंच रहातात.. माणसं दूर जातात.. पण आठवणी जवळ राहतात टाईमलाईनवर जाऊन, डोळे नुसतेच रेंगाळतात. सुदाम्याचे पोहे कधीकधी कनवटीलाच रहातात..

मी माझा

दिपोटी ·
लेखनविषय:
‘आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे रहातो खालच्या मानेने आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी’ बेलवलकरांच्या अस्तित्वाचा गाभारा नीरव-अतीव शांततेने केव्हा भिजणार? कोलाहल हा कधी थांबणार? काळाचा ओघ कधी थिजणार? सत्वाची विटंबना स्वत्वाचे विडंबन अजस्र महाकाय बीभत्स प्रचंड गदारोळात जो तो आपला मी माझा - दिपोटी

मुक्तपीठ

चुकार ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रवास खडतर, सापडेना वाट ती. वाटसरु नवे, हरदिवस भेटती. रोज नवा प्रश्न उभा समोर ठाके, थांब जरा, घे उसासा मन माझे सांगे. जुळता बंध नात्यांचे, कधी हेच धागे गुंतता, बाकी निसटून जाती एक सांधता साधता. वाटे व्हावे फुलपाखरू, मनमोकळे हुंदाडवे. स्वप्नांचे ओझे डोईपरी हलके व्हावे. विशाल आसमंत फिरुनी यावा एकदा, भरारीला बळ मिळावे मग पुन्हा एकदा. भुईचा भूचर कधीतरी पाखरू व्हावा, निर्भय, निश्चिंत, स्वच्छंदी, अनंत तो उडवा. वाटे द्यावे झुगारून सारे बंध. निखळून जावे साखळदंड. हुंदडणाऱ्या अल्लड मनास... मिळावे एक मुक्तपीठ....

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

सत्यजित... ·
लेखनविषय:
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा! कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा! कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा!

डू-आयडीज् खूप दिसतात इथे, परतुनी येती "नाना"विध रूपे

चामुंडराय ·
डू-आयडीज् खूप दिसतात इथे परतुनी येती "नाना"विध रूपे स्कोअर सेटल होतात इथे ट्रोलिंग जणू हक्कच असे कंपू करून पीडतात इथे पिंक टाकणे हेच ध्येय असे अजेंडा घेऊन येतात इथे काडी सारून नामानिराळे कसे विवादास्पद विषय प्रिय असे धागा पेटवून मजा बघती कसे अनेकानेक आयडीज् तयार असे एक उडाला तरी चिंता नसे मतामतांचा गलबला इथे मज जैसे सज्जन थोडेच असे

सैल नसू दे मिठी जराही!

सत्यजित... ·
अंगांगाची झाली लाही... सैल नसू दे मिठी जराही! मेघामाजी उनाड तडिता तू सागर मी अवखळ सरिता मला वाहू दे तुझ्या प्रवाही... सैल नसू दे मिठी जराही! पदरामधुनी लबाड वारा घिरट्या घालत फिरे भरारा गंध तनुचा दिशांत दाही... सैल नसू दे मिठी जराही!

सैल असावी मिठी जराशी...

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
काव्यरस
सैल असावी मिठी जराशी, हळूच वळुनी तुला बघाया, अर्ध्या मिटल्या तव नयनांचे, ओले हळवे चुंबन घ्याया.. रेशीम काळे केस उडोनी, कुरळ्या लाटा बाहुंवरती, मऊ मुलायम आखीव रेखीव, घटद्वयांना व्यर्थ लपवती... जरा विसावून सिंहकटीवर, मधूर मादक श्वास फुलावे, अधीर कोडे या विश्वाचे, गहि-या डोही उकलून यावे.. पहाटवारा लगबग करतो, घेऊन येतो थोडे केशर, स्वर्णीम करतो शर्मिल गाला, तलम तृप्तीचे शिंपून अत्तर.. ( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)