नमस्कार मंडळी,
आताच लोकसत्ताची इ-आवृत्ती चाळत असताना मला टिळकांनी १८ सप्टेंबर १८९४ रोजी केसरीमध्ये लिहिलेला अग्रलेख वाचायला मिळाला. आपण सर्वांनी तो वाचावा असे वाटल्याने त्याचा इथे दुवा देत आहे.
http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm
या लेखात त्यांनी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे वर्णन केले आहे. तसेच शेवटच्या दिवशीच्या मिरवणूकीचे सुद्धा वर्णन दिसेल. त्यात भक्तीरसाने म्हटलेली पदे वगैरे उल्लेख बघुन गहिवरून आले. भक्तीरस, प्रेमानंद वगैरे शब्द ते वापरतात. ते वर्णन वाचण्यासारखे आहे. कालानुरुप कसे बदल झाले ते जाणवेल.
लेखात पुढे ते सार्वजनिक उत्सावाच्या भूमिकेबद्द्ल थोडे लिहितात आणि सर्व जातीच्या लोकांनी त्यात भाग घेउन एकोपा वाढावा ही त्यांची अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहे असे सुद्धा नमूद करतात.
गणपतीउत्सवाचे थोडे इतिहासातले दाखले देत, हे काही नवेच खुळ नाही असेही सांगतात.
या लेखामध्ये ब्राह्मण-मराठा जातींच्या एकोप्याबद्दल आणि त्यांच्यात फुट पाडायच्या प्रयत्नांबद्दल सुद्धा त्यांनी लिहिले आहे.
नुकतेच मिपावर एका चर्चेच्या शीर्षकात अनर्गल हा शब्द वापरला गेला होता. या लेखात टिळकांनी निरर्गल असाही शब्द वापरलेला आहे. मला दोनही शब्द नवेच असल्याने मनात नोंद झाली इतकेच.
या लेखात गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीतल्या क्रमामध्ये ते म्हणतात पहिला गणपती कसब्याचा आणि शेवटचा श्रीबाबासाहेब महाराज यांचा. तर हा श्रीबाबासाहेब महारज यांचा गणपती म्हणजे नक्की कोणता?
लेखाबद्दल आपली मते सुद्धा जरुर येथे नोंदवावीत ही विनंती.
आपला,
--लिखाळ.
वाचने
3740
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाबासाहेब महाराज
काही बरोबर
In reply to बाबासाहेब महाराज by विकास
धन्यवाद!
In reply to काही बरोबर by मैत्र
आभार
वावा..
लिखाळशेठ, द
आभार
धन्यवाद !!!