हे ही खरंय !
मनात नेहमी तीच हुरहूर
काहूर करून टाकणारी !
तीच आठवण मन व्यापून टाकणारी ,
रोज आठवण काढायलाच हवी ....... असं नाहीये खरं तर
पण रोज आठवण येते ..... हे ही खरंय !
पाण्याने वाहतं असलं पाहिजे
त्याने सगळं पुसलं गेलं पाहिजे
डोळे, मन, अंगण, आभाळ
ते नेहमी भरून वाहीलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर
पण रोज आसवे भिजवून जातात ..... हे ही खरंय !
विरह विसरता आला पाहिजे,
नवा डाव मांडता आला पाहिजे,
आचारात, विचारात, वागण्यात, जगण्यात,
नेहमी हसणं जमलंच पाहिजे....... असंही नाहीये खरं तर
पण रोज हसून फक्त क्षण साधायचे ......