Skip to main content

कथा

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 14/05/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल. अर्थात थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे. मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते. मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता. म्हणून त्या मैदानाला लोक स्टीफन ग्राउंड म्हणून ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भाड मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पना करणे ही शक्य नव्हते.

अट्टाहास

लेखक रातराणी यांनी सोमवार, 11/05/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आना वॉक करून परत आली आणि रोजच्या सवयीने तिने सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद केले. म्हणजे ती अंधाराला घाबरत वगैरे नाही पण असा खिडकीतून बाहेर बघितल्यावर दिसणारा काळोख तिच्या अंगावर येतो. मोठ्या हौसेन, एकांतात राहायचं म्हणून ती या घरी राहायला आली. दिवसा उजेडी छानच वाटत ते. छोट्याशा टेकडीवरच टुमदार घर, समोर पसरलेला विशाल समुद्र, त्याच्या काठावर डोलणारी नारळाची झाडं, अगदी चित्रात असतं तसच! पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती या घराच्या. तिच्या या विचाराच हल्ली तिला स्वतःलाच हसू येत. पहिल्याच भेटीत ती कुठल्या मुलाच्यादेखील प्रेमात पडली नाही. पण या घरी आली आणि तिला वाटल, आपलीच वाट पाहत थांबल होतं इतके दिवस.

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?

डब्यातलं तत्त्वज्ञान भाग २

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/05/2015 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
डब्यातलं तत्त्व्ज्ञान भाग १ आम्ही दोघंजण जिना उतरलो कमी, आणि उड्या मारत जास्त आलो. ट्रेन कधी निघेल काही सांगता येत नव्हतं. उशीर झाला होता तिला. मला उशीर झाला नव्हता, पण मी आपला उगाचच गंमत म्हणून तिच्याबरोबर धावत निघालो. लेडीज डबा बराच पुढे होता. त्यामुळे ती साहजिकच जास्त जोर लावून पळत होती. पण तिची मजल ट्रेन निघायच्या आत जास्त पुढे गेली नाही. मी तिच्या पुढून धावत होतो. ट्रेन निघाली तेव्हा मी जवळ जवळ फर्स्ट क्लासपर्यंत पोचलोच होतो. पण ती चढल्याशिवाय मी चढणार नव्हतो. मला चढायचंच नव्हतं. तिच्याबरोबर थांबायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं.

रतीब

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 08/05/2015 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून शांताच एक काम हलक झाल होत, ते म्हणजे चंद्रीला चरायला नेण. दिगूने मोठ्या उत्साहाने ते काम अंगावर घेतलं होत. रोज दुपारी त्याचा मित्रांबरोबर कधी विटी दाण्डुचा डाव रंगत होता तर कधी पत्त्याचा. खेळ संपले की मग कैर्या, चिंचा पाडण, त्या मीठ लावून खाण आणि मग विहिरीत डुंबत बसण असा त्याचा उद्योग सुरु असे. संध्याकाळ झाली कि तो चंद्रीला घरी घेऊन येई. तोपर्यंत शांता कधी घर सारवून घेई, तर कधी दळण नीट करून ठेवायची. कधी बायका वाळवण करायला बोलवायच्या मग त्यांना जाऊन मदत करायची. आजही असाच दिगू चंद्रीला रानाकड घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ शांता धुण घेऊन गेली होती.

"नोकरी" - एक चित्रपट

लेखक वटवट यांनी गुरुवार, 07/05/2015 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रस्तुत प्रसंग आणि सर्व पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा आढळून आल्यास तो एकमात्र योगायोग समजावा)…. "नोकरी" रात्रीच्या चांदण्यांचा एक लूक घेतल्यानंतर, सगळ्यात सुरुवातीला कॅमेरा एका झोपडपट्टीवरून फिरतो… फिरत फिरत तो एका अरुंद अश्या बोळातून पुढच्या दिशेने जाऊ लागतो. जाताना आजूबाजूची दृश्ये खूप बोलकी असतात. एक गलितगात्र म्हातारा (वयोवृद्ध नाही…. म्हाताराच) खोकत असतो, दारात येउन. त्याच्या हातात एक तांब्या असतो, पण त्यात पाणी नसतं…( अरेरे….

विश्वास वासावरचा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/05/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

झोपलेले नशिब

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 05/05/2015 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची. अशीच काही वर्षे गेली. घरात अजुन एक बाळ आले. कोळ्याला वाटायला लागले, सभोवताल बदलतच नाहीये. तीच झोपडी, तेच जुने कपडे. रात्रीची झोप उडाली. एक दिवस स्वप्नात एक म्हतारा आला. स्वप्नात आला कि खरोखर आला हे काय कोळ्याला कळाले नाही. त्याने कोळ्याला सांगितले, की तुझे नशिब झोपलेले आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही, काहीही बदलणार नाही.

मी नाही बोलणार जा.............

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 04/05/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
अवनी आज प्रचंड घुश्श्यात होती. घरी आल्या आल्या तिने सोफ्यावर दफ्तर आपटलं आणि तडक वर आपल्या खोलीत निघून गेली. ज्योती किचनमधुन बाहेर पाणी घेउन येईपर्यंत वरुन धाडकन दरवाजा आपटल्याचा आवाज आला. तिला आजच हे प्रकरण थोड विचित्रच वाटलं. सहसा अवनी अस कधी वागायची नाही. हा थोड़ी हट्टी होती, ती तर सगळीच मुलं ह्या वयात असतात पण इतरांप्रमाणे अवनी कधी आततायीपणा करायची नाही. आईविना पोर म्हणून ती तिच्या आजीची ज़रा जास्तच लाडकी होती एव्हढंच. पण बाक़ी अवनी होती अगदी गोड आणि लाघवी. पूर्वी दंगा करून घर डोक्यावर घेणारी अवनी मम्मा गेल्यापासून मात्र थोडी बदलली होती.

साधु हास्यानंद 2

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 03/05/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणि ते पुढे म्हणाले, ' जो जन्माला येतो त्याला दुःख हे येते पण जगात आनंद ही तेवढाच आहे , मग आपण दुःखाच्या मागे का धावतो.  भुतकाळातील आनंदी क्षण  विसरतो,  दुःखाचे क्षण मात्र लक्षात ठेवतो.  आशा स्थितीत जर वर्तमानात राहीले तर त्याचा परिणाम भविष्यातील जीवनावर होतो.  जर तुम्ही त्याच ठिकाणी आनंदाचे क्षण आठवले तर त्याचा परिणाम तुमच्या वर्तमान जीवनावर होईल,  आणि सहाजिकच तुमचा भविष्यकाळ सुदंर आसेल, ' हे ऐकल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसु लागला.