Skip to main content

इतिहास

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी बुधवार, 27/08/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

नाहि चिरा...नाहि पणती....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

बर्ट्रांड रसल, माझा सर्वात आवडता लेखक

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 21/08/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर> बर्ट्रांड रसल (Bertrand Russell) हा माझा सर्वात आवडता लेखक असल्यामुळे माझी मतं आत्यंतिक (चांगली) असण्याची शक्यता वाढते. मला संदर्भ म्हणून हा लेख लिहायचा नाही, तर फक्त एक ओझरती ओळख म्हणून! माहितीजालावर त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती अर्थातच आहे आणि अनेक मिपाकरांना रसल आधीच माहित असेल. तर हा लेख त्यांच्यासाठी ज्यांना रसलबद्दल माहिती नाही, किंवा फक्त नावच ऐकून आहेत. थोडी माहिती या माणसाबद्दल आणि थोडी त्याच्या काही पुस्तकांबद्दल!

हौतात्म्याची शताब्दी आणि अजरामर हौतात्म्यगीत

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 11/08/2008 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानातील १८५७ साली भडकलेला क्रांतिचा वणवा शमला कि काय असे वाटत असतानाच विसावे शतक सुरू झाले आणि भारतमातेला मुक्त करण्यासाठी हिदुंस्थानातील क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा क्रांतिदेवतेची आराधना सुरू केली.

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार

लेखक चिन्या१९८५ यांनी बुधवार, 06/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते.

रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारा

लेखक चिन्या१९८५ यांनी सोमवार, 07/07/2008 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .खालील लेख माझ्या ब्लॉगवर व माबोवर मार्चमधे टाकण्यात आला होता. मिसळपावच्या सदस्यांनाही आमच्या उपक्रमाबद्दल कळावे म्हणुन येथेही टाकत आहे. निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी || या भुमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही | महाराष्ट्र धर्म राहीला काही | तुम्हांकरीता || यशवंत,किर्तीवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत अशा जाणत्या राजा शिवछत्रपतींची ,सोमवार दिनांक २४ मार्च रोजी जयंती होती. अशा या महाराष्ट्र गौरवाच्या .. नव्हे ,नव्हे संपुर्ण भारत गौरवाच्या दिवशी आम्ही उत्सव साजरा करायचा असे ४ वर्षापुर्वीच ठरवले.

रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर.....एक झलक.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 27/06/2008 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले ! आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती !

बावीस जून!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 22/06/2008 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज बावीस जून! काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना ह्या दिवशी घडल्या आहेत, त्या॑चा हा धा॑डोळा.. १) २२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला. सार्वभौम ब्रिटीश सत्तेवर प्रहार झाला. भारतीय स्वात॑त्र्यलढ्यातील एक महत्वाचे पान उलगडले गेले.. २) २२ जून १९४० रोजी फ्रान्सने (दुसर्‍या महायुद्धात) हिटलरपुढे गुढगे टेकले, बिनशर्त शरणागती पत्करली. हिटलरने पहिल्या महायुद्धातल्या पराजयाचा सूड उगवला. ३) २२ जून १९४१ रोजी हिटलरने रशियावर स्वारी केली (ऑपरेशन बार्बारोसा). ही त्याची लष्करी घोडचूक ठरली.